ईश्वर अंबा सद्गुरू पितामह प्रवचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ईश्वर अंबा सद्गुरू पितामह प्रवचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |*

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)*


महेश अंबेला प्रणव देत आहेत, जो कोणी प्रश्न मला केला नाही तो प्रश्न तू मजला केला आहेस, अन त्याचे उत्तर मजला तुजला द्यायचे आहे.

अवधिपूर्वी मी आपणास कोणते प्रणव प्रस्थापित केले होते? लिनता, नम्रता, संयमता मानवाने सतत आपणाप्रत घेतली पाहिजे. तरच  मानवाची या कलीयुगी स्थितीत प्रगतिमय स्थिती होईल. अहंमतेने होईल का? नाही.

सत आपणास ज्या अवधीत सानिध्यात घेते त्याअवधीत प्रथम काय करते? प्रथम आपुली भूमी येणे आपले शरीर शुद्ध करीते. भूमी शुद्ध करीते येणे कोणती स्थिती तर मन शुद्ध करीते. भूमीतच मन आहे ना? भूमी शुद्ध केल्यानंतर मन शुद्ध होणारच! अर्थातच सत आपणास सानिध्यात घेण्याच्या प्रथम आपली भूमी शुद्ध करीते, येणे आपणात जी अहंमता आहे ती नाश करण्याची स्थिती करीते. अहंमता गेल्याविणा शुद्धत्वता येणार नाही, मन स्थिर होणार नाही. अन तदनंतर आपणात ज्ञानबीज पेरते.

ज्ञानबीज म्हणजे काय? तर सत आपली भूमी सतशुध्द करून, आपली शारीरिक स्थिती सतशुध्द  करून आपणाप्रत घेते अन आपणाप्रत घेऊन ज्ञानयुक्त प्रणव अर्थात उपदेश आपणास प्रस्थापित करीत असते.

उपदेशात्मक स्थिती याने ज्ञानाचे बीज! जर आपण सताचे प्रणव पूर्णत्व ग्राह्य करून कर्तव्यत: साधली असती तर आपणाकडून स्थित्यंतरे झाली असती का? येणे सताने जे ज्ञानबीज आपणात पेरले ते आपण विसरलात. कशामुळे? अहंमतेमुळे! अहंमता आल्यानंतर ही सर्वस्वी स्थिती होत असते. अन्यथा अशी स्थिती होणार नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले