*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
*"लाघव"*
सत स्थुलात असताना आपणा सर्वाना प्रणव द्यायचे,"हे पहा तू जर चुकीच्या स्थितीने गेलास तर तुला "लाघव" होईल."
मानवी स्थितीप्रमाणे मोहमाया अंध:काराच्या स्थितीत मानव लाघवी स्थितीला पात्र व्हायचा.
सत पदोपदी प्रणव द्यावयाचे, परंतु लाघव झाल्यानंतर तोच सेवेकरी सद्गुरू माऊलीजवळ नतमस्तक होऊन लीनतेने प्रणव द्यावयाचा, "सता!मला या त्रासयुक्त स्थितीतून मुक्त करा." म्हणजेच सताजवळ क्षमा मागणे. तदनंतर सत आपणास पूर्णत्वाने प्रणव द्यावयाचे,"पुन:श्च अशी स्थिती होणे नाही. पुन:श्च अशी स्थिती झाली तर लाघव स्थिती मानवाला पूर्णत्व होईल."
अशी स्थिती, स्थित्यंतरे होऊन गेली तरी सताने तुम्हास पूर्णत्वाने ठेवली आहे ना ? कारण कलीयुगी स्थितीत इतरत्र भ्रमणता होऊ नये, परंतु तरी देखील आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडतात ना?
म्हणूनच मी आपणास आदेशात्मक स्थिती केली. आपण सताचे सेवेकरी आहात सताचा सेवेकरी कसा असला पाहिजे? सतशुध्द पाहिजे, लीन पाहिजे, नम्र पाहिजे.
सत स्थुलात असताना प्रणव द्यावयाचे,"माझे सेवेकरी आहेत, कलीयुगी स्थितीतून मजप्रत आलेले आहेत. सता! मी पूर्णत्वाने त्यांना मजप्रत घेतले आहे. आपणही त्या ज्योतीची पूर्णत्व स्वीकृती करणें".
ते प्रणव आपण सर्वस्वानी ग्रहण केले आहेत. अशी स्थिती असताना मानवी स्थितीप्रमाणे अहमता (अहंकार) आपणाप्रत येत असते? ज्या सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली, अन जाण दिधली असताना, कृतीमान झाली असताना आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडणे यथायोग्य नाही.
जोपर्यंत सत आपणास समजाऊन घेत नाही तोपर्यंत मानवाला क्षमा होईल का? नाही होणार! सताने आपणास समजावून घेण्यासाठी आपण लीनता, नम्रता, संयमता ठेवलीच पाहिजे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
*"लाघव"*
सत स्थुलात असताना आपणा सर्वाना प्रणव द्यायचे,"हे पहा तू जर चुकीच्या स्थितीने गेलास तर तुला "लाघव" होईल."
मानवी स्थितीप्रमाणे मोहमाया अंध:काराच्या स्थितीत मानव लाघवी स्थितीला पात्र व्हायचा.
सत पदोपदी प्रणव द्यावयाचे, परंतु लाघव झाल्यानंतर तोच सेवेकरी सद्गुरू माऊलीजवळ नतमस्तक होऊन लीनतेने प्रणव द्यावयाचा, "सता!मला या त्रासयुक्त स्थितीतून मुक्त करा." म्हणजेच सताजवळ क्षमा मागणे. तदनंतर सत आपणास पूर्णत्वाने प्रणव द्यावयाचे,"पुन:श्च अशी स्थिती होणे नाही. पुन:श्च अशी स्थिती झाली तर लाघव स्थिती मानवाला पूर्णत्व होईल."
अशी स्थिती, स्थित्यंतरे होऊन गेली तरी सताने तुम्हास पूर्णत्वाने ठेवली आहे ना ? कारण कलीयुगी स्थितीत इतरत्र भ्रमणता होऊ नये, परंतु तरी देखील आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडतात ना?
म्हणूनच मी आपणास आदेशात्मक स्थिती केली. आपण सताचे सेवेकरी आहात सताचा सेवेकरी कसा असला पाहिजे? सतशुध्द पाहिजे, लीन पाहिजे, नम्र पाहिजे.
सत स्थुलात असताना प्रणव द्यावयाचे,"माझे सेवेकरी आहेत, कलीयुगी स्थितीतून मजप्रत आलेले आहेत. सता! मी पूर्णत्वाने त्यांना मजप्रत घेतले आहे. आपणही त्या ज्योतीची पूर्णत्व स्वीकृती करणें".
ते प्रणव आपण सर्वस्वानी ग्रहण केले आहेत. अशी स्थिती असताना मानवी स्थितीप्रमाणे अहमता (अहंकार) आपणाप्रत येत असते? ज्या सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली, अन जाण दिधली असताना, कृतीमान झाली असताना आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडणे यथायोग्य नाही.
जोपर्यंत सत आपणास समजाऊन घेत नाही तोपर्यंत मानवाला क्षमा होईल का? नाही होणार! सताने आपणास समजावून घेण्यासाठी आपण लीनता, नम्रता, संयमता ठेवलीच पाहिजे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले