Sadguru Darbar - सद्गुरू दरबार Dedicated to my beloved Sadguru Param Pujya Shri Sadguru Swami Bhagwan Maharaj. माझे परम् पूजनीय श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांच्या चरणकमलावर सविनय सादर समर्पित.
शुक्रवार, ७ मे, २०२१
रविवार, २ मे, २०२१
श्री समर्थ वाणी
रविवार, ४ एप्रिल, २०२१
गुरुवार, ४ मार्च, २०२१
प्रवचन - वालावल
बुधवार, २२ जुलै, २०२०
गुरुवार, ९ जुलै, २०२०
मंगळवार, ७ जुलै, २०२०
मंगळवार, ९ जून, २०२०
प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी
मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८
वाल्मिकी ॠषी
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*
मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."
भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?
वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.
मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.
श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.
संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्यावर तेज दिसत नाही.
वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.
परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.
गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.
ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.
पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."
गुरुवार, २१ जून, २०१८
*जयजयादि परात्परा |*
*जगत्गुरू कर्पुरगौरा ||*
*गुरुदीक्षा निर्विकारा |*
*श्रीशंकरा मज देई ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
*" परात्परा येणे कोणती स्थिती?
सर्वस्व स्थितीत विखरुनही पराच्याही पलीकडे असणारी स्थिती येणे अनंत स्थिती."*
पार्वतीचे प्रणव आहेत "सर्वस्व स्थितीत आपण सर्वश्रेष्ठ आहात." परंतु पार्वतीला कल्पना होती का?
पार्वती स्वयंभूना प्रणव प्रस्थापित करीत होती, आपणच सर्व जगात श्रेष्ट आहात अन आपणाकडून मजला गुरुदिक्षा अनुकरण करावयाचे आहे. स्वयंभूकडून गुरुदिक्षा स्विकारून ती काय करणार होती? कशाची उपलब्धता तिजला करून घ्यावयाची होती?
आपण सर्वस्व जाणता दिक्षेत सर्वस्व स्थिती आहे. एकदा का सदगुरूंचे अनुकरण केले तर शिष्याला सर्वस्व स्थिती अनुभूतीत येते. अन अनुभूतीत आल्यानंतर शिष्याचे कोणते कर्तव्य असते? येणे सेवेकऱ्याचे कोणते कर्तव्य असते? *"सतत नामस्मरण करणे", सतत नामस्मरण केल्यानंतर सेवेकऱ्याला काय प्राप्त होते? ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त होते येणे कोणती स्थिती? तर स्वयंप्रकाश प्राप्त होतो"* अन त्या स्वयंमतेत प्रकाशात सेवेकरी काय पहात असतो? तर आपल्या सताचे येणे सदगुरूंचे दर्शन घेत असतो. सदगुरु दर्शन कशामुळे प्राप्त होईल हीच या पार्वतीची इछा.
जीव आणि ब्रम्ह!
सेवेकरी जीवात्मा स्थितीत असतो. येणे आत्मा स्थितीत असतो, अन सदगुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा परब्रह्म स्थितीत एकात्म झाल्याखेरीज दर्शन स्थिती प्राप्त होईल का? नाही होणार. जीव परब्रम्हात लय व्हावयास हवा. तो जीव परब्रम्हात लय कसा होईल. कुणामुळे होईल तर सदगुरूंमुळे होईल. जे दिधलेले नाम आहे त्याच्यात सेवेकरी पूर्णत्व लय झाला पाहिजे.
तरच जीव परब्रम्हात लय होईल. जे नाम आपणाप्रत सताने प्रदान केले आहे ते नाम कशासाठी प्रदान केले आहे. ते सताला पाहण्यासाठी प्रदान केले आहे. जीवात्मा तुमच्या शरीरयष्टीत स्थांबत असतो, तर भवसागरात तुम्हास कोण फिरवित असते? मन! अन त्या मनाला स्थिर शांत कोण करीते? तर नाम! जेव्हा सेवेकरी नाममय होतो तेंव्हाच मन स्थिर होते. मन स्थिर झाल्यानंतर आत्मा स्वयंप्रकाशित होतो. स्वयंप्रकाशित झाल्यानंतर त्या आत्म्याचे संधान परब्रम्हाशी होते. म्हणून मानवाने सताचे नामस्मरण केले पाहिजे. हीच स्थिती पार्वतीला जाणून घ्यायची आहे. स्वयंभू तत्व कसे होते तर आपल्या सताशी एकात्म होते.