Sadguru Darbar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sadguru Darbar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

मी तू रहित होणे म्हणजेच सत्मय होणे..........!!! (परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)


मी तू रहित होणे म्हणजेच सत्मय होणे..........!!!

मी तू रहित होणे म्हणजेच सत्मय होणे. जे कांही आपले सद्गुरू सांगतील ते ब्रम्हवाक्य. दुसरे मी कांही जाणत नाही. अशी सेवेकऱ्यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविश्वास प्रत्येक सेवेकर्याजवळ असला पाहिजे. सद्गुरूंचे वाक्य जर सेवेकर्यांनी प्रमाण मानले नाही तर कोणाचे वाक्य प्रमाण मानायचे? मी तू रहित होणे म्हणजेच अद्वैत होणे. हे होण्यासाठी सेवेकर्यांनी मनाने सतमय होणे आवश्यक होणे आहे. मन एकदा  का सतमय झाले कि सर्वस्व सतमय झालेच म्हणून समजा. म्हणून सद्गुरूंच्या ठायी सतचरणावर मन अर्पण करताना कसे असले पाहिजे तर ठाम. सेवेकर्यांच्या मनात हि भावना सदैवं असली पाहिजे. मी सद्गुरूंचा आहे आणि सदगुरू माझे आहेत. सदगुरूचा जो सेवेकर्यावर विश्वास असतो त्याची परीपूर्तता करणे प्रत्येक सेवेकर्याचे आध्यकर्तव्य आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सेवेकर्याची आहे. (प पु श्री सदगुरू स्वामी भगवान महाराज.)

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

नामस्मरण ........ सर्वस्वावरील एकच उपाय !!!


जे सदगुरू आसनावरून प्राप्त झालेले आहे त्यांच्या नामस्मरणात राहिलेच पाहिजे.
२४ तासातून थोडा का अवधी होईना नामस्मरण हे केलेच पाहिजे. थोडी तरी ध्यान-धारणा, अभ्यास, चिंतन हे केलेच पाहिजे. त्यालाच भक्ती मार्ग म्हणतात. तो न अंगीकारता आपण इतर उपद्व्याप करत बसतो, मग आपण अंतरंगात कसे रंगाल ? नेत्रतरंग कसे फाकतील ? तरंग फाकण्यासाठी शुभ्र-प्रकाश कसा प्राप्त होईल? हे सर्व होण्यासाठी नामस्मरणाची आवश्यकता आहे. प्रथम पायरी कोणती? तर नामस्मरण.
तुकाराम महाराज्यासारख्या महान संतांनी सुद्धा सांगितले आहे, नामापरीते नाही साधन, वाहतसे आण विठलाची.शपथ घेऊन सांगितले आहे, नामापरीते दुसरे कांहीही नाही. भक्तीमार्गाचा नाम हा केंद्र बिंदू आहे.
२४ तासात तुमच्या देहात किती अजपाजप होतो. अखंड नामालाच अजपाजप म्हणतात. २१६०० मोजून २४ तासात होते म्हणून तुमचा देह तरला आहे, उभा आहे. तर श्वास आणि उच्छवास किती वेळा चालतो? तर २१६०० वेळा. आत असलेल्या त्या भगवंताचे खाद्य ( नाम ) चालूच असते. त्यात तुम्ही भर घालवायची असते. मग उपास, तापास, निर्जळी लंघन ह्या सर्वांची किंमत नामस्मरणापुढे शून्य आहे. पण नामस्मरण करायला वेळ कोणाला आहे ? मायेच्या लटपटीत, खटपटीत वेळ मिळतो का? बसून ध्यान-धारणा होत नाही तर निदान रस्त्याने जाता-येता तरी करा. इतर व्याप करता, पण नामस्मरण नाही. पण प्रसंग आले किंवा इतर व्याप आले कि बाबांजवळ निवेदन करतात. मग सर्वस्व केन्द्रीकरण एकाच ठिकाणी होते. जर दुख: अंती परमेश्वर आहे तर सुखा अंती का असू नये? सुखा अंती तरंग येतात का? आपल्या दरबारात अनेक उदाहरणे आहेत. कुणावर प्रसंग आला कि बाबा येण्यापूर्वीच  दरबारात हजर. अन योग असा कि मीच त्या दिवशी दरबारात उशिरा येत असे. अशा वेळी त्यांचे तरंग बाबांकडे, कारण शांती मिळावी म्हणून. त्यापासून मुक्त व्हावे म्हणून. पण हे नेत्र तरंग नाहीत तर हे मायावी तरंग झालेत.
आपल्या दरबारातील सेवेकरणीचेच उदाहरण देतो, सेवेकरणीच्या आई वर प्रसंग आला ज्योत प्रकाशीत, तिला वाटले आपली आई आता जाणार. तिची इच्छा होती आपली आई राहिली पाहिजे. सेवेकरनीने आपल्या आईच्या छातीवर हात ठेवला. आई हात झटकतेय पण ती हात बाजूला करायला तयार नाही, अन सेवेकरनीने केंद्र बिंदू कुठे साधला, तर मुळाश्रम. त्यावेळी तिला अशी समाधी लागली कि शेवटी तिला संदेश मिळाले आता तू उतर, चिंता करू नकोस. आता तुझी माता स्थिर होईल त्यावेळी नेत्र तरंग नव्हते तर आपणावर जो प्रसंग येतो त्यातून सताने मला सोडवावे. सदगुरूने मला सोडवावे या साठी भक्त तळमळीने कार्य करतो. तो प्रसंग होता, ते तरंग नव्हते. अशी प्रत्येक मानवाची त-र्हा आहे. - भगवान महाराज

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

ॐ कार....!!!

ॐ कार....!!!
तेज म्हणजे प्रकाश. सूर्य उगवल्यानंतर तेज आहे. पण पृथ्वी आड गेली कि तो मावळतो. हि जी सर्व पंच महाभूते आहेत, त्यांना आकार आहे असे सांगता येत नाही. मग हि पंच महाभूते निर्माण करणारे जे परम निधान तत्व आहे, ज्यांना आपण अनंत तत्व, सर्वज्ञ म्हणतो, त्यांनी धूनधूनकारातून ॐ कार फेकले, त्यांनीच हि पंच महाभूते निर्माण केली आहेत. त्यात त्यांनी त्रिगुण टाकले, अकार, उकार, मकार टाकले अन तदनंतर आपण त्यात अदृश्य रुपी राहिले. तेच हे ॐ कार तत्व.
ॐ कारानीच सर्व माया पसरवली, माया पसारा निर्माण केला. चौर्याएैंशी  लक्ष योनी निर्माण केल्या. त्याचे अधिपती कोण तर अर्थाथ ॐ कार. तेच सर्वस्व त्रिगुणाची घडण घडवीत असतात..... उत्पती तेच, स्थिती तेच, आणि लय सुधा तेच करीत असतात. पण असे कळू देतात का? मीच सर्वस्व करीत असून सुद्धा स्वत: अकर्ते असतात. हि सर्व ठेव कशात आहे? तर तुमच्या देहात आहे. पंच महाभूते सुद्धा तुमच्या देहात आहेत. जे सर्व बाहेर विखुरलेले आहे ते सुद्धा तुमच्या
देहात आहे. प्रत्येक घटक हा सुद्धा ॐ कारमय आहे. त्यांनाच सत किंवा सदगुरु असे म्हणतात. तेच संकल्पविकल्पच्या पलीकडे म्हणजे निर्विकल्प आहेत. (संकल्प विकल्प प्रवचन - भगवान महाराज.)

गुरुवार, २२ मार्च, २०१२

सेवेकर्याची कर्तव्ये.........!!! गुरुदेव पितामह यांची प्रवचने......!!!


आपण सताचे सेवेकरी आहोत, आणि सताचा सेवेकरी सत सानिध्यात श्रद्धायुक्त स्थीतिने राहिला तर त्याला अघोर सूक्ष्म त्रास देऊ शकणार नाही. आपण सताशी तादाम्य स्थितीने राहिले पाहिजे. त्रास झाल्यानंतर स्थानात येऊन प्रणव द्यावयाचे पण स्थानात येऊन सताची भक्ती कोणी करायची? सताने मानवाला पूर्णत्व शांततामय स्थिती करावी अशी प्रत्येक मानवाची मनीषा असते पण सताची सुद्धा मानवाकडून मनीषा असतेच ना? कोणती मनीषा, तुमच्या धनाची नसते, संपत्तीची नसते, शारीरिक स्थितीची नसते तर फक्त तुमच्या श्रद्धेची. प्रथम मानव काय म्हणतो? माझी कौटुबिक स्थीती आहे , मला कर्तव्य करावयाचे आहे, पण त्रास होऊ लागला कि मग दरबारात येतो. दरबार येणे सताची कौंटुबिक स्थिती.
आपण सर्वस्व एकाच स्थितीत येता म्हणजेच सताची कौंटुबिक स्थिती होय. सत स्थुलात असताना कोणते प्रणव द्यावयाचे? अरे! हे माझे गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजेच कौटुबिक स्थिती. हि कलियुगी स्थिती आहे आणि या कलियुगात मानवाला अनेक कर्तव्य आहेत पण प्रथम कर्तव्य कोणते? तर सत नामस्मरण. सत नामस्मरण हे मानवाचे  आद्य कर्तव्य आहे. मायावी स्थितीत तुमच्या धनाची, मनाची, शरीराची झीज होईल पण सत नामस्मरणाने तुमच्या धनाची, मनाची, शरीराची कोणती स्थिती होईल? तर तेजोमय स्थिती होईल आणि सत तुमच्यात पूर्णत्व सहवास करून राहील. मग अघोर सूक्ष्म तुमच्या सहवासात राहील का?
मानवाला माया आहे तशी सतालाही माया आहे. तुम्ही सर्वस्व हि सताचीच माया आहे. तुमची पूर्णत्व स्थिती करून देणे हे सताचे आद्य कर्तव्य आहे, तसेच सताचे नामस्मरण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. हे जर मानवाने केले तर तो सतापासून दूर राहील का? नाही राहणार. तो सताप्रत येणारच. मानवाला शरीर देह मिळाल्या नंतर सुख हि आहे आणि दु:खही आहे. दोन्ही स्थितीत जर मानव एकाग्र झाला तर त्याला सताचे दर्शन दूर आहे का? ( गुरुदेव पितामह )

मंगळवार, २० मार्च, २०१२

अहम ब्रम्हास्मि........!!!


अहम ब्रम्हास्मि ----
मी तुझ्यातच आहे, प्रकाशाची जाणीव मिळाली नाही तर
ब्रम्हरूप कसे पाहता येईल?  प्रकाश मिळाला नाहीतर ब्रम्हरूप पाहता येणार नाही.
आत्म्याचे रूप पाहणे म्हणजेच ब्रम्हरूप पाहणे. तो निर्गुण स्वरूपी आहे कि सगुण
स्वरूपी आहे हे सुद्धा समजत नाही. पूर्ण प्रकाशात स्थिर होऊन ज्यावेळेला तो रममाण होतो त्या वेळेला प्रथम पायरी म्हणजेच स्वस्वरूपी जाणीव. तुझेच स्वरूप तुझ्या समोर आणतात ... त्यालाच स्वस्वरूपी जाणीव म्हणतात. त्याला ब्रम्हरूप हे पहिले पद आहे. सगुण रूप, प्रथम तुमचेच तुम्हाला दाखवतात. हे पाहिल्यानंतर मग तुम्हाला कळते अहम् ब्रम्हास्मि. हे पाहिल्यानंतर भक्त म्हणतो मीच ब्रम्ह आहे. माझ्या वेगळे ब्रम्ह नाही. हे कोणाच्या कृपेने होते? तर सद्गुरू कृपेने होते.  (परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांच्या प्रवचनातून.....)