नामस्मरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नामस्मरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

*आरती सदगुरूंची उजळली अंतरी|*

साम्य स्थितीत सत प्रवृत्ती असते. तरी मानवाला त्याची कल्पना येत नाही. मानव सताची आरती केव्हा करीतो? आप्ल्या स्थितीनुसार स्तुती अन आरती एकच आहे. म्हणून विचारत आहे सताची आरती मानव केव्हा करीतो? स्तुती प्रणवाद्वारे होते अन आरती कशी असते? आपणास क्ल्पना आहे मानवाला भक्ति जशी सोपी आहे तसेच भक्ति हा प्रणव देण्यास सोपा आहे. अन आरती हा ही एक प्रणव देण्यास सोपा आहे. परंतु या प्रणवात गहनता आहे. मानवी स्थितीप्रमाणे सताचे स्थितीत राहून आपणा सर्वस्वाना किती प्रणव बहाल केलें. परंतु त्या प्रणवाची मननता आपण सेवेकऱ्यानी केली नाही. पूर्णत्वाने ज्ञान मननतेत बहरून राहिले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता ही सर्वस्व भक्तिचीच अंगे आहेत. आपल्या मननतेनुसार मन पूर्णत्व सदगुरुमय करून, सतत नामस्मरण करीत दिव्यदृष्टीने आत्मज्योतीच्या प्रकाशात रममाण होणे येणे नाम आरती!

सताने आपणा सर्वस्वाना नाम बहाल केले आहे. येणे नाम आरती! सदगुरूंनी बहाल केलेले नाम अंत:र्मय स्थितीत येणे त्रयीत लय केल्यानंतर आपल्याला दिव्य प्रकाश मिळेल. त्या दिव्य प्रकाशात आपण सत पाहू  शकाल. अंबर येणे आकाश! आकाशात सुध्दा बहरून उरलेला हा दिव्य प्रकाश आहे. सताने दिधलेले  नाम अंत:र्मय स्थितीत ठेउन जो आपण प्रकाश पाहू शकाल, तोच प्रकाश आकाशमय येणे अंबरमय स्थितीत बहरलेला आहे. प्रकाशाची साठवण तुम्ही करु शकता का? नाही! तो प्रकाश नामानेच प्राप्त होऊ शकेल. सदगुरूंनी दिलेल्या नामानेच तो प्रकाश मिळू शकेल. मन त्रयीत, त्रयीत लय करून जे प्रणव पूर्णत्व होतात त्यालाच मंत्र म्हणतात. अन तोच मंत्र याने नाम! आता आपण सेवेकरी आरती येणे नाम कोणत्या तऱ्हेने घेणार शुद्ध शुचिर्भूत करून हे नाम येणे आरती केली पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार अर्धपदमासन घालून आपल्या सदगुरूंना नमस्कार करून, त्यांचे  स्वरुप मनामध्ये साठवून, चरणकमलाकडे मनाचे केंद्रिकरण करुन, त्रिकुटित आत्मज्योत लय करुन, देहाला विसरून अंत:र्यामापासून सदगुरूंना आळवले पाहिजे. लक्षात घ्या आपण नाम केव्हाही घेउ शकतो. परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सदगुरु चरणांवर अर्पण करूनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीने आपण नामाची स्थिती केलीत तर्च ते सतचरणाप्रत पोहोचू शकतें. तदनंतर सताचे दर्शन पूर्णत्वाने घेउ शकता.
आपण जी ज्योत दिवास्वरुपी प्रगट करता तीच ज्योत आपल्या आत्मस्थितीतही प्रगट असते ना! आत्मा ही पण एक ज्योतच आहे ना! तो आत्मा आपण मानवी स्थितीप्रमाणे सामूहिक स्थितीत प्रगट करु शकणार नाही. त्या परब्रम्हाचे स्मरण दिपस्थितीने आत्म्याशी स्वरूप करणे अन परब्रम्हाचे स्मरण करणे. आम्ही देखील सताचे स्तवन करीतो, पण कोणत्या स्थितीने याची आपणास पूर्णत्व क्ल्पना आहे. परंतु मानवाला हे प्रतिक करावेच लागतें ते प्रतिक आपल्या हस्त स्थितीत नसेल तर आपण स्थिर होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा आत्मज्योतीचे प्रतिक हा दिप आहे.

सोमवार, ४ मार्च, २०१३

नामस्मरण


नामस्मरण - चार वर्ण, अबालवृद्ध स्त्री- पुरुषांना अनुसर्ण्यास सुलभ जाणारे असे अमोघ साधन म्हणजे नामस्मरण होय. याची महती अनेक ग्रंथात वर्णिलेली आहे.सर्व साधू, संताच्या प्रत्ययास आलेले असे हे साधन होय. सर्वांचा त्या वर विश्वास असून इतरांस अनुभव घेण्याचा संतानी अति काकुळतीने उपदेश केला आहे. अशा या नामधनाविषयी संशय घेणे म्हणजे ... पाप होय.

कांही एक भाग्य होते पूर्वजांचे/ पापियांसी कैचे रामनाम//
रामनामे कोटी कुळे उद्धरती/ संशय धरती तोची पापी//
सर्व जाणे अंती रामनामे गती/ आणि वेद श्रुती गर्जताती//
गर्जती पुराणे आणि संतजन/ करावे भजन राघवाचे//

एक होती गणिका तिने एक पोपट पाळला होता, पोपटाचे नाव राघव. त्याच्यावर तिचे फार प्रेम होते आणि रामाचे नाव सुद्धा राघव म्हणून ती त्या पोपटाला जीवाच्या पलीकडे जपायची. अंतकाळी ती गणिका सारखी म्हणयाची अरे राघवा माझा अंत काळ आता जवळ आला आहे तुला पाणी कोण देईल, पेरू कोण देईल आणि राघव राघव करीत तिने प्राण सोडला आणि असा चमत्कार झाला कि

रामनामे उद्धरली ती गणिका/ नेली देवलोका याच देही//
याच देही गती पावली कुंटणी/ रामनाम वाणी उच्चारिता// ........समर्थ रामदास स्वामी.

आपले जीवन, सर्व मनोरथ पूर्ण करणारे साधन असे हे रामनाम आहे. त्या योगे भयाचे निवारण होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. पण आपले काम इतकेच की सदासर्वदा प्रात:काळी सायंकाळी सर्वकाळी हृदयात राम साठवून अखंड नामस्मरण करणे. 

आपल्या सद्गुरूनी सुद्धा हेच सांगितले आहे, जाता येता जो जो वेळ मिळेल त्या वेळेला नामस्मरण करा. नामस्मरणाने पापांचा नाश होतो आणि पुण्याचा संचय होतो.

श्वास श्वास पै नाम लै/ वृथा श्वास मत खोय//
ना जाने उस श्वास का/ आदत होय न जाय//....... स्वामी विवेकानंद.