*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
*(परम् पूज्य गुरुदेव पितामह यांची अमृतवाणी)*
*"क्षमा"* आणि ती केव्हा अन कधी होते? क्षमेची याचना केव्हा होते? मानवाकडून चुका झाल्यानंतर मानव सताप्रत क्षमेची याचना करतो, अन सत ते मान्य करते. सताने मान्य केल्यावर मानव कसा होतो? तृप्त होतो. मानवाची मनोमन कल्पना कोणती होते? माझ्या सताने मला क्षमा केली आहे. परंतु क्षमा झाली असे आपणास पूर्णत्व कल्पना येते का? सद्गुरू मुखातून प्रणव निघाल्यानंतर पूर्णत्वाने येते.
सद्गुरू मुखातून सतशुध्दच प्रणव बाह्य स्थितीत पडत असतात.
क्षमा येणे सामाऊन घेणे स्थिती नाही तर समजाऊन घेणे स्थिती आहे. आपणास प्रत्यय येतो सताने क्षमा केली. आपण मनोमन प्रफुल्लमय होता. आपल्या चुकांची क्षमा झाली आहे. परंतु त्या सतमाउलीने आपणास समजाऊन घेतले म्हणूनच तुम्हास क्षमेची स्थिती झाली ना? नाहीतर मानवांची कोणती स्थिती होते?
द्विधा ही आगळी वेगळी स्थिती आहे, क्षमा ही आगळी वेगळी स्थिती आहे. सताने आपणास समजावून घेतले येणे प्रणवाकृत करून, सतशुध्द करून आपल्याप्रत घेतले नाही का ?
आपणास कल्पना आहे, सद्गुरु येणे माउली एकलय झाली ना ? अन एकलय झाल्यानंतर तो योगी, तो मानव, तो मनुष्य, तो जीवात्मा सतशुध्द होतो. पूर्णत्व लीन अन नम्र अशी जेव्हा जीवात्म्याची स्थिती होते तेव्हाच सत त्यास क्षमा करते येणे समजाऊन घेते.
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
*(परम् पूज्य गुरुदेव पितामह यांची अमृतवाणी)*
*"क्षमा"* आणि ती केव्हा अन कधी होते? क्षमेची याचना केव्हा होते? मानवाकडून चुका झाल्यानंतर मानव सताप्रत क्षमेची याचना करतो, अन सत ते मान्य करते. सताने मान्य केल्यावर मानव कसा होतो? तृप्त होतो. मानवाची मनोमन कल्पना कोणती होते? माझ्या सताने मला क्षमा केली आहे. परंतु क्षमा झाली असे आपणास पूर्णत्व कल्पना येते का? सद्गुरू मुखातून प्रणव निघाल्यानंतर पूर्णत्वाने येते.
सद्गुरू मुखातून सतशुध्दच प्रणव बाह्य स्थितीत पडत असतात.
क्षमा येणे सामाऊन घेणे स्थिती नाही तर समजाऊन घेणे स्थिती आहे. आपणास प्रत्यय येतो सताने क्षमा केली. आपण मनोमन प्रफुल्लमय होता. आपल्या चुकांची क्षमा झाली आहे. परंतु त्या सतमाउलीने आपणास समजाऊन घेतले म्हणूनच तुम्हास क्षमेची स्थिती झाली ना? नाहीतर मानवांची कोणती स्थिती होते?
द्विधा ही आगळी वेगळी स्थिती आहे, क्षमा ही आगळी वेगळी स्थिती आहे. सताने आपणास समजावून घेतले येणे प्रणवाकृत करून, सतशुध्द करून आपल्याप्रत घेतले नाही का ?
आपणास कल्पना आहे, सद्गुरु येणे माउली एकलय झाली ना ? अन एकलय झाल्यानंतर तो योगी, तो मानव, तो मनुष्य, तो जीवात्मा सतशुध्द होतो. पूर्णत्व लीन अन नम्र अशी जेव्हा जीवात्म्याची स्थिती होते तेव्हाच सत त्यास क्षमा करते येणे समजाऊन घेते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा