प्रवचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रवचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ मे, २०२१

श्री समर्थ वाणी

गुरुवार दिनांक 19 मे 1960

श्री समर्थांचे बोल
मन आणि माया

माया म्हणजे काय? हे कोणी पाहिले आहे काय? माया म्हणजे स्वयम् पद आणि त्या स्वयम् पदाचा प्रकाश. त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तू पाहून त्याला वागतो आणि जे जे दृष्टीस पडले ते ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. 

ज्या प्रकाशात अमूल्य वस्तू दिसत आहे, त्या वस्तू पासून आपले संरक्षण होईल अशी मानवाची भावना, म्हणून ती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात.

अमूल वस्तू खरी. परंतु ती पासून पुढे काय होईल? याचा विचार नाही, त्याला माया म्हणतात. 

माया कोठून आली? हे हि त्याला समजत नाही. मायेला हे कळत नाही की मी कुठून आले? 

ज्योत आणि प्रकाश एकमेकावर अवलंबून आहेत. हे काही
सेवेकर-याना कळत नाही, म्हणून एखाद्या सेवेक-याला त्याची जाणीव नाही. म्हणून कोणी कोणाला लहान-मोठा म्हणू नये. याचा अर्थ भक्ती आहे.

मान-अपमान, संशय, कल्पना रहित भक्ती आहे. सेवेकर्‍याने मानापमानाचे गाठोडे जवळ बाळगले तर त्याच्या भक्तीला किंमत शून्य आहे. जो सेवेकरी एकदा ज्या पदाला शरण, त्याच पदाला परिपूर्ण सर्व अर्पण करणे, त्या ठिकाणाचा अंत घेणे, तेच ठिकाण सर्वस्वाचे निदान आहे असे समजावयास पाहिजे. मग तर त्याला पुढचा मार्ग सोपा जातो. 

हेच त्याला कळत नाही तो सेवेकरी नाही अगर शिष्यही नाही. स्वरूपाची ओळख करून घेतली हेच श्रेष्ठ होईल. ही ओळख कोणी करून घेतली आहे काय? 

ग्रंथ वाचून किंवा ओव्या वाचून अशाने दर्शन होत नाही, कळायचे नाही. मानवाने स्वतःच्या कृतीतच मनोवृत्तीचे दर्शन करावयास पाहिजे. 

मी कोणीतरी आहे, हे म्हणणे साफ चुकीचे आहे. जर तु कोणीतरी आहेस, तर तुझ्या हातून चूक झाल्यानंतर तुला आधार काय? मग तू का उठाठेव करतोस? तुला त्या जड देहाची शुद्धी, त्याची ओळख असती, तर तू मी म्हणणारा कोण? सर्वस्वाचे स्पष्टीकरण होवूं शकत नाही. 

गुरुवार, ४ मार्च, २०२१

मंगळवार, ९ जून, २०२०

प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

*_गुरु गुह्य_* 
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज अमृतवाणी)

_आपली श्री सद्गुरु माऊलीं गुरू गुह्य उघड करुन सांगताना म्हणते,_  

*"गुरुदेव पितामहांसारखे  परम्  पूज्य तत्व, सप्त ऋषींचे प्रमुख, यज्ञ यागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्यापूढे लिन आहेत असे ते तत्व"*  

_ते देखील या आसनाप्रत प्रणव देत असतात. मग असे ते आसन आणि त्यावर आरुढ असलेले तत्व सेवेकऱ्यांनो परम् श्रेष्ठ नाही का?_

मग अशा आसनाप्रत, अशा तत्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे. आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सतमय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दूसरे तीसरे कोणी नसून सद्गुरुच आहेत. त्याच्या वेगळे जाण देणारे दूसरे कोणीही नाही.

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."

गुरुवार, २१ जून, २०१८

*जयजयादि परात्परा |*

*जयजयादि परात्परा |*
    *जगत्गुरू कर्पुरगौरा ||*
       *गुरुदीक्षा निर्विकारा |*
          *श्रीशंकरा मज देई ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*" परात्परा येणे कोणती स्थिती?
सर्वस्व स्थितीत विखरुनही पराच्याही पलीकडे असणारी स्थिती येणे अनंत स्थिती."*

पार्वतीचे प्रणव आहेत "सर्वस्व स्थितीत आपण सर्वश्रेष्ठ आहात." परंतु पार्वतीला कल्पना होती का?

पार्वती स्वयंभूना प्रणव प्रस्थापित करीत होती, आपणच सर्व जगात श्रेष्ट आहात अन आपणाकडून मजला गुरुदिक्षा अनुकरण करावयाचे आहे. स्वयंभूकडून गुरुदिक्षा स्विकारून ती काय करणार होती? कशाची उपलब्धता तिजला करून घ्यावयाची होती?

आपण सर्वस्व जाणता दिक्षेत सर्वस्व स्थिती आहे. एकदा का सदगुरूंचे अनुकरण केले तर शिष्याला सर्वस्व स्थिती अनुभूतीत येते. अन अनुभूतीत आल्यानंतर शिष्याचे कोणते कर्तव्य असते? येणे सेवेकऱ्याचे कोणते कर्तव्य असते? *"सतत नामस्मरण करणे", सतत नामस्मरण केल्यानंतर सेवेकऱ्याला काय प्राप्त होते? ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त होते येणे कोणती स्थिती? तर स्वयंप्रकाश प्राप्त होतो"* अन त्या स्वयंमतेत प्रकाशात सेवेकरी काय पहात असतो? तर आपल्या सताचे येणे सदगुरूंचे दर्शन घेत असतो. सदगुरु दर्शन कशामुळे प्राप्त होईल हीच या पार्वतीची इछा.

जीव आणि ब्रम्ह!
सेवेकरी जीवात्मा स्थितीत असतो. येणे आत्मा स्थितीत असतो, अन सदगुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा परब्रह्म स्थितीत एकात्म झाल्याखेरीज दर्शन स्थिती प्राप्त होईल का? नाही होणार. जीव परब्रम्हात लय व्हावयास हवा. तो जीव परब्रम्हात लय कसा होईल. कुणामुळे होईल तर सदगुरूंमुळे होईल. जे दिधलेले नाम आहे त्याच्यात सेवेकरी पूर्णत्व लय झाला पाहिजे.

तरच जीव परब्रम्हात लय होईल. जे नाम आपणाप्रत सताने प्रदान केले आहे ते नाम कशासाठी प्रदान केले आहे. ते सताला पाहण्यासाठी प्रदान केले आहे. जीवात्मा तुमच्या शरीरयष्टीत स्थांबत असतो, तर भवसागरात तुम्हास कोण फिरवित असते? मन! अन त्या मनाला स्थिर शांत कोण करीते? तर नाम! जेव्हा सेवेकरी नाममय होतो तेंव्हाच मन स्थिर होते. मन स्थिर झाल्यानंतर आत्मा स्वयंप्रकाशित होतो. स्वयंप्रकाशित झाल्यानंतर त्या आत्म्याचे संधान परब्रम्हाशी होते. म्हणून मानवाने सताचे नामस्मरण केले पाहिजे. हीच स्थिती पार्वतीला जाणून घ्यायची आहे. स्वयंभू तत्व कसे होते तर आपल्या सताशी एकात्म होते.