स्वामी भगवान महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वामी भगवान महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

*आरती सदगुरूंची उजळली अंतरी|*

साम्य स्थितीत सत प्रवृत्ती असते. तरी मानवाला त्याची कल्पना येत नाही. मानव सताची आरती केव्हा करीतो? आप्ल्या स्थितीनुसार स्तुती अन आरती एकच आहे. म्हणून विचारत आहे सताची आरती मानव केव्हा करीतो? स्तुती प्रणवाद्वारे होते अन आरती कशी असते? आपणास क्ल्पना आहे मानवाला भक्ति जशी सोपी आहे तसेच भक्ति हा प्रणव देण्यास सोपा आहे. अन आरती हा ही एक प्रणव देण्यास सोपा आहे. परंतु या प्रणवात गहनता आहे. मानवी स्थितीप्रमाणे सताचे स्थितीत राहून आपणा सर्वस्वाना किती प्रणव बहाल केलें. परंतु त्या प्रणवाची मननता आपण सेवेकऱ्यानी केली नाही. पूर्णत्वाने ज्ञान मननतेत बहरून राहिले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता ही सर्वस्व भक्तिचीच अंगे आहेत. आपल्या मननतेनुसार मन पूर्णत्व सदगुरुमय करून, सतत नामस्मरण करीत दिव्यदृष्टीने आत्मज्योतीच्या प्रकाशात रममाण होणे येणे नाम आरती!

सताने आपणा सर्वस्वाना नाम बहाल केले आहे. येणे नाम आरती! सदगुरूंनी बहाल केलेले नाम अंत:र्मय स्थितीत येणे त्रयीत लय केल्यानंतर आपल्याला दिव्य प्रकाश मिळेल. त्या दिव्य प्रकाशात आपण सत पाहू  शकाल. अंबर येणे आकाश! आकाशात सुध्दा बहरून उरलेला हा दिव्य प्रकाश आहे. सताने दिधलेले  नाम अंत:र्मय स्थितीत ठेउन जो आपण प्रकाश पाहू शकाल, तोच प्रकाश आकाशमय येणे अंबरमय स्थितीत बहरलेला आहे. प्रकाशाची साठवण तुम्ही करु शकता का? नाही! तो प्रकाश नामानेच प्राप्त होऊ शकेल. सदगुरूंनी दिलेल्या नामानेच तो प्रकाश मिळू शकेल. मन त्रयीत, त्रयीत लय करून जे प्रणव पूर्णत्व होतात त्यालाच मंत्र म्हणतात. अन तोच मंत्र याने नाम! आता आपण सेवेकरी आरती येणे नाम कोणत्या तऱ्हेने घेणार शुद्ध शुचिर्भूत करून हे नाम येणे आरती केली पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार अर्धपदमासन घालून आपल्या सदगुरूंना नमस्कार करून, त्यांचे  स्वरुप मनामध्ये साठवून, चरणकमलाकडे मनाचे केंद्रिकरण करुन, त्रिकुटित आत्मज्योत लय करुन, देहाला विसरून अंत:र्यामापासून सदगुरूंना आळवले पाहिजे. लक्षात घ्या आपण नाम केव्हाही घेउ शकतो. परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सदगुरु चरणांवर अर्पण करूनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीने आपण नामाची स्थिती केलीत तर्च ते सतचरणाप्रत पोहोचू शकतें. तदनंतर सताचे दर्शन पूर्णत्वाने घेउ शकता.
आपण जी ज्योत दिवास्वरुपी प्रगट करता तीच ज्योत आपल्या आत्मस्थितीतही प्रगट असते ना! आत्मा ही पण एक ज्योतच आहे ना! तो आत्मा आपण मानवी स्थितीप्रमाणे सामूहिक स्थितीत प्रगट करु शकणार नाही. त्या परब्रम्हाचे स्मरण दिपस्थितीने आत्म्याशी स्वरूप करणे अन परब्रम्हाचे स्मरण करणे. आम्ही देखील सताचे स्तवन करीतो, पण कोणत्या स्थितीने याची आपणास पूर्णत्व क्ल्पना आहे. परंतु मानवाला हे प्रतिक करावेच लागतें ते प्रतिक आपल्या हस्त स्थितीत नसेल तर आपण स्थिर होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा आत्मज्योतीचे प्रतिक हा दिप आहे.

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जाणीतसे !! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव
  तेणे आत्मस्थिती जाणीतसे  !!
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतूरहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टि ज्या माणसाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे, पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव  घेऊ शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो ?
अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परिने सद्गुरू चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही.

मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वराने, अनंतानी मानवाला शक्ति दिलेली आहे. ही शक्ति सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाही असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर  सद्गुरू चरणात, सत चरणात लय असेल तर सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवतात. सद्गुरूंच्या ठिकाणी त्या ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे?

एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब  सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. ...........

पुढे चालू 2

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

दर्शन देरे, देरे भगवंता
  तुझा ठाव नाही, घेता येत अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता .....!!!

तुझीया नामात, होईन मी तल्लीन
  तुझेच नाम, सदा मी गाईन
   आता तरी कृपा, करशील कां अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

नाम तुझे गोड,  नाही त्याला पाड़
 सदा त्याचे वेड़, मनी त्याची ओढ,
  लावशील कां मजला, हे बा अनंता
   दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

!! सुंदर तो भाव, सुंदर तो विचार !!

🙏�🌻🍀🌷👍🌸🌺👏�

सुंदर ! अतिशय सुंदर !!

सुंदर तो भाव,
सुंदर तो विचार,
करीतसे तो भक्तगण,
ठाव घेण्यास तो आसूसला !!

कधी मिळेल ठाव,
नाही त्याची जाण,
जाण घेण्यासी,
तो क्षणभरी थांबला!!

तो एक क्षण,
लाभेल का त्या भक्ता,
सद्गुरूंची कृपा,
होईल कां ऽऽऽ त्याच्यावरी?

🙏�🌺🌸🌷🌻🍀🙏

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

भगवानकी चाह!!!

👉🏼👉🏼एक नगर के राजा ने यह घोषणा करवा दी कि कल जब मेरे महल का मुख्य दरवाज़ा खोला जायेगा..

तब जिस व्यक्ति ने जिस वस्तु को हाथ ✋🏼लगा दिया वह वस्तु उसकी हो जाएगी..

इस घोषणा को सुनकर सब लोग आपस में बातचीत करने लगे कि मैं अमुक वस्तु को हाथ लगाऊंगा..

कुछ लोग कहने लगे मैं तो स्वर्ण को हाथ लगाऊंगा, कुछ लोग कहने लगे कि मैं कीमती जेवरात💍 को हाथ लगाऊंगा, कुछ लोग घोड़ों 🐎 के शौक़ीन थे और कहने लगे कि मैं तो घोड़ों को हाथ लगाऊंगा, कुछ लोग हाथीयों 🐘को हाथ लगाने की बात कर रहे थे, कुछ लोग कह रहे थे कि मैं दुधारू गौओं 🐄को हाथ लगाऊंगा..

कल्पना कीजिये कैसा
अद्भुत दृश्य होगा वह !!

उसी वक्त महल का मुख्य दरवाजा खुला और सब लोग अपनी अपनी मनपसंद वस्तु को हाथ लगाने दौड🏃..

सबको इस बात की जल्दी थी कि पहले मैं अपनी मनपसंद वस्तु को हाथ लगा दूँ ताकि वह वस्तु हमेशा के लिए मेरी हो जाएँ और सबके मन में यह डर भी था कि कहीं मुझ से पहले कोई दूसरा मेरी मनपसंद वस्तु को हाथ ना लगा द 😱..

राजा 👑अपने सिंघासन पर बैठा सबको देख रहा था और अपने आस-पास हो रही भाग दौड़ 🏃🏃को देखकर मुस्कुरा रहा था 😊..

उसी समय उस भीड़ में से एक छोटी सी लड़की आई और राजा की तरफ बढ़ने लगी..

राजा उस लड़की को देखकर सोच 🤔में पढ़ गया और फिर विचार करने लगा कि यह लड़की बहुत छोटी है शायद यह मुझसे कुछ पूछने आ रही है..

वह लड़की 🚶🏼🚶🏼धीरे धीरे चलती हुई राजा के पास पहुंची और उसने अपने नन्हे हाथों ✋🏼 से राजा को हाथ लगा दिया..

राजा को हाथ लगाते ही राजा उस लड़की का हो गया और राजा की प्रत्येक वस्तु भी उस लड़की की हो गयी..
.
.
जिस प्रकार उन लोगों को राजा ने मौका दिया था और उन लोगों 😧 ने गलती की..

ठीक उसी प्रकार  ईश्वर😊 भी हमे हर रोज मौका😃 देता है और हम हर रोज गलती😞 करते है..

हम ईश्वर को पाने की बजाएँ
ईश्वर की बनाई हुई संसारी वस्तुओं
की कामना 😏करते है और
उन्हें प्राप्त करने के लिए प्रयत्न करते है

पर हम कभी इस बात पर विचार नहीं करते कि यदि ईश्वर हमारे हो गए तो उनकी बनाई हुई प्रत्येक वस्तु भी हमारी हो जाएगी..

ईश्वर को चाहना और
ईश्वर से चाहना..
दोनों में बहुत अंतर है|

[8/27, 2:43 PM] Mayur Tondwalkar:
🙏🍀🌻🌺☘🌸🌷👏🙏

चाह करो ऊस ईश्वर की,
जो खुदही इस संसारका स्वामी है,
काहेको तड़पते हो उस संसारकी माया पानेके लिए, जिसे रबने ही खूद बनवाया है !!

भगवन जब मिल जाये हमे,
क्यो ख्वाईश रखनी है माया और काया की,
ऊसीके चरणमें शरण लो,
प्यास धरो उस सावण की!!

अखंड बहता जाये निर्झर,
भगवान की छवी ना ऑखसे हटे,
दर्शन पाते ही ऊस विश्वरूपका,
आखे रह जायेगी फटे की फटे!!!

🙏🌸☘🌺🌻🍀🌷👏🙏

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

सुमनाचे मनोगत

सुमन - शब्द किती सोपा, अर्थही सोपेच. फुलाला सुमन देखील म्हटले जाते आणि "सु मन" म्हटल्यावर त्याचा अर्थ चांगले मन देखील होतो. तर अशा ह्या "सुमनाने" म्हणजे फुलाने ठरविले की आपण नेहमी भगवंताच्या गळ्यात मिरविण्यापेक्षा भगवंताच्या चरणावरच स्थिर कां होवू नये? गळ्यात तर सगळेच पडतात, चरणांवर स्थिर कोणी व्हावयाचे? आणि असा विचार मनात येताच "सु-मनच" ते चक्क भगवंताच्या चरणांवर माथा टेकते झाले.

भगवंताच्या चरणांची महती वेगळी सांगायची गरज नाही. जे चरणात आहे, ते इतर कोणत्याही ठिकाणी सापडणार नाही. जो भक्त त्या सताच्या चरणात लिन झाला आहे, त्याला काय कमी आहे? सत् चरण सापडणे कठीण आणि जर कां ते आपल्याला सापडले तर टिकविणे त्याहून कठीण. मग "सुमना"चे "सु-मनाने" जो विचार केला तो यथायोग्यच नाही काय?

तर भक्तगण हो, चला तर आपणही आपल्या सताच्या चरणांवर माथा टेकवूया आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करूया. सत् चरणात रत होऊ या, त्या सुमनासारखे.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

ओ भगवन मेरे (2)

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

तरस रहा हू कबसे!!
आशा लगाये मनसे!!
राह देख रहा हू तन, मन, धनसे!!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

जिंदगी क्या भरोसा ?
आज हू, कल रहू न रहू!!
सिर्फ तुम्हारे चरणको छुहू!!
यही हैं एक अभिलाषा!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात?


प्रवचनें ज्योतीला शुध्दत्वता करण्यासाठी
असतात.
हे प्रवचनरूपी स्नान आहे.
प्रवचन हे न्यानयुक्त प्रणवांची
आंघोळ असते. शुचि:र्भूत शुध्द
प्रणवांची आंघोळ करून तुम्ही
शुध्द व्हावे याकरीता प्रवचन असते.
कांही वेळेला अमृततुल्य प्रणव देखील
बाहेर फेकले जातात. तुमच्या मनावर
असलेली काजळी दूर करून तुम्हांला
तेजोमय बनविण्यासाठी ही प्रवचनें
असतात."
परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज
यांच्या प्रवचनातून साभार सादर.