शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

गीता 1

असे म्हटले जाते की अठरा दिवसांच्या महाभारत युद्धामध्ये त्या काळातील 80 टक्के पुरुषांचा नाश झाला.

कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अखेरीस जेथे हे महाभारताचे युद्ध घडले तेथे संजय गेला. त्याने जेव्हा सभोवती पाहिले, तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की खरेच युद्ध झाले होते कां? कारण जेथे पांडव आणि कृष्ण ऊभे होते तेथील पायाखालील जमिनीने सांडलेले सर्व रक्त गिळंकृत केलेले होते. रक्ताच्या एका थेंबाचा देखील तेथे मागमूस नव्हता.
तेवढ्यात एका वयस्कर भारदस्त मागून आलेल्या आवाजाने संजय चकीत झाला. तो म्हणत होता, "संजया! तुला सत्य काय ते कधीच कळणार नाही."

धुळीच्या लोटातून बाहेर येणाऱ्या भगवी वस्त्रे धारण केलेल्या त्या पाठीमागून आलेल्या आवाजाच्या दिशेने संजय फिरला.

रहस्यात्मक रित्या तो वृद्ध संजयला म्हणाला,"तू येथे कुरुक्षेत्राच्या युद्धाबद्दल जाणून घेण्यासाठी आला आहेस, परंतू त्याबद्दल तुला काहीच कळणार नाही, जोपर्यंत खरे युद्ध काय होते हे तुला कळणार नाही."

ह्याचा अर्थ काय?

महाभारत हे महाकाव्य आहे, तो एक पोवाडा आहे, ते एक सत्य आहे, परंतु त्याचबरोबर ते एक तत्वज्ञान देखील आहे.

तो वृद्ध हसला आणि संजयाकड़ून आणखी प्रश्न येण्याची वाट पाहू लागला. संजय म्हणाला, "मला एक सांगा मग ह्यातील तत्वज्ञान ते कोणते?"

वृद्ध म्हणाला, "ठिक आहे." पांडव म्हणजे दुसरे काही नसून, तुझी पाच इंद्रिये होत. दृष्टी किंवा दृष्टिकोन, गंध ज्ञान, चव, स्पर्श ज्ञान, ध्वनी ज्ञान ही ती पाच इंद्रिये.

आणि तुला माहितीय का, "कौरव" म्हणजे कोण?
कौरव म्हणजे आपल्यात असणारे शंभर अवगुण किंवा दुर्गुण, जे आपल्या ह्या पाच इंद्रियांवर रोजच हल्ला करीत असतात.
हे जरी खरे असले, तरी तू त्यांच्याबरोबर दोन हात करू शकतोस......माहितीय का कसे?

संजया ने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

कृष्ण तुझे सारथ्य करतो तेव्हा. तो वृद्ध हसला आणि संजय त्याच्याकडे "आ" वासून बघतच राहिला.

गीता 2

"कृष्ण म्हणजे तुझा आतील आवाज, तुझा अंतरात्मा, तुझा दिशादर्शक प्रकाश आणि तू जर का तुझ्या जीवनाला त्या कृष्णाच्या स्वाधीन केलेस तर तुला जीवनात काळजी करण्यासारखे काहीच उरणार नाही."

ह्या बरोबर संजय सुन्न / स्तब्ध झाला व पुन्हा भानावर येऊन प्रश्न करता झाला, "मग महानुभव, मला सांगा, द्रोणाचार्य आणि भीष्म हे दुर्गुणी होते का, जे कौरवांच्या बाजूने लढले? ह्या प्रश्नावर दु:खी होऊन त्या वृद्धाने नकारार्थी मान ड़ोलवली.

जसे तुम्ही वयाने वाढता तसे तुमचा वयस्करांकड़े पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. "तुमच्या वाढत्या वयात तुम्हाला असे वाटू लागते की जे वयस्कर तुमच्या लहानपणी सगळ्याच बाबतीत चांगले आदर्शवत होते ते तसे नाहीत. त्यांच्यामध्ये सुद्धा दोष आहेत. आणि एके दिवशी तुम्हाला विचार करावासा वाटतो की ते खरच तुमच्या भल्यासाठी आहेत की वाईटासाठी आहेत. तुम्हाला असाही साक्षात्कार होईल की तुम्हाला त्यांच्याबरोबर तुमच्या भल्यासाठी भांडणही करावे लागेल. आणि वय वाढतानाचा हा सगळ्यात कठीण असा कालक्रम असेल आणि त्यासाठीच अशावेळी "गीता" ही महत्त्वाची असणार आहे."

संजय जमिनीवर निश्चल पड़ला, का तर तो थकला होता म्हणून नव्हे तर त्याचे कारण होते की तो ते समजत होता आणि ह्या संपूर्ण प्रकरणातील अघोरपणा दुष्टपणा त्याला जाणवला होता.

तो विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

"ह!" तो वृद्ध म्हणाला. तू अत्युत्तम ते शेवटाला ठेवलेस. कर्ण म्हणजे तुझ्या त्या पंचेन्द्रीयांचा बंधु. तो म्हणजे तुझी इच्छा. तो तुझाच एक भाग होय, परंतु दुर्गुणांचा साथी. त्याला त्याच्या चुकांची कल्पना आहे पण तो दुर्गुणी लोकांबरोबर असल्यामुळे फक्त बहाने देतोय, जशा तुझ्या इच्छा सदानकदा बहाने करीत असतात.

जशा तुझ्या इच्छा नाही कां तुला दुर्गुण जवळ करण्यासाठी बहाने करतात?

संजयाने शांतपणे मान हलवली. त्याने जमिनीकडे पाहिले. हजारो कल्पना मनामध्ये पिंगा घालीत असल्याकारणाने त्यांची मनोमन जुळणी करीत होता आणि जेव्हा त्याने मान वरकरून त्या वृद्धाकड़े पाहिले तेव्हा तो वृद्ध निघून गेला होता. धुळीच्या लोटांमध्ये तो केव्हाच अंतर्धान पावला होता. एक फार मोठे जीवनाचे तत्वज्ञान मागे सोडून तो निघून गेला होता.

Lesson from Gita

The below excerpt is published giving due respect to it's writer as the source is not known due to it's taken from whatsapp message. Marathi translation will follow:

It is said in the texts that 80% of the fighting male population of the civilization was wiped out in the eighteen days Mahabharata war.

Sanjay, at the end of the war went to the spot where the greatest war took place; Kurukshetra.

He looked around and wondered if the war really happened, if the ground beneath him had soaked all that blood, if the great Pandavas and Krishna stood where he stood.

“You will never know the truth about that!” said an aging soft voice.

Sanjay turned around to find an Old man in saffron robes appearing out of a column of dust.

“I know you are here to find out about the Kurukshetra war, but *you cannot know about that war till you know what the real war is about*.” the Old man said enigmatically.

“What do you mean?”

*The Mahabharata is an Epic, a ballad, perhaps a reality, but definitely a philosophy*.

The Old man smiled luring Sanjay into more questions.

“Can you tell me what the philosophy is then?”
Sanjay requested.

Sure, began the Old man.

*The Pandavas are nothing but your five senses*,
sight,
smell,
taste,
touch
and sound...,

and do you know what the *Kauravas* are?
 he asked narrowing his eyes.

 *The Kauravas are the hundred vices that attack your senses everyday but you can fight them*... and do you know how?

Sanjay shook his head again.

“When Krishna rides your chariot!”

The Old man smiled brighter and Sanjay gasped at that gem of insight.

*Krishna is your inner voice, your soul, your guiding light and if you let your life in his hands you have nothing to worry*.

Sanjay was stupefied but came around quickly with another question.

“Then *why are Dronacharya and Bhishma fighting for the Kauravas, if they are vices*?”

The Old man nodded, sadder for the question.

It just means that as you grow up, your perception of your elders change. *The elders who you thought were perfect in your growing up years are not all that perfect. They have faults. And one day you will have to decide if they are for your good or your bad.  Then you may also realize that you may have to fight them for the good. It is the hardest part of growing up and that is why the Geeta is important*.

Sanjay slumped down on the ground, not because he was tired but because he could understand and was struck by  the enormity of it all.

 *What about Karna*? he whispered.

“Ah!” said the Old man. “You have saved the best for last. *Karna is the brother to your senses, he is desire, he is a part of you but stands with the vices. He feels wronged and makes excuses for being with the vices as your desire does all the time.*

 *Does your desire not give you excuses to embrace vices*?”

Sanjay nodded silently. He looked at the ground, consumed with a million thoughts, trying to put everything together and then when he looked up the Old man was gone....
disappeared in the column of dust.........leaving behind the great philosophy of Life!  
🙏🙏🙏🙏

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जाणीतसे !! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव
  तेणे आत्मस्थिती जाणीतसे  !!
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतूरहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टि ज्या माणसाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे, पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव  घेऊ शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो ?
अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परिने सद्गुरू चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही.

मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वराने, अनंतानी मानवाला शक्ति दिलेली आहे. ही शक्ति सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाही असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर  सद्गुरू चरणात, सत चरणात लय असेल तर सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवतात. सद्गुरूंच्या ठिकाणी त्या ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे?

एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब  सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. ...........

पुढे चालू 2

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

प्रभातिचा शुभारंभ

प्रभातिचा शुभारंभ करूया
घेऊनी तुझे नाम सद्गुरू राया
वंदन करीतो मी तुजला
पडतो तुझीया मी पाया........

जवळपास करण्यासाठी माया
का घालवितो वेळ माझा मी वाया?
रमण्या ऐवजी नामात तुझीया
झिजवितो मायेत, मी माझी काया

फरफटवितो मजला जमविण्या,
कवडीमोल ती माया
आयुष्याचा दवड़ीतो अमुल्य वेळ,
जवळ करण्यात नश्वर अशी ती माया

नाम तुझीये न घेता सुप्रभाती
घेतो मोबाईल मी हाती
रमून जातो त्यातच
फेसबुक आणि व्हाॅटस् अपच्या सांगाती
................मयुर तोंड़वळकर............

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*

✨🌹 ✨🌹 ✨🌹 ✨🌹 ✨🌹
*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*
        *सद्गुरू ही पर्दा दूर हटावे।*
*सद्गुरू से पाईये सच्चा प्यार,*
        *सद्गुरू से मिलता मोक्ष द्वार।*
*अन्त समय जो सद्गुरू को ध्याता,*
        *यम न खोले उस का खाता*
*सद्गुरू को करिये वंदना भाव से बारंबार ,*
        *नाम सुनकर किया जिस ने भवसागर पार*
👏👏👏👏👏 👏👏👏 👏👏👏

*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*
        *सद्गुरू ही पर्दा दूर हटावे।*
सद्गुरू हे साऱ्या जगतातील एकच असे
तत्व आहे जे सगळ्याना सत् मार्ग दाखवून त्या
अनंता प्रत आपल्याला घेऊन जातात,
सद्गुरूच मायेचा पर्दा दूर करतात. (सद्गुरूनी
म्हटल्याप्रमाणे त्या मायेची शक्ती ही 21
सुर्यांची जितकी शक्ती असते तितकी त्या
एका मायेची शक्ती आहे).

*सद्गुरू से पाईये सच्चा प्यार,*
        *सद्गुरू से मिलता मोक्ष द्वार।*
खरे प्रेम जर कोणाकडे मिळत असेल तर ते
फक्त सद्गुरूंकड़ेच मिळू शकते. इतकेच नव्हे
तर मोक्षाचे द्वार सुध्दा फक्त सद्गुरूच  खोलून
देऊ शकतात. इतर कोणीही नाही. (मोक्ष म्हणजे
काय? तर मुक्ती मोक्ष म्हणजे एखाद्याला त्या
सताच्या चरणांची प्राप्ती होणे, म्हणजेच सताने
त्या भक्ताला आपल्या चरणाप्रत घेणे)

*अन्त समय जो सद्गुरू को ध्याता,*
        *यम न खोले उस का खाता*
याचा अर्थ असा की जो सदोदीत त्या सताचे
म्हणजेच सद्गुरूंचे ध्यान करतो (अन्त समय
नाही) तर अंतिम श्वासापर्यंत जो सतत त्या
सद्गुरूंचे ध्यान करतो त्याला यम देखील या
स्थुलातून नेऊ शकत नाही. त्याला फक्त
सद्गुरूच मुक्ती मोक्ष देतात म्हणजेच आपल्या
चरणावर स्थिर करतात. (आणि अशी कित्येक
उदाहरणे या दरबारात घड़ून गेलेली आहेत. जुन्या
भक्तगणांनी ती पाहिली देखील आहेत.)

*सद्गुरू को करिये वंदना भाव से बारंबार ,*
        *नाम सुनकर किया जिस ने भवसागर पार*
ज्या संताने हे लिहीलय ते म्हणतात, "त्या सद्गुरूंची
वंदना म्हणजेच नामस्मरण आपण सगळ्यांनीच
वारंवार, नेहमी, सदोदीत केले पाहिजे, आणि ते
ही कसे तर भावपूर्ण, निस्सीम भावनेतून, मनापासून,
मन:पूर्वक, अंतरात्म्यातून ओढ लाविल असे. अशा
रीतीने जो माझा भक्तगण जाईल, त्याला हा
भवसागर पार करून जाण्यास मीच (सद्गुरूच) मदत
करणार आहेत ह्याची जाणीव सर्वस्वांनी घ्यावयास
हवी.

🙏�🌺🍀🌸🌷🌻👏🙏

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

फुले, .......भगवंताचीच मुले !!!

माझ्या अंगणात जास्वंद फुलले,
गणपतिच्या चरणी मी ते वाहिले,

पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे,
कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे,

मोग-याचा सुगंध पसरला सगळीकडे,
भगवंताच्या दर्शनासाठी अवघे झाले मन वेड़े,

कमळ दल पुष्प जरी अवतरले असे चिखलात,
महालक्ष्मीला ते प्यारे, वसे ते तिच्या करकमलात,

सदाफुलीची ही फुले सदा फुलती आपल्या आसपास,
औषधी असती, लाभतो त्यांना भगवंताचा सहवास,

अनंताचे वर्णन काय मुखी करावे?
नावातच त्याच्या 'अनंत', अनंत वेळा स्मरावे,

सताचा रंग हा शुभ्र, सताच्या सान्निध्यात रहावे,
हिच असे मनिषा तयाची, सद्गुरूंच्या चरणी त्यांना वहावे,

कुणी त्यांच्या गळ्यात जाऊनी पड़े,
तर कुणी घाली भक्ती भावाने साकडे,

कुणी त्याच्या चरणांसाठी आसुसले,
अशी ही फुले, जशी कांही भगवंताचीच मुले,

सुगंध तयांचा सगळीकडे दरवळे,
भगवंताच्या चरणी वाहूनी भक्तगणही सुखावले........!!

मयुर तोंड़वळकर

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

दर्शन देरे, देरे भगवंता
  तुझा ठाव नाही, घेता येत अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता .....!!!

तुझीया नामात, होईन मी तल्लीन
  तुझेच नाम, सदा मी गाईन
   आता तरी कृपा, करशील कां अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

नाम तुझे गोड,  नाही त्याला पाड़
 सदा त्याचे वेड़, मनी त्याची ओढ,
  लावशील कां मजला, हे बा अनंता
   दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

हे पिता परमेश्वर !!

🙏🌺🌸🌷🌻🍀👏�🙏

हे पिता परमेश्वर,
हे मातेश्वर,
होईल का मला दर्शन,
तुझीया स्वरूपाचे....!!

दर्शन होता मी भक्त,
होईल का मी विरक्त,
होईल का मी परावृत्त,
मोहमायेच्या पाशातून....!!!

चरणांची सेवा,
घडेल का हे देवा,
आशा करीतो भक्त हा,
आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत....!!!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मी कोण आहे ?

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

मी कोण आहे ?

सगळे आहे ते तुझेच तर आहे,
मी काय देणार भगवन,
माझे असे काय आहे?

सगळ्या विश्वाचा निर्माता तुच तर आहेस,
मी काय देणार भगवन,
मी देणारा, मी कोण आहे?

जड़विता, घड़विता तुच तर आहेस,
मी काय जड़विणार, घड़विणार
मी कोण आहे?

जगताचा चालक, पालक तुच तर आहेस,
मी कां गमजा करतो,
जो काही आहे तो मीच आहे ?

🙏🌺🌸🌷🌻🍀👏�🙏

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

!! सुंदर तो भाव, सुंदर तो विचार !!

🙏�🌻🍀🌷👍🌸🌺👏�

सुंदर ! अतिशय सुंदर !!

सुंदर तो भाव,
सुंदर तो विचार,
करीतसे तो भक्तगण,
ठाव घेण्यास तो आसूसला !!

कधी मिळेल ठाव,
नाही त्याची जाण,
जाण घेण्यासी,
तो क्षणभरी थांबला!!

तो एक क्षण,
लाभेल का त्या भक्ता,
सद्गुरूंची कृपा,
होईल कां ऽऽऽ त्याच्यावरी?

🙏�🌺🌸🌷🌻🍀🙏

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

बदल हवा !!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

फक्त इतिहास रचने हा माझा उद्देश नाही,
सगळा आटापिटा आहे तो चेहरा बदलला पाहिजे,

तुझ्या विचारात किंवा माझ्या विचारात,
एक धगधगता अंगार हवा,
गरज आहे त्यात आवेग असावयास पाहिजे,

आजही मी एक प्रश्न माझ्याशीच करतो,
इतकेच योग्य आहे की आणखी कांही बदलू शकतो,

एकच आवाज हृदयातून येतो,
ही तर आहे सुरूवात आता,
अजून हसणे बाकी आहे...॥

🙏🌸🌷🌻🍀🌺👏�🙏

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

भगवानकी चाह!!!

👉🏼👉🏼एक नगर के राजा ने यह घोषणा करवा दी कि कल जब मेरे महल का मुख्य दरवाज़ा खोला जायेगा..

तब जिस व्यक्ति ने जिस वस्तु को हाथ ✋🏼लगा दिया वह वस्तु उसकी हो जाएगी..

इस घोषणा को सुनकर सब लोग आपस में बातचीत करने लगे कि मैं अमुक वस्तु को हाथ लगाऊंगा..

कुछ लोग कहने लगे मैं तो स्वर्ण को हाथ लगाऊंगा, कुछ लोग कहने लगे कि मैं कीमती जेवरात💍 को हाथ लगाऊंगा, कुछ लोग घोड़ों 🐎 के शौक़ीन थे और कहने लगे कि मैं तो घोड़ों को हाथ लगाऊंगा, कुछ लोग हाथीयों 🐘को हाथ लगाने की बात कर रहे थे, कुछ लोग कह रहे थे कि मैं दुधारू गौओं 🐄को हाथ लगाऊंगा..

कल्पना कीजिये कैसा
अद्भुत दृश्य होगा वह !!

उसी वक्त महल का मुख्य दरवाजा खुला और सब लोग अपनी अपनी मनपसंद वस्तु को हाथ लगाने दौड🏃..

सबको इस बात की जल्दी थी कि पहले मैं अपनी मनपसंद वस्तु को हाथ लगा दूँ ताकि वह वस्तु हमेशा के लिए मेरी हो जाएँ और सबके मन में यह डर भी था कि कहीं मुझ से पहले कोई दूसरा मेरी मनपसंद वस्तु को हाथ ना लगा द 😱..

राजा 👑अपने सिंघासन पर बैठा सबको देख रहा था और अपने आस-पास हो रही भाग दौड़ 🏃🏃को देखकर मुस्कुरा रहा था 😊..

उसी समय उस भीड़ में से एक छोटी सी लड़की आई और राजा की तरफ बढ़ने लगी..

राजा उस लड़की को देखकर सोच 🤔में पढ़ गया और फिर विचार करने लगा कि यह लड़की बहुत छोटी है शायद यह मुझसे कुछ पूछने आ रही है..

वह लड़की 🚶🏼🚶🏼धीरे धीरे चलती हुई राजा के पास पहुंची और उसने अपने नन्हे हाथों ✋🏼 से राजा को हाथ लगा दिया..

राजा को हाथ लगाते ही राजा उस लड़की का हो गया और राजा की प्रत्येक वस्तु भी उस लड़की की हो गयी..
.
.
जिस प्रकार उन लोगों को राजा ने मौका दिया था और उन लोगों 😧 ने गलती की..

ठीक उसी प्रकार  ईश्वर😊 भी हमे हर रोज मौका😃 देता है और हम हर रोज गलती😞 करते है..

हम ईश्वर को पाने की बजाएँ
ईश्वर की बनाई हुई संसारी वस्तुओं
की कामना 😏करते है और
उन्हें प्राप्त करने के लिए प्रयत्न करते है

पर हम कभी इस बात पर विचार नहीं करते कि यदि ईश्वर हमारे हो गए तो उनकी बनाई हुई प्रत्येक वस्तु भी हमारी हो जाएगी..

ईश्वर को चाहना और
ईश्वर से चाहना..
दोनों में बहुत अंतर है|

[8/27, 2:43 PM] Mayur Tondwalkar:
🙏🍀🌻🌺☘🌸🌷👏🙏

चाह करो ऊस ईश्वर की,
जो खुदही इस संसारका स्वामी है,
काहेको तड़पते हो उस संसारकी माया पानेके लिए, जिसे रबने ही खूद बनवाया है !!

भगवन जब मिल जाये हमे,
क्यो ख्वाईश रखनी है माया और काया की,
ऊसीके चरणमें शरण लो,
प्यास धरो उस सावण की!!

अखंड बहता जाये निर्झर,
भगवान की छवी ना ऑखसे हटे,
दर्शन पाते ही ऊस विश्वरूपका,
आखे रह जायेगी फटे की फटे!!!

🙏🌸☘🌺🌻🍀🌷👏🙏

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

सुमनाचे मनोगत

सुमन - शब्द किती सोपा, अर्थही सोपेच. फुलाला सुमन देखील म्हटले जाते आणि "सु मन" म्हटल्यावर त्याचा अर्थ चांगले मन देखील होतो. तर अशा ह्या "सुमनाने" म्हणजे फुलाने ठरविले की आपण नेहमी भगवंताच्या गळ्यात मिरविण्यापेक्षा भगवंताच्या चरणावरच स्थिर कां होवू नये? गळ्यात तर सगळेच पडतात, चरणांवर स्थिर कोणी व्हावयाचे? आणि असा विचार मनात येताच "सु-मनच" ते चक्क भगवंताच्या चरणांवर माथा टेकते झाले.

भगवंताच्या चरणांची महती वेगळी सांगायची गरज नाही. जे चरणात आहे, ते इतर कोणत्याही ठिकाणी सापडणार नाही. जो भक्त त्या सताच्या चरणात लिन झाला आहे, त्याला काय कमी आहे? सत् चरण सापडणे कठीण आणि जर कां ते आपल्याला सापडले तर टिकविणे त्याहून कठीण. मग "सुमना"चे "सु-मनाने" जो विचार केला तो यथायोग्यच नाही काय?

तर भक्तगण हो, चला तर आपणही आपल्या सताच्या चरणांवर माथा टेकवूया आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करूया. सत् चरणात रत होऊ या, त्या सुमनासारखे.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

ओ भगवन मेरे (2)

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

तरस रहा हू कबसे!!
आशा लगाये मनसे!!
राह देख रहा हू तन, मन, धनसे!!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

जिंदगी क्या भरोसा ?
आज हू, कल रहू न रहू!!
सिर्फ तुम्हारे चरणको छुहू!!
यही हैं एक अभिलाषा!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

ओ भगवन मेरे (1)

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!

आया हू मैं दरपे  तेरे !!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!

ना समज हैं मुझमें भारी !
ना मुझमें हैं होशियारी!!
बस एकही कामना भारी!!!
सिर्फ दर्शन हो आते ही दरबारी!!!

आया हू मैं दरपे  तेरे !!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!

मैं हू  बालक अज्ञानी !
चाहता हू हो जाये सज्ञानी!!
आपके निरंतर सहवासमे !!!
भूल जाऊ सब कुछ शैतानी!!!

आया हू मैं दरपे  तेरे !!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!
............मयुर तोंड़वळकर.......

रविवार, २९ मे, २०१६

!!! सद्गुरू दर्शन !!!

!!! सद्गुरू दर्शन !!!

मनी वसे भाव
घेऊया सताचा ठाव
त्यासाठी करा सदोदीत
नामस्मरण....

नामस्मरण करता करता
भाव तो जागतसे
सताच्या चरणांचा
ठाव तो लागतसे........

भाव तो जागता
ठाव तो लागता
दर्शन ते घडतसे
सद्गुरू रायांचे........

दर्शन ते घडता भक्त
होई तो जीवनमुक्त
अवघेची जीवनाचे
सार्थक होई...........
..............अस्मादीक.............

रविवार, १७ एप्रिल, २०१६

रामनवमी

��� ��� ��� ��� ���
राम-सीता नांदे जेथे,
तेथे अहंकार कोठे?
जेथे रामाचे स्मरण,
तेथे अहंकाराचे होई विस्मरण !
'मी'पण जाते जेव्हा,
राम प्रगटतो तेव्हा तेव्हा,
नवा मी होई केव्हा?
रावणाचे दहन होई तेव्हा !
सीतामाई (सुख) येती घरा,
तोची दिवाळी दसरा,
रामनवमीचा सण साजरा,
चला करूया घरा घरा !
मयुर तोंडवळकर........!!!
��� ��� ��� ��� ��� ��