अंतरंगी रंगुनी जावे । नेत्र भरुनी चरण पहावे ।।
31 जुलै 1986
(परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींची अमृतवाणी)
नेत्रात रंगुनी जावे म्हणजे काय ? नेत्र म्हणजेच ज्योत. कशाने कोणत्या गतीने रंगुनी जावे ? कोणत्या पद्धतीने रंगुनी जावे ?
कारण हे नेत्र म्हणजे दृष्टी, डोळे, ज्याला आम्ही त्रिकुटी म्हणतो. डोळे, कान, अन वाणी ही मिळून त्रिकुटी आहे. याच्यावर जो ताबा मिळवेल तो सर्वरहीत स्थिर होऊ शकेल. त्याचे नेत्र सर्वरहीत स्थिर होऊ शकतील. नेत्र हे चंचल असतात. ते स्थिर आहेत कां ? एका दृष्टीक्षेपात तो अनंत तऱ्हा पहात असतो . अन तसे त्याचे विचारही निर्माण होत असतात.
आता ही दृष्टी म्हणजे ते नेत्र. त्यात रंगुनी जावे म्हणजे काय ? जी सतभक्तीने आचरण करणारी ज्योत आहे, सताशिवाय दुसरे नेणे नाही, जाणे नाही, अशी ज्योत असेल त्याच्या नेत्र बिंदूजवळ नेहमी सतचरणच तरळत असतात. दुसरे कांही तरळणार नाही. तो पाहताना सदगुरु दर्शनातच लय असणार , त्याचे तरंग कसे असणार तर सतमय असणार. आता नेत्रात सतमय तरंग असले तर त्या तरंगात तो लय बद्ध होतो, त्यातच तो रंगून जातो हा या श्लोकाचा भावार्थ आहे. त्याला सतमय गती प्राप्त होते अन त्यातच तो रंगून जातो. अशा त्या गतीमध्ये तो भक्त, जो सतभक्त असेल तो.
सतभक्त कोणाला म्हणावे, त्याची व्याख्या काय? जो सताशिवाय दुसरे अन्यथा ओळखणे नाही, जाणणे नाही, पाहणे नाही, सत हेच माझे सर्वस्व निधान, सताप्रत भक्तीच्या गतीने जाणारी ज्योत असणार, सताशिवाय वेगळे पाहणे नाही अशी जी ज्योत असेल, ती ज्योत मग ती स्त्री असो वा पुरुष असो, प्रकृतीने जरी भिन्न तरी सगळ्यांना अधिकार समत्व आहे. त्या गतीने ती ज्योत सतचरणावर ध्यानयुक्त तऱ्हेने म्हणजे ध्यान कुठे तर मनाने अन पाहणे कुठे असते तर अंतःर्दृष्टीने, बहिर्दृष्टी रंगली, सतमय बनली, सतचरणावर स्थिर झाली मग अंतरंग देखील तसेच होणार, अंतःर्मन कसे होणार?
यस्य स्मरण मात्रेन । ज्ञानमुत्पध्यते स्वयंम ।
स एवं सर्व संपत्ती तस्मै श्री गुरवे नमः ।।
महेश अंबेला सांगत आहेत माझे गुरू कसे आहेत की ज्यांचे स्मरण केले , ज्यांची आठवण केली, ज्यांचे ध्यान केले तरी लगेच तरळतात, लगेच प्रगट होतात आणि ते मला जाणीव देतात, दर्शन देतात असे जे महान पद त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो . क्रमशः
🙏🙏🙏🙏
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक
31 जुलै 1986
(परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींची अमृतवाणी)
नेत्रात रंगुनी जावे म्हणजे काय ? नेत्र म्हणजेच ज्योत. कशाने कोणत्या गतीने रंगुनी जावे ? कोणत्या पद्धतीने रंगुनी जावे ?
कारण हे नेत्र म्हणजे दृष्टी, डोळे, ज्याला आम्ही त्रिकुटी म्हणतो. डोळे, कान, अन वाणी ही मिळून त्रिकुटी आहे. याच्यावर जो ताबा मिळवेल तो सर्वरहीत स्थिर होऊ शकेल. त्याचे नेत्र सर्वरहीत स्थिर होऊ शकतील. नेत्र हे चंचल असतात. ते स्थिर आहेत कां ? एका दृष्टीक्षेपात तो अनंत तऱ्हा पहात असतो . अन तसे त्याचे विचारही निर्माण होत असतात.
आता ही दृष्टी म्हणजे ते नेत्र. त्यात रंगुनी जावे म्हणजे काय ? जी सतभक्तीने आचरण करणारी ज्योत आहे, सताशिवाय दुसरे नेणे नाही, जाणे नाही, अशी ज्योत असेल त्याच्या नेत्र बिंदूजवळ नेहमी सतचरणच तरळत असतात. दुसरे कांही तरळणार नाही. तो पाहताना सदगुरु दर्शनातच लय असणार , त्याचे तरंग कसे असणार तर सतमय असणार. आता नेत्रात सतमय तरंग असले तर त्या तरंगात तो लय बद्ध होतो, त्यातच तो रंगून जातो हा या श्लोकाचा भावार्थ आहे. त्याला सतमय गती प्राप्त होते अन त्यातच तो रंगून जातो. अशा त्या गतीमध्ये तो भक्त, जो सतभक्त असेल तो.
सतभक्त कोणाला म्हणावे, त्याची व्याख्या काय? जो सताशिवाय दुसरे अन्यथा ओळखणे नाही, जाणणे नाही, पाहणे नाही, सत हेच माझे सर्वस्व निधान, सताप्रत भक्तीच्या गतीने जाणारी ज्योत असणार, सताशिवाय वेगळे पाहणे नाही अशी जी ज्योत असेल, ती ज्योत मग ती स्त्री असो वा पुरुष असो, प्रकृतीने जरी भिन्न तरी सगळ्यांना अधिकार समत्व आहे. त्या गतीने ती ज्योत सतचरणावर ध्यानयुक्त तऱ्हेने म्हणजे ध्यान कुठे तर मनाने अन पाहणे कुठे असते तर अंतःर्दृष्टीने, बहिर्दृष्टी रंगली, सतमय बनली, सतचरणावर स्थिर झाली मग अंतरंग देखील तसेच होणार, अंतःर्मन कसे होणार?
यस्य स्मरण मात्रेन । ज्ञानमुत्पध्यते स्वयंम ।
स एवं सर्व संपत्ती तस्मै श्री गुरवे नमः ।।
महेश अंबेला सांगत आहेत माझे गुरू कसे आहेत की ज्यांचे स्मरण केले , ज्यांची आठवण केली, ज्यांचे ध्यान केले तरी लगेच तरळतात, लगेच प्रगट होतात आणि ते मला जाणीव देतात, दर्शन देतात असे जे महान पद त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो . क्रमशः
🙏🙏🙏🙏
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा