*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
सदगुरूनी सेवेकऱ्याच्या मनावर ताबा मिळवल्यानंतर सेवेकऱ्याचे मन कसे राहिले पाहिजे तर सतशुध्द राहिले पाहिजे. परंतु तसे रहात नाही.
सत्य अन असत्य ही स्थिती मन चंचल झाल्यावर होत असते. म्हणून सर्वात प्रथम सेवेकऱ्याने सद्गुरुमय झाले पाहिजे. सेवेकरी सद्गुरुमय झाला नाही तर तो ज्ञानाचा आस्वाद कसा घेऊ शकणार? याकरीता सेवेकऱ्याने सद्गुरुमय व्हायला पाहिजे. मानवाचे मन सदगुरुमय झाले तर मानवामध्ये शंका, कुशंका, चंचलता, सत्य, असत्य राहील का?
ज्ञानार्जनाची आवड आहे परंतु मन चंचल आहे, कशासाठी आपले मन चंचल आहे? आपण सत स्थानात आहात ना? मग मनामध्ये चंचलता का येते? ती न येण्यासाठी प्रथम मानवी स्थितीप्रमाणे मन सदगुरुमय करणे.
आपणास या भवसागरातून तरुण जायचे आहे, वाहून जायचे नाही. आपणा सर्वस्वाना सताचे सानिध्य घेऊन, ज्ञानार्जन करून सत स्थितीत स्थिर केले आहे. परंतु कलीयुगी स्थितीप्रमाणे आपुल्या मनाची स्थिती स्थिर शांत रहात नाही.
सदगुरु स्थानात प्रयाण झाल्यानंतर ज्योत सदगुरुमय होते. परंतु स्थानातून बाहेर पडल्यानंतर तीच ज्योत संशयातीत होते. सताचे स्थानातील ज्योतीने स्थुल त्यागीले आहे परंतु कर्तव्य त्यागीले आहे का तर नाही.
सत आपणास पदोपदी प्रणव देत होते आपणा सर्वस्वांचे कर्तव्य पाहून मी आनंदीमय आहे. परंतु अशी स्थित्यंतरे निर्माण झाल्यानंतर सताकडून आपण कोणते प्रणव घेणार आहात? ज्ञानाची स्थिती ग्रहण करावयाची असेल तर ते ज्ञान ग्रहणतेत येईल.
प्रथम मन सदगुरुमय करा, शीतल, शांत, द्वेषरहीत करा, शंकारहीत व्हां. स्थुल अनेक आहेत परंतु जडविता, घडविता एकच आहे. सताने स्थुलात आपणास ज्ञानमय प्रणव प्रस्थापित केले ते पूर्णत्व ग्रहण करा. ते पूर्णत्वाने मनन करा .
आपण सताचे सेवेकरी आहात. अन सत स्थितीत अशी स्थित्यंतरे होणे यथायोग्य नाही. सताने किती अवधी आपणास ज्ञानोपदेश केला. अन तो ज्ञानोपदेश आपण सर्वस्वानी पूर्णत्व ग्रहण केला असता, मननतेत पूर्णत्व घेतला असता तर अशी स्थित्यंतरे घडली नसती. सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली आहे. अन अशा सताचे तुम्ही सेवेकरी आहात. अशी स्थित्यंतरे घडल्यनंतर सतानाही दु:ख होईल. ज्ञानोपदेश करणे आमचे कर्तव्यच आहे. ज्ञानोपदेश हा कलीयुगी स्थितीतून मानवाची मुक्तता करण्यासाठी आहे. मुक्त होण्याकरिताच सताने सर्वस्व स्थिती केलेली आहे. परंतु आपण मानव त्याची जाण घेत नाही, कल्पना घेत नाही, अन आचरणात पूर्णत्व स्थितीने आणतही नाही.
सत प्रणवाकरीता आम्ही देखील कर्तव्य करत आहोतच ना? तद्वत आपण सेवेकऱ्यानी देखील आपले कर्तव्य सोडावयाचे नाही. सताने आपणास आद्य कर्तव्य बहाल केले. अन ते आद्य कर्तव्य करीता करीता कोणते कर्तव्य दिधले आहे.
संयमता, लीनता ही ठेवलीच पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता नसेल तर तो सताचा सेवेकरी शोभून दिसणार नाही. या पूर्णत्व कलीयुगी स्थितीत तुम्हास आपणाप्रत घेतले आहे. शुध्दीकरण स्थितीचीही जाण दिधली आहे. या सर्वस्व जाणीवा ग्राह्यतेत असताना आपणाकडून घडणारी स्थित्यंतरे यथायोग्य नाहीत. *"लीनता, नम्रता, संयमता सर्वस्व पूर्णत्वाने आचरणात आणली पाहिजे."* आपणाकडून हे घडल्यानंतर, ग्राह्य झाल्यानंतर ज्ञानयुक्त प्रणव मी प्रस्थापित करीन. जर ही तीन गुण आपणाप्रत नसतील तर ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही.
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले.
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
सदगुरूनी सेवेकऱ्याच्या मनावर ताबा मिळवल्यानंतर सेवेकऱ्याचे मन कसे राहिले पाहिजे तर सतशुध्द राहिले पाहिजे. परंतु तसे रहात नाही.
सत्य अन असत्य ही स्थिती मन चंचल झाल्यावर होत असते. म्हणून सर्वात प्रथम सेवेकऱ्याने सद्गुरुमय झाले पाहिजे. सेवेकरी सद्गुरुमय झाला नाही तर तो ज्ञानाचा आस्वाद कसा घेऊ शकणार? याकरीता सेवेकऱ्याने सद्गुरुमय व्हायला पाहिजे. मानवाचे मन सदगुरुमय झाले तर मानवामध्ये शंका, कुशंका, चंचलता, सत्य, असत्य राहील का?
ज्ञानार्जनाची आवड आहे परंतु मन चंचल आहे, कशासाठी आपले मन चंचल आहे? आपण सत स्थानात आहात ना? मग मनामध्ये चंचलता का येते? ती न येण्यासाठी प्रथम मानवी स्थितीप्रमाणे मन सदगुरुमय करणे.
आपणास या भवसागरातून तरुण जायचे आहे, वाहून जायचे नाही. आपणा सर्वस्वाना सताचे सानिध्य घेऊन, ज्ञानार्जन करून सत स्थितीत स्थिर केले आहे. परंतु कलीयुगी स्थितीप्रमाणे आपुल्या मनाची स्थिती स्थिर शांत रहात नाही.
सदगुरु स्थानात प्रयाण झाल्यानंतर ज्योत सदगुरुमय होते. परंतु स्थानातून बाहेर पडल्यानंतर तीच ज्योत संशयातीत होते. सताचे स्थानातील ज्योतीने स्थुल त्यागीले आहे परंतु कर्तव्य त्यागीले आहे का तर नाही.
सत आपणास पदोपदी प्रणव देत होते आपणा सर्वस्वांचे कर्तव्य पाहून मी आनंदीमय आहे. परंतु अशी स्थित्यंतरे निर्माण झाल्यानंतर सताकडून आपण कोणते प्रणव घेणार आहात? ज्ञानाची स्थिती ग्रहण करावयाची असेल तर ते ज्ञान ग्रहणतेत येईल.
प्रथम मन सदगुरुमय करा, शीतल, शांत, द्वेषरहीत करा, शंकारहीत व्हां. स्थुल अनेक आहेत परंतु जडविता, घडविता एकच आहे. सताने स्थुलात आपणास ज्ञानमय प्रणव प्रस्थापित केले ते पूर्णत्व ग्रहण करा. ते पूर्णत्वाने मनन करा .
आपण सताचे सेवेकरी आहात. अन सत स्थितीत अशी स्थित्यंतरे होणे यथायोग्य नाही. सताने किती अवधी आपणास ज्ञानोपदेश केला. अन तो ज्ञानोपदेश आपण सर्वस्वानी पूर्णत्व ग्रहण केला असता, मननतेत पूर्णत्व घेतला असता तर अशी स्थित्यंतरे घडली नसती. सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली आहे. अन अशा सताचे तुम्ही सेवेकरी आहात. अशी स्थित्यंतरे घडल्यनंतर सतानाही दु:ख होईल. ज्ञानोपदेश करणे आमचे कर्तव्यच आहे. ज्ञानोपदेश हा कलीयुगी स्थितीतून मानवाची मुक्तता करण्यासाठी आहे. मुक्त होण्याकरिताच सताने सर्वस्व स्थिती केलेली आहे. परंतु आपण मानव त्याची जाण घेत नाही, कल्पना घेत नाही, अन आचरणात पूर्णत्व स्थितीने आणतही नाही.
सत प्रणवाकरीता आम्ही देखील कर्तव्य करत आहोतच ना? तद्वत आपण सेवेकऱ्यानी देखील आपले कर्तव्य सोडावयाचे नाही. सताने आपणास आद्य कर्तव्य बहाल केले. अन ते आद्य कर्तव्य करीता करीता कोणते कर्तव्य दिधले आहे.
संयमता, लीनता ही ठेवलीच पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता नसेल तर तो सताचा सेवेकरी शोभून दिसणार नाही. या पूर्णत्व कलीयुगी स्थितीत तुम्हास आपणाप्रत घेतले आहे. शुध्दीकरण स्थितीचीही जाण दिधली आहे. या सर्वस्व जाणीवा ग्राह्यतेत असताना आपणाकडून घडणारी स्थित्यंतरे यथायोग्य नाहीत. *"लीनता, नम्रता, संयमता सर्वस्व पूर्णत्वाने आचरणात आणली पाहिजे."* आपणाकडून हे घडल्यानंतर, ग्राह्य झाल्यानंतर ज्ञानयुक्त प्रणव मी प्रस्थापित करीन. जर ही तीन गुण आपणाप्रत नसतील तर ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही.
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा