मानव कितीही गप्प राहिला तरी त्याच्या अंत:र्मय स्थितीची कल्पना आम्हास येते. अंत:र्मय स्थितीत सत् आहे. तुमच्या अंतर्मय स्थितीत जी काही स्थिती चालू आहे त्याची सताला परिपूर्ण कल्पना आहे.
मानवाने कसे राहिले पाहिजे?
स्थिती चांगली असो अगर वाईट असो ती सताजवळ उघड केली पाहिजे. अंतर्मय स्थितीत ठेवल्यानंतर कर्तव्य होणार नाही. तुमची अंतर्मय स्थिती स्वच्छ राहिल्यानंतर सत् त्या ठिकाणी वास करून राहील.
आपुली अंतर्मय स्थिती गढुळ केंव्हा होते?
आचार म्हणू कि विचार म्हणावे?
आचार दिसतात विचार दिसत नाहीत. वाईट विचार अंतर्मय स्थितीत राहिल्यानंतर अंतर्मय स्थिती गढुळ होते. आचाराने तुम्ही कर्तव्य करीत असता; ते सर्वस्वांना दिसत असते. पण तुम्ही विचार करीता ते कोण पाहू शकेल?
अंतर्मय स्थिती गढूळ झाल्यानंतर सत् बाजूला सरकते. मग तुमचे विचारही बिघडतात अन् आचारही बिघडतात. मानवाची स्थूल स्थिती होऊन त्याला कर्तव्याची जाण रहात नाही अन् मानव आळशी होतो.
म्हणून प्रणव देतो मनन स्थिती शुध्द ठेवा. त्याकरीता प्रथम तुमचे विचार शुध्द ठेवा. जेंव्हा तुमच्या मनन स्थितीत विचारांची शुध्दत्वता असेल त्या अवधीत सत् तुमच्याप्रत असेल. परंतु ज्या अवधीत तुमची वैचारिक स्थिती गढूळ असेल त्या अवधीत सत् बाजूला सरकते.
आम्ही मानवाला दुर्गुणी म्हणणार नाही, कारण सताने त्याची या स्थितीत उपलब्धता केली आहे. ती दुर्गुणी होण्यासाठी नाही. मानवाची वैचारिक स्थितीच मानवाला दुर्गुणी होण्याकरिता कारणीभूत होत असते. म्हणून मानवाने वैचारिक स्थिती पूर्णत्व शुध्द ठेवली पाहिजे.
मानवाने कसे राहिले पाहिजे?
स्थिती चांगली असो अगर वाईट असो ती सताजवळ उघड केली पाहिजे. अंतर्मय स्थितीत ठेवल्यानंतर कर्तव्य होणार नाही. तुमची अंतर्मय स्थिती स्वच्छ राहिल्यानंतर सत् त्या ठिकाणी वास करून राहील.
आपुली अंतर्मय स्थिती गढुळ केंव्हा होते?
आचार म्हणू कि विचार म्हणावे?
आचार दिसतात विचार दिसत नाहीत. वाईट विचार अंतर्मय स्थितीत राहिल्यानंतर अंतर्मय स्थिती गढुळ होते. आचाराने तुम्ही कर्तव्य करीत असता; ते सर्वस्वांना दिसत असते. पण तुम्ही विचार करीता ते कोण पाहू शकेल?
अंतर्मय स्थिती गढूळ झाल्यानंतर सत् बाजूला सरकते. मग तुमचे विचारही बिघडतात अन् आचारही बिघडतात. मानवाची स्थूल स्थिती होऊन त्याला कर्तव्याची जाण रहात नाही अन् मानव आळशी होतो.
म्हणून प्रणव देतो मनन स्थिती शुध्द ठेवा. त्याकरीता प्रथम तुमचे विचार शुध्द ठेवा. जेंव्हा तुमच्या मनन स्थितीत विचारांची शुध्दत्वता असेल त्या अवधीत सत् तुमच्याप्रत असेल. परंतु ज्या अवधीत तुमची वैचारिक स्थिती गढूळ असेल त्या अवधीत सत् बाजूला सरकते.
आम्ही मानवाला दुर्गुणी म्हणणार नाही, कारण सताने त्याची या स्थितीत उपलब्धता केली आहे. ती दुर्गुणी होण्यासाठी नाही. मानवाची वैचारिक स्थितीच मानवाला दुर्गुणी होण्याकरिता कारणीभूत होत असते. म्हणून मानवाने वैचारिक स्थिती पूर्णत्व शुध्द ठेवली पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा