गुरु कसा असावा ? यावर
बरेच जण चर्चा करतात, पण शिष्य कसा असावा यावर कधी जास्त उहापोह होत नाही.
समर्थांनी
"म्हणॊनी सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथे न लगती सायास ।
त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरा ॥" असे म्हटले आहे.
जसे गुरु सद्गुरु
पाहिजेत तसे शिष्य सच्छिष्य पाहिजे, म्हणून समर्थांनी सच्छिष्यांची लक्षणे
सांगितली आहेत.
" मुख्य सच्छिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण ।
अनन्यभावे शरण । त्या नांव सच्छिष्य ॥
या ओव्या मधे पुढे समर्थांनी शिष्य हा
निर्मळ, आचारशील, विरक्त, निष्ठावंत, पवित्र, धीर, उदार, प्रज्ञावंत, सात्विक, जगतमित्र
(सर्वांवर प्रेम करणारा) असावा. तो अविवेकी नसावा.
"घडी
एक विश्वास धरी । सवेची घडी एक गुर्गुरी ।”
अंत:करणात
अभिमान आणि बाहेर विनम्रता असा दुटप्पी पणा, सद्गुरुंच्या पुढे जास्त लुडबुड करून, अन्य साधकांना सद्गुरुंची सेवा करण्याची संधी न देता मीच
सद्गुरुंचा फार जवळचा आणि आवडता शिष्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारा नसावा.
"सद्गुरुहून देव् मोठा । जयास वाटे तो करंटा । ” अशी ज्याची पूर्णपणे समर्पित बुद्धी आणि अत्यंत निष्ठा आहे तो उत्तम शिष्य
होय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा