"भगवत् भक्तीच्या उत्तमावस्थेत रत झाल्यानंतरच भगवंताच्या प्रेम पात्रतेचा अधिकार भक्तांला प्राप्त होतो. नुसतंच वाचक अभ्यासक व पांडीत्य किंवा ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."
भक्तीप्रेम सुख नेणवे आणिका !
पंडीत वाचका ज्ञानियांसी !!
भक्तीचे व भक्तांचेही अनेक प्रकार आहेत. भक्ती कशीही असली तरी श्रेष्ठ व उत्तमच.
गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात,
"नामभक्ती तर सगळेच करतात पण अंतःकरणात जिव्हाळा व भगवंताविषयीच्या आंतरिक प्रेमाचा कळवळा नसेल तर हा नंदनंदन परमात्मा संतुष्ट व वश्य होऊन प्राप्त होत नाही."
!! राम राम सब कोई कहे,
ठग ठाकुर और चोर !
!! बिना प्रे💓म रिझें नही,
तुलसी नंदकिसोर !!
🙏🏻 🙏🌻🌹