Namasmaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Namasmaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

नामस्मरण ........ सर्वस्वावरील एकच उपाय !!!


जे सदगुरू आसनावरून प्राप्त झालेले आहे त्यांच्या नामस्मरणात राहिलेच पाहिजे.
२४ तासातून थोडा का अवधी होईना नामस्मरण हे केलेच पाहिजे. थोडी तरी ध्यान-धारणा, अभ्यास, चिंतन हे केलेच पाहिजे. त्यालाच भक्ती मार्ग म्हणतात. तो न अंगीकारता आपण इतर उपद्व्याप करत बसतो, मग आपण अंतरंगात कसे रंगाल ? नेत्रतरंग कसे फाकतील ? तरंग फाकण्यासाठी शुभ्र-प्रकाश कसा प्राप्त होईल? हे सर्व होण्यासाठी नामस्मरणाची आवश्यकता आहे. प्रथम पायरी कोणती? तर नामस्मरण.
तुकाराम महाराज्यासारख्या महान संतांनी सुद्धा सांगितले आहे, नामापरीते नाही साधन, वाहतसे आण विठलाची.शपथ घेऊन सांगितले आहे, नामापरीते दुसरे कांहीही नाही. भक्तीमार्गाचा नाम हा केंद्र बिंदू आहे.
२४ तासात तुमच्या देहात किती अजपाजप होतो. अखंड नामालाच अजपाजप म्हणतात. २१६०० मोजून २४ तासात होते म्हणून तुमचा देह तरला आहे, उभा आहे. तर श्वास आणि उच्छवास किती वेळा चालतो? तर २१६०० वेळा. आत असलेल्या त्या भगवंताचे खाद्य ( नाम ) चालूच असते. त्यात तुम्ही भर घालवायची असते. मग उपास, तापास, निर्जळी लंघन ह्या सर्वांची किंमत नामस्मरणापुढे शून्य आहे. पण नामस्मरण करायला वेळ कोणाला आहे ? मायेच्या लटपटीत, खटपटीत वेळ मिळतो का? बसून ध्यान-धारणा होत नाही तर निदान रस्त्याने जाता-येता तरी करा. इतर व्याप करता, पण नामस्मरण नाही. पण प्रसंग आले किंवा इतर व्याप आले कि बाबांजवळ निवेदन करतात. मग सर्वस्व केन्द्रीकरण एकाच ठिकाणी होते. जर दुख: अंती परमेश्वर आहे तर सुखा अंती का असू नये? सुखा अंती तरंग येतात का? आपल्या दरबारात अनेक उदाहरणे आहेत. कुणावर प्रसंग आला कि बाबा येण्यापूर्वीच  दरबारात हजर. अन योग असा कि मीच त्या दिवशी दरबारात उशिरा येत असे. अशा वेळी त्यांचे तरंग बाबांकडे, कारण शांती मिळावी म्हणून. त्यापासून मुक्त व्हावे म्हणून. पण हे नेत्र तरंग नाहीत तर हे मायावी तरंग झालेत.
आपल्या दरबारातील सेवेकरणीचेच उदाहरण देतो, सेवेकरणीच्या आई वर प्रसंग आला ज्योत प्रकाशीत, तिला वाटले आपली आई आता जाणार. तिची इच्छा होती आपली आई राहिली पाहिजे. सेवेकरनीने आपल्या आईच्या छातीवर हात ठेवला. आई हात झटकतेय पण ती हात बाजूला करायला तयार नाही, अन सेवेकरनीने केंद्र बिंदू कुठे साधला, तर मुळाश्रम. त्यावेळी तिला अशी समाधी लागली कि शेवटी तिला संदेश मिळाले आता तू उतर, चिंता करू नकोस. आता तुझी माता स्थिर होईल त्यावेळी नेत्र तरंग नव्हते तर आपणावर जो प्रसंग येतो त्यातून सताने मला सोडवावे. सदगुरूने मला सोडवावे या साठी भक्त तळमळीने कार्य करतो. तो प्रसंग होता, ते तरंग नव्हते. अशी प्रत्येक मानवाची त-र्हा आहे. - भगवान महाराज