मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

ओ भगवन मेरे (1)

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!

आया हू मैं दरपे  तेरे !!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!

ना समज हैं मुझमें भारी !
ना मुझमें हैं होशियारी!!
बस एकही कामना भारी!!!
सिर्फ दर्शन हो आते ही दरबारी!!!

आया हू मैं दरपे  तेरे !!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!

मैं हू  बालक अज्ञानी !
चाहता हू हो जाये सज्ञानी!!
आपके निरंतर सहवासमे !!!
भूल जाऊ सब कुछ शैतानी!!!

आया हू मैं दरपे  तेरे !!!

ओ भगवन मेरे ऽऽऽ !
कर दे ऽऽ दर्शन ऽऽ तेरे !!
............मयुर तोंड़वळकर.......

रविवार, २९ मे, २०१६

!!! सद्गुरू दर्शन !!!

!!! सद्गुरू दर्शन !!!

मनी वसे भाव
घेऊया सताचा ठाव
त्यासाठी करा सदोदीत
नामस्मरण....

नामस्मरण करता करता
भाव तो जागतसे
सताच्या चरणांचा
ठाव तो लागतसे........

भाव तो जागता
ठाव तो लागता
दर्शन ते घडतसे
सद्गुरू रायांचे........

दर्शन ते घडता भक्त
होई तो जीवनमुक्त
अवघेची जीवनाचे
सार्थक होई...........
..............अस्मादीक.............

रविवार, १७ एप्रिल, २०१६

रामनवमी

��� ��� ��� ��� ���
राम-सीता नांदे जेथे,
तेथे अहंकार कोठे?
जेथे रामाचे स्मरण,
तेथे अहंकाराचे होई विस्मरण !
'मी'पण जाते जेव्हा,
राम प्रगटतो तेव्हा तेव्हा,
नवा मी होई केव्हा?
रावणाचे दहन होई तेव्हा !
सीतामाई (सुख) येती घरा,
तोची दिवाळी दसरा,
रामनवमीचा सण साजरा,
चला करूया घरा घरा !
मयुर तोंडवळकर........!!!
��� ��� ��� ��� ��� ��

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात?


प्रवचनें ज्योतीला शुध्दत्वता करण्यासाठी
असतात.
हे प्रवचनरूपी स्नान आहे.
प्रवचन हे न्यानयुक्त प्रणवांची
आंघोळ असते. शुचि:र्भूत शुध्द
प्रणवांची आंघोळ करून तुम्ही
शुध्द व्हावे याकरीता प्रवचन असते.
कांही वेळेला अमृततुल्य प्रणव देखील
बाहेर फेकले जातात. तुमच्या मनावर
असलेली काजळी दूर करून तुम्हांला
तेजोमय बनविण्यासाठी ही प्रवचनें
असतात."
परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज
यांच्या प्रवचनातून साभार सादर.

सोमवार, ४ मार्च, २०१३

नामस्मरण


नामस्मरण - चार वर्ण, अबालवृद्ध स्त्री- पुरुषांना अनुसर्ण्यास सुलभ जाणारे असे अमोघ साधन म्हणजे नामस्मरण होय. याची महती अनेक ग्रंथात वर्णिलेली आहे.सर्व साधू, संताच्या प्रत्ययास आलेले असे हे साधन होय. सर्वांचा त्या वर विश्वास असून इतरांस अनुभव घेण्याचा संतानी अति काकुळतीने उपदेश केला आहे. अशा या नामधनाविषयी संशय घेणे म्हणजे ... पाप होय.

कांही एक भाग्य होते पूर्वजांचे/ पापियांसी कैचे रामनाम//
रामनामे कोटी कुळे उद्धरती/ संशय धरती तोची पापी//
सर्व जाणे अंती रामनामे गती/ आणि वेद श्रुती गर्जताती//
गर्जती पुराणे आणि संतजन/ करावे भजन राघवाचे//

एक होती गणिका तिने एक पोपट पाळला होता, पोपटाचे नाव राघव. त्याच्यावर तिचे फार प्रेम होते आणि रामाचे नाव सुद्धा राघव म्हणून ती त्या पोपटाला जीवाच्या पलीकडे जपायची. अंतकाळी ती गणिका सारखी म्हणयाची अरे राघवा माझा अंत काळ आता जवळ आला आहे तुला पाणी कोण देईल, पेरू कोण देईल आणि राघव राघव करीत तिने प्राण सोडला आणि असा चमत्कार झाला कि

रामनामे उद्धरली ती गणिका/ नेली देवलोका याच देही//
याच देही गती पावली कुंटणी/ रामनाम वाणी उच्चारिता// ........समर्थ रामदास स्वामी.

आपले जीवन, सर्व मनोरथ पूर्ण करणारे साधन असे हे रामनाम आहे. त्या योगे भयाचे निवारण होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. पण आपले काम इतकेच की सदासर्वदा प्रात:काळी सायंकाळी सर्वकाळी हृदयात राम साठवून अखंड नामस्मरण करणे. 

आपल्या सद्गुरूनी सुद्धा हेच सांगितले आहे, जाता येता जो जो वेळ मिळेल त्या वेळेला नामस्मरण करा. नामस्मरणाने पापांचा नाश होतो आणि पुण्याचा संचय होतो.

श्वास श्वास पै नाम लै/ वृथा श्वास मत खोय//
ना जाने उस श्वास का/ आदत होय न जाय//....... स्वामी विवेकानंद.

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

समर्थाचिया सेवका वक्र पाहे


समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी कोण आहे /
जयाची लीला वर्णिता तिन्ही लोकी / नु पेक्षा कदा रामदासां भिमानी /

लक्षात घ्या समर्थांचे सांगणे एकाच आहे, समर्थ तारी त्याला कोणीही मारू शकणार नाही. . समर्थासमोर येणे सद्गुरू समोर त्रिगुण देखील फिके पडतात, मायेचे देखील  कांहीही चालत नाही.

सद्गुरूंचा ज्याच्यावर कृपा हस्त आहे त्याचे कोणीही कांहीही करू शकत नाहीआपल्या भक्तासाठी गुपचूप अव्यक्तपणे जाऊन कर्तव्य करून येतील. सद्गुरू कर्तव्य करतात हे कोणाला कळणार देखील नाही. असे जे परमनिधान तत्व ज्यांना तुम्ही सत म्हणतात तेच समर्थतेच सदगुरु सर्वस्व व्यापून अलिप्त असणारे तत्व जळीस्थळीकाष्ठीपाषाणीअसणारे तत्वतीन ताल सप्त पाताल भरूनही उरलेले तत्व मग अशा सताची उपासना करणे योग्य आहे कि नाहीहेच सत सर्वस्व विखुरलेले आहे. त्या सदगुरांच्या नामस्मरणात जर आपण स्थिर झालो तर सदगुरु आपल्याला कदापीही बाजूला सरणार नाहीत. पण मनातले भय मात्र मागे सारा. अशा सदगुरूंचे आपण सेवेकरी आहोत ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. समर्थाचे आपल्या भक्तावर पूर्ण लक्ष असते.





बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

शिष्य कसा असावा?

गुरु कसा असावा ? यावर बरेच जण चर्चा करतात, पण शिष्य कसा असावा यावर कधी जास्त उहापोह होत नाही. 

समर्थांनी 

"म्हणॊनी सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथे न लगती सायास । 
त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरा ॥" असे म्हटले आहे.  

जसे गुरु सद्गुरु पाहिजेत तसे शिष्य सच्छिष्य पाहिजे, म्हणून समर्थांनी सच्छिष्यांची लक्षणे सांगितली आहेत. 

" मुख्य सच्छिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । 

अनन्यभावे शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ 

या ओव्या मधे पुढे समर्थांनी शिष्य हा निर्मळ, आचारशील, विरक्त, निष्ठावंत, पवित्र, धीर, उदारप्रज्ञावंतसात्विकजगतमित्र (सर्वांवर प्रेम करणारा) असावा. तो अविवेकी नसावा. 


"घडी एक विश्वास धरी । सवेची घडी एक गुर्गुरी ।” 

अंत:करणात अभिमान आणि बाहेर विनम्रता असा दुटप्पी पणासद्गुरुंच्या पुढे जास्त लुडबुड करून, अन्य साधकांना सद्गुरुंची सेवा करण्याची संधी न देता मीच सद्गुरुंचा फार जवळचा आणि आवडता शिष्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारा नसावा. 

"सद्गुरुहून देव् मोठा । जयास वाटे तो करंटा । अशी ज्याची पूर्णपणे समर्पित बुद्धी आणि अत्यंत निष्ठा आहे तो उत्तम शिष्य होय.

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

मी तू रहित होणे म्हणजेच सत्मय होणे..........!!! (परमपूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)


मी तू रहित होणे म्हणजेच सत्मय होणे..........!!!

मी तू रहित होणे म्हणजेच सत्मय होणे. जे कांही आपले सद्गुरू सांगतील ते ब्रम्हवाक्य. दुसरे मी कांही जाणत नाही. अशी सेवेकऱ्यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविश्वास प्रत्येक सेवेकर्याजवळ असला पाहिजे. सद्गुरूंचे वाक्य जर सेवेकर्यांनी प्रमाण मानले नाही तर कोणाचे वाक्य प्रमाण मानायचे? मी तू रहित होणे म्हणजेच अद्वैत होणे. हे होण्यासाठी सेवेकर्यांनी मनाने सतमय होणे आवश्यक होणे आहे. मन एकदा  का सतमय झाले कि सर्वस्व सतमय झालेच म्हणून समजा. म्हणून सद्गुरूंच्या ठायी सतचरणावर मन अर्पण करताना कसे असले पाहिजे तर ठाम. सेवेकर्यांच्या मनात हि भावना सदैवं असली पाहिजे. मी सद्गुरूंचा आहे आणि सदगुरू माझे आहेत. सदगुरूचा जो सेवेकर्यावर विश्वास असतो त्याची परीपूर्तता करणे प्रत्येक सेवेकर्याचे आध्यकर्तव्य आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सेवेकर्याची आहे. (प पु श्री सदगुरू स्वामी भगवान महाराज.)