Sadguru Darbar - सद्गुरू दरबार Dedicated to my beloved Sadguru Param Pujya Shri Sadguru Swami Bhagwan Maharaj. माझे परम् पूजनीय श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांच्या चरणकमलावर सविनय सादर समर्पित.
भगवान महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
भगवान महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ४ एप्रिल, २०२१
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०
बुधवार, २२ जुलै, २०२०
गुरुवार, ९ जुलै, २०२०
मंगळवार, ७ जुलै, २०२०
मंगळवार, ९ जून, २०२०
प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
मौलिक ठेवा
🙏🙏🙏
बाबा म्हणतात, "ही माया सुखदुःखाच्या व्यापाराने चालत असते." मानवाला सुख आणि दुःखहि असतातच. अगोदर म्हटल्याप्रमाणे, मनासारखे झाले की त्याला तो सुख म्हणतो आणि मनाच्या विरोधात झाले तर दु:ख म्हणतो. हा सुख दुःखाचा खेळ म्हणजेच मायेचा व्यापार होय. मायेचे कर्तव्यच मुळी हा खेळ खेळत राहणे असते.
मानवाना आज कशाची अपेक्षा असते तर जे समोर असेल ते पाहिजे. देवाकडे गेला, संताकडे गेला, ऋषी-मुनींकडे गेला, देवळात गेला तरी मानव देवाकडे मागणी काय मागतो?
मानव मागणी एकच मागतो कि, भगवंता मला सुखच दे. माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. म्हणजेच ही माया तो मागत असतो.
पण हे सुख कसे आहे? तर क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, ते नश्वर आहे, अर्थात नाशिवंत आहे. ते आज आहे, तर उद्या नाही. ते कायमचे कुणाकडेही नसते. ते लाघवी, मायावी आहे.
म्हणूनच सद्गुरू माऊली पुढे विचारते, "याची जाणीव कोणी घेतली आहे का? सुख हे सदैव असते का? तर नाही.
सुखा पाठोपाठ दुःख हे आहेच. दुःख गेल्यानंतर सुख हे आहेच. मानवी जीवनात त्या समुद्रामध्ये जशी सुकती आणि भरती असते, तशीच सुख-दु:खाची सुकती आणि भरती ही चालूच असते.
हिच मायेची लाघवी तऱ्हा आहे. जिथे सुकती आहे, तिथे भरती आहे, अन् जिथे भरती आहे तिथे सुकतीही आहे. सर्वाभूती हे आहे परंतु तुम्हाला त्याचा अंत सापडणार नाही.
पण ही सुखती, भरती कशामुळे होते ते तुम्हाला कळायचे नाही. त्याला कोणीतरी कारण आहेच, पण ते कारण अदृष्य आहे. सुखदुःखाचे कारण आपण म्हणतो दृष्य आहे, पण ते देखील अदृष्यच आहे......(अनगड)......
प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी
*_गुरु गुह्य_*
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज अमृतवाणी)
_आपली श्री सद्गुरु माऊलीं गुरू गुह्य उघड करुन सांगताना म्हणते,_
*"गुरुदेव पितामहांसारखे परम् पूज्य तत्व, सप्त ऋषींचे प्रमुख, यज्ञ यागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्यापूढे लिन आहेत असे ते तत्व"*
_ते देखील या आसनाप्रत प्रणव देत असतात. मग असे ते आसन आणि त्यावर आरुढ असलेले तत्व सेवेकऱ्यांनो परम् श्रेष्ठ नाही का?_
मग अशा आसनाप्रत, अशा तत्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे. आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सतमय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दूसरे तीसरे कोणी नसून सद्गुरुच आहेत. त्याच्या वेगळे जाण देणारे दूसरे कोणीही नाही.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)