रविवार, १ जानेवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग पहिला)

सतभक्तीचे स्वरूप (भाग पहिला)

हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा सरळ मार्ग आहे. पण दोन्ही टोके सांभाळायची.

आपण जाणताच हाताच्या बाजू दोन - एक उजवी अन दुसरी डावी. त्या दोन बाजूंमध्ये उजवा गट भक्ती अन डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम. हि तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी हि सर्व तामस लोकांची उपासना.

भक्तियुक्त उपासना कोणती - तर अखंड नाम.
त्या परते दुसरे काही नाही. जे सत् पदाने अखंड नाम सत्-पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे, त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शनयुक्त राहणे हेच त्याचे मर्म. अशा स्थितीत राहिले ते ऋषी-मुनी, ब्रह्मऋषी, सप्तर्षी आणि त्यांची गुरुकुले या चौकट मुनींच्या गुरुकुलातले, तर कोपिष्ट मुनींची गुरुकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन त्यांची गुरुकुले, राक्षस, अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती, हि वेगळी चाकोरी आणि भक्ती हि वेगळी चाकोरी. तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मर्षी, सप्तर्षी, यांचा ताफा मात्र लहान होता. परंतु तेजस्वी होता. तेजोबालासहित होता. याचे कारण सत कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या. सत त्यांनाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे कि मी तुमच्या बरोबर आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती सत आणि तामस असलेले लोक हे त्यांचेच भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी.   

भक्ति – एक राजमार्ग !
म्हणजेच - भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग. भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे, त्यात काटे, कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु, तामसी वृत्तीच्या मार्गात काटे, कुटे, खाच, खळगे, सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात ! परंतु भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे. आता आपण जाणताच कि वेगवेगळी शुद्दीकरणे आपण पाहिली, अनुभवली. या शुद्दीकरणात आपणा सर्वांना हे कळून चुकले होते कि अघोरांकडे वेगवेगळे वरद्हस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतीना  शुद्दीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता.

परंतु शुद्दीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने ! जरी अघोरांना वरदहस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापिटा केला तरी बाजू सताचीच घेणार परंतु अशी वेळ आली कि अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने ! शेवटी सत् बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच ! सत् सताचीच बाजू घेणार, अघोरांची बाजू कधीही घेणार नाही.

कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो कि सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पाहतच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे आम्ही अघोरांचा नाश करीत आहोत. स्थूलातून गेलेल्या या अघोरांनी सुक्ष्माने मानवांवर कब्जा केला. द्वापार युगापासून जेवढे अघोर अवतारकार्यात मारले, ते सर्व अघोर सुक्ष्माने होते. सुक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या पंचवीस अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थुलाने केला त्यांचा नाश सुक्ष्माने करणे तुम्हा मानवांना शक्य होईल का?

ज्यांच्यासाठी ॐ कारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्याकरिता अनन्तानी ॐ करांना आदेश देवून जन्म घ्यावयाला भाग पाडले अन् त्यांना कर्तव्याची दिशा दिली. मग अशा अघोरांच्या सुक्ष्मांचा नाश तुम्ही कलियुगी मानव करू शकता का?

आपण पाहताच कि आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिति होत असतांना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य ८५० पाय-यांच्या अघोर ज्योतींचा देखील नाश केला गेला आहे. सर्वस्व ज्या राक्षसांकडे होते, ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धीकरणातून नाश केला गेला आहे. पुढे चालू...........(२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: