सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

पूढे राम आपला मार्ग आक्रमत किसकिंदी येथे आले. तेथे मारूतीची भेट झाली. मारूती रामाचा सेवेकरी (दास) बनला. नंतर तिथेच त्यांची वदघट झाली.

मारूतीने उड्डाण करून लंकेत जाऊन ज्या ठिकाणी सीता होती, तिथे मुद्रिका (खूण) घेऊन गेला होता.

हनुमंताने माझी सीतामाई आहे हे बरोबर ओळखले व प्रत्यक्ष पाहिले कि सर्व निद्रिस्त आहेत. त्यांनी झाडावरून पाने टाकायला सुरवात केली. सीतेने वर पाहिले. मारूती म्हणाला तू घाबरू नकोस.

इकडे रावणाला कळले कि बागेत माकड आले. तेंव्हा त्याला पकडण्यासाठी लाख उपद्व्याप केले. जेवढे त्याने केले ते सर्व त्याच्याच अंगलट आले.

त्यांनी चिंध्या शेपटीला बांधून शेपटीला आग लावली. सर्वत्र हाहा:कार झाला. मारूतीने भूभूतक्तार करून लंकेला आग लावली. रावण घाबरला. 3/4 लंका जाळून टाकली.

त्याला रावणाच्या समोर आणले. रावण म्हणाला, "तू हे काय चालवले आहेस?" रावण म्हणाला, "मी उंच आसनावर आहे." तेव्हा मारूतीने सुध्दा आपले आसन उंच केले.

मारूतीने घाम गाळला तो मगरीने ग्रहण केला. तेव्हा मकरध्वज जन्माला आले.

त्याने रामाला सीतेची सर्व हकीगत सांगितली.

म्हणून समर्थ सांगतात, "माझा जो सेवेकरी आहे त्याने कोणत्याही तऱ्हेची काळजी वाहू नये. त्यांचा मी त्राता आहे."

*सद्गुरु मारक नसून तारक असतात.* आपण ज्या आपुलकीने तळमळता ते किती भाग्यवान आहेत.

नारायणांचा नारायण. अशा तत्वांचे आपण सेवेकरी. नीतीने परिपूर्ण असणारे, शुद्ध विचार, आचार व भावना पाहिजे. तरच तुम्ही श्रीहरीच्या आसनाला पात्र व्हाल. ते मायावीने शांती देतील.

मी तुमच्यातली एक ज्योत आहे. पण त्या बाहेर जर काही आतबाहेर झाले तर दोषात्मक आहे. त्यांचे संधान परमेश्वराशी आहे. ते सर्व व्यापक असणारे तत्व हे चालू देणार नाही.
                             (क्रमश:) 29 ऑगस्ट

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मनुष्य यत् किंचित मायावी तत्वासाठी पशु बनतो. हा संशय म्हणजे क्षणिक लोभासाठी. हे करणे बरे नाही. मायावी तत्वात गुरफटला कि ईश्वर तत्व निराळे राहते. ज्याठिकाणी भक्ति तेथे तो रममाण होतो. तेथे विशेष अडचणी काही नाही.

सर्वात सोपी म्हणजे भक्ति. तुमच्यात जे आहे ते ओळखायला पाहिजे.

ते म्हणाले, "माते तुझे प्रणव कायम. मी निघालो."

रामावर सर्वांची माया होती. त्या गडबडीत सीतेला सर्व कळले कि प्रत्यक्ष राम वनवासाला चालले आहेत. त्यांनी कुणाला सांगितले नव्हते. सीता म्हणाली, "तुम्ही जेथे, तेथे मी येणार!" ती म्हणाली, "जशा परिस्थितीत तुम्ही, तशा परिस्थितीत मी."

सीतेचे मनोधैर्य श्रेष्ठ होते. तीने काही गोष्टींचा विचार केला नाही. प्रत्यक्ष राजाला बाहेर गेल्यावर स्वत: सर्व करायला पाहिजे. परंतु तीने कष्टाचे सुख पत्करले. ज्याठिकाणी नवरा तेथे छायेने (पत्नीने) असावयास पाहिजे.

जनकानी सीतेला सर्व काही सांगितले होते. शेवटी पती हा माझा साक्षात परमेश्वर! सीता आदिमाया शक्ति होती. सर्वजण वनवासाला निघाले. करीत करीत राम नाशिक येथे पंचवटीला आले. त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे मठ आहे.

राक्षसांचा नि:पात करण्यासाठी दक्षिणेला जावे लागले. असे परम् तत्व असताचा नि:पात करण्यासाठी चालले होते. पण राक्षस किती लबाड व अघोर असतात. रावणाने मारीचाला मायावी हरीण बनवून सीतामाईला बनविण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या कातडीची मी वस्त्रे बनवीन.

पण लक्ष्मणाला माहित होते. राम हरिणीच्या मागे होते. पण रावणाने रामाची नक्कल केली कि, "मी संकटात सापडलो आहे, लक्ष्मणा धाऽऽव." तेव्हा सीता घाबरली. पण लक्ष्मणाने सांगितले, "आई तू शांत रहा." परंतु लक्ष्मणाला ती आडवे, तीडवे बोलू लागली. लक्ष्मणा आताच तुम्ही निघा. आई जातो म्हणून त्याने रेषा आखली अन् सांगितले कुणी भिक्षेला आले तर याच्या बाहेर पडू नकोस.

तेव्हा लबाड रावण साधु बनले. व भिक्षेला आले. रावण लांब उभे राहिले. सीतेला पेच पडला व सीता म्हणाली, "तुम्ही जवळ या, भिक्षा वाढायची आहे." वाढताना चुकून तीचा पाय रेषेबाहेर पडला व रावणाने तीला पकडली.

अनंताना हे घडवायचे होते. राम मारिचाला मारून परत आले अन् पहातात तर सीता नाही. रामाला सुध्दा गहिवरून आले. पण लक्ष्मण धीर गंभीर होता.

ते शोधत शोधत दंडकारण्यात फिरू लागले व सीता सीता म्हणून झाडांना कवटाळीत होते. त्याचवेळी सतपुरूषांचा उध्दार होत होता. त्याचवेळी पार्वती शंकराला म्हणाली, "मी नकली सीता बनते." तेव्हा शंकर म्हणाले, "मी राम कोण आहे हे ओळखतो. तू त्या भानगडीत पडू नकोस. तुझ्यामुळे मला त्रास होईल. सावध रहा."

शेवटी पार्वती आली. लक्ष्मण रामाच्या पाठीमागे होताच. पार्वती नकली सीता बनली व लांब उभी राहिली. राम प्रेमाने अश्रू गाळत होते. परंतु राम काही फसले नाहीत. त्यांनी सर्व पाहिले. राम जवळ आले तरी फसले नाहीत. त्यांनी ढुंकुनसुध्दा पाहीले नाही.

*"परस्त्री मातेसमान."* राम पूर्ण शुध्द होते. रामांनी मुद्दाम टाळले. नकली सीता म्हणाली, "हे प्रभो ! आपली सीता येथे असताना आपण असे काय करता?" राम उत्तरले, *"हे भवाने! तू मला बनवायला आलीस का?"* (तीच ती तुळजापूरची भवानी) "हा दाशरथी राम पत्नीला पागल नव्हता. तू काय कैलासपती भोलानाथ समजलीस."

तीने पतीचा धावा केला. रामाने तीची पूजा केली.
                                  (क्रमश:)

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

*रामविजय : जय जय रघुवीर समर्थ*

आर्यवर्तात पूर्वी शाळा नसून गुरूकुले होती. त्यांचेपैकी काहींचे गुरू वशिष्टमुनीं होते. तेथे उच्च, नीच, श्रीमंत, गरीब, ब्राम्हण, क्षत्रिय असा भेदभाव नव्हता. मानव हीच जात व अवतार - स्त्री, पुरुष. फक्त शुध्द अशुद्ध ते पहात.

वशिष्ठ गुरूकुलामध्ये ते शिक्षण घेत होते. वशिष्ठांनी सुध्दा यांना 'योगवाशिष्ठ ' शिकविले.

आपण तन, मन, धन अर्पण करतो, ते करणारे फार निराळे आहेत. रूढी प्रमाणे सेवेकरी तिन्ही अंगाने शरण जायला पाहिजे.

सद्गुरु हे स्वयंमेव पद आहे. हे पद शिष्याला टिकवावे लागते.

दशरथ हे वयस्थ झाले तेव्हा राम हे राज्याधिपती होण्यास लायक होते. वशिष्ठांना सर्व माहित होते, पण ते सांगत नव्हते.

कैकयी शुध्द सात्विक ज्योत होती. मंथरा तीची दासी होती. मंथरेने कैकयीला सांगितले रामाला राजपद मिळाले तर भरताचे काय? राम आपल्या मातेला न भेटता सावत्र आईला प्रथम भेटत असत.

परंतु अनंताना माहित होते व त्यांना पूढे घडवायचे होते. कैकयीने दशरथांना बोलावले. कैकयी ही दशरथांची लाडकी होती. तीने फसवून वर मागीतले. ते ऐकून दशरथ बेहोष पडला.

पहिला वर भरताला राज्य व दुसरा वर रामाला वनवास. दशरथ राजा मुर्च्छा येऊन पडला. त्याचे रामावर जास्त प्रेम होते. पण धन्य ते राम! त्याबद्दल त्याना काहीच वाटले नाही. रामाच्या कानावर आले तेंव्हा ते गहिवरून कैकयीला म्हणाले, *"माते भरताला राज्यावर बसव."* पण वडीलांची ही तऱ्हा. त्यावेळी कैकयी शुद्धीवर आली. ते म्हणाले तुमच्या आदेशाने मी चौदा वर्षे फिरून येतो.
                                (क्रमश:) 27 ऑगस्ट

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

रामविजय : जय जय रघुवीर समर्थ|

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

दशरथ राजाच्या कुटुंबाचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी! दशराथाचे वडील दिलीप. साक्षात परमेश्वर कौशल्येच्या उदरी जन्म घेणार हे माहित नव्हते. पण वशिष्ठांना हे माहित होते. परमेश्वर सुद्धा पाहतात कि ज्याच्या उदरी, कुशीत जन्म घ्यायचा ती भूमी शुध्द पाहिजे. यज्ञ केल्यावर पितामहांनी पिठाचे पिंड केले. पिंडामुळे पुत्रप्राप्ती झाली. म्हणजेच त्या पिंडात आव्हान करून शक्ति निर्माण केली. परमेश्वराच्या संधीने भाग केले. परंतु एक भाग घारीने नेला तो अंजनीने भक्षण करून मारूतीचा जन्म झाला.

स्वरूप, कांती, सतेज, दैदीप्यमान ज्योत म्हणजेच राम! परंतु कौशल्या अभिमानी नव्हती. माझे, तुझे तिच्याजवळ नव्हते. राम पूर्णात पूर्ण होते. शीतल, शांत, धीर गंभीरतेने जाणारी दयाघन ज्योत होती.

प्रभु रामचंद्र म्हटले कि आल्हाद वाटतो. शुध्द स्फटिकासारखा, सतेज, बुध्दीमान होता. बुध्दीवान होते साक्षात क्षिराब्धीच ते! सातव्या अवतारात शेष हा लक्ष्मण होता.

राम पितृ व मातृ भक्त होते. त्यांनी सावत्र आईला सुध्दा दुखावले नाही. ज्याचे वर्तन शुध्द आणि शीतल तोच सद् वर्तनी, शुद्ध शुचि:र्भूत. अविनाशी ममतेने व प्रेमळपणाने राहत असत. नितांत आदरणीय असे लहानाचे मोठे होऊ लागले.
                              (क्रमश:) 26 ऑगस्ट

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

शेवटी कौरव पांडवांची लढाई जुंपली, परंतु त्याना पांच पांडवांचा नाश करता आला नाही. अर्जुनाच्या ठिकाणी माया उत्पन्न झाली त्यावेळी अर्जुनाने वायुमंत्र उपदेशिला. त्याच ठिकाणी कृष्णाने सुक्ष्माची गती दिली. अर्जुनाने गुरू, मामा, आजोबा, भाऊ या सर्वाना पाहिले. अर्जुन कृष्णाला म्हणाला मला हे राज्य नको. अन् हे पापही नको. तुच्छ ते राज्य. "कृष्णा ! मला या राज्याची आवश्यकता नाही." तेव्हा कृष्ण म्हणाले, "अर्जुना तुला ही दुर्बुद्धी कशी सुचली?" कृष्णाने जाणले व त्याला ठिकाणावर आणण्यासाठी उपदेश केला. तीच गीता 150-200 श्लोकात केली. 

"ही लढाई सत्य असत्यासाठी आहे. तू कोण? मारविता कोण? वगैरे सांगून विराट रूप दाखविले व हे सर्व खेळ मी अनंताचा अनंत करीत आहे." कृष्णाने अर्जुनाला शुद्धीवर आणून ठणकावले कि, "तुझ्याकडून हे युध्द करून घेणार आहे."

तेव्हा अर्जुन लढाईला उभा राहिला. पण अर्जुनाला बाण लागला नाही. कृष्णाने सारथ्याचे काम केले. त्याच्या
रथाच्या वरती रूद्र मारूती होता. म्हणून रथ उडत नव्हता.

इतके सर्वस्व घडविले, पण द्रोण, भीष्म कठीण होते. द्रोण ही सामान्य ज्योत नव्हती. कृष्णाने कारस्थाने केली. त्याने भीमाला बोलावले व सांगितले अश्वत्थामा हत्तीला ठार मारणे. ठार मारल्यानंतर कृष्ण धर्माजवळ आले. आकाशपाताळ एक केले व धर्म राजाला म्हणाले, "अश्वत्थामा लढाईत पडला हे आम्ही सर्वत्र पसरविणार. तेव्हा द्रोण तुझ्याकडे येईल, तेव्हा तू फक्त असे म्हण कि, "अश्वत्थामा लढाईत पडला. मनुष्य किंवा हत्ती माहित नाही."

कृष्णाने सत्यासाठी लबाडी केली. पण कृष्ण तेथेच अव्यक्त राहिले. द्रोणाना कळताच ते धर्माजवळ आले. अन् धर्माला म्हणाले धर्मराज अश्वत्थामा लढाईत पडला हे खरे आहे काय? तेव्हा कृष्णाने धर्माला श्रवणी दिली. धर्माने सांगितले, "अश्वत्थामा लढाईत पडला."

तेव्हा द्रोणाचार्याना बाणाने मारले. भीष्मांची तसेच कर्णाची गती केली. कर्ण हा पांडव होता. पण अघोराकडे सानिध्य.

कर्ण खरा दानशूर होता. कवचकुंडले मागितली. कृष्णाने पृथ्वीला आदेश दिले तू दुभंग हो. तेव्हा कर्णाच्या रथाची चाके जमीनीत रूतली. कृष्ण म्हणाले, "कर्णा तू एका साध्वीची वस्त्रफेड होताना खाली मान का घातलीस?"

महाभारत संपल्यावर कृष्णराज यादवकुलोत्पन्न होते; यादव उन्मत्त झाले. त्याने समाधी अंगाने आपली काया स्थिर केली. सत्यासाठी झगडले. कृषणावतारात त्यांनी याप्रमाणे कार्य केले.

आता कलीयुगात सद्गुरु तत्वाने कार्य करीत आहेत. नीती तत्वाने जाण्यास सद्गुरु सांगत आहेत. सत् हे सतासाठी झगडणारे आहे. ते निर्भीड, सत्य अन् सात्विक आहे. *सत्या परता नाही धर्म!* ज्याच्या जवळ सत्य धर्म नाही तो मुक्तिस कसा जाणार?   24 ऑगस्ट 

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

कृष्णांची शिष्ठाई संपल्यानंतर, ते चालले असताना कृष्णांना भूक लागली. पण कृष्ण नात्याने दुर्योधनाकडे  वा धर्माकडे न जाता विदूराकडे गेला. हा गरीब होता. (शुध्द साधी ज्योत) कृष्ण त्याच्या घरी आले. तेव्हा विदूर कासावीस झाला. कारण त्यांना मी काय देणार? 

परंतु विदूर सत् होते. अन्न घ्यायचे ते सताच्या घरी. त्यावेळी विदुराला परमानंद झाला. विदूर म्हणाले, "या वेळी माझ्या घरी काही नाही." पण कृष्ण म्हणाले, "त्या कण्या आहेत की!"
        *विदूरा घरच्या भक्षुणी कण्या*

      नंतर कण्यांची पेज पत्रावळीचा द्रोण करून त्यातून खात असताना कृष्ण म्हणाले, "आज मी अमृत प्यायलो. परंतु विदूर म्हणाला परमेश्वराला पेज द्यावी! तेव्हा कृष्ण प्रेमाने म्हणाला, विदूरा तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी एका हाताने जेवतो. पण तुझ्यासाठी चार हातानी द्रोण केला, तू धन्य आहेस. असे हे कृष्ण सताचे कैवार घेणारे आहेत. कौरवांनी कपटे केली. पांडवाना बारा वर्षे वनवासात पाठवली, वनवासात सुद्धा असताना दुर्योधनाने दुर्वास मुनींना सात - आठसे शिष्यांना घेऊन द्रौपदीकडे जेवणासाठी पाठविले. त्यावेळी अथितीचा आदर सत्कार केला जात असे. दुर्वास द्रौपदीकडे आले परंतु बुध्दी असताची होती. ते सर्व जेवण आटोपल्यानंतर आले तेंव्हा द्रौपदीला भीती वाटली. यांना आता जेवण कुठचे द्यायचे? पण दुर्वास ठणकावून म्हणाले, *"आम्ही गंगास्नान करून येतो, तो पर्यंत जेवणाची तयारी कर."* ती होय म्हणाली, पण तीला आठवण झाली सूर्याने दिलेली थाळी तीने धुऊन ठेवली होती. अशावेळी शांतपणे तीने कृष्णाचा धावा केला. तेव्हा कृष्ण हजर झाले. तीने सर्व हकीगत सांगितली. कृष्णाला सुद्धा पेच पडला कृष्ण म्हणाले, अग, पण द्रौपदी तुझ्याजवळ थाळी आहे ना? पण त्या थाळीला डाळीचा एक कण लागला होता. कृष्णांनी चावी फिरवली. तेव्हा प्रत्येक जण पाण्यातच ढेकर द्यायला लागले. त्यांनी ध्यान करून तेथे कृष्ण असल्याचे पाहिले. व तेथून पळून गेले. भगवंत ज्या ठिकाणी आहेत तेथे कमतरता होऊ शकेल काय? आपल्या भक्ताची बुध्दी कोती तर भगवंत त्याला कोते देतात. पण बुध्दी विशाल असल्यास भगवंत सुद्धा विशाल! भक्ताची लाज त्यांनीच राखली. असे ते करून अकर्ते आहेत.
                                     (क्रमश:) 23 ऑगस्ट

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

      कृष्ण शिष्ठतेसाठी आले असता दुर्योधन उच्च स्थानी बसले होते. त्यावेळी कृष्ण म्हणाले, "मी शिष्ठतेसाठी आलो आहे. तुम्ही समान दोन भाग करून महायुद्ध आटपा. पण त्या पांडवाना सुईच्या टोकाइतकीसुध्दा जमीन मिळणार नाही", असे कौरव म्हणाले.

इतका अपराध झाला तरी कृष्ण सहन करीत होते. भीम हा फक्त आईला (कुंतीला) मान द्यायचा. कृष्ण विचार करीत बसले. ते दुर्योधनाला म्हणाले, "दुर्योधना तू विचार कर. तुझे म्हणने चौकटीत बसत नाही." दुर्योधन धर्माला म्हणाला, "तुझे काय मत आहे?" तेव्हा धर्म म्हणाला, "ते कृष्ण सांगेल." तेव्हा कृष्ण म्हणाला, "यामध्ये तुला कोण पुण्यवान दिसतो का?"

धर्माला पापी बनविणारा दुर्योधन, तोच पापी होता. तेव्हा त्याला सर्व पापी दिसत होते. धर्म म्हणाला, "सर्व पुण्यवान व दुर्योधन सुध्दा पुण्यवान."

ज्याचे आचार विचार सत् त्याला सतच दिसणार. कृष्ण मात्र नाराज झाले. पुढे महान अवर्षण होणार हे माहित होते.
                              (क्रमश:)

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
तिने आपल्याला जन्म दिला. तिने सर्व कष्ट काढले. मातापित्यांचा वाईट गतीने उध्दार करणे पाप आहे.

सताने कालीयाचा सुध्दा नाश केला. अघोरांचा निपा:त करण्यासाठी सत् जन्माला येते. *सत् हेच कृष्ण व कृष्ण हेच सर्वस्व होय.*

परब्रह्म तत्व असल्याने त्यांना सर्व जाणीव होती. शेष हाच बलदेव. हे दोघेजण कंसाला भेटायला कंसाचे अपराध पूर्ण झाल्यानंतर गेले. त्यावेळी यशोदेला वाईट वाटले. तेव्हा त्यांची समजूत केली. शेवटी ते मथुरेला पोहोचले.

कंसाने अनितीने अपराध चालविले होते. कंसाने कृष्णाला पूर्ण ओळखले होते. पण कंस डावपेच करायचा. अनितीने कारभार करताना कृष्णाने भर गादिवरून ओढून आणून मुठीने मारले.

परब्रह्म शक्ति बरोबर मानव काय मुकाबला करणार? त्याचे ते राज्य कृष्णाने, माझे न म्हणता एका सात्विक ज्योतीला देऊन टाकले व निघाले.

याप्रमाणे आपले सेवेकरी उदारमतवादी पाहिजेत. *"साधेपणा पण उदात्त विचार"*

कृष्ण मायेचा आसुसलेला नव्हता. कंसाला मारल्यानंतर दुसरे नातलग होते. शेवटी बहिणीला म्हणाले 101 अपराध झाले कि माझ्याजवळ असलेले अस्त्र गप्प बसणार नाही. (जरासंध), मुचकुंदाला मारले व ते महाभारतात गेले.

खरोखर कृष्ण वेडा नव्हता. परंतु त्यांनी पाच पांडवांशी संगत केली. पांडवांकडे सत् ऐश्वर्य होते. परंतु कौरवांकडे दाखवायचे ऐश्वर्य होये.

धर्म राजा शितल, संयमी व शांत होता. कृष्ण सताच्याच ठिकाणी गेले. सत् सता मध्येच मिसळते. त्या पांच पांडवाना पाठीशी धरून महाभारत रचले. ज्याला प्रत्यक्ष भगवंत तारी त्याला कोण मारी. पण याचवेळी कृष्णाने राजकारण सुरू केले. शेवटी धर्माची समजूत केली. त्यातील भीमाला फक्त गदाच माहिती होती. त्याच्याजवळ शक्ति भरपूर होती. भीम कृष्णाला म्हणाला, दुर्योधन कृष्णाचा अपमान करील. पण कृष्ण म्हणाले, मला मान नाही अन् अपमानही नाही. नंतर कुंतीची समंती घेऊन ते गेले.
                                 (क्रमश:)

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

हरीविजय

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
हरीविजय नाव पडण्याचे कारण म्हणजे कृष्णावतारामध्ये त्यांनी लाघवी तऱ्हा केलेली आहे. तू एक तर मी दुप्पट.

कृष्णाने अवतारामध्ये काय केले. वासुदेव व देवकी यांच्या लग्नाच्यावेळी कंसाने आकाशवाणी ऐकून आपल्या बहिणीला खाली पाडली. तेथे नारद हजर झाला. कंस म्हणाला, "हिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो माझा वध करणार म्हणून हिचा वध करतो." नारद म्हणाले, "अरे कंसा बुद्धिमान असून तू मुर्ख कसा? आताच तू पापाचा धनी का होतोस?" तरी त्याने तिला बंदिशाळेत टाकली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिळेवर आपटायचा.

शेवटी एक बालक येण्यापूर्वीच देवकीला कृष्ण दिसला. ती कृष्णमय झाली होती. तिने लहान बालक पाहिले. नंतर ज्यावेळी शुद्धीवर आली त्यावेळी आकाशवाणी झाली "तुम्ही घाबरू नका. तुम्ही याला गोकुळात यमुनापार ठेवा."

तेव्हा वसुदेवांनी धीर केला. कृष्णाच्या स्पर्शाने बंदिशाळा उघडली. तोपर्यंत कोणाला जाग आली नाही. सर्व शांत. यमुना दुथडी भरून वहात होती. तेव्हा परत आकाशवाणी झाली "तू घाबरू नको."

बालकाचे पाय पाण्याला लागताच ती दुभंग पावली. त्यावेळी नंदाची मुलगी मृत अवस्थेत असलेली वसुदेवांनी आणली व मुलाला तेथे ठेवले.

नंतर कंसाला मुल झाल्याचे कळले. परमेश्वर कसे सूत्रधार आहेत पहा? तो रागाने तिला आपटणार तोच झटक्यात ती कडकडली, "हे पाप्या तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे."

हिच ती अबुनिवासीनी देवी होय. हिच स्थिर राहिली आहे. त्यावेळी कंस हताश झाला. यदुकुलोत्पन्न कंस होता. कृष्णाला ठार मारण्यासाठी त्याने लाघवांनी माणसे पाठवली पण त्यात त्याला यश आले नाही. परंतु त्या बालस्वरूपाला सर्व गती होती. नंतर यदुकुलात कृष्ण वाढू लागले.

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

*भक्ति*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

आपला भक्ति मार्ग निराळा आहे. अध्यात्मिक केंद्राच्या अनुसंधनाने, त्यामुळे सर्व समान पातळीने वागायचे. ध्यानधारणा गती व अखंड ज्ञान.

आपल्याला त्या ठिकाणी जाण्यास प्रकाश अनुभवावा लागतो. दृष्टी नासाग्री ठेवून बसावे लागते. कारण मन एकाग्र रहाण्यासाठी. दृष्टी उघडी ठेवून सुद्धा ध्यान करता येते. म्हणजेच ती केवळ प्रकाशित ज्योत पाहिजे. ते आपोआप दृष्टी फेकणार!

आपल्या भक्ति मार्गात आपण कोणत्या हेतूने बसतो. तुम्ही मला ओळखून घ्या अन् तीच मुर्ती डोळ्यासमोर ठेवून नामस्मरण करायचे. ते आपोआप होत असते व स्थिर होता येते. आपल्या आसनाचा भक्तिमार्ग असा आहे.

24 तासातून काही वेळ समर्थ चरणात घालवावा, ध्यानधारणा झाल्याशिवाय पूजेला अर्थ नाही. आपल्या घरीसुद्धा आपल्याला ध्यान करता येते. तो वेळ तुमचा परमेश्वराच्या ठिकाणी रूजू होतो, एरवी नाही. त्यांची पहाणी बरोबर असते. तुम्ही त्यांना बनवायचा प्रयत्न केला तरी ते बनायचे नाहीत.

सत् तत्व प्रेमळ आहे पण तितकेच वज्रापेक्षाही कठीण आहे. सद्गुरु वेळप्रसंगी लाघव का करतात? अनाठायी कोणावर लाघव करणार नाहीत. पण ही ज्योत चार तत्त्वांच्या निराळ्या गतीने चालल्यास ते लाघव करतात. एकदा समर्थांनी लाघव केले तर पूर्ण क्षमा केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी त्याला चुका सांगाव्या लागतात. वर वर चुका तसे वर वर क्षमा! लाघव हे फार निराळे आहेत. ते सेवेक-याला कासावीस करून सोडतात.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

*वाल्मिकी ऋषी*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

वाल्या कोळी खून करीत असे. तत्पूर्वी ती ब्राह्मण कुलोत्पन्न ज्योत होती. पण ती चुकली.

ब्राह्मण कुणाला म्हणावे? "ब्रम्ह जाणे इति ब्राह्मण:"

मनाच्या व्यापाराची खिन्नता झाली.

ज्योत चारी तत्त्वांच्या चाकोरीबाहेर गेली कि भगवंत त्याच्यावर लक्ष देतात. पण वाल्या बायको मुलांचे पोषण करण्यासाठी खून करीत असे. हे पाहून श्रीहरीना विचार पडला कि ज्योत फार अघोरी कामे करीत आहे.

शेवटी नारदांचे व श्रीहरींचे खलबत झाले. नारद म्हणाले, "तुमचे त्या ज्योतीवर फार लक्ष आहे". तेव्हा श्रीहरी म्हणाले "नारदा तू तेथे जा". तेव्हा नारद निघाले. ते तंबोरा व माळ यासह होते. वाल्याला दोन दिवस सावज मिळाले नव्हते. पण तिसऱ्या दिवशी वाल्याला नारद दिसले. त्याने आपली फरशी उगारली. तेव्हा नारद म्हणाले, "माझ्याजवळ काही नाही". पण वाल्याला फक्त मायेशिवाय दूसरे काही दिसत नव्हते. नारदांनी विचारले "तू हे कशासाठी करतोस?" तो म्हणाला, "माझ्या बायको-मुलांचे पोट भरण्यासाठी". तर मग आजपर्यंत जे पाप केलेस ते कोण भरणार? त्यावर वाल्या म्हणाला, "तीच भरतील."

नारद धीरोदत्त होते. नारदांनी सर्व सहन केले. ते म्हणाले मी उभा राहतो. हे तुझे पापाचे प्रायश्चित्त कोण भोगील ते तुझ्या माणसांना विचारून ये?

श्रीहरीनी लाघवांनी नटविल्यावर वाल्याला विचार पडला व तो आपल्या घरी गेला व पत्नीला म्हणाला, "मी एवढे खून केले. "पत्नी म्हणाली त्या पापाचा वाटा मी घेणार नाही". मुलांनी पण तेच उत्तर दिले.

मग वाल्या विचारात पडला. मी ही पापे मुलाबाळांसाठी केली पण पापाचा वाटेकरी मीच! तो तेथेच बसून रडू लागला. नारदांनी सांगितले म्हणून तो तेथे गेला होता. नारद म्हणाले,"आता तुझी कुऱ्हाड माझ्यावर चालव".

पश्चाताप होणे हेच खरे! नंतर वाल्या त्यांना शरण गेला व म्हणाला, "मला क्षमा करा." नारद म्हणाले, "ज्याचे त्यानेच भोगायचे. तू कसा काय मुक्त होणार?"

"त्यासाठी तुम्ही मला काही सांगा" असे वाल्या म्हणाला. नारद म्हणाले, "एक मंत्र आहे." नारदांनी त्याला "मरा" हा मंत्र दिला. मरा मरा राम राम हा मंत्र लयबद्ध स्थितीने जपता जपता, हा जप करत असता तद्नंतर त्यातून "राम" हा ध्वनी निर्माण झाला.

कित्येक वर्षे लोटली, श्रीहरी नारदांना म्हणाले, "तू कोणाला अनुग्रह दिला आहेस का?" आठवून तरी पहा. शिष्याबद्दल तू शंका का घेतोस?

नारदांनी विचार केला. त्यांना रामनामाचा ध्वनी ऐकू आला. त्याच्यावर वारूळ चढले होते. त्यावेळी तो अस्थिमय झाला होता. पण चैतन्यमय होता. तो समाधित गुंग होता.

नारदाचे बोल ऐकले अन् त्याने पाय धरले. नारदांनी त्यांना चेतना शक्ति दिली अन् म्हणाले, *"तू वाल्या नसून वाल्मिकी झालास"*

तुम्ही माझे सद्गुरु आहात. तुमची कृपा म्हणून मला हे पद मिळाले. *वाल्याने रामावतार होण्याआधी रामायण लिहिले.* आत्मदर्शन असल्याने वदघट असते.

"समर्थ भक्तिने मानव गेल्यास त्याच्या पापाच्या राशी नाश पावतील. पण ठाम श्रध्दा व समर्थ आदेशानुसार तुमचे वागणे असेल तर!"

यातून घेण्यासारखे म्हणजे खूनी मनुष्य देखील उध्दरीला जातो. सद्गुरूंनी मानवाला जर कोणते कार्य करू नको म्हटले व त्याने ते केले तर तो मानवाचा दोष आहे.

झाले गेले गंगेला अर्पण करायचे. आत्मदर्शन प्रकाशाखेरीज मिळणार नाही. एकचित्त होण्यासाठी सद्वर्तनाची चाकोरी पाहिजे. सत् कृपेच्या साह्याने समाधी लागते.

सर्व संत म्हणतात, "सद्गुरु हे परम् निदान आहे. ते असूनही अलिप्त आहेत."

हे सताचे आसन आहे. *प्रत्येक ज्योतीने आपले आचरण सत् शुद्ध ठेवले पाहिजे.* शंकेला थारा द्यायचा नाही. बाहेर अघोर कार्य करणारे मानव आहेत, त्यांच्या पासून दूर रहायचे.

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी

*सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली।*
*निजवस्तु दावीली माझी मला ।।*
*माझे सुख मज दावीयेले डोळा ।।*
*दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ।।*
(नामदेव महाराज)

सद्गुरूंची कृपा झाल्यावर आपल्याला खरे ज्ञान मिळते.

*डोळीयाचा डोळा उघडीला जेणे ।*
*आनंदाचे लेणे देवविले।।*
*नामदेव म्हणे निक्की सापडली सोय ।*
*कदा न विसंबे पाय खेचरांचे ।।*

सद्गुरु म्हणजे काय हे नामदेवाला कळले.
सद्गुरु हे परम् तत्व आहे. त्या येसू खेचरांचे पाय मी विसरणार नाही. ज्यांच्या कृपेने मी पहातो तेच ते सत् !

त्यांचे अभंग श्रेष्ठ प्रतिचे आहेत. सद्गुरूंनी नामदेवाचा कस पाहिला.

संत धनाचे लोभी नाहीत. ते धनाची किंमत कवडी समजतात. सद्गुरु ध्यान हिच संपत्ती होय.

विठ्ठल म्हणाले, "नाम्या ! तुझे लग्न करायचे  आहे. तुला मुलगी कोण देणार? ती मुलगी सावकाराची पाहिजे. नाम्या म्हणायचा, माझे विठ्ठल आहेत.

श्रीहरीने मारूतीला आदेश दिले व त्याला बैल केले आणि नाम्या त्यावर बसला. मारूती बैल रूपाने होता. तो आरध्याच्या वाटेवर बसला. तेव्हा सावकाराची बायको नवर्‍यावर चिडली. हे पाहिल्यावर नाम्याने विठ्ठलाची आळवणी केली. त्यावेळी विठ्ठल निद्रिस्त होते. त्यानी ऐकले. अब्रू जाण्याची वेळ! तेव्हा रुक्मिणीसह, गणपतीसह निघाले. गणपतीबरोबर उंदीरही निघाले. सावकाराच्या घरी उंदराना पाठवून तेथील सर्व वस्तू नष्ट केल्या.

शेवटी विठ्ठलांनी रूप पालटले व नाम्याजवळ गेले. सावकाराला म्हणाले, "हे माझे चिरंजीव! नाम्याचे पारडे जड होते. सावकाराला नाम्याने सांगितले कि यांना शरण जा. त्यावेळी ते शरण गेले. नंतर विठ्ठल तेथून निघून गेले. पण विठ्ठलांनी लाघवांनी नाम्याचे घर सोनेरी केले.

नाम्याची बायको सज्जन होती. पांडुरंग भक्ताची लाज राखतो. सद्गुरु सेवेक-यासाठी सर्वस्व पणाला लावतात.

नामदेव हा आमच्या सारखाच मानव! पण भगवंताने त्याच्यासाठीच का यावे?
नामदेव तळमळीचा सेवेकरी होता. त्याला त्याच्या भगवंताशिवाय त्रिभूवनात काही दिसत नव्हते. म्हणून तो सद्गुरूंना आवडत होता. सद्गुरूंची इज्जत तीच आपली इज्जत सेवेक-यांनी समजावी.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

समाधी


सतचरण हीच मुक्ती...!!! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

सद्गुरू प्रिय ज्योत ती असते जी सदोदित सद्गुरू दर्शनात असते, सद्गुरुंच्या प्रणवांचे पालन करणारी ज्योत. सद्गुरू कडून ज्ञान घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करून ज्ञान वाढवणारी ज्योत.

पांचवा प्रणव ज्या भक्तांना, ज्या सेवेकऱ्यांना प्रगट असेल त्यालाच म्हणायचे सद्गुरू दर्शन ! सद्गुरू दर्शन हीच मुक्ती !

चारी वेद जेथे मौनावले तेथे मग चारी मुक्ती कुठे शिलक राहिल्या ?

स्थुलातुन सूक्ष्म, सूक्ष्मातून कारण, कारणातून महाकारण देह म्हणजे तेजोमय स्थिती.

ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर आपण चारी देहाचे व्यवहार करू शकतो. या चार देहातून ती ज्योत मुक्त होऊ शकते. कशामुळे? तर सद्गुरूमय झाल्यामुळे.

चारी मुक्तीच्या पलीकडचे सद्गुरू तत्व आहे. अविनाशी परम् तत्व जर प्रगट झाले अन त्यांच्या दर्शनात तुम्ही तादात्म्य झालात मग स्थूल राहील कोठे? सूक्ष्म राहील कोठे ? कारण राहील कोठे ? महाकारण राहील कोठे ? अशा ज्योतीला देहभान रहात नाही. तेथेच समाधी लागते.

समाधी म्हणजे त्या अनंताच्या शुभ्रप्रकाशाशी ज्योतिर्मय होणे अर्थात स्वतःचे जडत्व आपण विसरणे. जाणीव रहित होणे. तटस्थ होऊन त्या स्थितीत रममाण होणे. यालाच समाधी म्हणतात ! जवळ जवळ मृत्यूसमान त्याची गती असते. त्याचा जीव त्रिकुटीत अविनाशाशी लयबद्ध होऊन ब्रह्मांडी लय असतो. मग मुक्ती राहिली कोठे ? सतचरण आहेत तीच मुक्ती !
प पू सदगुरु बाबांच्या चारी मुक्ती म्हणजे , सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळविणे या प्रवचनातील एक भाग
टायपिंग:श्री रविंद्र वेदपाठक

*नामदेव महाराज*2

नामदेवाचे व्यवहार मायावी होते. विठ्ठलाना विचार पडला हा भोळा आहे. त्याला खरे दर्शन दिले नाही म्हणून ज्ञानेश्वरांना सांगितले.

ज्ञानेश्वरांनी नामदेवाला बोलावले व म्हणाले, "तुम्ही याचे कच्चे पक्के डोके पहा. गोराकाका तुम्ही याचे कच्चे, पक्के पहा."

त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मारण्यास सुरूवात केली. तेव्हा नाम्या म्हणाला, "गोराकाका, तुम्हाला अक्कल आहे कि नाही."

तेव्हा गोराकुंभार म्हणाला, "हा कच्चा आहे. तेथे अभिमान दिसला."

त्यातून मुक्ता नाम्याला म्हणाली, "चिडतोस का?"

तेव्हा नाम्या तिच्यावर चिडला अन् म्हणाला, "मी विठ्ठलाला विचारतो."

तो विठ्ठलाला म्हणाला, " मी तुमचा आवडता असताना या लोकांनी माझा अपमान केला. मला कच्चा म्हटले. तेव्हा तुम्हीच पहा."

विठ्ठलांनी त्याची समजुत केली. विठ्ठल म्हणाले, " मला तू खरा पाहिला नाहिस. खरे रूप पहाण्यासाठी सद्गुरु करावा लागतो."

तर नाम्या म्हणाला, "तुम्हीच सद्गुरूं!" तेव्हा विठ्ठल म्हणाले सद्गुरु केल्याशिवाय काही नाही. तू खेचर यांना शरण जा.

नाम्याने आवड्यानाथाच्या देवळात जाऊन येसू खेचर यांचा शोध केला. येसू खेचर हे पादत्राणे घालून देवळात लिंगावर पाय ठेवून झोपले होते. ते पाहून नाम्याला वाईट वाटले. त्याला राग आला. जोरजोराने येसू खेचराचे पाय धरून बाजूला ठेवी तर तेथे लिंग! शेवटी आपले चुकले म्हणुन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. शरण गेला. तेव्हा खेचर म्हणाले, "आता खरी पश्चा:ताप दग्ध झालेली ज्योत आहे." तेव्हा त्यांनी नाम्याला बोलावले व डोक्यावर हात टाकला म्हणजेच अनुग्रह दिला. नाम्याला गहिवरून आले. माझ्या कल्याणासाठी विठ्ठलांनी कस घेतला.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

*नामदेव महाराज*

नामदेव समाजाच्या गतीने शिंपी होते. घरचे सुखी होते. त्यांचे माता पिता विठ्ठलांचे नि:सीम भक्त होते. त्यामुळे विठ्ठलांनी नामदेवाला त्यांच्या घरी पाठवले.

त्यांचे वडील परप्रांतात गेले. त्यांची रूढी होती कि रोज विठ्ठलाला भोजन अर्पण करून मगच आपण जेवायचे. ते काम नामदेवाजवळ दिले. त्याला वाटे विठ्ठलांनी भोजन करावे. त्याना एकदा विठ्ठलाजवळ नेले. तेथे त्याना फार उशीर झाला. नामदेव म्हणाले " मी जेवण आणले ते तू का जेवत नाहीस." अन् म्हणाले, "विठ्ठला तुम्ही जेवला नाहीत तर मी इथे डोके आपटून जीव देईन."

तेव्हा विठ्ठलाने लाघवी नटवून भोजन केले. घरी आल्यावर त्याच्या आईला खरे वाटेना. वडील आल्यावर आईने त्यांना सांगितले, " नाम्या ताट रीकामा आणित असे."

वडीलांनी विचारले भोजन तू काय केलेस? खरे खोटे पहाण्यासाठी त्यांनी गुपचूप पहाण्याचे ठरविले व नाम्या जवळ भोजनाचे ताट दिले.

नाम्या म्हणाला "विठ्ठला तू जेव" विठ्ठल जेवला. त्यावेळी वडीलांनी नाम्याला धन्यवाद दिले. शेवटी तोच नामदेव 5 (पाच) वर्षाचा असताना, विठ्ठलांना जेवणास भाग पाडणारा पुढे संगतीने दरोडेखोर बनला.

पण पूर्व जन्माची ती सात्विक ज्योत होती. जरी दरोडे घातले तरी आवडया नागनाथाला नैवेद्य दाखवायचा.

नामदेव पंचक्वान्नाचे ताट घेऊन गेला त्याच वेळी एक गरीब आई व मुलगा ते भोजन पाहू लागली. नाम्याने ते भोजन मुलाला दिले.

दरोडेखोरांनी माझ्या नवर्‍याचा वध केला हे बाईचे शब्द ऐकून नाम्या विचारात पडला. कारण तो सत् होता. त्याच्या डोळ्यात अंजन पडल्याप्रमाणे झाले व त्याना रोज येण्याची मुभा दिली. अन् म्हणाला मी अत्यंत पापी आहे. असे म्हणून तो लिंगाला म्हणाला माझी सुटका करा अन् स्व:चा खंजीर काढून रक्त दिले. त्याला मुर्चा येऊन तो देवळात पडला. तेव्हा तेथे ब्राम्हण आले व त्यांनी पाहिले. नाम्याला उचलून बाहेर टाकले.

नवनाथ म्हणाले "तू ज्याला जेवण दिलेस त्यांनी तुला दृष्टांत दिला कि तू महत् पापी आहेस. तू येथे दिंडीला येऊ नकोस." तेव्हा त्याला फार वाईट वाटले.

माझ्यामुळे इतरांना आदेश नाही. त्यानी एक विठ्ठलाला पत्र लिहिले. ते वाचून विठ्ठल हेलावले. त्यात होते "मी अत्यंत पापी आहे. मी तुमचा नेम विसरणार नाही. पाच वर्षांचा असताना माझ्या हातचे जेवण तुम्ही केलेत. पण मी आता तुम्हाला तोंड दाखविणार नाही."

शेवटी त्याना भरून आले. विठ्ठलांनी जाणीव दिली तुला आता क्षमा आहे. तू दर्शनाला येऊ शकतोस. त्याला पश्चाताप झाला. तोच नामदेव विठ्ठलांचा भक्त झाला.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

*देही देखीली पंढरी । .....3

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

"अवघाची संसार सुखाचा करीन । दावीन तिन्ही लोकी ।।"

असे संतानी म्हटले आहे. खऱ्या भक्ताला आपल्या प्रपंचाची काळजी नाही. सत्य आपल्या संसारात स्थिर होण्यासाठी प्रथम आई वडील सत्याने वागणारे पाहिजेत. सत्याचे पालन झाले पाहिजे.

सत्पद म्हणजे दयाघन! ते कुणाला बोलणार नाहीत, तरीपण मानवांनी आपले आचरण सत् ठेवले पाहिजे.

चोख्याला विठ्ठलाशिवाय दूसरे काही माहित नव्हते. चोख्याने जाणले होते कि सत्यामुळे आदर मिळतो. सत्य टिकविले पाहिजे. सत्य हेच ईश! मायावी मन स्थिर राहणार नाही.

मानव हा क्षणभंगुर आहे. क्षणिक लोभासाठी मनुष्य पापे करतो. पण त्याला सुख शांती मिळत नाही. असत् कधीही स्थिर राहणार नाही.

मन हे मोक्षाप्रत नेणारे आहे. जगात कोणी महान किंवा मोठा नाही. संचिताप्रमाणे होत असते. गरीबी आली तर नाराज न होणे, श्रीमंती आली म्हणून हुरळून जाऊ नये.

समर्थ म्हणतात, "अमीरी ही चंचल आहे. श्रीमंत लक्ष्मी असते. मी गरीबीत असतो. मी कोणीही नाही. माझ्याकडून करून घ्या."

सद्गुरूंचे आदेश पाळा. समर्थ शक्तिपूढे मानवाचा ठाव लागणार नाही. सद्गुरु हे अत्यंत लाघवी आहेत. तुम्ही कोठेही असला तरी समर्थांचे ध्यान करा. त्यांची आठवण ठेवल्यावर मालिक सुध्दा म्हणतात कि, "माझे सेवेकरी मला विसरणार नाहीत."

सत् हे सर्व काही पुरवित असते. जन्म झाल्यावर आईच्या रक्ताचे दुधात रूपांतर सतच करते.

मनुष्य कर्माने दरिद्री होतो.

गर्वापासून आणलेली जी संपत्ती ती गर्वसंपत्ती.

विश्वव्यापी तेच परमेश्वर, पांडुरंग. तेच चोख्याला सर्व काही देत होते. सत् संपत्ती कुणी लुटली तरी संपणार नाही. ती कुणी लूटणार नाही.

"पांडुरंग म्हणजे शुभ्रप्रकाश! सद्गुरूंचा शुभ्र प्रकाश असतो."

प्रत्यक्ष चोखा आपल्या मुखाने म्हणत असे. शांती हि त्याची निजागंना म्हणजेच अर्धागिंनी आहे. तीच रुक्मिणी आहे. शांती असावी म्हणजे तृप्ती.

आकारले तितके नाशे. आपली दृष्टी नष्ट झाली तर सर्वस्व नष्ट होते. डोळे निर्माण होतात. बंद केले कि जाणीव होत नाही. पण त्यात जो प्रकाश मिळतो त्यातच सद्गुरु उभे असतात. त्यांच्या आदेशाप्रमाणे चालले पाहिजे.

मानव हा क्षणभंगुर आहे. सद्गुरूंची भक्ति परमश्रेष्ठ गतीची आहे. समर्थांनी कस घ्यायला सुरुवात केली म्हणजे ते त्याला नाचतात.

" हे भगवंता तुझ्या सत्तेने वेद बोलतात. सूर्य तुझ्या सत्तेने चालतो. तू ब्रम्हांडाचा धनी आहेस", असे नामदेव म्हणतो.

सद्गुरु तत्व ज्याने ओळखले तोच तहान भूक विसरतो. स्वार्थासाठी लाख उपद्व्याप केले कि पापाच्या राशी निर्माण होतात. मृत्यू गोलार्धात 83 लक्ष योनी आहेत.

सद्गुरूंना बनविणे म्हणजे महान अपराध आहे. सद्गुरूंनी शाप दिला तर त्याचे रक्षण करणारा कोणी नाही, असे स्वयंभू पार्वतीला सांगतात.

बी चांगले पेरले तर चांगले उगवणार. दृष्टी व कान यामध्ये चार बोटांचे अंतर आहे. त्याच चार बोटांनी मानव अधोगतीला गेले आहेत.

मालिक कस घेतात आपल्याला ह्याबद्दल आदर पाहिजे. माया, ममता, अहंकार यांना आदर न देणारा तोच माझा भक्त असे कृष्ण पार्थाला म्हणाले.

भगवंताबरोब मानव बरोबरी करू शकणार नाही.

"माया आपल्या बरोबर येणार नाही. अशाश्वत आहे तीच माया आहे."

चार चौकटीत म्हणजेच चार तत्वामध्ये सत् पदाने आहे तोच सेवेकरी आहे.

चोखा लीन, नम्र व शांत होता. तोच हा पांडुरंग जाणा । आपण जन्माला आल्यावर समर्थांना डोळे भरून पहा हिच खरी भक्ति. मनात शंका आणू नका.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

*देही देखीली पंढरी।आत्माअविनाशी विटेवरी ।।*

*देही देखीली पंढरी।आत्माअविनाशी विटेवरी ।।*
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी)

काही मानव म्हणतात कि, "माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत."

"वैकुंठनायक तेच समर्थ!"

आपल्या सद्गुरु कर्तव्यासाठी ह्या गोष्टीचा काही मतलब नसतो. ज्याने सृष्टीला उत्पन्न केले आहे त्याला आपण काय देणार? त्याला आपल्या शक्तिने काय अर्पण करणार? आपण आपली चुक सुधारली पाहिजे.

चोखा म्हणतो, "माझ्या देहातच पंढरी आहे व त्यात पांडुरंग आहे त्याला मी पाहत आहे."

आजकालचा मानव क्षणिक लोभासाठी लबाड्या करतो.

ज्या ठिकाणी सत्य आहे तेथे यश आहे. "यश ते पार्थां मीच जाण" असे कृष्ण अर्जुनाला म्हणाले. ज्या ठिकाणी मी आहे त्याठिकाणी यश आहे. समर्थांना पहाण्यासाठी आपले आचरण चोख्याप्रमाणे पाहिजे.

संसार म्हणजे सगुणाचे सार!

पण निर्गुण काय आहे ते ओळखावे. आपण आहात हे आपणाला कळले पाहिजे. प्रथम आपली भूमिका शुध्द असली पाहिजे. "पळसाला पाने तीन".

संसार नीटनेटका असेल तर पाच मिनिटे भक्तिला बसता येईल. गरीबी पत्करली तरी चालेल.

मला पत मिळाली तर ती सत्यामुळेच मिळाली. सत्य असल्यानेच सर्वस्व आहे. चोख्याने सत्य कधी सोडले नाही.

संतोष व समाधान पाहिजे. कर्ते करविते वेगळे आहेत. म्हणजे सत्य संकल्पाचा दाता आहे. तरच ते पांडुरंग उभे रहातात. समर्थ म्हणतात, "मला जे करून घ्यायचे ते मी घेणारच." मालिक म्हणतात, "तुम्ही कर्तव्यात रहा, माझे लक्ष आहे."

सताला अपयश आणण्यास कोणी पाहिले तर तसे होणार नाही. मालिक कस घेतात पण त्याला ते कधी कमी पडू देणार नाहीत.

संतांमध्ये स्वार्थ नव्हता. म्हणून भगवंत संतांची चाकरी पत्करीत होते. मनुष्य नेहमी मायेत चुकतो. माझे काही नाही. माझ्यासह हे समर्थांचे आहे. अविनाशी आत्मा अमर आहे. सत् आपल्या ठिकाणी असेल तर काही कमतरता नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

मन हे वारू.......!!!

मन हा असा वारू आहे, सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्यावरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?

मनावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही. केले नाही. करविता नाही. हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचि:र्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.

जय श्री सद्गुरू माऊली।

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची अमृत वाणी*

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

चोखोबा हा जातीने महार असून नितांत आदरणीय होता. त्याची कृती सत् व अभिमान रहित शुध्द अशी होती. तो म्हणे, "मला तुम्ही बनवले, तरी  विठ्ठलाला कुणी बनविणारे नाही."
चोखोबाची वर्तणूक निष्कलंक होती.

संत म्हणजे शांत, विठ्ठल म्हणजे चैतन्याचा गाभा! चैतन्याचा गाभा म्हणजे बाहेरील ज्योतीची निरज्योत. स्वात्म अनुभव घेण्यासाठी बालरूप घेतात. चित्घन चकचकीत हि-याप्रमाणे असतात.

पांडुरंग चोख्यासाठी सर्वस्व होते. कोणताही संत असला तरी त्याला सद्गुरुविना दर्शन नाही. विठ्ठलाशिवाय त्याला दुसरे काही माहित नव्हते. सद्गुरूंनी त्याला दर्शन दिले. त्याचा मूळ उद्देश नितांत भक्ति हा होता. शुध्द नितांत भक्ति हे उच्च पातळीचे ध्येय आहे. त्या भक्तिमध्ये कोणत्याही तऱ्हेचे तरंग निर्माण होऊ देऊ नयेत.

समर्थ कस पहातात. ती ज्योत ठामपणे आहे, निष्कलंक आहे कि मायावी आहे? तुम्ही श्रद्धेने आपल्या कर्तव्याने वाटचाल करा. ते अनंत व्यापक आहेत. अशा अनंतना सर्वस्वाची गती आहे.

कुणी निंदो वा वंदो आपला स्वहिताचा धंदा गमावता कामा नये. सद्गुरु तुमच्या पापसंचिताचा नाश करून तुम्हाला सत् पदाची ओळख करुन देतात.

आंधळ्याला ज्याप्रमाणे काठी त्याप्रमाणे भक्ताला सद्गुरु ही काठी आहे. ती ज्योत सताच्या आदेशा बाहेर नाही.

"आपण जे काही कर्तव्य करता, त्या कर्तव्यात असलेल्या काही मायावी ज्योतीना परब्रह्म म्हणजे पैसा वाटतो."

आपण जन्माला आल्याबरोबर आमच्या बरोबर काय असते? स्थूल संपत्ती नसून सत् किंवा असत् असते.

"सत् चित् झाले म्हणजे सच्चिदानंद होते."

काही मानव म्हणतात कि माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? तर आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत. वैकुंठनायक तेच समर्थ!
टायपिंग : श्री सुभाष भोसले

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी

आपले सद्गुरु आपल्याला ज्ञान देत असतात. परंतु ते ज्ञान प्राप्त करून देतांना सद्गुरु कधी श्रम हा प्रणव प्राप्त करीत नाहीत. तर ते प्रणव देतात हे माझे आद्य कर्तव्य आहे. सत् इतके श्रम घेऊन आपणास बोध प्राप्त करून देत असतात, मग तो बोध मानवाने परिपूर्ण ग्रहण केला पाहिजे की नको?

मी माझ्या सताला कसा बरे विसरू? अशी स्थिती कलीयुगी मानवाने सताप्रत केली तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही.

मानवी स्थितीप्रमाणे या कलीयुगी स्थितीत असत्य स्थितीसाठी सर्वस्व स्थिती मुक्त आहे. परंतु सत्य स्थितीसाठी अनेक अडचणी आहेत.

कारण हे  प्रथमपासूनच आहे. सत्य हे सत्यच आहे. ते कदापिही लोपत नाही आणि कितीही लोपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लोपून रहाणार नाही.

मानवाला जेंव्हा दु:खमय स्थिती प्राप्त होत असते तेव्हाच त्याला सताप्रत प्रणव देण्यास उसंत मिळते. जेंव्हा मानवाला दु:खमय येणे आफत स्थिती प्राप्त होते तेव्हा त्याला सताची आठवण करण्यास पूर्णत्वाने उसंत मिळते.

परंतु अशी स्थिती न करता दु:खातूनही आणि सुखातूनही सताला कधी विसरू नये. अशी जेंव्हा स्थिती होते तेंव्हा सत् त्या ज्योतीपासून कदापिही दूर जात नाही. सताला दूर कोण करीते? तर मानवच करीतो.

सत् मानवाला स्वयंम् स्थितीत घेण्याची स्थिती करीत असते. सत कधीही आपल्या सेवेक-याला अती कष्टात जाऊ देत नाही. परंतु सेवेकरी पूर्णाची स्थिती दुय्यम करून अती कष्टात जातो. सताने एकदा का प्रणव दिधले तर ते पूर्णत्व करण्यासाठी सत् पराकाष्ठा करीत असते. परंतु मानव अतीमायेच्या आहारी जाऊन स्थिती करीतो.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी

ज्याने अहंकार केला तो या भूतलावर कर्तव्य करू शकणार नाही. सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. अहंकाराचा नाश करा. रागाचा नाश करा. अहंकाराचा नाश केल्याविना तुम्हाला सत् प्राप्त होणार नाही.

ज्या अवधीत रागाची स्थिती होईल त्या अवधीत नामस्मरणाची स्थिती करणे. मग राग आपणापासून दूर जाईल. रागाने जो या देहाचा नाश करतो तो या भूतलावर सुक्ष्म गतीने अती दु:खमय स्थिती प्राप्त करून घेत असतो.

मानवाने लीनतेने राहिले पाहिजे. स्थानावरून सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. जो लीनतेने; शांततेने स्थितीत राहील त्याच्यापासून सत् कदापिही दूर जाणर नाही. मानवाने आचरण करताना प्रथम लीनता पत्करली पाहिजे. जरी कलीयुगी स्थिती असली तरी आपण सत् सानिध्यातल्या ज्योती आहात. लीनतेने आचरण होईल त्यावेळी आपण सताला ह्रदयस्थ स्थितीत साठवून ठेवाल. अहंभाव असेल तर सत् आपणाप्रत रहाणार नाही. म्हणून अहंमतेचा नाश करून लीनतेने स्वीकार करा. मनन स्थितीत जर समाधान युक्त स्थिती असेल तरच मनन स्थिती स्थिर राहील.

माया ही चीज किती गंभीर आहे, अन् ही माया मानवाला सतापासून दूर नेते. मायेत गढून गेल्यानंतर मानवाला कल्पना येत नाही. जी स्थिर, शांत माया आहे तीचा मानव विचारही करीत नाही. सत् आपणास पदोपदी प्रणव देत होते मायेपासून दूर रहा. माया चंचल आहे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

सोमवार, ३० जुलै, २०१८

अंतरंगी रंगूनी जावे....5

अतरंगी रंगुनी जावे .......

यत्किंचित माया पण मायेसाठी केवढ्या गडबडी. मायेकरिता रात्रंदिवस झोप सुद्धा लागत नाही. ही माया आपण घेऊन जाणे शक्य नाही. अरे आपले कवच सुद्धा आपल्याल्या नेता येत नाही, आदेश सुटल्यानंतर तेथेच टाकून जावे लागते मग माया काय येणार बरोबर?

पण कांही लोकांची जाणीव असते की माया म्हणजेच सर्वस्व. माया सतावू लागली की मग सदगुरूंचा शोध घेतात.

त्रास कधी होतो मायेत गुरफटल्यानंतर. तेंव्हा मायेत रममाण न होता सत चरणात रममाण व्हा. मायेरहीत आम्ही नाही, तुम्ही नाही आणि अनंत म्हणतात तेही नाहीत.

माझ्या भक्ताने टाहो फोडला मग मलाही धाव घ्यावी लागते. मग मी तरी माया रहीत आहे का ? पण आमची माया कशी आहे? सत माया! अन तुमची माया कशी आहे?

सताची माया कशी असणार तर सम बुद्धीने सगळी कडे पाहणार, अंतरंगाचे तरंग असे असतात. क्रमशः
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

रविवार, २९ जुलै, २०१८

*श्री गुरुदेव पितामह*

मानव कितीही गप्प राहिला तरी त्याच्या अंत:र्मय स्थितीची कल्पना आम्हास येते. अंत:र्मय स्थितीत सत् आहे. तुमच्या अंतर्मय स्थितीत जी काही स्थिती चालू आहे त्याची सताला परिपूर्ण कल्पना आहे.

मानवाने कसे राहिले पाहिजे?
स्थिती चांगली असो अगर वाईट असो ती सताजवळ उघड केली पाहिजे. अंतर्मय स्थितीत ठेवल्यानंतर कर्तव्य होणार नाही. तुमची अंतर्मय स्थिती स्वच्छ राहिल्यानंतर सत् त्या ठिकाणी वास करून राहील.

आपुली अंतर्मय स्थिती गढुळ केंव्हा होते? 

आचार म्हणू कि विचार म्हणावे?
आचार दिसतात विचार दिसत नाहीत. वाईट विचार अंतर्मय स्थितीत राहिल्यानंतर अंतर्मय स्थिती गढुळ होते. आचाराने तुम्ही कर्तव्य करीत असता; ते सर्वस्वांना दिसत असते. पण तुम्ही विचार करीता ते कोण पाहू शकेल?

अंतर्मय स्थिती गढूळ झाल्यानंतर सत् बाजूला सरकते. मग तुमचे विचारही बिघडतात अन् आचारही बिघडतात. मानवाची स्थूल स्थिती होऊन त्याला कर्तव्याची जाण रहात नाही अन् मानव आळशी होतो.

म्हणून प्रणव देतो मनन स्थिती शुध्द ठेवा. त्याकरीता प्रथम तुमचे विचार शुध्द ठेवा. जेंव्हा तुमच्या मनन स्थितीत विचारांची शुध्दत्वता असेल त्या अवधीत सत् तुमच्याप्रत असेल. परंतु ज्या अवधीत तुमची वैचारिक स्थिती गढूळ असेल त्या अवधीत सत् बाजूला सरकते.

आम्ही मानवाला दुर्गुणी म्हणणार नाही, कारण सताने त्याची या स्थितीत उपलब्धता केली आहे. ती दुर्गुणी होण्यासाठी नाही. मानवाची वैचारिक स्थितीच मानवाला दुर्गुणी होण्याकरिता कारणीभूत होत असते. म्हणून मानवाने वैचारिक स्थिती पूर्णत्व शुध्द ठेवली पाहिजे.

गुरुवार, २६ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद

आपला हा पंचमहाभूतांचा बनलेला देह आहे. आपल्या या देहात जवळ जवळ बहात्तर हजार नाड्या आहेत. त्यात प्रमुख बहात्तर. त्यावर तीन नाड्या: इडा, पिंगळा, सुषुम्ना. तीन नाड्या बहात्तर नाड्याना चेतना देतात आणि बहात्तर नाड्या बहात्तर हजार नाड्याना.

तीन नाड्याना चेतना देणारी एक नाडी आहे, तिला तुर्या म्हणतात. तुर्येकडून सूत्रे फिरली की सर्वस्व सूत्रे फिरतात. त्या तुर्येला सुद्धा चालना देणारे आणखी एक तत्व आहे. त्या तत्वाच्या इशाऱ्यावर तुर्या काम करत असते. पण ते तत्व मात्र अव्यक्त आहे. ते तुम्ही पाहिले पाहिजे अन त्यातच तुम्ही लय झाले पाहिजे.

अध्यात्माच्या वा योगाच्या सहाय्याने तुम्ही तुर्येप्रत जाऊ शकता पण पुढे जायला अडचणी येतात. तुर्या म्हणजेच बिंदू! कुणी त्याला ज्योत म्हणतात.

मग आता लक्षात घ्या या सर्व नाड्यांचा अधिपती तोच गणपती ! त्याच्या सत्तेने सर्वस्व व्यवहार होत असतात. सर्व नाड्यांकडून ते कर्तव्य करून घेत असतात. गजासुराचा वध करण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्मावतार घेईल असे शंकराला संदेश मिळाले होते. अन् त्या नुसार गणपतीचे अवतार कार्य घेऊन गजासुराचा वध केला.

गणपती गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. ते समत्व बुद्धीने सगळीकडे पहातात. ओंकार समत्व बुद्धीने पाहणारा आहे म्हणून महेशानी म्हटले आहे 'समता वर्तावी | अहमता खंडावी !' गणपतीची पूजा करताना अहंकार रहित होऊन पूजा करा तरच तो कृपादृष्टीने पाहिल.

समर्थ रामदास स्वामीने म्हटले आहे,

                  गणाधिश जो ईश सर्वां गुणांचा ।
                  मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

बुधवार, २५ जुलै, २०१८

मानवता धर्म.....2

आपण कोण आहोत अन आपला धर्म कोणता?
धर्म म्हणजे जात नव्हे, धर्म म्हणजे धारणा, पोषण अन कर्तव्य ! धारण करणे म्हणजे प्रथम धारणा, तदनंतर त्याचे पालनपोषण अन मग त्याचे कर्तव्य.

आता स्वधर्म कोणता?
तर मानवता. मानव हा अवतार आहे म्हणून मानवता हा धर्म. आता प्रथम धर्म तू जाणलास, माझे सत  सर्वठायी एकच आहे अशा समत्व भावनेने तू वागलास, समतेने वागल्यानंतरच त्याला मानवता धर्म कळला असे म्हणता येईल.

ज्या ठिकाणी मानवता असते तेथे लिनत्व असते. अशा या मानवतेला जर नामाची जोड मिळाली तर काय होईल?

मानवता म्हणजे सत मार्गाने जाणे, नितीमत्तेने वाटचाल करणे अन तुझ्यात वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्याची ओळख करून घेणे.

नामच तुला त्या अविनाशाची, सताची, ब्रम्हाची ओळख करून देईल. नामाच्या जोडी शिवाय हे होणे शक्य नाही. लक्ष्यात घ्या, तुकारामानी देखील आपल्या अभंगात सांगितले आहे,
                    "नामापरते नाही साधन ।
                      जळतील पापे जन्मांतरीची ।।"

मंगळवार, २४ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद*...1...*

पाचवा प्रणव वेद कशामुळे मिळतो ? कशामुळे प्राप्त होतो ?

ज्ञानमार्गाने मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञान मार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी जाऊ लागला, नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद्गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरूंशी बोलणे चालणे होऊ लागले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला असे म्हणता येईल. जरी तो प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालावयाची आहे.

प्रणव येणे बोल! जसे आपण बोलणे ऐकतो त्याच प्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ओमकार स्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला असे म्हणता येईल, मग अशी ज्योत सद्गुरू सानिध्याने कुठेही जाऊ शकते.

पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याशिवाय आपल्याला गुरूगुह्य काय आहे हे समजणार नाही. जो पर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणववेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही तो पर्यंत आपले सद्गुरू काय आहेत याची तो जाणीव घेऊ शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही.

पाचवा प्रणववेद सूरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो.

आम्ही हे म्हणतो ते खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते. सद्गुरूना संदेश द्यावयाचे असतील तर ते कोणत्याही तत्वाला देऊ शकतात. हाच पाचवा प्रणववेद! आपण पाहतो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सूक्ष्मपणे कोठेही आदेशानुसार जाऊन येते की नाही?
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

सोमवार, २३ जुलै, २०१८

*# श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी #*

*# श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी #*

🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
सताप्रत प्रणव देताना, कळत नकळत असे प्रणव देणे योग्य नव्हे.
🍁🍁🍁🍁🍄🍄🍁🍁🍁
माया ही तुमची आहे. आमची नाही. आम्हाला मायेची काही गरज नाही.
🥀🌺🥀🌺🥀🌺🥀🌺
स्थुलाला मायेची गरज ही असतेच असते. तुम्हालाच माया जवळ केली पाहिजे अन् मायेचे कर्तव्यही केलेच पाहिजे.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
जितकी शरीरे, तितकी मने अन् प्रत्येकाचे आचार विचार वेगवेगळे.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
सर्वस्व मनानी एकच विचार केल्यानंतर आपण सतसान्निध्यात राहू.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्रध्दा असली तर सर्वस्व स्थिती. श्रध्दा असून मन चंचल झाल्यास कर्तव्य होणार नाही.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मानवाची मनन स्थिती शांत आणि स्थिर असावी. यालाच श्रध्दा आणि सबूरी म्हणतात.
🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄

शनिवार, २१ जुलै, २०१८

*-: तन, मन, आणि धन :-*3

सेवेकरी पूर्णत्व सत् मय राहीला तर षड्:रिपू त्या सेवेक-याप्रत जाऊ शकणार नाही. कलियुगी स्थितीत मानव पूर्णत्व मोहमायेत गुंतलेला असतो. हि मोहमाया मानवापासून दूर जाऊ शकत नाही.

आपणास पूर्णत्व कल्पना आहे सताने या पृथ्वीतलावर कर्तव्य केले ना? ज्ञानार्जन देखील केले. मानवाला मोहमायेतून सोडविण्यासाठी परिपूर्ण स्थितीने कर्तव्य केले. आपणास सानिध्यात घेऊन ज्ञानयुक्तता केली. परंतु मानवाच्या मनाची चंचलता दूर होत नाही. मानव मुखाने परिपूर्ण प्रणव देतो पण मननतेने ही स्थिती होत नाही.

म्हणून मानवाने प्रथम मनाची शुद्धत्वता केली पाहिजे. सताने आपणास स्थूल दिधले आहे. स्थूलाने आपणास कर्तव्य करता येईल. त्याचवेळी मनाने आद्य कर्तव्य येणे नामस्मरण केले पाहिजे. पण ते होत नाही. स्थूल कर्तव्य करते अन् मन मोहमायेचे कर्तव्य करीते. पण तेच मन सतमायेत गेले तर कर्तव्याला परिपूर्णता येईल.

मानवाला मोहमायेत कोण गुंतवते? तर मानवाचे मनच मानवाला संसारमय स्थितीत गुंतवते. मानव संसारमय स्थितीत मोहमायेमुळे गुंततो. असाच मोह जर मानवाला भक्तीत झाला तर सेवेकरी सताप्रत जाऊन स्थिर होईल. अन् संसारमय स्थितीत स्थितप्रज्ञ होईल.

संसार मानवाचा नाही तर ती त्या परब्रह्माची निर्मिती आहे. परंतु मानव असे मानत नाही. मानव म्हणतो सर्वस्व माझे आहे. पण मी कोणाचा आहे याची जाण विसरतो.

सताने स्थूलात असताना सर्वस्वाची तुम्हा सेवेक-याना पूर्णत्वता कशी आहे याची जाण दिधलेली आहे. पण मानव मोहाला अधिक भूलतो. त्या संसारमय स्थितीसाठी मानव तन, मन, धन सर्वस्व समर्पित करीत असतो, परंतु सतासाठी समर्पितता नसते. अन् म्हणूनच मानव मोहमायेत गुरफटतो.

आपण म्हणता संसार! कोणाला नाही? सताचा देखील संसार आहे. परंतु ज्या परब्रह्माने संसाराची निर्मिती केली ते मात्र त्यात गुंतून राहिले नाहीत. एवढेच नाही तर सर्वस्वांसाठी परिपूर्ण स्थिती करीत आहेत ना?

सताने आपणास अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याची स्थिती केली पण तुम्हाकडून अज्ञानाची स्थिती दूर करण्याची स्थिती पूर्णत्व होत नाही.

आपण प्रणव द्याल आम्ही कलीयुगी मानव आहोत. पण सताने या कलीयुगातच कर्तव्य केले आहे. जोपर्यंत मानवाच्या स्थितीत अहंम आहे तो पर्यंत तो पूर्णत्व होऊ शकत नाही. मानवाने आपसातील अहंमतेचे खंडण केले पाहिजे.

*श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी*

जर आपणास मायावी कर्तव्यासाठी वेळ पुरत नाही तर मग सत् कर्तव्यासाठी अवधी मिळणार नाही.

मानवाचे शरीर कर्तव्य करीत असते. मनाने मानव मायेचे कर्तव्य करीत असतो. पण त्याच स्थितीप्रमाणे जर मानवाने अपुले मन सतात गढवून ठेविले मग इतरत्र स्थिती जी आपणास दिधली आहे त्याने तुमची कर्तव्य केली तर ती कर्तव्य होऊ शकतील.

दोन्ही स्थितीत मानव कर्तव्य करू शकतो. म्हणून मन दोन्ही स्थितीत ठेवायचे. सताप्रतही ठेवायचे अन् कर्तव्यातही ठेवायचे.

कर्तव्य केल्याविना मानवाला मायेची स्थिती प्राप्त होणार नाही. अन् माया ही मानवाला हवीच आहे. जर माया नसेल तर मानव काही करू शकणार नाही.

मानव सतावरच स्थितप्रज्ञ असतो म्हणून मानवाने आपले मन सताप्रत ठेऊन कर्तव्याची पूर्णत्वता केली पाहिजे. मग मानव संतुष्ट होईल. मानवाने सतात परिपूर्णता केली तर तो या विषयांतरात एकाग्र पणे राहील. नुसत्या विषयांतरात येणे नुसत्या कर्तव्यात राहिले तरीही तो मानव संतुष्ट होऊ शकणार नाही. दोन्ही स्थितीने राहिल्यानंतर मानव संतुष्ट राहिल.

सर्वस्व स्थिती सतानेच उपलब्ध करून ठेवलेली आहे. सताची मनोकामना कोणती असते? सताचीही मनोकामना असते कि मी जे स्थूल येणे शरीर या स्थितीत पाठवले आहे त्या शरीराला विषयांवरची जरूरी अधिक आहे. जर विषयांतर नसेल तर शरीर काम करू शकणार नाही. नुसत्या शरीराचा पुतळा करून उपयोग नाही, तर त्याच्याकडून कर्तव्य करून घेतलेच पाहिजे. जर कर्तव्य ही स्थितप्रज्ञ नसतील तर तुमचे शरीर काही करू शकणार नाही. विषयांतर म्हणजे मानवाला दिनात करावी लागणारी अनेक कर्तव्ये होत.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

गुरुवार, १९ जुलै, २०१८

*-: तन, मन, आणि धन :-*2

तन सताने दिधलेले आहे, मन सताने दिधलेले आहे, धन सताने दिधले आहे. ते कर्तव्यासाठी दिधले आहे. मानवाने त्याचा यथायोग्य वापर केला पाहिजे.

तन मिळाले म्हणून त्याची कशीही स्थिती करणे यथायोग्य नाही. मनाची यथायोग्य स्थिती केली पाहिजे अन् धनाचाही यथायोग्य उपयोग केला पाहिजे.

मानवी स्थिती प्रमाणे सताने तुम्हांस माया हे धन अशी स्थिती दिधलेली नाही. त्या खेरीज तुम्हाला एक फार मोठे धन दिधलेले आहे. मायावी धन तुम्हापासून कोणीही हिरावून घेऊ शकेल परंतु सताने समर्पित केलेले धन कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मग सताने दिधलेले धन श्रेष्ठ आहे ना? परंतु मानवाला ह्या धनाची किंमत कळत नाही, परंतु मायावी धनाची किंमत कळते. कारण मानव समजतो कि मायावी धन त्याने कमविलेले आहे.

जर मानवात सताने वास केला नसता तर तो हे मायावी धन कसा बरे कमवू शकेल? वास्तविकतेत जर मानवाची अशी धारणा असेल तर तो सतापासून दूर जावू शकणार नाही.

सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधलेली आहे पण आपण ते जाणीवेत ठेवले नाही. कोणतीही स्थिती असो, कलियुग स्थिती असो नाहीतर आर्यवर्त असो. कलियुग कशामुळे प्राप्त झाले? याची जाण सताने आपणास दिधलेली आहे. कलियुग असून देखील सत् कर्तव्य परायणता साधत होते ना?  अशा सताच्या स्थितीतील आपण मानवी ज्योती आहात. मग याची जाण आपणास असावयास, यावयास हवी.

सतानी आपणास जे तन, मन, धन दिले आहे ते कर्तव्यासाठी. कर्तव्य करीत असताना सेवेक-याने दृढ:निश्चयी राहिले पाहिजे.

आपणात असणाऱ्या "मी" ची जाण घेऊन कर्तव्य केले तरच भक्त सत् शुद्ध होऊ शकतो. अन् अशा भक्तांपाशी संयमता अन् लिनता वास करून राहते. असा भक्त सताला सांगू शकतो, *"आहे हे सर्व आपूलेच आहे. आपण आम्हास ते कर्तव्या करीता प्रदान केले आहे. आम्ही केवळ निमित्त आहोत."

* हा पंचमहाभूताचा देह परमात्म्याने निर्माण केलेल्या निसर्गाशी संधान ठेऊन राहिला अन् त्याचा कर्तव्यासाठी यथायोग्य स्थितीने वापर केला तरच तो शुध्द राहिल. हा मानवी देह असेपर्यंत क्षणिक मायेला न भूलता सद्गुरूंनी आपणास जे अमूल्य धन प्रदान केले आहे येणे जे "अखंड नाम" बहाल केले आहे, त्याबरोबर तन्मयता साधल्यास सद्गुरु आपणापासून कधीही दूर जाणार नाहीत.

टायपिंग: श्री सुभाष भोसले

सोमवार, १६ जुलै, २०१८

तन, मन आणि धन.....!!!

(पितामहांची अमृतवाणी)

मानवाजवळ सर्वस्व स्थिती असते. मानवाचे तन आहे, मानवाचे धन आहे.

जर सताचे सर्वस्व असेल तर मग अहंकार का येतो? अहंभाव का येतो? लिनता का येत नाही? समत्वता का येत नाही?

तन आमचे नाही. तन म्हणजे हा पंचमहाभूतांचा देह बनवून परमात्म्याने आम्हांस प्रदान केला, अन् स्वयंम् स्थितीत वास करून राहिले.

त्यांच्यापासूनच मनाची निर्मिती अन् कर्तव्याकरीता धनाची निर्मिती. तेव्हा यातील कोणतीही स्थिती मानवाची नाही. परंतु हे मानव मान्य करीत नाही.

मानवाचे स्थूल आहे, मानवाचे धन आहे, मानवाचे सर्वस्व आहे. सताने तुम्हास तुमच्यासाठी प्रदान केले आहे. परंतु त्याची जाण मानवाने घेतली पाहिजे. जे सताने दिधले ते कर्तव्यासाठी दिधले. जो मानव दृढ:निश्चइ राहतो त्याला कशाची कमतरता नाही. पण काही मानवांच्या मनात आप-पर भाव मनी वसत राहतो. त्यांच्याठायी समत्वता नसते.

तन म्हणजे हा पंचमहाभूतांचा देह. त्या देहात असणारी  आत्मज्योत अन् आत्मज्योती पासून असणारे मन. त्या मनात असणारी लिनता, सत् शुद्धता, संयमता अन् नितीमत्ता हेच खरे धन.

"मी" या सर्वस्वात बहरलेला आहे. पण ज्याने "मी" ला ओळखले आहे, ज्याने त्या "मी" शी संधान ठेवले आहे तोच खरा मानव होऊ शकतो. अशा मानवाजवळ संयम असतो, लिनत्वता असते अन् त्या मानवाची स्थिती स्थिर अन् शांत असते. शांततेने, स्थिरतेने तो सताला पदोपदी प्रणव देत असतो, " सता! जे आहे ते आपुले आहे. आपण मजला प्रदान केले आहे. कर्तव्यासाठी केले आहे. आपल्या कृपेने सर्वस्व स्थिती होत आहे. मी निमित्तमात्र आहे."

परंतु अशी स्थिती मानवाजवळ होत नाही. तो म्हणतो आहे हे सर्वस्व माझे आहे.

परमेशाने मानवास देह प्रदान केला आहे. त्या देहाची उपयुक्तता मानवाने यथायोग्य स्थितीने केली पाहिजे. यथायोग्य स्थितीने केली नाही तर त्रासयुक्त स्थिती होते. परमेशाने या भूमंडलावर परिपूर्ण निसर्ग स्थिती करून ठेवली आहे. अन् या परिपूर्ण निसर्गात मानवाची निर्मिती आहे. मग त्या निसर्गाशी मानवाने संधान ठेविले पाहिजे. पण मानव निसर्गा विरूद्ध वागतो. मानवाची अशी स्थिती अहंकारामुळे होते.

लक्षात घ्या, अहंकाराने मानव नाशाप्रत जातो. आपणास सत् सान्निध्य हवे असेल, सत् आपणात वास करून रहावयास हवे असेल तर आपण विषयाचा नाश केला पाहिजे. विषयापासून परावृत्त झाले पाहिजे. पण मानवाची परावृत्त स्थिती होत नाही. "मी" पणा असल्यामुळे अशी स्थिती होत असते.

परमेश सर्वाभूती सम आहे. परंतु मानव त्याची जाण घेत नाही. ज्या मानवाला सताने सर्वस्व प्रदान केले आहे त्याची  जाण मानव घेत नाही. परंतु मायेची, विषयाची जाण मानवाला पूर्णत्व असते. अन् त्या विषयात रंगून गेल्यानंतर मानवाला त्रासयुक्त स्थिती होते. तद्नंतर मानव परमेश्वराला शरण जातो.

सताने स्थूलात असताना आपणा सर्वस्वांना परिपूर्ण जाण दिधलेली आहे. सताला सर्वस्व सम आहे. सत् सर्वस्व ठिकाणी एकाच दृष्टीने पहात असते. सेवेक-यांनी देखिल अशीच स्थिती करावयास हवी.

या अहंमतेमुळे तुम्ही सताला पाहू शकणार नाही. परंतु संयमतेने एकाग्र व्हाल तरच तुम्हांस सताची जाण घेता येईल. आपणा पासून सत् दूर नाही.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

बुधवार, ११ जुलै, २०१८

अंतरंगी रंगुनी जावे ....... 4

अंतरंगी रंगुनी जावे .......
त्या परब्रम्हाच्या गतीच्या अंशाने, आत्मबिंदूच्या गतीने, स्वयंम् प्रकाशाच्या सहाय्याने सर्वस्व अनुभवता येईल ही माझ्या सत चरणांची कृपा आहे. पण अंतरंगातील तरंग अशा त-हेचे असतील तर ! मायेच्या तरंगाने वाटचाल केलीत तर कदापी अंत देणार नाहीत. म्हणूनच म्हटले आहे, "तुझे आहे तुजपाशी, खरोखरीच तू जागा चुकलाशी".

तुमचे तुमच्यातच आहे. अविनाशी आत्मा हेच परमनिधान तत्त्व. अंतरंगातील अविनाशी आत्म्याप्रत गेले पाहिजे तरच सत् म्हणते मी तुझ्या वेगळा नाही अन तू माझ्या वेगळा नाही . सर्वस्व आपण एकच आहोत !

मायेच्या चाकोरीत गेले की तरंग बदलतात. मग अहंकार येतो अनेक उपाधी तयार होतात. मग परत स्थिर होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. अंतरंगाचे तरंग अन तरंगात रंगले मग वेगळे कांही नाही.

हे सर्व रंगण्यासाठी आवश्यकता कोणाची असते? तर नामस्मरणाची. नामाच्या पलीकडे साधन नाही. नाम हेच सर्वस्वाचे निधान आहे. अन नामाच्या सहाय्यानेच आपल्याला तिथपर्यंत गेले पाहिजे.

टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

अंतरंगी रंगुनी जावे ।। 3

माया येथे सद्गुरुच सांभाळतात शेवटी. अंतकळीचा बा पांडुरंग म्हटले आहे ते खरे आहे. अंतकाळी ते धाव घेणारच,  तुमचे संरक्षण करणारच, तुम्हाला सानिध्यात घेणारच, पण सतशुद्ध असेल तरच !  अशुद्ध असेल तर कसे घेतील?

म्हणून अंतरंगाच्या तरंगाला जर वाटले की ज्योत तशा तऱ्हेची आहे मग तळमळीने सांगतात, आता या ज्योतीला पुन्हा जन्म नको. आपल्या येथील योगिनींच्या बाबतीत आम्हीच गुरुदेवांना सांगितले की आता तीला पुन्हा जन्म नको. भोग भोगले ते बस झाले. परंतु आम्ही तुम्हाला एकच सांगतो स्थूल सुटले की या ज्योतीला आपण आपल्या गुरुकुलात घेऊन  चला. पुन्हा जन्म नको.  पण पुन्हा या तरंगाच्या तरंगानी मायेत खेचता उपयोगाचे नाही.

तरंग हे सतमय असले पाहिजेत त्यात जरा सुद्धा किल्मिष असता कामा नये. अंतरंगातले तरंग कसे पाहिजेत? तर सतमय, सद्गुरुंच्या ठिकाणी असले पाहिजेत. नुसती दृष्टी फिरली की सद्गुरू मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे.

माझ्या समोरच सत आहेत हे पाहिल्या नंतर मनाची ठेवण इकडे तिकडे होणे शक्य नाही. सत हे सतच राहणार, स्थिर राहणार, तेच शांत तेच गतिमान.

शुभ्र प्रकाशात, वर्तुळात, बिंदूत पाठवितात. ज्योत बिंदूच्या आत जाऊन समाधिस्त होते, आपल्याच अंतरंगातून आपल्याला ध्वनी मिळतो. असे करत करत ज्योत अनंतांच्या सानिध्यात जाते. सानिध्यात घेणे ही त्यांचीच कृपा आहे.

पण केव्हा घेतील? अंतरंगात तरंग तन्मय होतील तेव्हाच ते आपल्याला जवळ घेतील अन्यथा  घेणार नाहीत.
तात्पर्य काय हा विषय साधा नाही ज्ञानाचा विषय आहे. सतमय गतीने वाटचाल करताना इतकी धन्यता वाटेल, जाणीव मिळेल, अन लिनतेने उद्गार निघतील किती भाग्यवान आहे मी! आज मी प्रत्यक्ष परब्रम्ह गती पाहतोय, अनुभवतोय. क्रमशः

संसार.....*श्री गुरुदेव पितामह*

*श्री गुरुदेव पितामह*

लक्षात घ्या संसारातच अर्थ आहे, संसारातच ज्ञान आहे अन त्या ज्ञानातच परमार्थ आहे.

सताने मानवी स्थितीप्रमाणे संसाराचा अर्थ आपणांस सांगितला आहे.

*"सगुणाचे सार येणे संसार".* संसार केल्याविना तुम्हास अर्थ कळणार नाही. अर्थात "संसाराचा अर्थ घेतल्याविना तुम्हाला परमार्थ कळणार नाही."

मानव सताचे भाष्य ग्रहण करीत नाही म्हणून त्यास ज्ञान ग्रहण करण्यास अवधी लागतों. सत मुखातून आलेले प्रणव आपण ग्रहण केले पाहिजे.

लक्षात घ्या सत मुखातून कर्तव्यासाठी प्रणव फेकले जातात. आम्ही जे आपणास ज्ञानार्जन केले ते आपुल्या मतीत, आपुल्या मनन स्थितीत येणे आपुल्या बुद्धिमत्तेत येत आहे ना?

आपणास कल्पना आहे, बाकी राहिल्याविना मानवाची पूर्णत्वता होणार नाही. बाकी नसेल तर तो मानव परमार्थाप्रत पोहोचेल, अन बाकी असेल तरच  तो सताची भक्ति करेल.

आम्ही दिलेल्या प्रणवांची आपण मनन स्थिती करावी जेणे करुन आपले आचरणही पूर्णत्व शुद्धत्व होईल. आचरण शुद्धत्व झाल्यानंतर कर्तव्याची दिशा उजळून निघेल. मानवाने परीपूर्ण स्थितीने कर्तव्यता करणे.

लक्षात घ्या मानवाकडून चुका झाल्याविना त्याला सत क्षमा करणार नाही. अन सताकडून क्षमा झाल्याविना ज्ञान मिळणार नाही. परंतु पुन:श्च  चुका करणे नाही. कल्पनेत स्थिती आल्यानंतर ती कृतीत आणली पाहिजे. मानवाला चुकीची कल्पना आल्यानंतर त्याने पुन:श्च चुक करणे नाही.

शनिवार, ७ जुलै, २०१८

अतरंगी रंगुनी जावे । (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

महेश हे तत्व सतमय होते. अन्यथा काही ओळखणे नाही अशा तर्हेने महेश होते. तसा भक्त सुद्धा त्या गतीने गेला, दुसरे कांही ओळखणे नाही, तरंगात रंगला तर तो सुद्धा अंतरंगात रंगून जातो.

अंतरंगाला सुद्धा रंग नाना आहेत. पण आपल्या सात्विकतेचा रंग कसा असणार? तर शुभ्र वलय! बाकी रंग आहेत. पितवर्ण आहे, निलवर्ण आहे, परंतु आपल्याला रंग कोणता पाहायचा असतो? शुभ्र  वर्ण !

शुभ्र वर्ण म्हणजे स्वयंम प्रकाशाचा वर्ण. तो सताचा वर्ण. त्याची झाक कोणती आहे? सताची आहे.  सतावेगळे ते नाही मग अशा अंतरंगात जर लयबद्ध झालात, तरळलात तर तुमच्या अंतरंगात चैतन्य प्रगट होईल अन त्या ठिकाणी सत स्थिर राहील अन तुम्हीं त्या दर्शनात स्थिर रहाल, लय व्हाल ! कसल्याही प्रकारची भ्रांती रहाणार नाही.

पण हे होण्यासाठी या उच्च पायरीप्रत जाण्यासाठी प्रथम पायरी कोणती? तर नाम! प्रथम पायरी कोणती? तर नामस्मरण.

"अखंड नाम" त्याला त्रिपदा गायत्री म्हणतात. तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग भरलेले आहे अन भरूनही अलिप्त आहे असे परमनिधान तत्व ते नाम, जे सद्गुरू आसनावरून प्राप्त झालेले आहे. त्या नामस्मरणात राहिलेच पाहिजे , चॊविस तासातून थोडा का अवधी मिळेना नामस्मरण हे केलेच पाहिजे. थोडी तरी ध्यानधारणा, अभ्यास केलाच पाहिजे त्याला भक्तिमार्ग म्हणतात .

अतरंगी रंगुनी जावे । (सद्गुरू स्वामी भगवान महाराज )
क्रमशः

गुरुवार, ५ जुलै, २०१८

अंतरंगी रंगुनी जावे ।

अंतरंगी रंगुनी जावे । नेत्र भरुनी चरण पहावे ।।
31 जुलै 1986
(परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींची अमृतवाणी)

नेत्रात रंगुनी जावे म्हणजे काय ? नेत्र म्हणजेच ज्योत. कशाने कोणत्या गतीने रंगुनी जावे ? कोणत्या पद्धतीने रंगुनी जावे ?

कारण हे नेत्र म्हणजे दृष्टी, डोळे, ज्याला आम्ही त्रिकुटी म्हणतो. डोळे, कान, अन वाणी ही मिळून त्रिकुटी आहे. याच्यावर जो ताबा मिळवेल तो सर्वरहीत स्थिर होऊ शकेल. त्याचे नेत्र सर्वरहीत स्थिर होऊ शकतील. नेत्र हे चंचल असतात. ते स्थिर आहेत कां ? एका दृष्टीक्षेपात तो अनंत तऱ्हा पहात असतो . अन तसे त्याचे विचारही निर्माण होत असतात.

आता ही दृष्टी म्हणजे ते नेत्र. त्यात रंगुनी जावे म्हणजे काय ? जी सतभक्तीने आचरण करणारी ज्योत आहे, सताशिवाय दुसरे नेणे नाही, जाणे नाही, अशी ज्योत असेल त्याच्या नेत्र बिंदूजवळ नेहमी सतचरणच तरळत असतात. दुसरे कांही तरळणार नाही. तो पाहताना सदगुरु दर्शनातच लय असणार , त्याचे तरंग कसे असणार तर सतमय असणार. आता नेत्रात सतमय तरंग असले तर त्या तरंगात तो लय बद्ध होतो, त्यातच तो रंगून जातो हा या श्लोकाचा भावार्थ आहे. त्याला सतमय गती प्राप्त होते अन त्यातच तो रंगून जातो. अशा त्या गतीमध्ये तो भक्त, जो सतभक्त असेल तो.

सतभक्त कोणाला म्हणावे, त्याची व्याख्या काय? जो सताशिवाय दुसरे अन्यथा ओळखणे नाही, जाणणे नाही, पाहणे नाही, सत हेच माझे सर्वस्व निधान, सताप्रत भक्तीच्या गतीने जाणारी ज्योत असणार, सताशिवाय वेगळे पाहणे नाही अशी जी ज्योत असेल, ती ज्योत मग ती स्त्री असो वा पुरुष असो, प्रकृतीने जरी भिन्न तरी सगळ्यांना अधिकार समत्व आहे. त्या गतीने ती ज्योत सतचरणावर ध्यानयुक्त तऱ्हेने म्हणजे ध्यान कुठे तर मनाने अन पाहणे कुठे असते तर अंतःर्दृष्टीने, बहिर्दृष्टी रंगली, सतमय बनली, सतचरणावर स्थिर झाली मग अंतरंग देखील तसेच होणार, अंतःर्मन कसे होणार?

यस्य स्मरण मात्रेन । ज्ञानमुत्पध्यते स्वयंम ।
स एवं सर्व संपत्ती तस्मै श्री गुरवे  नमः ।।

महेश अंबेला सांगत आहेत माझे गुरू कसे आहेत की ज्यांचे स्मरण केले , ज्यांची आठवण केली, ज्यांचे ध्यान केले तरी लगेच तरळतात, लगेच प्रगट होतात आणि ते मला जाणीव देतात, दर्शन देतात असे जे महान पद त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो . क्रमशः
🙏🙏🙏🙏
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

मंगळवार, ३ जुलै, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 5

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

(परम् पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)

माझी कन्यका अहिल्या! पतीशापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? अशी स्थिती असताना आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होतीच ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हांसही सर्वस्वाची जाण होती.  पण मानवांना कल्पनेत यावयास हवे म्हणून किती अवधी त्याच स्थितीत स्थित होती.

भगवंताने स्थूल रुप धारण करून, तुम्हा मानवांना स्थुलरुप मिळाल्यानंतर कशी स्थित्यंतरे येतात त्याची स्वयंम आपणांस जाणही दिधली आहे. तरीही मानव विसरतो.

सुख आले तर मानव तास, मिनिष, महिना, वर्षे याची गणती करत नाही, परंतु दु:ख आले तर मानव क्षणापासून सुरवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत? सताचे सेवेकरी आहोत.

कालानुसार, भोगत्वानुसार सुखदुःखे ही येणारच! पण जी सताची दृष्टी तुम्हाप्रत आहे ती कृपादृष्टी ह्या सर्वस्व स्थितीतून तुम्हास मुक्त करणार का नाही?

मानवास थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर मानव चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.

आपण जाणताच स्वयंम सत स्थुलाने अपुल्या स्थितीत होते ना! आपण सर्वस्वानी त्याची जाण घेतली का नाही? तरीही सताने अशी प्रणवाकृत स्थिती केली.

अपुले कर्तव्य आहे, सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. पण हतबल होणे नाही. तुम्ही सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लीनता ही ठेवलीच पाहिजे.

अवधितच आपण मजला माझ्या योगीनीचे प्रणव प्रस्थापित केलेत. मी योगीनीला सोडून आहे की योगीनी मजला सोडून आहे! सत तीजला सोडून आहे की ती सताला सोडून आहे! तीच्या सर्वस्व सुखदु:खाची जाण आम्हाला आहेच!

निवेदन देणे हे आपुले कर्तव्यच आहे. आपण सर्वस्व भक्त या भगवंताचे आहात, या सताचे आहात. ह्या सताला सर्वस्वांच्या सुखदुःखाची जाण आहे का नाही?

भगवंत भक्ताप्रत कधी लय होत असतो? भक्ताप्रत संयमता आहे, लीनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण परीपूर्ण श्रध्दा ? श्रध्दा येणे दृढनिश्चय! येणेच नि:स्सीम प्रेम! जर भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होतात ना? अन मानवी स्थितीत सताने तुम्हास याची कल्पना पूर्णत्वाने दिधलेली आहे ना! जिथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील. कशामुळे? श्रध्देमुळे, लीनतेमुळे, नम्रतेमुळे, संयमतेमुळे ! म्हणून भगवंत भक्ताप्रत लय रहाण्यासाठी हे सर्वस्व गुण भक्तामध्ये हवेत. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. *" आपणास कल्पना आहे विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते"*
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले

सोमवार, २ जुलै, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 4

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

प्रथम मानव, त्याला ईष तत्वाची जाण मिळाल्यानंतर तो मनुष्य, अन त्याचा उपदेश पूर्णत्व ग्रहण केल्यानंतर नंतर योगी!

मानवाला सताने ज्ञानही दिधले, अन भक्तिही दिधली. *"ज्ञानाविना भक्तिही शून्य अन भक्तिविना ज्ञानही शून्य"*

आपुले मन सतचरणावर लीन झाल्यानंतर भक्ति होते. सदगुरु चरणांजवळ आल्यानंतर ज्ञानही प्राप्त होते अन भक्तिही प्राप्त होते. परंतु ते मानवाने कसे ग्राह्य करायचे असते?

मनात जर पूर्णत्वाने सत् भक्ति असेल तर बौद्धिक स्थिती विशाल होईल. बौद्धिक स्थिती विशाल झाल्यानंतर ज्ञानही विशालच होईल. तरच त्याला ज्ञानाचा अन भक्तीचा प्रत्यय येईल. आपण स्थित रहावयाचे, सतशुध्द रहावयाचे, मन सतशुध्द करावयाचे, नम्र रहावयाचे, प्रणव लीनतेने द्यावयाचे तरच गती गतीने तुमच्या ज्ञानात, भक्तित पूर्णत्वाने वाढ होईल.

भक्त भगवंताप्रत का येत असतो? भक्तिसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी तो सतचरणाप्रत येत असतो का? येणे भक्त भगवंताप्रत येतो, तो सुख, दु:ख सांगण्यासाठी. कलीयुगी स्थितीप्रमाणे, आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत जात होता तो ज्ञानासाठी. परमेशाला पूर्णत्व पहाण्यासाठी!

परंतु या कलीयुगी स्थितीत कशी स्थिती होते?
तर आपली सुख दु:ख  सताने येणे भगवंताने ग्राह्य करून सुखशांती दिधली पाहिजे.

अन जर का भगवंताकडून अशी स्थिती झाली नाही तर मग भक्त चंचल होईल. भगवंताने आपली सुख दु:खे ग्राह्य केली नाहीत तर आपली सर्वस्वांची स्थिती चंचल होते. चलबिचल होते.

मग तो मानव असो, सेवेकरी असो, तो कसा प्रणव देईल? आम्ही आपल्या चरणांवर शरण आलो आहोत यातून मजला सोडवा.

आपण प्रणव दिधलें भक्त भक्तिसाठी सताप्रत येत असतो, अन तोच भक्त पुन:श्च प्रणव कसे देतो?

आपणा सर्वस्वांच्या ज्ञानात अधिकाधिक तेजोमय स्थिती होण्यासाठीच हे प्रणव दिधलें आहेत.

भक्ताचे प्रणव ग्राह्य करणे हे भगवंताचे कर्तव्यच आहे. अन भक्ताने भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचेही कर्तव्य आहे.

परंतु हे आपणास असे प्रणव प्रस्थापित का केले? इतुके ज्ञान आपणाप्रत असताना आपणाकडून प्रणवांची स्थिती का होऊ नये?

भगवंताने स्थुलरुप धारण करून सुखदु:खे भोगली का नाही? त्या अवधीत भगवंत कसे होते? स्थिर, शांत, संयमी होते. पण तोच भक्त थोडीसी दुर्मिळ स्थिती झाली तर कसा होतो? चलबिचल होतो. अवधितच स्थितीही प्रगट करतो.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शनिवार, ३० जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 3

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*"लाघव"*
सत स्थुलात असताना आपणा सर्वाना प्रणव द्यायचे,"हे पहा तू जर चुकीच्या स्थितीने गेलास तर तुला "लाघव" होईल."

मानवी स्थितीप्रमाणे मोहमाया अंध:काराच्या स्थितीत मानव लाघवी स्थितीला पात्र व्हायचा.

सत पदोपदी प्रणव द्यावयाचे, परंतु लाघव झाल्यानंतर तोच सेवेकरी सद्गुरू माऊलीजवळ नतमस्तक होऊन लीनतेने प्रणव द्यावयाचा, "सता!मला या त्रासयुक्त स्थितीतून मुक्त करा." म्हणजेच सताजवळ क्षमा मागणे. तदनंतर सत आपणास पूर्णत्वाने प्रणव द्यावयाचे,"पुन:श्च अशी स्थिती होणे नाही. पुन:श्च अशी स्थिती झाली तर लाघव स्थिती मानवाला पूर्णत्व होईल."

अशी स्थिती, स्थित्यंतरे होऊन गेली तरी सताने तुम्हास पूर्णत्वाने ठेवली आहे ना ? कारण कलीयुगी स्थितीत इतरत्र भ्रमणता होऊ नये, परंतु तरी देखील आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडतात ना?

म्हणूनच मी आपणास आदेशात्मक स्थिती केली. आपण सताचे सेवेकरी आहात सताचा सेवेकरी कसा असला पाहिजे? सतशुध्द पाहिजे, लीन पाहिजे, नम्र पाहिजे.

सत स्थुलात असताना प्रणव द्यावयाचे,"माझे सेवेकरी आहेत, कलीयुगी स्थितीतून मजप्रत आलेले आहेत. सता! मी पूर्णत्वाने त्यांना मजप्रत घेतले आहे. आपणही त्या ज्योतीची पूर्णत्व स्वीकृती करणें".

ते प्रणव आपण सर्वस्वानी ग्रहण केले आहेत. अशी स्थिती असताना मानवी स्थितीप्रमाणे अहमता (अहंकार) आपणाप्रत येत असते? ज्या सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली, अन जाण दिधली असताना, कृतीमान झाली असताना आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडणे यथायोग्य नाही.

जोपर्यंत सत आपणास समजाऊन घेत नाही तोपर्यंत मानवाला क्षमा होईल का? नाही होणार! सताने आपणास समजावून घेण्यासाठी आपण लीनता, नम्रता, संयमता ठेवलीच पाहिजे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शुक्रवार, २९ जून, २०१८

संसार करून परमार्थ साधा !

परम् पूज्य श्री सद्गुरूस्वामी भगवान महाराज म्हणतात, "आपणाला प्रपंच करावयाचा नाही, तर आपल्याला काय करावयाचा आहे? "संसार".

प्रपंच ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर - प्र म्हणजे प + र म्हणजेच "पर" (इतर) आणि पंच म्हणजे "पंचाईत". याचाच अर्थ साध्या शब्दात सांगायचा म्हणजे परक्याची पंचाईत म्हणजे उठाठेव न करणे. इतरांच्या बाबतीत लक्ष न घालने. स्वतः स्वतःची उन्नती करून घेणे. (पारमार्थिक अर्थाने)

या प्रपंच शब्दाचे इतरही अनेक अर्थ होतात व ते सुद्धा पर म्हणजेच इतरांच्या बाबतीतच असतात. म्हणून भक्ताला काय केले पाहिजे तर "संसार".

आता संसार या शब्दाचा अर्थ पाहू. "संसार" येणे "सगुणाचा सार" येणे आपण मानव देहाने आहोत म्हणजेच सगुण आहोत. आणि सार येणे  मानव देहाचे कर्तव्य कर्म. ते आपण कसे केले पाहिजे ? तर ते सतमय मार्गाने करावयास हवे.

आपणास निर्गुणाप्रत म्हणजेच आपल्या सद्गुरूंप्रत जावयाचे आहे. ते कसे शक्य होईल? तर ते सतमय मार्गाने, मनोभावे सद्गुरूंची सेवा तिन्ही अंगाने येणे तन, मन, धनाने केल्यासच ते शक्य होईल. यासाठीच सद्गुरू माऊली म्हणतात, "संसार करून परमार्थ साधा". संसार केल्यानेच परमार्थ साधता येईल, अन्यथा नाही. प्रपंच करून परमार्थ साधता येणार नाही.

*ईश्वर म्हणे वो देवी |* 2

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम् पूज्य गुरुदेव पितामह यांची अमृतवाणी)*

*"क्षमा"* आणि ती केव्हा अन कधी होते? क्षमेची याचना केव्हा होते? मानवाकडून चुका झाल्यानंतर मानव सताप्रत क्षमेची याचना करतो, अन सत ते मान्य करते. सताने मान्य केल्यावर मानव कसा होतो? तृप्त होतो. मानवाची मनोमन कल्पना कोणती होते? माझ्या सताने मला क्षमा केली आहे. परंतु क्षमा झाली असे आपणास पूर्णत्व कल्पना येते का? सद्गुरू मुखातून प्रणव निघाल्यानंतर पूर्णत्वाने येते.

सद्गुरू मुखातून सतशुध्दच प्रणव बाह्य स्थितीत पडत असतात.

क्षमा येणे सामाऊन घेणे स्थिती नाही तर समजाऊन घेणे स्थिती आहे. आपणास प्रत्यय येतो सताने क्षमा केली. आपण मनोमन प्रफुल्लमय होता. आपल्या चुकांची क्षमा झाली आहे. परंतु त्या सतमाउलीने आपणास समजाऊन घेतले म्हणूनच तुम्हास क्षमेची स्थिती झाली ना? नाहीतर मानवांची कोणती स्थिती होते?

द्विधा ही आगळी वेगळी स्थिती आहे, क्षमा ही आगळी वेगळी स्थिती आहे. सताने आपणास समजावून घेतले येणे प्रणवाकृत करून, सतशुध्द करून आपल्याप्रत घेतले नाही का ?

आपणास कल्पना आहे, सद्गुरु येणे माउली एकलय झाली ना ? अन एकलय झाल्यानंतर तो योगी, तो मानव, तो मनुष्य, तो जीवात्मा सतशुध्द होतो. पूर्णत्व लीन अन नम्र अशी जेव्हा जीवात्म्याची स्थिती होते तेव्हाच सत त्यास क्षमा करते येणे समजाऊन घेते.

बुधवार, २७ जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |*

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)*


महेश अंबेला प्रणव देत आहेत, जो कोणी प्रश्न मला केला नाही तो प्रश्न तू मजला केला आहेस, अन त्याचे उत्तर मजला तुजला द्यायचे आहे.

अवधिपूर्वी मी आपणास कोणते प्रणव प्रस्थापित केले होते? लिनता, नम्रता, संयमता मानवाने सतत आपणाप्रत घेतली पाहिजे. तरच  मानवाची या कलीयुगी स्थितीत प्रगतिमय स्थिती होईल. अहंमतेने होईल का? नाही.

सत आपणास ज्या अवधीत सानिध्यात घेते त्याअवधीत प्रथम काय करते? प्रथम आपुली भूमी येणे आपले शरीर शुद्ध करीते. भूमी शुद्ध करीते येणे कोणती स्थिती तर मन शुद्ध करीते. भूमीतच मन आहे ना? भूमी शुद्ध केल्यानंतर मन शुद्ध होणारच! अर्थातच सत आपणास सानिध्यात घेण्याच्या प्रथम आपली भूमी शुद्ध करीते, येणे आपणात जी अहंमता आहे ती नाश करण्याची स्थिती करीते. अहंमता गेल्याविणा शुद्धत्वता येणार नाही, मन स्थिर होणार नाही. अन तदनंतर आपणात ज्ञानबीज पेरते.

ज्ञानबीज म्हणजे काय? तर सत आपली भूमी सतशुध्द करून, आपली शारीरिक स्थिती सतशुध्द  करून आपणाप्रत घेते अन आपणाप्रत घेऊन ज्ञानयुक्त प्रणव अर्थात उपदेश आपणास प्रस्थापित करीत असते.

उपदेशात्मक स्थिती याने ज्ञानाचे बीज! जर आपण सताचे प्रणव पूर्णत्व ग्राह्य करून कर्तव्यत: साधली असती तर आपणाकडून स्थित्यंतरे झाली असती का? येणे सताने जे ज्ञानबीज आपणात पेरले ते आपण विसरलात. कशामुळे? अहंमतेमुळे! अहंमता आल्यानंतर ही सर्वस्वी स्थिती होत असते. अन्यथा अशी स्थिती होणार नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

मंगळवार, २६ जून, २०१८

मन......!!!

मन हा असा वारू आहे , सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्या वरवरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?

मनाच्यावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही, केले नाही, करविता नाही हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचिर्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.

जो गुरू ब्रम्हउपदेशक आहे, सात्विक तत्व आहे, अविनाशी परम तत्वाची जाणीव देण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, त्या परमपदाप्रत स्थिर करण्याची पात्रता ज्याची आहे असाच गुरू हवा.

गुरुतत्व अर्थात असा गुरू अहंकारी असता कामा नये. अशाच गुरूला शरण जा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वाटचाल करा. अन ती केलीच पाहिजे. मग ते गुरू स्वत: तुम्हाला सुखी करतात, शांती देतात.

मानवाच्या मनाची ओढण त्या गुरुउपदेशाप्रमाणे असायला हवी. मग ते सांगतात मी तुझ्यातच वास करून आहे.

परब्रम्ह हे त्रिगुणावेगळे आहेच आहे परंतु त्यातच ते सामावलेले देखील आहे. त्रिगुण रहित ते परब्रम्ह आहे. याचे सार म्हणजे लिनत्व असेल तरच मेख सापडेल, अन्यथा सापडणे शक्य नाही. आपला अंत कळू देणार नाहीत कारण अनंत लाघवी शक्ती आहे.
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)
टायपिंग असिस्ट: श्री रविंद्र वेदपाठक

सोमवार, २५ जून, २०१८

*कवणे मार्गे जी स्वामी |* 2

*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

सदगुरूनी सेवेकऱ्याच्या मनावर ताबा मिळवल्यानंतर सेवेकऱ्याचे मन कसे राहिले पाहिजे तर सतशुध्द राहिले पाहिजे. परंतु तसे रहात नाही.

सत्य अन असत्य ही स्थिती मन चंचल झाल्यावर होत असते. म्हणून सर्वात प्रथम सेवेकऱ्याने सद्गुरुमय झाले पाहिजे. सेवेकरी सद्गुरुमय झाला नाही तर तो ज्ञानाचा आस्वाद कसा घेऊ शकणार? याकरीता सेवेकऱ्याने सद्गुरुमय व्हायला पाहिजे. मानवाचे मन सदगुरुमय झाले तर मानवामध्ये शंका, कुशंका, चंचलता, सत्य, असत्य राहील का?

ज्ञानार्जनाची आवड आहे परंतु मन चंचल आहे, कशासाठी आपले मन चंचल आहे? आपण सत स्थानात आहात ना? मग मनामध्ये चंचलता का येते? ती न येण्यासाठी प्रथम मानवी स्थितीप्रमाणे मन सदगुरुमय करणे.

आपणास या भवसागरातून तरुण जायचे आहे, वाहून जायचे नाही. आपणा सर्वस्वाना सताचे सानिध्य घेऊन, ज्ञानार्जन करून सत स्थितीत स्थिर केले आहे. परंतु कलीयुगी स्थितीप्रमाणे आपुल्या मनाची स्थिती स्थिर शांत रहात नाही.

सदगुरु स्थानात प्रयाण झाल्यानंतर ज्योत सदगुरुमय होते. परंतु स्थानातून बाहेर पडल्यानंतर तीच ज्योत संशयातीत होते. सताचे स्थानातील ज्योतीने स्थुल त्यागीले आहे परंतु कर्तव्य त्यागीले आहे का तर नाही.

सत आपणास पदोपदी प्रणव देत होते आपणा सर्वस्वांचे कर्तव्य पाहून मी आनंदीमय आहे. परंतु अशी स्थित्यंतरे निर्माण झाल्यानंतर सताकडून आपण कोणते प्रणव घेणार आहात? ज्ञानाची स्थिती ग्रहण करावयाची असेल तर ते ज्ञान ग्रहणतेत येईल.

प्रथम मन सदगुरुमय करा, शीतल, शांत, द्वेषरहीत करा, शंकारहीत व्हां. स्थुल अनेक आहेत परंतु जडविता, घडविता एकच आहे. सताने स्थुलात आपणास ज्ञानमय प्रणव प्रस्थापित केले ते पूर्णत्व ग्रहण करा. ते पूर्णत्वाने मनन करा .

आपण सताचे सेवेकरी आहात. अन सत स्थितीत अशी स्थित्यंतरे होणे यथायोग्य नाही. सताने किती अवधी आपणास ज्ञानोपदेश केला. अन तो ज्ञानोपदेश आपण सर्वस्वानी पूर्णत्व ग्रहण केला असता, मननतेत पूर्णत्व घेतला असता तर अशी स्थित्यंतरे घडली नसती. सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली आहे. अन अशा सताचे तुम्ही सेवेकरी आहात. अशी स्थित्यंतरे घडल्यनंतर सतानाही दु:ख होईल. ज्ञानोपदेश करणे आमचे कर्तव्यच आहे. ज्ञानोपदेश हा कलीयुगी स्थितीतून मानवाची मुक्तता करण्यासाठी आहे. मुक्त होण्याकरिताच सताने सर्वस्व स्थिती केलेली आहे. परंतु आपण मानव त्याची जाण घेत नाही, कल्पना घेत नाही, अन आचरणात पूर्णत्व स्थितीने आणतही नाही.

सत प्रणवाकरीता आम्ही देखील कर्तव्य करत आहोतच ना? तद्वत आपण सेवेकऱ्यानी देखील आपले कर्तव्य सोडावयाचे नाही. सताने आपणास आद्य कर्तव्य बहाल केले. अन ते आद्य कर्तव्य करीता करीता कोणते कर्तव्य दिधले आहे.

संयमता, लीनता ही ठेवलीच पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता नसेल तर तो सताचा सेवेकरी शोभून दिसणार नाही. या पूर्णत्व कलीयुगी स्थितीत तुम्हास आपणाप्रत घेतले आहे. शुध्दीकरण स्थितीचीही जाण दिधली आहे. या सर्वस्व जाणीवा ग्राह्यतेत असताना आपणाकडून घडणारी स्थित्यंतरे यथायोग्य नाहीत. *"लीनता, नम्रता, संयमता सर्वस्व पूर्णत्वाने आचरणात आणली पाहिजे."* आपणाकडून हे घडल्यानंतर, ग्राह्य झाल्यानंतर ज्ञानयुक्त प्रणव मी प्रस्थापित करीन. जर ही तीन गुण आपणाप्रत नसतील तर ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही.
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले.

शुक्रवार, २२ जून, २०१८

*कवणे मार्गे जी स्वामी |*

*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

मानवाचे मन!
प्रथम मानव देह, देहानंतर आत्मा येणे जीवात्मा! जेंव्हा पंचमहाभूतांचा पुतळा देह होतो, उपलब्ध होतो तेव्हा जीवात्मा त्यात प्रवेश करतो.

देह, आत्मा येणे जीवात्मा, जीवात्म्याने देहात प्रवेश केल्यानंतर त्या जीवात्म्यापासून येणे आत्म्यापासून कोणती स्थिती निर्माण होते? आत्म्यापासून कोणती स्थिती तर मन. अन मनापासून बुद्धि .

आत्मा सतशुध्द परब्रम्हापासून प्राप्त झालेला आहे. अन त्यात आत्म्यापासून मनाची उपलब्धता. परंतु मन मानवाला कसे असते तर तारक असते, मारक नसून, साधक असते अन बोधकही असते.

मनापासून मानवाला बुद्धिची स्थिती प्राप्त होते. तीच बुध्दी सत स्थितीने गेली तर मानव परब्रम्हात जातो. परंतु तीच स्थिती अयोग्य स्थितीने गेली तर मानव सतापासून दूर जातो. बुध्दीमुळे कर्तव्य परायणता साधतो. बौद्धिक स्थिती नसेल तर मानव कर्तव्य परायणता साधु शकेल का? अन कर्तव्य परायण झाल्याविणा मानवाची स्थिती उपलब्ध होईल का?

तुमचा देह नुसता देहच आहे का? त्याला इंद्रिये आहेत. इंद्रियांची हालचाल झाल्याविना देह पूर्णत्व होईल का? नाही.

जी बौध्दिकता तुमच्याजवळ असते त्या बौध्दिकते नुसार इंद्रियांची कर्तव्यत: असते. बौध्दिक स्थिती सत स्थितीने गेली तर कर्तव्य सत स्थितीनेच होतील. परंतु तीच बौद्धिक स्थिती असत् स्थितीने जाईल तर इंद्रियांची कर्तव्यें देखिल असतच होतील.

मानवाला जे मन दिलेले आहे त्या मनावर कोण ताबा मिळवू शकेल? तर सद्गुरू! सदगुरुविना मानवाला शांत करणारे तत्व इतरत्र कोणीही होऊ शकत नाही. सदगुरु तत्वच मानवाच्या मनावर ताबा घेऊन त्याला स्थिर, शांत, भक्तियुक्त करु शकते.

सेवेकऱ्याला सदगुरु पूर्णत्व सानिध्यात घेतात, अन ज्ञानार्जनही करतात. त्यामुळे सेवेकरी सदगुरुमय होतो. प्रथम ज्योत सदगुरुमय झाली नाही तर ती सतमय कशी होऊ शकेल?

सताचा राजमार्ग सदगुरुच दाखवतात. येणे सदगुरु आणि सेवेकरी यांची मनन स्थिती एकलय होते. ही एकलयता साधली तरच मानवाचे मन स्थिर, शांत होऊ शकेल.

सदगुरु अन सेवेकरी यांचे नाते अतूट असतें. अन दोघांचीही स्थिती प्रेममय असते. यामुळे मनाची शुद्धत्वता होते. मन शांत होते. सेवेकऱ्याचे मन सदगुरु चरणाप्रत असेल तर ते तारक असते, बोधक असते. पण चंचल असेल अर्थात सदगुरु चरणांपासून दूर असेल तर ते मारक असते. अन त्यामुळे भक्ति म्हणजे काय हे मानवाला कळत नाही.

गुरुवार, २१ जून, २०१८

*जयजयादि परात्परा |*

*जयजयादि परात्परा |*
    *जगत्गुरू कर्पुरगौरा ||*
       *गुरुदीक्षा निर्विकारा |*
          *श्रीशंकरा मज देई ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*" परात्परा येणे कोणती स्थिती?
सर्वस्व स्थितीत विखरुनही पराच्याही पलीकडे असणारी स्थिती येणे अनंत स्थिती."*

पार्वतीचे प्रणव आहेत "सर्वस्व स्थितीत आपण सर्वश्रेष्ठ आहात." परंतु पार्वतीला कल्पना होती का?

पार्वती स्वयंभूना प्रणव प्रस्थापित करीत होती, आपणच सर्व जगात श्रेष्ट आहात अन आपणाकडून मजला गुरुदिक्षा अनुकरण करावयाचे आहे. स्वयंभूकडून गुरुदिक्षा स्विकारून ती काय करणार होती? कशाची उपलब्धता तिजला करून घ्यावयाची होती?

आपण सर्वस्व जाणता दिक्षेत सर्वस्व स्थिती आहे. एकदा का सदगुरूंचे अनुकरण केले तर शिष्याला सर्वस्व स्थिती अनुभूतीत येते. अन अनुभूतीत आल्यानंतर शिष्याचे कोणते कर्तव्य असते? येणे सेवेकऱ्याचे कोणते कर्तव्य असते? *"सतत नामस्मरण करणे", सतत नामस्मरण केल्यानंतर सेवेकऱ्याला काय प्राप्त होते? ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त होते येणे कोणती स्थिती? तर स्वयंप्रकाश प्राप्त होतो"* अन त्या स्वयंमतेत प्रकाशात सेवेकरी काय पहात असतो? तर आपल्या सताचे येणे सदगुरूंचे दर्शन घेत असतो. सदगुरु दर्शन कशामुळे प्राप्त होईल हीच या पार्वतीची इछा.

जीव आणि ब्रम्ह!
सेवेकरी जीवात्मा स्थितीत असतो. येणे आत्मा स्थितीत असतो, अन सदगुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा परब्रह्म स्थितीत एकात्म झाल्याखेरीज दर्शन स्थिती प्राप्त होईल का? नाही होणार. जीव परब्रम्हात लय व्हावयास हवा. तो जीव परब्रम्हात लय कसा होईल. कुणामुळे होईल तर सदगुरूंमुळे होईल. जे दिधलेले नाम आहे त्याच्यात सेवेकरी पूर्णत्व लय झाला पाहिजे.

तरच जीव परब्रम्हात लय होईल. जे नाम आपणाप्रत सताने प्रदान केले आहे ते नाम कशासाठी प्रदान केले आहे. ते सताला पाहण्यासाठी प्रदान केले आहे. जीवात्मा तुमच्या शरीरयष्टीत स्थांबत असतो, तर भवसागरात तुम्हास कोण फिरवित असते? मन! अन त्या मनाला स्थिर शांत कोण करीते? तर नाम! जेव्हा सेवेकरी नाममय होतो तेंव्हाच मन स्थिर होते. मन स्थिर झाल्यानंतर आत्मा स्वयंप्रकाशित होतो. स्वयंप्रकाशित झाल्यानंतर त्या आत्म्याचे संधान परब्रम्हाशी होते. म्हणून मानवाने सताचे नामस्मरण केले पाहिजे. हीच स्थिती पार्वतीला जाणून घ्यायची आहे. स्वयंभू तत्व कसे होते तर आपल्या सताशी एकात्म होते.

गुरुवार, १४ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |* 2

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तूं  निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तूं स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

गुरुगीता कोणी कोणाला प्रणवाकृत केली आहे, तर महेशाने अंबेला प्रणवाकृत केली आहे. या गुरुगीतेत सदगुरुपदाची महती दिधलेली आहे. गुरु अन सदगुरु यामध्ये काही स्थिती आहे ना?

आपण सर्वस्व सेवेकरी मानवी स्थितीत आहात. आपुले गुरू किती आहेत अन सद्गुरु किती आहेत? आई, वडील, विद्यार्जन करणारे ते गुरू, ज्ञानार्जन करणारे ते सद्गुरू! पण मानवाच्या स्थुल देहातच काही गुरू वास करून आहेत. याची मानवाला कल्पना आहे का? मानवी स्थितीप्रमाणे माता गुरू, पिता गुरू, विद्यार्जन करणारे गुरू पण ज्ञानार्जन करणारे ते सदगुरु! त्यांना गुरू म्हणता येईल का?

परंतु मानवी देहात जे पाच गुरू आहेत त्याची मानवाला कल्पना आहे का? आपणास पदोपदी प्रणव मननतेत बिंबवले पाहिजेत. तुमच्या स्थुल देहात जो राम आणि जे सत आहे, जे सद्गुरू आहेत ते तुम्हास पहाता आले पाहिजेत. सद्गुरूंनी स्थुलात असताना हे कर्तव्य केले, ते तुम्हांस सताचा अर्थात सद्गुरूंचा वास आपल्या देहात कसा आहे हे दाखविण्याचे कर्तव्य सदोदित करीत होते अर्थात तो त्यांचा अधिकार होता. मग आपल्या देहातील पाच गुरूंकडून अर्थातच या पंचमहाभूतांनाकडून आपण काय स्वीकृत केलेत.

पंचमहाभूतांपासून देह बनला पण देहापासून बुद्धि कदापीही नाही. ती बुध्दी आत्मस्थितीपासून प्राप्त होते. या पंचमहाभूतांपासून आपण एकच स्थिती प्राप्त करु शकता अन ती म्हणजे संयमन! संयमाने मानव पूर्णत्वाने ज्ञान ग्रहण करु शकतो. अन ज्ञान ग्रहण केल्यानंतर पुढील स्थिती प्राप्त होते.

ज्ञानार्जन मानवाला कोणापासून प्राप्त होते ? तर सद्गुरूंपासून ज्ञान मानवाला प्राप्त होते. जोपर्यंत सत, परब्रह्म, सद्गुरु मानवास जवळ घेत नाही, सर्वस्व स्थितीने शुद्धत्व करीत नाही तोपर्यंत मानव अज्ञानी असतो. ज्या अवधीत सद्गुरु सेवेकऱ्याला आपणाप्रत घेतील, आपले बहुमोल प्रणव प्रदान करतील, अन षडरिपूच्या वलयाने वेष्टीलेल्या मनाला शुद्धत्व करतील त्यावेळीच तो ज्ञानार्जन करु शकेल. अन हे सर्वस्व सद्गुरुविना कोणीही करु शकणार नाही.

मानवाची स्थिती चलबिचल का होते? कारण तो सद्गुरूंच्या प्रणवांचे मनन पूर्णत्वाने करत नाही. मानव संयमतेने, एकनिष्ठ श्रध्देने सद्गुरु चरणाप्रत लीन राहिला तर तो मानव सद्गुरूंपासून दूर जाणार नाही. परंतु मन अस्थिर झाले तर मात्र तो सद्गुरूंपासून दूर जातो. म्हणून मानवाने मन सदोदित सद्गुरु चरणाप्रत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मंगळवार, १२ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तू निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तू स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला वर्तवित आहेत, "ॐ" नमोजी येणे ॐकारा तुजला माझा पूर्णत्व नमस्कार असो.

कल्पदृम म्हणजे कल्पनाही करता येणार नाही असे! असे हे सदगुरु परब्रम्ह आहेत. आपण कल्पनाही करु शकणार नाही. परब्रम्हाची आपण कल्पना करु शकतो का? नाही. महेश आपल्या अंबेला प्रणव देत आहेत, *"हे अंबे, सदगुरु तत्व, परब्रह्म तत्व असे आहे कि त्याची आपण कल्पना करु शकणार नाही. अन अशा या ॐकाराना माझा पूर्णत्वाने नमस्कारअसों"*

आपणास याची कल्पना आहे, महेश तत्व असे आहे? भोळे अन तप्तही आहे, परंतु पूर्णत्व सदगुरुमय तत्व आहे.

महेशानी पूर्णत्वाने सताची, परब्रम्हाची, सदगुरूंची जाणीव घेतली होती. भोळे असूनही या भूतलाचे कर्तव्य करीत होते. अन अशा तत्वाने आपल्या अंबेला येणे पत्नीला पूर्णत्वाने प्रणव दिले, "प्रथम ॐ आहे अन त्यातून आमची आकारणी झाली आहे अशा या ॐकारमय स्थितीला, ॐकाराना आमची सदैव, सतत नमस्कार स्थिती आहे."

अशा या सदगुरु परब्रम्हाची आपण कल्पनाही करु शकणार नाही असे महेश आपल्या पत्नीला विवरण करून सांगत आहेत.

आपण जाणताच सदगुरु साकारमय स्थितीत असताना अन सताने येणे सदगुरूंनी पूर्णत्व प्रस्थापित केले असताना मानवाची स्थिती कशी होत असते? चलबिचल स्थिती होते ना!

सदगुरूंनी सांगितल्याप्रमाणे मानवाने अर्थातच सत सेवेकऱ्यांनी आचरण ठेवले पाहिजे. त्यांच्या अनुसंधनाने वाटचाल केली पाहिजे. अर्थातच सदगुरूंच्या प्रणवांची मननता केली पाहिजे.

आपणा सर्वस्व सत सेवेकऱ्याना मानवी स्थिती प्रमाणे ही गुरुगीता प्रणवाकृत केली होती. त्यावेळी सत स्वयम येणे सदगुरु स्थुलात होते. सदगुरूंनी अर्थातच सताने येणे साक्षात परब्रम्हाने स्थुल देह धारण केलेला होता. अन मानव येणे सत सेवेकरी देखील स्थुलातच होते, स्थुल देही होते. सदगुरूंना आपणास या गुरुगीतेची मानवी स्थिप्रमाणे कल्पना दिधली. सताने अर्थात स्थुलदेही सदगुरूंनी आपणास दिधलेले प्रणव आपल्या मननतेत राहिले नाहीत.