Gurudev Pitamah लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Gurudev Pitamah लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ जून, २०१८

तरी दुर्लभ या त्रिभुवनात.....!!!

*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला प्रणव देत आहेत, *" तू तुझे मन शुध्द शुचिर्भूत करून पूर्णत्वाने मी  जे प्रणव देतो ते ग्रहण कर. मी जे प्रणव देतो ते त्रिभुवनातही दुर्लक्षित आहेत."*
असेच प्रणव सत तुम्हा सर्वस्वाना स्थानावरून येणे आसनावरून देत होते. सत तुम्हास पूर्णत्व स्पष्टीकरण करून सांगत होते. सदगुरुमय झाल्याविना तुम्हास ज्ञान प्राप्त होईल का? नाही.
जेंव्हा मानव सदगुरु सानिध्यात येतो तेंव्हा सत त्या मानवाची पूर्णत्व शुध्दीकरण स्थिती करीते. त्याच अवधीत तो मानव सतशुध्द होऊन सदगुरुमय होतो. त्यापूर्वी मानव चंचल अन द्विधा मनस्थितीत असतो. ज्या अवधीत सत तुमच्या शिरकमलावर हस्त स्पर्श करून अखंड नामाची गती प्राप्त करीते, त्या अवधीत तुमची स्थिती सतशुध्द अन सदगुरुमय होते. अन तदनंतर सत तुम्हास सताची पूर्णत्व जाण करून देते. जे अंबेने प्रणव स्वयंभूना दिधले, *"तुम्हीच माझे गुरू आहात, तुम्हीच मजला सताची जाण द्या"* तदनंतर हे प्रणव स्वयंभूनी अंबेला दिधले. अन आम्ही आपणास आपल्या सताची पूर्णत्वाने जी स्थिती या भूतलावर होती त्याचे प्रणव दिधले. परंतु समीकरण एकच आहे, ही जी स्थिती आहे ती कवण केलेली स्थिती आहे. *अन तुमची स्थिती प्रत्यक्ष सताने घडवून दिलेली स्थिती आहे.* अंबेने स्वयंभूना प्रणव देणे यापेक्षा अधिकाधिक आगळी वेगळी स्थिती सताने तुम्हास प्रदान केलेली आहे. अन त्याप्रमाणें जर तुमची कृतीमान स्थिती असेल तर तो सेवेकरी कसा होईल? तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही. अन सतही त्या सेवेकऱ्यापासून दूर राहणे शक्य नाही. सत तुम्हास प्रणव देत होते कि ही कलीयुगी स्थिती आहे. या कलीयुगी स्थितीत मोहमायेत जी स्थिती आहे त्यात अधिक न गुंतता तुम्ही सत नामस्मरणात पूर्णत्व लय होऊन रहा. अशी स्थिती केल्यानंतर सत येणे परब्रह्म तुम्हास दुष्टांतमय स्थिती देईलच देईल.
सताने सर्वस्व उघड स्थिती केली पण तुम्ही ते स्मरणतेत घेतले नाही. मानव मोहमायेत अधिकाधिक गुंतत गेला त्यामुळे तो सतापासून दूर गेला. पूर्णत्व सताप्रत राहण्यासाठी सेवेकऱ्याने कर्तव्यापुरते मायेचे कर्तव्य करून सतत नामस्मरणात राहिले पाहिजे. पण मानवाकडून अशी स्थिती होत नाही.
कर्तव्य करीत असतानासुध्दा मन नामस्मरणात गुंतून राहिले पाहिजे. लक्षात घ्या नाम तुमच्यात गुंतून आहे. नामाने तुम्हाला सोडले तर तुमचे स्थुल  स्थित्य रहाणार नाही. म्हणजेच नाम तुमच्यात गुंतून आहे पण आपण संसारमय स्थितीत आहात. संसार येणे स्वार्थ! अन हेच प्रणव महेश अंबेला देत आहेत. सताला संसार नाही का? तुम्ही हाच सताचा संसार आहे. पण सत तुम्हात गुंतून राहिले नाही. तुम्हास ज्ञानोपदेश करीत, तुम्हास सतशुध्द करीत, तुम्हास सतभक्तिची पूर्णत्व जाण देत स्वयंम परब्रम्हाचे कर्तव्य करीत होते.

गुरुवार, ७ जून, २०१८

ईश्वर म्हणे वो देवी......

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

भक्त भगवंताप्रत का येत असतो? तर ज्ञानप्राप्तीसाठी आणि भक्तिसाठी भक्त सत चरणाप्रत येत असतो. आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत ज्ञानप्राप्तीसाठी जात होता.
भगवंतानी आपली सुख-दु:ख स्थिती ग्राह्य केली नाही तर आपली स्थिती चंचल होईल. भक्ताचे भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
सद्गुरू माऊलीने स्थुल रुप धारण केल्यानंतर सुख- दु:ख स्थिती भोगली कि नाही? पण तरीहि ते स्थिर, शांत, संयमी असायचे. पण तोच भक्त, थोडीशी दुर्मिळ स्थिती झाली तर चलबिचल होतो.
आपणास कल्पना आहे आमची कन्यका अहिल्या पतीच्या शापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? असे असून देखील आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होती ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हालाही सर्वस्वाची जाण होती. सर्वस्व स्थिती भगवंताने स्थुल रुप धारण करून स्थित्यंतरे कशी येतात त्याची स्वयम जाण सद्गुरूनी आपणास दिधलेली आहे.पण तरीही मानव विसरतो.

आपणास कल्पना आहे सुख आल्यानंतर मानव कालावधीची गणना करीत नाही. पण दु:ख आल्यानंतर मानव क्षणापासून सुरुवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत. थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर आपण चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आम्ही हे मान्य करीतो कि अपुले कर्तव्य आहे सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. परंतु हतबल होणे नाही. आपण सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लिनता ही ठेवलीच पाहिजे.
आपण सर्वस्व भक्त भगवंताचे आहात, सताचे आहात. त्या सताला तुमच्या सर्वस्व सुख-दु:खाची जाण आहेच. भक्ताची जर पूर्णत्व श्रध्दायुक्त स्थिती नसेल तर? लिनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम नसेल तर? भगवंत भक्तात लय होणार नाहीत. भक्ताचे भगवंतावर अपरंपार, नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होणारच. जेथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील.
म्हणून भगवंत भक्ताप्रत राहण्यासाठी या सर्वस्व गुणांची आवश्यकताआहे. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. लक्षात ठेवा विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते.