गुरुवार, २२ मार्च, २०१२

सेवेकर्याची कर्तव्ये.........!!! गुरुदेव पितामह यांची प्रवचने......!!!


आपण सताचे सेवेकरी आहोत, आणि सताचा सेवेकरी सत सानिध्यात श्रद्धायुक्त स्थीतिने राहिला तर त्याला अघोर सूक्ष्म त्रास देऊ शकणार नाही. आपण सताशी तादाम्य स्थितीने राहिले पाहिजे. त्रास झाल्यानंतर स्थानात येऊन प्रणव द्यावयाचे पण स्थानात येऊन सताची भक्ती कोणी करायची? सताने मानवाला पूर्णत्व शांततामय स्थिती करावी अशी प्रत्येक मानवाची मनीषा असते पण सताची सुद्धा मानवाकडून मनीषा असतेच ना? कोणती मनीषा, तुमच्या धनाची नसते, संपत्तीची नसते, शारीरिक स्थितीची नसते तर फक्त तुमच्या श्रद्धेची. प्रथम मानव काय म्हणतो? माझी कौटुबिक स्थीती आहे , मला कर्तव्य करावयाचे आहे, पण त्रास होऊ लागला कि मग दरबारात येतो. दरबार येणे सताची कौंटुबिक स्थिती.
आपण सर्वस्व एकाच स्थितीत येता म्हणजेच सताची कौंटुबिक स्थिती होय. सत स्थुलात असताना कोणते प्रणव द्यावयाचे? अरे! हे माझे गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजेच कौटुबिक स्थिती. हि कलियुगी स्थिती आहे आणि या कलियुगात मानवाला अनेक कर्तव्य आहेत पण प्रथम कर्तव्य कोणते? तर सत नामस्मरण. सत नामस्मरण हे मानवाचे  आद्य कर्तव्य आहे. मायावी स्थितीत तुमच्या धनाची, मनाची, शरीराची झीज होईल पण सत नामस्मरणाने तुमच्या धनाची, मनाची, शरीराची कोणती स्थिती होईल? तर तेजोमय स्थिती होईल आणि सत तुमच्यात पूर्णत्व सहवास करून राहील. मग अघोर सूक्ष्म तुमच्या सहवासात राहील का?
मानवाला माया आहे तशी सतालाही माया आहे. तुम्ही सर्वस्व हि सताचीच माया आहे. तुमची पूर्णत्व स्थिती करून देणे हे सताचे आद्य कर्तव्य आहे, तसेच सताचे नामस्मरण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. हे जर मानवाने केले तर तो सतापासून दूर राहील का? नाही राहणार. तो सताप्रत येणारच. मानवाला शरीर देह मिळाल्या नंतर सुख हि आहे आणि दु:खही आहे. दोन्ही स्थितीत जर मानव एकाग्र झाला तर त्याला सताचे दर्शन दूर आहे का? ( गुरुदेव पितामह )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: