सद्गुरू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सद्गुरू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

अनगडाची ही दुनिया सारी.....

*_खरोखरच आपण आणि आपली पिढी ही खूप खूप भाग्यवान आहे, कारण आपणांस आपले सद्गुरू लाभले._*

*_इतकेच नव्हे तर आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ह्याच वेळेस आणि काळात आपले सव्विसावे अवतारकार्य संपन्न करून आणि आपणा समस्त बंधु-भगिनींस आपल्या जवळ घेऊन, आपले नाम देऊन त्यांच्या प्रत जाण्याचा मार्ग प्रवचन रुपाने समजावून सांगून उपकृत केले._*

_खरोखरच आपण भाग्यवान नाही कां?_ 

*_उजळले भाग्य अमुचे,_*
*_उजळल्या अमुच्या ज्योती_*
*_चरणी घेता सामाऊनी_*
*_मनी गवसले मोती_*

*_मोतीयांचा हार करुनी_*
*_घातला तो गळा_*
*_सद्गुरु प्रसन्न होता_*
*_लाविला नामाचा हो टिळा_*

*_टिळा लाविता नामाचा_*
*_प्रकाश पसरे सारा_*
*_प्रकाशाच्या कल्लोळात_*
*_नजारा दिसे तो न्यारा_*

*_हरवूनी जातो मीपणा त्यात_*
*_उरतो फक्त ओंकार_*
*_ओंकार ध्वनी आळविता_*
*_एकलय होतो अपार_*

*_अनगडाची ही दुनिया सारी_*
*_ज्यास कुणा ती सापडे_*
*_कधीच मागे फिरून न पाही_*
*_लागे मनापासोनी ती आवडे_*

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."

मंगळवार, २० मार्च, २०१८

गुरू गुह्य

सत ज्या अवधीत तुम्हांस आपणा प्रत घेत होते त्या अवधीत तुमची मानवी स्थितीप्रमाणे पूर्णत्व सतशुध्दताच करीत होते नां?

मोह आणि माया या सद्गुरूंपासून दूर नेणा-या आहेत.

आरती येणे कोणती स्थिती तर नाम.

सद्गुरूंसमवेत नामामुळेच जाऊ शकतो.

अंत:करणापासून सद्गुरू चरणी केलेली विनंती याला आपण सेवेकरी प्रार्थना म्हणतो.

प्रार्थना आणि विनंती :

प्रार्थना म्हणजे परात्पर, क्षराक्षर व चराचर याच्यात भरूनही अलिप्त असणा-या निर्गुण, निराकार व अविनाशी सच्छिदानंद तत्वाला नम्रतापूर्वक, एकाग्र चित्ताने केवळ दर्शन व सान्निध्य मिळविण्याकरिता नामाने आळविता येणे नाम प्रार्थना.

परब्रह्माकडे म्हणजेच सताकडे सुखदु:खाची, मायेची निवेदने आपण देत असतो तसेच कष्टमय स्थितीतून सुटण्यासाठी व मनाला शांती मिळविण्याकरिता आपण जे प्रणव देतो तीच विनंती.

💐🕉💐🕉💐🕉💐🕉💐

शनिवार, १७ मार्च, २०१८

"फक्त ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

💐🌲💐🌷💐🌲💐🌷

"भगवत् भक्तीच्या उत्तमावस्थेत रत झाल्यानंतरच भगवंताच्या प्रेम पात्रतेचा अधिकार भक्तांला प्राप्त होतो. नुसतंच वाचक अभ्यासक व पांडीत्य किंवा ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

भक्तीप्रेम सुख नेणवे आणिका !
पंडीत वाचका ज्ञानियांसी !!

भक्तीचे व भक्तांचेही अनेक प्रकार आहेत. भक्ती कशीही असली तरी श्रेष्ठ व उत्तमच.

गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात,
"नामभक्ती तर सगळेच करतात पण अंतःकरणात जिव्हाळा व भगवंताविषयीच्या आंतरिक प्रेमाचा कळवळा नसेल तर हा नंदनंदन परमात्मा संतुष्ट व वश्य होऊन प्राप्त होत नाही."

!! राम राम सब कोई कहे,
   ठग ठाकुर और चोर !
!! बिना प्रे💓म रिझें नही,
   तुलसी नंदकिसोर !!
🙏🏻 🙏🌻🌹

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

*आरती सदगुरूंची उजळली अंतरी|*

साम्य स्थितीत सत प्रवृत्ती असते. तरी मानवाला त्याची कल्पना येत नाही. मानव सताची आरती केव्हा करीतो? आप्ल्या स्थितीनुसार स्तुती अन आरती एकच आहे. म्हणून विचारत आहे सताची आरती मानव केव्हा करीतो? स्तुती प्रणवाद्वारे होते अन आरती कशी असते? आपणास क्ल्पना आहे मानवाला भक्ति जशी सोपी आहे तसेच भक्ति हा प्रणव देण्यास सोपा आहे. अन आरती हा ही एक प्रणव देण्यास सोपा आहे. परंतु या प्रणवात गहनता आहे. मानवी स्थितीप्रमाणे सताचे स्थितीत राहून आपणा सर्वस्वाना किती प्रणव बहाल केलें. परंतु त्या प्रणवाची मननता आपण सेवेकऱ्यानी केली नाही. पूर्णत्वाने ज्ञान मननतेत बहरून राहिले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता ही सर्वस्व भक्तिचीच अंगे आहेत. आपल्या मननतेनुसार मन पूर्णत्व सदगुरुमय करून, सतत नामस्मरण करीत दिव्यदृष्टीने आत्मज्योतीच्या प्रकाशात रममाण होणे येणे नाम आरती!

सताने आपणा सर्वस्वाना नाम बहाल केले आहे. येणे नाम आरती! सदगुरूंनी बहाल केलेले नाम अंत:र्मय स्थितीत येणे त्रयीत लय केल्यानंतर आपल्याला दिव्य प्रकाश मिळेल. त्या दिव्य प्रकाशात आपण सत पाहू  शकाल. अंबर येणे आकाश! आकाशात सुध्दा बहरून उरलेला हा दिव्य प्रकाश आहे. सताने दिधलेले  नाम अंत:र्मय स्थितीत ठेउन जो आपण प्रकाश पाहू शकाल, तोच प्रकाश आकाशमय येणे अंबरमय स्थितीत बहरलेला आहे. प्रकाशाची साठवण तुम्ही करु शकता का? नाही! तो प्रकाश नामानेच प्राप्त होऊ शकेल. सदगुरूंनी दिलेल्या नामानेच तो प्रकाश मिळू शकेल. मन त्रयीत, त्रयीत लय करून जे प्रणव पूर्णत्व होतात त्यालाच मंत्र म्हणतात. अन तोच मंत्र याने नाम! आता आपण सेवेकरी आरती येणे नाम कोणत्या तऱ्हेने घेणार शुद्ध शुचिर्भूत करून हे नाम येणे आरती केली पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार अर्धपदमासन घालून आपल्या सदगुरूंना नमस्कार करून, त्यांचे  स्वरुप मनामध्ये साठवून, चरणकमलाकडे मनाचे केंद्रिकरण करुन, त्रिकुटित आत्मज्योत लय करुन, देहाला विसरून अंत:र्यामापासून सदगुरूंना आळवले पाहिजे. लक्षात घ्या आपण नाम केव्हाही घेउ शकतो. परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सदगुरु चरणांवर अर्पण करूनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीने आपण नामाची स्थिती केलीत तर्च ते सतचरणाप्रत पोहोचू शकतें. तदनंतर सताचे दर्शन पूर्णत्वाने घेउ शकता.
आपण जी ज्योत दिवास्वरुपी प्रगट करता तीच ज्योत आपल्या आत्मस्थितीतही प्रगट असते ना! आत्मा ही पण एक ज्योतच आहे ना! तो आत्मा आपण मानवी स्थितीप्रमाणे सामूहिक स्थितीत प्रगट करु शकणार नाही. त्या परब्रम्हाचे स्मरण दिपस्थितीने आत्म्याशी स्वरूप करणे अन परब्रम्हाचे स्मरण करणे. आम्ही देखील सताचे स्तवन करीतो, पण कोणत्या स्थितीने याची आपणास पूर्णत्व क्ल्पना आहे. परंतु मानवाला हे प्रतिक करावेच लागतें ते प्रतिक आपल्या हस्त स्थितीत नसेल तर आपण स्थिर होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा आत्मज्योतीचे प्रतिक हा दिप आहे.

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

प्रभातिचा शुभारंभ

प्रभातिचा शुभारंभ करूया
घेऊनी तुझे नाम सद्गुरू राया
वंदन करीतो मी तुजला
पडतो तुझीया मी पाया........

जवळपास करण्यासाठी माया
का घालवितो वेळ माझा मी वाया?
रमण्या ऐवजी नामात तुझीया
झिजवितो मायेत, मी माझी काया

फरफटवितो मजला जमविण्या,
कवडीमोल ती माया
आयुष्याचा दवड़ीतो अमुल्य वेळ,
जवळ करण्यात नश्वर अशी ती माया

नाम तुझीये न घेता सुप्रभाती
घेतो मोबाईल मी हाती
रमून जातो त्यातच
फेसबुक आणि व्हाॅटस् अपच्या सांगाती
................मयुर तोंड़वळकर............

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*

✨🌹 ✨🌹 ✨🌹 ✨🌹 ✨🌹
*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*
        *सद्गुरू ही पर्दा दूर हटावे।*
*सद्गुरू से पाईये सच्चा प्यार,*
        *सद्गुरू से मिलता मोक्ष द्वार।*
*अन्त समय जो सद्गुरू को ध्याता,*
        *यम न खोले उस का खाता*
*सद्गुरू को करिये वंदना भाव से बारंबार ,*
        *नाम सुनकर किया जिस ने भवसागर पार*
👏👏👏👏👏 👏👏👏 👏👏👏

*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*
        *सद्गुरू ही पर्दा दूर हटावे।*
सद्गुरू हे साऱ्या जगतातील एकच असे
तत्व आहे जे सगळ्याना सत् मार्ग दाखवून त्या
अनंता प्रत आपल्याला घेऊन जातात,
सद्गुरूच मायेचा पर्दा दूर करतात. (सद्गुरूनी
म्हटल्याप्रमाणे त्या मायेची शक्ती ही 21
सुर्यांची जितकी शक्ती असते तितकी त्या
एका मायेची शक्ती आहे).

*सद्गुरू से पाईये सच्चा प्यार,*
        *सद्गुरू से मिलता मोक्ष द्वार।*
खरे प्रेम जर कोणाकडे मिळत असेल तर ते
फक्त सद्गुरूंकड़ेच मिळू शकते. इतकेच नव्हे
तर मोक्षाचे द्वार सुध्दा फक्त सद्गुरूच  खोलून
देऊ शकतात. इतर कोणीही नाही. (मोक्ष म्हणजे
काय? तर मुक्ती मोक्ष म्हणजे एखाद्याला त्या
सताच्या चरणांची प्राप्ती होणे, म्हणजेच सताने
त्या भक्ताला आपल्या चरणाप्रत घेणे)

*अन्त समय जो सद्गुरू को ध्याता,*
        *यम न खोले उस का खाता*
याचा अर्थ असा की जो सदोदीत त्या सताचे
म्हणजेच सद्गुरूंचे ध्यान करतो (अन्त समय
नाही) तर अंतिम श्वासापर्यंत जो सतत त्या
सद्गुरूंचे ध्यान करतो त्याला यम देखील या
स्थुलातून नेऊ शकत नाही. त्याला फक्त
सद्गुरूच मुक्ती मोक्ष देतात म्हणजेच आपल्या
चरणावर स्थिर करतात. (आणि अशी कित्येक
उदाहरणे या दरबारात घड़ून गेलेली आहेत. जुन्या
भक्तगणांनी ती पाहिली देखील आहेत.)

*सद्गुरू को करिये वंदना भाव से बारंबार ,*
        *नाम सुनकर किया जिस ने भवसागर पार*
ज्या संताने हे लिहीलय ते म्हणतात, "त्या सद्गुरूंची
वंदना म्हणजेच नामस्मरण आपण सगळ्यांनीच
वारंवार, नेहमी, सदोदीत केले पाहिजे, आणि ते
ही कसे तर भावपूर्ण, निस्सीम भावनेतून, मनापासून,
मन:पूर्वक, अंतरात्म्यातून ओढ लाविल असे. अशा
रीतीने जो माझा भक्तगण जाईल, त्याला हा
भवसागर पार करून जाण्यास मीच (सद्गुरूच) मदत
करणार आहेत ह्याची जाणीव सर्वस्वांनी घ्यावयास
हवी.

🙏�🌺🍀🌸🌷🌻👏🙏

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

फुले, .......भगवंताचीच मुले !!!

माझ्या अंगणात जास्वंद फुलले,
गणपतिच्या चरणी मी ते वाहिले,

पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे,
कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे,

मोग-याचा सुगंध पसरला सगळीकडे,
भगवंताच्या दर्शनासाठी अवघे झाले मन वेड़े,

कमळ दल पुष्प जरी अवतरले असे चिखलात,
महालक्ष्मीला ते प्यारे, वसे ते तिच्या करकमलात,

सदाफुलीची ही फुले सदा फुलती आपल्या आसपास,
औषधी असती, लाभतो त्यांना भगवंताचा सहवास,

अनंताचे वर्णन काय मुखी करावे?
नावातच त्याच्या 'अनंत', अनंत वेळा स्मरावे,

सताचा रंग हा शुभ्र, सताच्या सान्निध्यात रहावे,
हिच असे मनिषा तयाची, सद्गुरूंच्या चरणी त्यांना वहावे,

कुणी त्यांच्या गळ्यात जाऊनी पड़े,
तर कुणी घाली भक्ती भावाने साकडे,

कुणी त्याच्या चरणांसाठी आसुसले,
अशी ही फुले, जशी कांही भगवंताचीच मुले,

सुगंध तयांचा सगळीकडे दरवळे,
भगवंताच्या चरणी वाहूनी भक्तगणही सुखावले........!!

मयुर तोंड़वळकर

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

दर्शन देरे, देरे भगवंता
  तुझा ठाव नाही, घेता येत अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता .....!!!

तुझीया नामात, होईन मी तल्लीन
  तुझेच नाम, सदा मी गाईन
   आता तरी कृपा, करशील कां अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

नाम तुझे गोड,  नाही त्याला पाड़
 सदा त्याचे वेड़, मनी त्याची ओढ,
  लावशील कां मजला, हे बा अनंता
   दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

हे पिता परमेश्वर !!

🙏🌺🌸🌷🌻🍀👏�🙏

हे पिता परमेश्वर,
हे मातेश्वर,
होईल का मला दर्शन,
तुझीया स्वरूपाचे....!!

दर्शन होता मी भक्त,
होईल का मी विरक्त,
होईल का मी परावृत्त,
मोहमायेच्या पाशातून....!!!

चरणांची सेवा,
घडेल का हे देवा,
आशा करीतो भक्त हा,
आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत....!!!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

भगवानकी चाह!!!

👉🏼👉🏼एक नगर के राजा ने यह घोषणा करवा दी कि कल जब मेरे महल का मुख्य दरवाज़ा खोला जायेगा..

तब जिस व्यक्ति ने जिस वस्तु को हाथ ✋🏼लगा दिया वह वस्तु उसकी हो जाएगी..

इस घोषणा को सुनकर सब लोग आपस में बातचीत करने लगे कि मैं अमुक वस्तु को हाथ लगाऊंगा..

कुछ लोग कहने लगे मैं तो स्वर्ण को हाथ लगाऊंगा, कुछ लोग कहने लगे कि मैं कीमती जेवरात💍 को हाथ लगाऊंगा, कुछ लोग घोड़ों 🐎 के शौक़ीन थे और कहने लगे कि मैं तो घोड़ों को हाथ लगाऊंगा, कुछ लोग हाथीयों 🐘को हाथ लगाने की बात कर रहे थे, कुछ लोग कह रहे थे कि मैं दुधारू गौओं 🐄को हाथ लगाऊंगा..

कल्पना कीजिये कैसा
अद्भुत दृश्य होगा वह !!

उसी वक्त महल का मुख्य दरवाजा खुला और सब लोग अपनी अपनी मनपसंद वस्तु को हाथ लगाने दौड🏃..

सबको इस बात की जल्दी थी कि पहले मैं अपनी मनपसंद वस्तु को हाथ लगा दूँ ताकि वह वस्तु हमेशा के लिए मेरी हो जाएँ और सबके मन में यह डर भी था कि कहीं मुझ से पहले कोई दूसरा मेरी मनपसंद वस्तु को हाथ ना लगा द 😱..

राजा 👑अपने सिंघासन पर बैठा सबको देख रहा था और अपने आस-पास हो रही भाग दौड़ 🏃🏃को देखकर मुस्कुरा रहा था 😊..

उसी समय उस भीड़ में से एक छोटी सी लड़की आई और राजा की तरफ बढ़ने लगी..

राजा उस लड़की को देखकर सोच 🤔में पढ़ गया और फिर विचार करने लगा कि यह लड़की बहुत छोटी है शायद यह मुझसे कुछ पूछने आ रही है..

वह लड़की 🚶🏼🚶🏼धीरे धीरे चलती हुई राजा के पास पहुंची और उसने अपने नन्हे हाथों ✋🏼 से राजा को हाथ लगा दिया..

राजा को हाथ लगाते ही राजा उस लड़की का हो गया और राजा की प्रत्येक वस्तु भी उस लड़की की हो गयी..
.
.
जिस प्रकार उन लोगों को राजा ने मौका दिया था और उन लोगों 😧 ने गलती की..

ठीक उसी प्रकार  ईश्वर😊 भी हमे हर रोज मौका😃 देता है और हम हर रोज गलती😞 करते है..

हम ईश्वर को पाने की बजाएँ
ईश्वर की बनाई हुई संसारी वस्तुओं
की कामना 😏करते है और
उन्हें प्राप्त करने के लिए प्रयत्न करते है

पर हम कभी इस बात पर विचार नहीं करते कि यदि ईश्वर हमारे हो गए तो उनकी बनाई हुई प्रत्येक वस्तु भी हमारी हो जाएगी..

ईश्वर को चाहना और
ईश्वर से चाहना..
दोनों में बहुत अंतर है|

[8/27, 2:43 PM] Mayur Tondwalkar:
🙏🍀🌻🌺☘🌸🌷👏🙏

चाह करो ऊस ईश्वर की,
जो खुदही इस संसारका स्वामी है,
काहेको तड़पते हो उस संसारकी माया पानेके लिए, जिसे रबने ही खूद बनवाया है !!

भगवन जब मिल जाये हमे,
क्यो ख्वाईश रखनी है माया और काया की,
ऊसीके चरणमें शरण लो,
प्यास धरो उस सावण की!!

अखंड बहता जाये निर्झर,
भगवान की छवी ना ऑखसे हटे,
दर्शन पाते ही ऊस विश्वरूपका,
आखे रह जायेगी फटे की फटे!!!

🙏🌸☘🌺🌻🍀🌷👏🙏

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

सुमनाचे मनोगत

सुमन - शब्द किती सोपा, अर्थही सोपेच. फुलाला सुमन देखील म्हटले जाते आणि "सु मन" म्हटल्यावर त्याचा अर्थ चांगले मन देखील होतो. तर अशा ह्या "सुमनाने" म्हणजे फुलाने ठरविले की आपण नेहमी भगवंताच्या गळ्यात मिरविण्यापेक्षा भगवंताच्या चरणावरच स्थिर कां होवू नये? गळ्यात तर सगळेच पडतात, चरणांवर स्थिर कोणी व्हावयाचे? आणि असा विचार मनात येताच "सु-मनच" ते चक्क भगवंताच्या चरणांवर माथा टेकते झाले.

भगवंताच्या चरणांची महती वेगळी सांगायची गरज नाही. जे चरणात आहे, ते इतर कोणत्याही ठिकाणी सापडणार नाही. जो भक्त त्या सताच्या चरणात लिन झाला आहे, त्याला काय कमी आहे? सत् चरण सापडणे कठीण आणि जर कां ते आपल्याला सापडले तर टिकविणे त्याहून कठीण. मग "सुमना"चे "सु-मनाने" जो विचार केला तो यथायोग्यच नाही काय?

तर भक्तगण हो, चला तर आपणही आपल्या सताच्या चरणांवर माथा टेकवूया आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करूया. सत् चरणात रत होऊ या, त्या सुमनासारखे.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

ओ भगवन मेरे (2)

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

तरस रहा हू कबसे!!
आशा लगाये मनसे!!
राह देख रहा हू तन, मन, धनसे!!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

जिंदगी क्या भरोसा ?
आज हू, कल रहू न रहू!!
सिर्फ तुम्हारे चरणको छुहू!!
यही हैं एक अभिलाषा!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ!!
कब होगे दर्शन तेरे!!!
ओ भगवन मेरे ऽऽऽ!!!

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

शिष्य कसा असावा?

गुरु कसा असावा ? यावर बरेच जण चर्चा करतात, पण शिष्य कसा असावा यावर कधी जास्त उहापोह होत नाही. 

समर्थांनी 

"म्हणॊनी सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथे न लगती सायास । 
त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरा ॥" असे म्हटले आहे.  

जसे गुरु सद्गुरु पाहिजेत तसे शिष्य सच्छिष्य पाहिजे, म्हणून समर्थांनी सच्छिष्यांची लक्षणे सांगितली आहेत. 

" मुख्य सच्छिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । 

अनन्यभावे शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ 

या ओव्या मधे पुढे समर्थांनी शिष्य हा निर्मळ, आचारशील, विरक्त, निष्ठावंत, पवित्र, धीर, उदारप्रज्ञावंतसात्विकजगतमित्र (सर्वांवर प्रेम करणारा) असावा. तो अविवेकी नसावा. 


"घडी एक विश्वास धरी । सवेची घडी एक गुर्गुरी ।” 

अंत:करणात अभिमान आणि बाहेर विनम्रता असा दुटप्पी पणासद्गुरुंच्या पुढे जास्त लुडबुड करून, अन्य साधकांना सद्गुरुंची सेवा करण्याची संधी न देता मीच सद्गुरुंचा फार जवळचा आणि आवडता शिष्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारा नसावा. 

"सद्गुरुहून देव् मोठा । जयास वाटे तो करंटा । अशी ज्याची पूर्णपणे समर्पित बुद्धी आणि अत्यंत निष्ठा आहे तो उत्तम शिष्य होय.