गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

समर्थाचिया सेवका वक्र पाहे


समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी कोण आहे /
जयाची लीला वर्णिता तिन्ही लोकी / नु पेक्षा कदा रामदासां भिमानी /

लक्षात घ्या समर्थांचे सांगणे एकाच आहे, समर्थ तारी त्याला कोणीही मारू शकणार नाही. . समर्थासमोर येणे सद्गुरू समोर त्रिगुण देखील फिके पडतात, मायेचे देखील  कांहीही चालत नाही.

सद्गुरूंचा ज्याच्यावर कृपा हस्त आहे त्याचे कोणीही कांहीही करू शकत नाहीआपल्या भक्तासाठी गुपचूप अव्यक्तपणे जाऊन कर्तव्य करून येतील. सद्गुरू कर्तव्य करतात हे कोणाला कळणार देखील नाही. असे जे परमनिधान तत्व ज्यांना तुम्ही सत म्हणतात तेच समर्थतेच सदगुरु सर्वस्व व्यापून अलिप्त असणारे तत्व जळीस्थळीकाष्ठीपाषाणीअसणारे तत्वतीन ताल सप्त पाताल भरूनही उरलेले तत्व मग अशा सताची उपासना करणे योग्य आहे कि नाहीहेच सत सर्वस्व विखुरलेले आहे. त्या सदगुरांच्या नामस्मरणात जर आपण स्थिर झालो तर सदगुरु आपल्याला कदापीही बाजूला सरणार नाहीत. पण मनातले भय मात्र मागे सारा. अशा सदगुरूंचे आपण सेवेकरी आहोत ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. समर्थाचे आपल्या भक्तावर पूर्ण लक्ष असते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: