मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

अमृतवाणी

 *प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
                            *अमृतवाणी*

      काळ(यम) हा सारखा फिरत असतो. काळाच्या गतीबरोर मोजमाप असते. ती झडप घालायला पहाते, शिकारी जसा आपला भक्ष्य मिळाल्याबरोबर झडप घालणार.

       जे दिसते आहे ते नाशिवंत आहे व तेच तू माझे म्हणतोस. पण दिसत नाही अन् शाश्वत आहे ते तू माझे म्हणत नाहीस. आज ना उद्या आपण जाणार. पण जाण्यापूर्वी ज्याने हे जाणले आहे तोच सावध!

जो सावध तो दिनवाणी नाही, तो तन्मय असतो. अशी ज्योत समर्थ चरणांजवळ जाणार.

जन हे जनता जनार्दन आहे. तुझ्या ठायी ईश तत्व आहे. गुण्यागोविंदाने वाग व नामात दंग रहा. सत् गतीने वाटचाल कर.

मानवांच्या मनोभूमीमध्ये दोषांची मळी उत्पन्न होईल. दोष रहित असली तर शांती मिळणार. दोष आपल्याला अधोगतीला नेतात. कारण मनाची भूमी ठाम नसल्यामुळे.

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ़निश्चयः।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥

सत् उपासक ज्योत दोषातून मुक्त होते.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।
जनी निंद्य तें सर्व सोडूनि द्यावे।
जनी वंद्य तें सर्व भावें करावें।।