शुक्रवार, २१ मे, २०२१

आठवणी


फोटो कोलाजमध्ये सुरूवातीला LOOKING BACK आणि MOVING FORWARD ह्या थिमची (विषय विशेष) ची योजना करण्यात आलेली आहे. 

पाठीमागे वळून बघत असताना आलेले अनुभव लक्षात ठेवून पुढील जीवन यात्रेची मार्गक्रमना करावयाची आहे, हे नित्य ध्यानात ठेऊन वाटचाल करायची आहे, मग त्यामध्ये कितीही अडचणी येवोत. यामध्ये आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा सतत लक्ष आपल्यावर आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवावयाचे आहे, ही त्यामागची भावना असून, तिला या चित्रातून व्यक्त करण्यात आलेले आहे.

मंगळवार, १८ मे, २०२१

आठवण एक साठवण


श्री सद्गुरू भंडारा शुभदिन, वालावल, सिंधुदुर्ग

        आजच्याच दिनी, 18 मे 2018 (गुरूवार), आपला श्री सद्गुरू भंडारा शुभदिन मोठ्या उत्साहात व आनंदाने श्री सद्गुरू माऊली कृपेने साजरा करण्यात आला होता. 
         ह्या शुभदिनी, आश्रमाच्या सभोवतालचा आसमंत भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. भगवा रंग हा त्याग, बलिदान, ज्ञान, शुध्दता व सेवेचे प्रतिक मानला गेला आहे आणि आपल्या श्री सद्गुरू माऊलिंनी देखील आपणांस ज्ञानोपसनेद्वारे त्याग, बलिदान, शुध्दत्वता व सेवा यांचेच आपल्या प्रवचनांद्वारे अखंड असे मार्गदर्शन केले होते, जे आजही आम्हा पामरांना दिपस्तंभासारखे ह्या भवसागरात तारून नेत आहे.
           ह्याच सर्व पार्श्वभूमीवर चित्रातील निळ्या रंगाची लकेर आपणांस, हा रंग आकाश आणि पाण्याचा रंग असल्याची आठवण करून देत, आपल्यातील अविचलपणाचे वैशिष्टय़ जपण्याची शिकवण देत आहे. हे जसे खरे, तसेच हा रंग विश्वासाचं देखील प्रतीक आहे. 
          ह्या दोन रंगाच्या मध्यभागी खुलून उठलेला आपला हा वालावल आश्रम छायाचित्रामध्ये अतिशय दिमाखदार पध्दतीने उतरविण्यात आपलेच एक गुरूबंधू श्री आदेश माधवी अशोक पीसी हे यशस्वी झालेले आहेत. (अनगड)

अमृतवाणी

रविवार, २ मे, २०२१

श्री समर्थ वाणी

गुरुवार दिनांक 19 मे 1960

श्री समर्थांचे बोल
मन आणि माया

माया म्हणजे काय? हे कोणी पाहिले आहे काय? माया म्हणजे स्वयम् पद आणि त्या स्वयम् पदाचा प्रकाश. त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तू पाहून त्याला वागतो आणि जे जे दृष्टीस पडले ते ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. 

ज्या प्रकाशात अमूल्य वस्तू दिसत आहे, त्या वस्तू पासून आपले संरक्षण होईल अशी मानवाची भावना, म्हणून ती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात.

अमूल वस्तू खरी. परंतु ती पासून पुढे काय होईल? याचा विचार नाही, त्याला माया म्हणतात. 

माया कोठून आली? हे हि त्याला समजत नाही. मायेला हे कळत नाही की मी कुठून आले? 

ज्योत आणि प्रकाश एकमेकावर अवलंबून आहेत. हे काही
सेवेकर-याना कळत नाही, म्हणून एखाद्या सेवेक-याला त्याची जाणीव नाही. म्हणून कोणी कोणाला लहान-मोठा म्हणू नये. याचा अर्थ भक्ती आहे.

मान-अपमान, संशय, कल्पना रहित भक्ती आहे. सेवेकर्‍याने मानापमानाचे गाठोडे जवळ बाळगले तर त्याच्या भक्तीला किंमत शून्य आहे. जो सेवेकरी एकदा ज्या पदाला शरण, त्याच पदाला परिपूर्ण सर्व अर्पण करणे, त्या ठिकाणाचा अंत घेणे, तेच ठिकाण सर्वस्वाचे निदान आहे असे समजावयास पाहिजे. मग तर त्याला पुढचा मार्ग सोपा जातो. 

हेच त्याला कळत नाही तो सेवेकरी नाही अगर शिष्यही नाही. स्वरूपाची ओळख करून घेतली हेच श्रेष्ठ होईल. ही ओळख कोणी करून घेतली आहे काय? 

ग्रंथ वाचून किंवा ओव्या वाचून अशाने दर्शन होत नाही, कळायचे नाही. मानवाने स्वतःच्या कृतीतच मनोवृत्तीचे दर्शन करावयास पाहिजे. 

मी कोणीतरी आहे, हे म्हणणे साफ चुकीचे आहे. जर तु कोणीतरी आहेस, तर तुझ्या हातून चूक झाल्यानंतर तुला आधार काय? मग तू का उठाठेव करतोस? तुला त्या जड देहाची शुद्धी, त्याची ओळख असती, तर तू मी म्हणणारा कोण? सर्वस्वाचे स्पष्टीकरण होवूं शकत नाही. 

समर्थ वाणी