शनिवार, ३० जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 3

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*"लाघव"*
सत स्थुलात असताना आपणा सर्वाना प्रणव द्यायचे,"हे पहा तू जर चुकीच्या स्थितीने गेलास तर तुला "लाघव" होईल."

मानवी स्थितीप्रमाणे मोहमाया अंध:काराच्या स्थितीत मानव लाघवी स्थितीला पात्र व्हायचा.

सत पदोपदी प्रणव द्यावयाचे, परंतु लाघव झाल्यानंतर तोच सेवेकरी सद्गुरू माऊलीजवळ नतमस्तक होऊन लीनतेने प्रणव द्यावयाचा, "सता!मला या त्रासयुक्त स्थितीतून मुक्त करा." म्हणजेच सताजवळ क्षमा मागणे. तदनंतर सत आपणास पूर्णत्वाने प्रणव द्यावयाचे,"पुन:श्च अशी स्थिती होणे नाही. पुन:श्च अशी स्थिती झाली तर लाघव स्थिती मानवाला पूर्णत्व होईल."

अशी स्थिती, स्थित्यंतरे होऊन गेली तरी सताने तुम्हास पूर्णत्वाने ठेवली आहे ना ? कारण कलीयुगी स्थितीत इतरत्र भ्रमणता होऊ नये, परंतु तरी देखील आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडतात ना?

म्हणूनच मी आपणास आदेशात्मक स्थिती केली. आपण सताचे सेवेकरी आहात सताचा सेवेकरी कसा असला पाहिजे? सतशुध्द पाहिजे, लीन पाहिजे, नम्र पाहिजे.

सत स्थुलात असताना प्रणव द्यावयाचे,"माझे सेवेकरी आहेत, कलीयुगी स्थितीतून मजप्रत आलेले आहेत. सता! मी पूर्णत्वाने त्यांना मजप्रत घेतले आहे. आपणही त्या ज्योतीची पूर्णत्व स्वीकृती करणें".

ते प्रणव आपण सर्वस्वानी ग्रहण केले आहेत. अशी स्थिती असताना मानवी स्थितीप्रमाणे अहमता (अहंकार) आपणाप्रत येत असते? ज्या सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली, अन जाण दिधली असताना, कृतीमान झाली असताना आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडणे यथायोग्य नाही.

जोपर्यंत सत आपणास समजाऊन घेत नाही तोपर्यंत मानवाला क्षमा होईल का? नाही होणार! सताने आपणास समजावून घेण्यासाठी आपण लीनता, नम्रता, संयमता ठेवलीच पाहिजे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शुक्रवार, २९ जून, २०१८

संसार करून परमार्थ साधा !

परम् पूज्य श्री सद्गुरूस्वामी भगवान महाराज म्हणतात, "आपणाला प्रपंच करावयाचा नाही, तर आपल्याला काय करावयाचा आहे? "संसार".

प्रपंच ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर - प्र म्हणजे प + र म्हणजेच "पर" (इतर) आणि पंच म्हणजे "पंचाईत". याचाच अर्थ साध्या शब्दात सांगायचा म्हणजे परक्याची पंचाईत म्हणजे उठाठेव न करणे. इतरांच्या बाबतीत लक्ष न घालने. स्वतः स्वतःची उन्नती करून घेणे. (पारमार्थिक अर्थाने)

या प्रपंच शब्दाचे इतरही अनेक अर्थ होतात व ते सुद्धा पर म्हणजेच इतरांच्या बाबतीतच असतात. म्हणून भक्ताला काय केले पाहिजे तर "संसार".

आता संसार या शब्दाचा अर्थ पाहू. "संसार" येणे "सगुणाचा सार" येणे आपण मानव देहाने आहोत म्हणजेच सगुण आहोत. आणि सार येणे  मानव देहाचे कर्तव्य कर्म. ते आपण कसे केले पाहिजे ? तर ते सतमय मार्गाने करावयास हवे.

आपणास निर्गुणाप्रत म्हणजेच आपल्या सद्गुरूंप्रत जावयाचे आहे. ते कसे शक्य होईल? तर ते सतमय मार्गाने, मनोभावे सद्गुरूंची सेवा तिन्ही अंगाने येणे तन, मन, धनाने केल्यासच ते शक्य होईल. यासाठीच सद्गुरू माऊली म्हणतात, "संसार करून परमार्थ साधा". संसार केल्यानेच परमार्थ साधता येईल, अन्यथा नाही. प्रपंच करून परमार्थ साधता येणार नाही.

*ईश्वर म्हणे वो देवी |* 2

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम् पूज्य गुरुदेव पितामह यांची अमृतवाणी)*

*"क्षमा"* आणि ती केव्हा अन कधी होते? क्षमेची याचना केव्हा होते? मानवाकडून चुका झाल्यानंतर मानव सताप्रत क्षमेची याचना करतो, अन सत ते मान्य करते. सताने मान्य केल्यावर मानव कसा होतो? तृप्त होतो. मानवाची मनोमन कल्पना कोणती होते? माझ्या सताने मला क्षमा केली आहे. परंतु क्षमा झाली असे आपणास पूर्णत्व कल्पना येते का? सद्गुरू मुखातून प्रणव निघाल्यानंतर पूर्णत्वाने येते.

सद्गुरू मुखातून सतशुध्दच प्रणव बाह्य स्थितीत पडत असतात.

क्षमा येणे सामाऊन घेणे स्थिती नाही तर समजाऊन घेणे स्थिती आहे. आपणास प्रत्यय येतो सताने क्षमा केली. आपण मनोमन प्रफुल्लमय होता. आपल्या चुकांची क्षमा झाली आहे. परंतु त्या सतमाउलीने आपणास समजाऊन घेतले म्हणूनच तुम्हास क्षमेची स्थिती झाली ना? नाहीतर मानवांची कोणती स्थिती होते?

द्विधा ही आगळी वेगळी स्थिती आहे, क्षमा ही आगळी वेगळी स्थिती आहे. सताने आपणास समजावून घेतले येणे प्रणवाकृत करून, सतशुध्द करून आपल्याप्रत घेतले नाही का ?

आपणास कल्पना आहे, सद्गुरु येणे माउली एकलय झाली ना ? अन एकलय झाल्यानंतर तो योगी, तो मानव, तो मनुष्य, तो जीवात्मा सतशुध्द होतो. पूर्णत्व लीन अन नम्र अशी जेव्हा जीवात्म्याची स्थिती होते तेव्हाच सत त्यास क्षमा करते येणे समजाऊन घेते.

बुधवार, २७ जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |*

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)*


महेश अंबेला प्रणव देत आहेत, जो कोणी प्रश्न मला केला नाही तो प्रश्न तू मजला केला आहेस, अन त्याचे उत्तर मजला तुजला द्यायचे आहे.

अवधिपूर्वी मी आपणास कोणते प्रणव प्रस्थापित केले होते? लिनता, नम्रता, संयमता मानवाने सतत आपणाप्रत घेतली पाहिजे. तरच  मानवाची या कलीयुगी स्थितीत प्रगतिमय स्थिती होईल. अहंमतेने होईल का? नाही.

सत आपणास ज्या अवधीत सानिध्यात घेते त्याअवधीत प्रथम काय करते? प्रथम आपुली भूमी येणे आपले शरीर शुद्ध करीते. भूमी शुद्ध करीते येणे कोणती स्थिती तर मन शुद्ध करीते. भूमीतच मन आहे ना? भूमी शुद्ध केल्यानंतर मन शुद्ध होणारच! अर्थातच सत आपणास सानिध्यात घेण्याच्या प्रथम आपली भूमी शुद्ध करीते, येणे आपणात जी अहंमता आहे ती नाश करण्याची स्थिती करीते. अहंमता गेल्याविणा शुद्धत्वता येणार नाही, मन स्थिर होणार नाही. अन तदनंतर आपणात ज्ञानबीज पेरते.

ज्ञानबीज म्हणजे काय? तर सत आपली भूमी सतशुध्द करून, आपली शारीरिक स्थिती सतशुध्द  करून आपणाप्रत घेते अन आपणाप्रत घेऊन ज्ञानयुक्त प्रणव अर्थात उपदेश आपणास प्रस्थापित करीत असते.

उपदेशात्मक स्थिती याने ज्ञानाचे बीज! जर आपण सताचे प्रणव पूर्णत्व ग्राह्य करून कर्तव्यत: साधली असती तर आपणाकडून स्थित्यंतरे झाली असती का? येणे सताने जे ज्ञानबीज आपणात पेरले ते आपण विसरलात. कशामुळे? अहंमतेमुळे! अहंमता आल्यानंतर ही सर्वस्वी स्थिती होत असते. अन्यथा अशी स्थिती होणार नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

मंगळवार, २६ जून, २०१८

मन......!!!

मन हा असा वारू आहे , सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्या वरवरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?

मनाच्यावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही, केले नाही, करविता नाही हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचिर्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.

जो गुरू ब्रम्हउपदेशक आहे, सात्विक तत्व आहे, अविनाशी परम तत्वाची जाणीव देण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, त्या परमपदाप्रत स्थिर करण्याची पात्रता ज्याची आहे असाच गुरू हवा.

गुरुतत्व अर्थात असा गुरू अहंकारी असता कामा नये. अशाच गुरूला शरण जा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वाटचाल करा. अन ती केलीच पाहिजे. मग ते गुरू स्वत: तुम्हाला सुखी करतात, शांती देतात.

मानवाच्या मनाची ओढण त्या गुरुउपदेशाप्रमाणे असायला हवी. मग ते सांगतात मी तुझ्यातच वास करून आहे.

परब्रम्ह हे त्रिगुणावेगळे आहेच आहे परंतु त्यातच ते सामावलेले देखील आहे. त्रिगुण रहित ते परब्रम्ह आहे. याचे सार म्हणजे लिनत्व असेल तरच मेख सापडेल, अन्यथा सापडणे शक्य नाही. आपला अंत कळू देणार नाहीत कारण अनंत लाघवी शक्ती आहे.
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)
टायपिंग असिस्ट: श्री रविंद्र वेदपाठक

सोमवार, २५ जून, २०१८

*कवणे मार्गे जी स्वामी |* 2

*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

सदगुरूनी सेवेकऱ्याच्या मनावर ताबा मिळवल्यानंतर सेवेकऱ्याचे मन कसे राहिले पाहिजे तर सतशुध्द राहिले पाहिजे. परंतु तसे रहात नाही.

सत्य अन असत्य ही स्थिती मन चंचल झाल्यावर होत असते. म्हणून सर्वात प्रथम सेवेकऱ्याने सद्गुरुमय झाले पाहिजे. सेवेकरी सद्गुरुमय झाला नाही तर तो ज्ञानाचा आस्वाद कसा घेऊ शकणार? याकरीता सेवेकऱ्याने सद्गुरुमय व्हायला पाहिजे. मानवाचे मन सदगुरुमय झाले तर मानवामध्ये शंका, कुशंका, चंचलता, सत्य, असत्य राहील का?

ज्ञानार्जनाची आवड आहे परंतु मन चंचल आहे, कशासाठी आपले मन चंचल आहे? आपण सत स्थानात आहात ना? मग मनामध्ये चंचलता का येते? ती न येण्यासाठी प्रथम मानवी स्थितीप्रमाणे मन सदगुरुमय करणे.

आपणास या भवसागरातून तरुण जायचे आहे, वाहून जायचे नाही. आपणा सर्वस्वाना सताचे सानिध्य घेऊन, ज्ञानार्जन करून सत स्थितीत स्थिर केले आहे. परंतु कलीयुगी स्थितीप्रमाणे आपुल्या मनाची स्थिती स्थिर शांत रहात नाही.

सदगुरु स्थानात प्रयाण झाल्यानंतर ज्योत सदगुरुमय होते. परंतु स्थानातून बाहेर पडल्यानंतर तीच ज्योत संशयातीत होते. सताचे स्थानातील ज्योतीने स्थुल त्यागीले आहे परंतु कर्तव्य त्यागीले आहे का तर नाही.

सत आपणास पदोपदी प्रणव देत होते आपणा सर्वस्वांचे कर्तव्य पाहून मी आनंदीमय आहे. परंतु अशी स्थित्यंतरे निर्माण झाल्यानंतर सताकडून आपण कोणते प्रणव घेणार आहात? ज्ञानाची स्थिती ग्रहण करावयाची असेल तर ते ज्ञान ग्रहणतेत येईल.

प्रथम मन सदगुरुमय करा, शीतल, शांत, द्वेषरहीत करा, शंकारहीत व्हां. स्थुल अनेक आहेत परंतु जडविता, घडविता एकच आहे. सताने स्थुलात आपणास ज्ञानमय प्रणव प्रस्थापित केले ते पूर्णत्व ग्रहण करा. ते पूर्णत्वाने मनन करा .

आपण सताचे सेवेकरी आहात. अन सत स्थितीत अशी स्थित्यंतरे होणे यथायोग्य नाही. सताने किती अवधी आपणास ज्ञानोपदेश केला. अन तो ज्ञानोपदेश आपण सर्वस्वानी पूर्णत्व ग्रहण केला असता, मननतेत पूर्णत्व घेतला असता तर अशी स्थित्यंतरे घडली नसती. सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली आहे. अन अशा सताचे तुम्ही सेवेकरी आहात. अशी स्थित्यंतरे घडल्यनंतर सतानाही दु:ख होईल. ज्ञानोपदेश करणे आमचे कर्तव्यच आहे. ज्ञानोपदेश हा कलीयुगी स्थितीतून मानवाची मुक्तता करण्यासाठी आहे. मुक्त होण्याकरिताच सताने सर्वस्व स्थिती केलेली आहे. परंतु आपण मानव त्याची जाण घेत नाही, कल्पना घेत नाही, अन आचरणात पूर्णत्व स्थितीने आणतही नाही.

सत प्रणवाकरीता आम्ही देखील कर्तव्य करत आहोतच ना? तद्वत आपण सेवेकऱ्यानी देखील आपले कर्तव्य सोडावयाचे नाही. सताने आपणास आद्य कर्तव्य बहाल केले. अन ते आद्य कर्तव्य करीता करीता कोणते कर्तव्य दिधले आहे.

संयमता, लीनता ही ठेवलीच पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता नसेल तर तो सताचा सेवेकरी शोभून दिसणार नाही. या पूर्णत्व कलीयुगी स्थितीत तुम्हास आपणाप्रत घेतले आहे. शुध्दीकरण स्थितीचीही जाण दिधली आहे. या सर्वस्व जाणीवा ग्राह्यतेत असताना आपणाकडून घडणारी स्थित्यंतरे यथायोग्य नाहीत. *"लीनता, नम्रता, संयमता सर्वस्व पूर्णत्वाने आचरणात आणली पाहिजे."* आपणाकडून हे घडल्यानंतर, ग्राह्य झाल्यानंतर ज्ञानयुक्त प्रणव मी प्रस्थापित करीन. जर ही तीन गुण आपणाप्रत नसतील तर ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही.
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले.

शुक्रवार, २२ जून, २०१८

*कवणे मार्गे जी स्वामी |*

*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

मानवाचे मन!
प्रथम मानव देह, देहानंतर आत्मा येणे जीवात्मा! जेंव्हा पंचमहाभूतांचा पुतळा देह होतो, उपलब्ध होतो तेव्हा जीवात्मा त्यात प्रवेश करतो.

देह, आत्मा येणे जीवात्मा, जीवात्म्याने देहात प्रवेश केल्यानंतर त्या जीवात्म्यापासून येणे आत्म्यापासून कोणती स्थिती निर्माण होते? आत्म्यापासून कोणती स्थिती तर मन. अन मनापासून बुद्धि .

आत्मा सतशुध्द परब्रम्हापासून प्राप्त झालेला आहे. अन त्यात आत्म्यापासून मनाची उपलब्धता. परंतु मन मानवाला कसे असते तर तारक असते, मारक नसून, साधक असते अन बोधकही असते.

मनापासून मानवाला बुद्धिची स्थिती प्राप्त होते. तीच बुध्दी सत स्थितीने गेली तर मानव परब्रम्हात जातो. परंतु तीच स्थिती अयोग्य स्थितीने गेली तर मानव सतापासून दूर जातो. बुध्दीमुळे कर्तव्य परायणता साधतो. बौद्धिक स्थिती नसेल तर मानव कर्तव्य परायणता साधु शकेल का? अन कर्तव्य परायण झाल्याविणा मानवाची स्थिती उपलब्ध होईल का?

तुमचा देह नुसता देहच आहे का? त्याला इंद्रिये आहेत. इंद्रियांची हालचाल झाल्याविना देह पूर्णत्व होईल का? नाही.

जी बौध्दिकता तुमच्याजवळ असते त्या बौध्दिकते नुसार इंद्रियांची कर्तव्यत: असते. बौध्दिक स्थिती सत स्थितीने गेली तर कर्तव्य सत स्थितीनेच होतील. परंतु तीच बौद्धिक स्थिती असत् स्थितीने जाईल तर इंद्रियांची कर्तव्यें देखिल असतच होतील.

मानवाला जे मन दिलेले आहे त्या मनावर कोण ताबा मिळवू शकेल? तर सद्गुरू! सदगुरुविना मानवाला शांत करणारे तत्व इतरत्र कोणीही होऊ शकत नाही. सदगुरु तत्वच मानवाच्या मनावर ताबा घेऊन त्याला स्थिर, शांत, भक्तियुक्त करु शकते.

सेवेकऱ्याला सदगुरु पूर्णत्व सानिध्यात घेतात, अन ज्ञानार्जनही करतात. त्यामुळे सेवेकरी सदगुरुमय होतो. प्रथम ज्योत सदगुरुमय झाली नाही तर ती सतमय कशी होऊ शकेल?

सताचा राजमार्ग सदगुरुच दाखवतात. येणे सदगुरु आणि सेवेकरी यांची मनन स्थिती एकलय होते. ही एकलयता साधली तरच मानवाचे मन स्थिर, शांत होऊ शकेल.

सदगुरु अन सेवेकरी यांचे नाते अतूट असतें. अन दोघांचीही स्थिती प्रेममय असते. यामुळे मनाची शुद्धत्वता होते. मन शांत होते. सेवेकऱ्याचे मन सदगुरु चरणाप्रत असेल तर ते तारक असते, बोधक असते. पण चंचल असेल अर्थात सदगुरु चरणांपासून दूर असेल तर ते मारक असते. अन त्यामुळे भक्ति म्हणजे काय हे मानवाला कळत नाही.

गुरुवार, २१ जून, २०१८

*जयजयादि परात्परा |*

*जयजयादि परात्परा |*
    *जगत्गुरू कर्पुरगौरा ||*
       *गुरुदीक्षा निर्विकारा |*
          *श्रीशंकरा मज देई ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*" परात्परा येणे कोणती स्थिती?
सर्वस्व स्थितीत विखरुनही पराच्याही पलीकडे असणारी स्थिती येणे अनंत स्थिती."*

पार्वतीचे प्रणव आहेत "सर्वस्व स्थितीत आपण सर्वश्रेष्ठ आहात." परंतु पार्वतीला कल्पना होती का?

पार्वती स्वयंभूना प्रणव प्रस्थापित करीत होती, आपणच सर्व जगात श्रेष्ट आहात अन आपणाकडून मजला गुरुदिक्षा अनुकरण करावयाचे आहे. स्वयंभूकडून गुरुदिक्षा स्विकारून ती काय करणार होती? कशाची उपलब्धता तिजला करून घ्यावयाची होती?

आपण सर्वस्व जाणता दिक्षेत सर्वस्व स्थिती आहे. एकदा का सदगुरूंचे अनुकरण केले तर शिष्याला सर्वस्व स्थिती अनुभूतीत येते. अन अनुभूतीत आल्यानंतर शिष्याचे कोणते कर्तव्य असते? येणे सेवेकऱ्याचे कोणते कर्तव्य असते? *"सतत नामस्मरण करणे", सतत नामस्मरण केल्यानंतर सेवेकऱ्याला काय प्राप्त होते? ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त होते येणे कोणती स्थिती? तर स्वयंप्रकाश प्राप्त होतो"* अन त्या स्वयंमतेत प्रकाशात सेवेकरी काय पहात असतो? तर आपल्या सताचे येणे सदगुरूंचे दर्शन घेत असतो. सदगुरु दर्शन कशामुळे प्राप्त होईल हीच या पार्वतीची इछा.

जीव आणि ब्रम्ह!
सेवेकरी जीवात्मा स्थितीत असतो. येणे आत्मा स्थितीत असतो, अन सदगुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा परब्रह्म स्थितीत एकात्म झाल्याखेरीज दर्शन स्थिती प्राप्त होईल का? नाही होणार. जीव परब्रम्हात लय व्हावयास हवा. तो जीव परब्रम्हात लय कसा होईल. कुणामुळे होईल तर सदगुरूंमुळे होईल. जे दिधलेले नाम आहे त्याच्यात सेवेकरी पूर्णत्व लय झाला पाहिजे.

तरच जीव परब्रम्हात लय होईल. जे नाम आपणाप्रत सताने प्रदान केले आहे ते नाम कशासाठी प्रदान केले आहे. ते सताला पाहण्यासाठी प्रदान केले आहे. जीवात्मा तुमच्या शरीरयष्टीत स्थांबत असतो, तर भवसागरात तुम्हास कोण फिरवित असते? मन! अन त्या मनाला स्थिर शांत कोण करीते? तर नाम! जेव्हा सेवेकरी नाममय होतो तेंव्हाच मन स्थिर होते. मन स्थिर झाल्यानंतर आत्मा स्वयंप्रकाशित होतो. स्वयंप्रकाशित झाल्यानंतर त्या आत्म्याचे संधान परब्रम्हाशी होते. म्हणून मानवाने सताचे नामस्मरण केले पाहिजे. हीच स्थिती पार्वतीला जाणून घ्यायची आहे. स्वयंभू तत्व कसे होते तर आपल्या सताशी एकात्म होते.

गुरुवार, १४ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |* 2

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तूं  निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तूं स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

गुरुगीता कोणी कोणाला प्रणवाकृत केली आहे, तर महेशाने अंबेला प्रणवाकृत केली आहे. या गुरुगीतेत सदगुरुपदाची महती दिधलेली आहे. गुरु अन सदगुरु यामध्ये काही स्थिती आहे ना?

आपण सर्वस्व सेवेकरी मानवी स्थितीत आहात. आपुले गुरू किती आहेत अन सद्गुरु किती आहेत? आई, वडील, विद्यार्जन करणारे ते गुरू, ज्ञानार्जन करणारे ते सद्गुरू! पण मानवाच्या स्थुल देहातच काही गुरू वास करून आहेत. याची मानवाला कल्पना आहे का? मानवी स्थितीप्रमाणे माता गुरू, पिता गुरू, विद्यार्जन करणारे गुरू पण ज्ञानार्जन करणारे ते सदगुरु! त्यांना गुरू म्हणता येईल का?

परंतु मानवी देहात जे पाच गुरू आहेत त्याची मानवाला कल्पना आहे का? आपणास पदोपदी प्रणव मननतेत बिंबवले पाहिजेत. तुमच्या स्थुल देहात जो राम आणि जे सत आहे, जे सद्गुरू आहेत ते तुम्हास पहाता आले पाहिजेत. सद्गुरूंनी स्थुलात असताना हे कर्तव्य केले, ते तुम्हांस सताचा अर्थात सद्गुरूंचा वास आपल्या देहात कसा आहे हे दाखविण्याचे कर्तव्य सदोदित करीत होते अर्थात तो त्यांचा अधिकार होता. मग आपल्या देहातील पाच गुरूंकडून अर्थातच या पंचमहाभूतांनाकडून आपण काय स्वीकृत केलेत.

पंचमहाभूतांपासून देह बनला पण देहापासून बुद्धि कदापीही नाही. ती बुध्दी आत्मस्थितीपासून प्राप्त होते. या पंचमहाभूतांपासून आपण एकच स्थिती प्राप्त करु शकता अन ती म्हणजे संयमन! संयमाने मानव पूर्णत्वाने ज्ञान ग्रहण करु शकतो. अन ज्ञान ग्रहण केल्यानंतर पुढील स्थिती प्राप्त होते.

ज्ञानार्जन मानवाला कोणापासून प्राप्त होते ? तर सद्गुरूंपासून ज्ञान मानवाला प्राप्त होते. जोपर्यंत सत, परब्रह्म, सद्गुरु मानवास जवळ घेत नाही, सर्वस्व स्थितीने शुद्धत्व करीत नाही तोपर्यंत मानव अज्ञानी असतो. ज्या अवधीत सद्गुरु सेवेकऱ्याला आपणाप्रत घेतील, आपले बहुमोल प्रणव प्रदान करतील, अन षडरिपूच्या वलयाने वेष्टीलेल्या मनाला शुद्धत्व करतील त्यावेळीच तो ज्ञानार्जन करु शकेल. अन हे सर्वस्व सद्गुरुविना कोणीही करु शकणार नाही.

मानवाची स्थिती चलबिचल का होते? कारण तो सद्गुरूंच्या प्रणवांचे मनन पूर्णत्वाने करत नाही. मानव संयमतेने, एकनिष्ठ श्रध्देने सद्गुरु चरणाप्रत लीन राहिला तर तो मानव सद्गुरूंपासून दूर जाणार नाही. परंतु मन अस्थिर झाले तर मात्र तो सद्गुरूंपासून दूर जातो. म्हणून मानवाने मन सदोदित सद्गुरु चरणाप्रत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मंगळवार, १२ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तू निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तू स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला वर्तवित आहेत, "ॐ" नमोजी येणे ॐकारा तुजला माझा पूर्णत्व नमस्कार असो.

कल्पदृम म्हणजे कल्पनाही करता येणार नाही असे! असे हे सदगुरु परब्रम्ह आहेत. आपण कल्पनाही करु शकणार नाही. परब्रम्हाची आपण कल्पना करु शकतो का? नाही. महेश आपल्या अंबेला प्रणव देत आहेत, *"हे अंबे, सदगुरु तत्व, परब्रह्म तत्व असे आहे कि त्याची आपण कल्पना करु शकणार नाही. अन अशा या ॐकाराना माझा पूर्णत्वाने नमस्कारअसों"*

आपणास याची कल्पना आहे, महेश तत्व असे आहे? भोळे अन तप्तही आहे, परंतु पूर्णत्व सदगुरुमय तत्व आहे.

महेशानी पूर्णत्वाने सताची, परब्रम्हाची, सदगुरूंची जाणीव घेतली होती. भोळे असूनही या भूतलाचे कर्तव्य करीत होते. अन अशा तत्वाने आपल्या अंबेला येणे पत्नीला पूर्णत्वाने प्रणव दिले, "प्रथम ॐ आहे अन त्यातून आमची आकारणी झाली आहे अशा या ॐकारमय स्थितीला, ॐकाराना आमची सदैव, सतत नमस्कार स्थिती आहे."

अशा या सदगुरु परब्रम्हाची आपण कल्पनाही करु शकणार नाही असे महेश आपल्या पत्नीला विवरण करून सांगत आहेत.

आपण जाणताच सदगुरु साकारमय स्थितीत असताना अन सताने येणे सदगुरूंनी पूर्णत्व प्रस्थापित केले असताना मानवाची स्थिती कशी होत असते? चलबिचल स्थिती होते ना!

सदगुरूंनी सांगितल्याप्रमाणे मानवाने अर्थातच सत सेवेकऱ्यांनी आचरण ठेवले पाहिजे. त्यांच्या अनुसंधनाने वाटचाल केली पाहिजे. अर्थातच सदगुरूंच्या प्रणवांची मननता केली पाहिजे.

आपणा सर्वस्व सत सेवेकऱ्याना मानवी स्थिती प्रमाणे ही गुरुगीता प्रणवाकृत केली होती. त्यावेळी सत स्वयम येणे सदगुरु स्थुलात होते. सदगुरूंनी अर्थातच सताने येणे साक्षात परब्रम्हाने स्थुल देह धारण केलेला होता. अन मानव येणे सत सेवेकरी देखील स्थुलातच होते, स्थुल देही होते. सदगुरूंना आपणास या गुरुगीतेची मानवी स्थिप्रमाणे कल्पना दिधली. सताने अर्थात स्थुलदेही सदगुरूंनी आपणास दिधलेले प्रणव आपल्या मननतेत राहिले नाहीत.

रविवार, १० जून, २०१८

Vachane


*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

अंबा तापट होती, कर्तव्यासाठी हट्टाग्रही होती. स्वयंभू सतत नामस्मरणात लय राहायचे अन ज्यावेळी समाधीस्थ स्थितीतून उतरतील तेव्हाच ती त्यांना प्रणव देउ शकत असे. म्हणूनच ती प्रणव प्रस्थापित करीत  आहे, तुम्ही जे सतत ध्यानमय स्थितीत राहून परब्रम्हाचे दर्शन आपण घेत आहात ते मजला प्राप्त व्हावयास हवे.

महेश अंबेला सांगत आहे, *"तू मन सतशुध्द कर, परब्रम्हाची जाण घेतलीस तर तुला ते पूर्णत्व प्राप्त होईल."*
सत आपणाला सदोदित प्रणव देत होते, *" मन शुद्ध करून सताला पहाण्याची स्थिती करा."

* मानव सताप्रत पूर्णत्व स्थितीने राहिले तर मननतेला अवधी लागत नाही. मानवी मनाची स्थिती स्थिर नसल्याने मननतेला अवधी लागतो. परंतु मन सताप्रत स्थिर राहिल्यानंतर अवधिची आवश्यकता नाही.

सताने या पृथ्वीतलावर दृश्यत्वता प्राप्त करून संसारयुक्त स्थिती करून तुम्हासही आपणाप्रत घेऊन परब्रम्हास प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग साध्य करून दिधला. तुम्हास सत प्राप्त झाले, येणे सद्गुरू प्राप्त झाले तर राजमार्ग साध्य झाला. राजमार्गाने सेवेकऱ्याने वाटचाल केली तर परब्रम्हाची जाण प्राप्त होईल. अन तदनंतर तो भवसागरातून मुक्त होईल. जर मानव स्थिर झाला तर कशाचीही कमतरता भासणार नाही. शारिरीक स्थितीची नाही, ज्ञानाची नाही, सौख्याची नाही, सुखाची नाही कशाचीही कमतरता मानवाला वाटणार नाही. सत राजमार्ग साध्य करून देते परंतु मानवाला आक्रमिता येत नाही.

आम्ही आपणास सर्वस्वाना सदोदित प्रणव देतो आद्यकर्तव्य करा, सदोदित नामस्मरणात रहा. नामस्मरणात राहिल्यानंतर मन सतशुध्द राहून स्थिर शांत रहाते. मन स्थिर शांत राहिल्यानंतर शरीर शांत रहाते. मग सेवेकरी नामस्मरण किती करीतो. देहाला स्थिर शांत ठेउन सेवेकऱ्याने नामस्मरण हे केलेच पाहिजे.

लक्षात ठेवा नाम हे मानवाला सोडून नाही, अन मानव नामाला सोडून राहूच शकत नाही. कर्तव्य करीत करीत मानवाने मनाने नामस्मरण केले पाहिजे. परंतु मानवाकडून एवढी स्थिती पूर्णत्व होत नाही.

सेवेकरी मनाची स्थिती जागृतमय करील तेवढी त्या सेवेकऱ्याची जीवनज्योत प्रज्वलित होईल. त्याचा प्रकाश तेजोमय होईल. तुमच्या अंत:स्थितील ज्योत नामस्मरणामुळे तेजोमय होईल. हे करण्यासाठी मन सतशुध्द ठेवा.

भवसागरातून आपणास पलीकडे जावयाचे असेल तर सदगुरूंची साथ हवी. सदगुरूंची साथ दृढनिश्चयी ठेवलीत तर तुम्ही परब्रह्माप्रत निश्चितपणे जाऊ शकाल.

शनिवार, ९ जून, २०१८

सत वचने


तरी दुर्लभ या त्रिभुवनात.....!!!

*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला प्रणव देत आहेत, *" तू तुझे मन शुध्द शुचिर्भूत करून पूर्णत्वाने मी  जे प्रणव देतो ते ग्रहण कर. मी जे प्रणव देतो ते त्रिभुवनातही दुर्लक्षित आहेत."*
असेच प्रणव सत तुम्हा सर्वस्वाना स्थानावरून येणे आसनावरून देत होते. सत तुम्हास पूर्णत्व स्पष्टीकरण करून सांगत होते. सदगुरुमय झाल्याविना तुम्हास ज्ञान प्राप्त होईल का? नाही.
जेंव्हा मानव सदगुरु सानिध्यात येतो तेंव्हा सत त्या मानवाची पूर्णत्व शुध्दीकरण स्थिती करीते. त्याच अवधीत तो मानव सतशुध्द होऊन सदगुरुमय होतो. त्यापूर्वी मानव चंचल अन द्विधा मनस्थितीत असतो. ज्या अवधीत सत तुमच्या शिरकमलावर हस्त स्पर्श करून अखंड नामाची गती प्राप्त करीते, त्या अवधीत तुमची स्थिती सतशुध्द अन सदगुरुमय होते. अन तदनंतर सत तुम्हास सताची पूर्णत्व जाण करून देते. जे अंबेने प्रणव स्वयंभूना दिधले, *"तुम्हीच माझे गुरू आहात, तुम्हीच मजला सताची जाण द्या"* तदनंतर हे प्रणव स्वयंभूनी अंबेला दिधले. अन आम्ही आपणास आपल्या सताची पूर्णत्वाने जी स्थिती या भूतलावर होती त्याचे प्रणव दिधले. परंतु समीकरण एकच आहे, ही जी स्थिती आहे ती कवण केलेली स्थिती आहे. *अन तुमची स्थिती प्रत्यक्ष सताने घडवून दिलेली स्थिती आहे.* अंबेने स्वयंभूना प्रणव देणे यापेक्षा अधिकाधिक आगळी वेगळी स्थिती सताने तुम्हास प्रदान केलेली आहे. अन त्याप्रमाणें जर तुमची कृतीमान स्थिती असेल तर तो सेवेकरी कसा होईल? तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही. अन सतही त्या सेवेकऱ्यापासून दूर राहणे शक्य नाही. सत तुम्हास प्रणव देत होते कि ही कलीयुगी स्थिती आहे. या कलीयुगी स्थितीत मोहमायेत जी स्थिती आहे त्यात अधिक न गुंतता तुम्ही सत नामस्मरणात पूर्णत्व लय होऊन रहा. अशी स्थिती केल्यानंतर सत येणे परब्रह्म तुम्हास दुष्टांतमय स्थिती देईलच देईल.
सताने सर्वस्व उघड स्थिती केली पण तुम्ही ते स्मरणतेत घेतले नाही. मानव मोहमायेत अधिकाधिक गुंतत गेला त्यामुळे तो सतापासून दूर गेला. पूर्णत्व सताप्रत राहण्यासाठी सेवेकऱ्याने कर्तव्यापुरते मायेचे कर्तव्य करून सतत नामस्मरणात राहिले पाहिजे. पण मानवाकडून अशी स्थिती होत नाही.
कर्तव्य करीत असतानासुध्दा मन नामस्मरणात गुंतून राहिले पाहिजे. लक्षात घ्या नाम तुमच्यात गुंतून आहे. नामाने तुम्हाला सोडले तर तुमचे स्थुल  स्थित्य रहाणार नाही. म्हणजेच नाम तुमच्यात गुंतून आहे पण आपण संसारमय स्थितीत आहात. संसार येणे स्वार्थ! अन हेच प्रणव महेश अंबेला देत आहेत. सताला संसार नाही का? तुम्ही हाच सताचा संसार आहे. पण सत तुम्हात गुंतून राहिले नाही. तुम्हास ज्ञानोपदेश करीत, तुम्हास सतशुध्द करीत, तुम्हास सतभक्तिची पूर्णत्व जाण देत स्वयंम परब्रम्हाचे कर्तव्य करीत होते.

गुरुवार, ७ जून, २०१८

ईश्वर म्हणे वो देवी......

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

भक्त भगवंताप्रत का येत असतो? तर ज्ञानप्राप्तीसाठी आणि भक्तिसाठी भक्त सत चरणाप्रत येत असतो. आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत ज्ञानप्राप्तीसाठी जात होता.
भगवंतानी आपली सुख-दु:ख स्थिती ग्राह्य केली नाही तर आपली स्थिती चंचल होईल. भक्ताचे भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
सद्गुरू माऊलीने स्थुल रुप धारण केल्यानंतर सुख- दु:ख स्थिती भोगली कि नाही? पण तरीहि ते स्थिर, शांत, संयमी असायचे. पण तोच भक्त, थोडीशी दुर्मिळ स्थिती झाली तर चलबिचल होतो.
आपणास कल्पना आहे आमची कन्यका अहिल्या पतीच्या शापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? असे असून देखील आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होती ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हालाही सर्वस्वाची जाण होती. सर्वस्व स्थिती भगवंताने स्थुल रुप धारण करून स्थित्यंतरे कशी येतात त्याची स्वयम जाण सद्गुरूनी आपणास दिधलेली आहे.पण तरीही मानव विसरतो.

आपणास कल्पना आहे सुख आल्यानंतर मानव कालावधीची गणना करीत नाही. पण दु:ख आल्यानंतर मानव क्षणापासून सुरुवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत. थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर आपण चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आम्ही हे मान्य करीतो कि अपुले कर्तव्य आहे सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. परंतु हतबल होणे नाही. आपण सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लिनता ही ठेवलीच पाहिजे.
आपण सर्वस्व भक्त भगवंताचे आहात, सताचे आहात. त्या सताला तुमच्या सर्वस्व सुख-दु:खाची जाण आहेच. भक्ताची जर पूर्णत्व श्रध्दायुक्त स्थिती नसेल तर? लिनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम नसेल तर? भगवंत भक्तात लय होणार नाहीत. भक्ताचे भगवंतावर अपरंपार, नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होणारच. जेथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील.
म्हणून भगवंत भक्ताप्रत राहण्यासाठी या सर्वस्व गुणांची आवश्यकताआहे. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. लक्षात ठेवा विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते.