सोमवार, ४ मार्च, २०१३

नामस्मरण


नामस्मरण - चार वर्ण, अबालवृद्ध स्त्री- पुरुषांना अनुसर्ण्यास सुलभ जाणारे असे अमोघ साधन म्हणजे नामस्मरण होय. याची महती अनेक ग्रंथात वर्णिलेली आहे.सर्व साधू, संताच्या प्रत्ययास आलेले असे हे साधन होय. सर्वांचा त्या वर विश्वास असून इतरांस अनुभव घेण्याचा संतानी अति काकुळतीने उपदेश केला आहे. अशा या नामधनाविषयी संशय घेणे म्हणजे ... पाप होय.

कांही एक भाग्य होते पूर्वजांचे/ पापियांसी कैचे रामनाम//
रामनामे कोटी कुळे उद्धरती/ संशय धरती तोची पापी//
सर्व जाणे अंती रामनामे गती/ आणि वेद श्रुती गर्जताती//
गर्जती पुराणे आणि संतजन/ करावे भजन राघवाचे//

एक होती गणिका तिने एक पोपट पाळला होता, पोपटाचे नाव राघव. त्याच्यावर तिचे फार प्रेम होते आणि रामाचे नाव सुद्धा राघव म्हणून ती त्या पोपटाला जीवाच्या पलीकडे जपायची. अंतकाळी ती गणिका सारखी म्हणयाची अरे राघवा माझा अंत काळ आता जवळ आला आहे तुला पाणी कोण देईल, पेरू कोण देईल आणि राघव राघव करीत तिने प्राण सोडला आणि असा चमत्कार झाला कि

रामनामे उद्धरली ती गणिका/ नेली देवलोका याच देही//
याच देही गती पावली कुंटणी/ रामनाम वाणी उच्चारिता// ........समर्थ रामदास स्वामी.

आपले जीवन, सर्व मनोरथ पूर्ण करणारे साधन असे हे रामनाम आहे. त्या योगे भयाचे निवारण होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. पण आपले काम इतकेच की सदासर्वदा प्रात:काळी सायंकाळी सर्वकाळी हृदयात राम साठवून अखंड नामस्मरण करणे. 

आपल्या सद्गुरूनी सुद्धा हेच सांगितले आहे, जाता येता जो जो वेळ मिळेल त्या वेळेला नामस्मरण करा. नामस्मरणाने पापांचा नाश होतो आणि पुण्याचा संचय होतो.

श्वास श्वास पै नाम लै/ वृथा श्वास मत खोय//
ना जाने उस श्वास का/ आदत होय न जाय//....... स्वामी विवेकानंद.