शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

      कृष्ण शिष्ठतेसाठी आले असता दुर्योधन उच्च स्थानी बसले होते. त्यावेळी कृष्ण म्हणाले, "मी शिष्ठतेसाठी आलो आहे. तुम्ही समान दोन भाग करून महायुद्ध आटपा. पण त्या पांडवाना सुईच्या टोकाइतकीसुध्दा जमीन मिळणार नाही", असे कौरव म्हणाले.

इतका अपराध झाला तरी कृष्ण सहन करीत होते. भीम हा फक्त आईला (कुंतीला) मान द्यायचा. कृष्ण विचार करीत बसले. ते दुर्योधनाला म्हणाले, "दुर्योधना तू विचार कर. तुझे म्हणने चौकटीत बसत नाही." दुर्योधन धर्माला म्हणाला, "तुझे काय मत आहे?" तेव्हा धर्म म्हणाला, "ते कृष्ण सांगेल." तेव्हा कृष्ण म्हणाला, "यामध्ये तुला कोण पुण्यवान दिसतो का?"

धर्माला पापी बनविणारा दुर्योधन, तोच पापी होता. तेव्हा त्याला सर्व पापी दिसत होते. धर्म म्हणाला, "सर्व पुण्यवान व दुर्योधन सुध्दा पुण्यवान."

ज्याचे आचार विचार सत् त्याला सतच दिसणार. कृष्ण मात्र नाराज झाले. पुढे महान अवर्षण होणार हे माहित होते.
                              (क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: