तिने आपल्याला जन्म दिला. तिने सर्व कष्ट काढले. मातापित्यांचा वाईट गतीने उध्दार करणे पाप आहे.
सताने कालीयाचा सुध्दा नाश केला. अघोरांचा निपा:त करण्यासाठी सत् जन्माला येते. *सत् हेच कृष्ण व कृष्ण हेच सर्वस्व होय.*
परब्रह्म तत्व असल्याने त्यांना सर्व जाणीव होती. शेष हाच बलदेव. हे दोघेजण कंसाला भेटायला कंसाचे अपराध पूर्ण झाल्यानंतर गेले. त्यावेळी यशोदेला वाईट वाटले. तेव्हा त्यांची समजूत केली. शेवटी ते मथुरेला पोहोचले.
कंसाने अनितीने अपराध चालविले होते. कंसाने कृष्णाला पूर्ण ओळखले होते. पण कंस डावपेच करायचा. अनितीने कारभार करताना कृष्णाने भर गादिवरून ओढून आणून मुठीने मारले.
परब्रह्म शक्ति बरोबर मानव काय मुकाबला करणार? त्याचे ते राज्य कृष्णाने, माझे न म्हणता एका सात्विक ज्योतीला देऊन टाकले व निघाले.
याप्रमाणे आपले सेवेकरी उदारमतवादी पाहिजेत. *"साधेपणा पण उदात्त विचार"*
कृष्ण मायेचा आसुसलेला नव्हता. कंसाला मारल्यानंतर दुसरे नातलग होते. शेवटी बहिणीला म्हणाले 101 अपराध झाले कि माझ्याजवळ असलेले अस्त्र गप्प बसणार नाही. (जरासंध), मुचकुंदाला मारले व ते महाभारतात गेले.
खरोखर कृष्ण वेडा नव्हता. परंतु त्यांनी पाच पांडवांशी संगत केली. पांडवांकडे सत् ऐश्वर्य होते. परंतु कौरवांकडे दाखवायचे ऐश्वर्य होये.
धर्म राजा शितल, संयमी व शांत होता. कृष्ण सताच्याच ठिकाणी गेले. सत् सता मध्येच मिसळते. त्या पांच पांडवाना पाठीशी धरून महाभारत रचले. ज्याला प्रत्यक्ष भगवंत तारी त्याला कोण मारी. पण याचवेळी कृष्णाने राजकारण सुरू केले. शेवटी धर्माची समजूत केली. त्यातील भीमाला फक्त गदाच माहिती होती. त्याच्याजवळ शक्ति भरपूर होती. भीम कृष्णाला म्हणाला, दुर्योधन कृष्णाचा अपमान करील. पण कृष्ण म्हणाले, मला मान नाही अन् अपमानही नाही. नंतर कुंतीची समंती घेऊन ते गेले.
(क्रमश:)