शुक्रवार, १२ जून, २०२०

मानवाच्या मनाची शुध्द गती-प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                            मौलिक ठेवा
                            🙏🙏🙏
मानव मनाच्या शुध्द गतीने कृतीमान असला पाहिजे. शुद्ध गती म्हणजे कोणती स्थिती? असा प्रश्न सर्वस्वांना पडणे स्वाभाविक आहे.

तर शुध्द गती म्हणजे मनाची शुद्धता असणे गरजेचे आहे. म्हणजेच मनामध्ये कोणत्याही प्रकारची विकल्पता असता कामा नये, कोणाबद्दल ही शंका असता कामा नये. शंका-कुशंका मनामध्ये आली की मन स्थिर राहू शकत नसल्याने, मनाची स्थिती कशी होत असते? तर दोलायमान, अस्थिर. अशा स्थितीमुळे मन चलबिचल होऊ लागते. मनामध्ये ना-ना त-हेचे चुकीचे विचार येऊ लागतात व मानव सत् मार्गापासून, सन्मार्गापासून भरकटला जातो. अशावेळी तो संपूर्णपणे मायेच्या अधीन जातो. सताचा त्याला विसर पडतो. जे शुभलक्षण नव्हे.

म्हणूनच बाबा म्हणतात, "मानवाची कृती नितीमत्तेची असेल तर त्याला दुःखाची झळ जास्त लागणार नाही, त्याला सुखच जाणवेल. म्हणजेच ब-याच गोष्टी ह्या त्याच्या मनाप्रमाणे घडू लागतील, ज्याला सुख असे म्हटले जाते.
अशा मानवाला सुखाचीच जाण जास्त जाणवेल. 

पण त्याची कृती जर हीन असेल, त्याचे अशुद्ध विचार असतील, त्याचे अशुद्ध वागणे असेल, त्याच्यामध्ये अहंकार भरलेला असेल, पूर्णतया स्वार्थ भरलेला असेल, मग अशा मानवांना सुख मिळू शकेल का? अशी बाबा आपल्याला विचारणा करीत आहेत. पुढे सद्गुरू माऊली म्हणते, त्यांना जे सुख मिळेल ते क्षणिक मिळेल. 

पण नीतीमत्तेने चालणा-या मानवांना जे सुख मिळते ते परामानंदाचे सुख मिळत असते. शुध्दबुध्दीने, समत्वाने जर तुम्ही सगळीकडे पाहिलेत तर तुम्ही स्वतःच यातून निभावून जाल. 

भगवंतानी सांगितले आहे की, हे मानवा ! तू जर हे सुखदुःख समत्वतेने सगळीकडे पाहशिल, तर तू स्वतःच स्वतः होशिल, म्हणजे *"अहंम् ब्रम्हास्मी"* 

याचा अर्थ - अहं म्हणजे मी आणि ब्रम्ह + असी यांचा संधी म्हणजे ब्रम्हास्मी हा शब्द होय. याचा अर्थ मीच ब्रम्ह आहे. 

यामध्ये *मी* मूर्त मानव आणि *ब्रम्ह* म्हणजे अमूर्त शक्ती. याचाच अर्थ मूर्तामध्ये अमूर्त किंवा सगुणामध्ये निर्गुण, आकारामध्ये निराकार यांचा जेव्हा संगम होतो, त्याचवेळेस ही स्थिती होत असते. ती म्हणजे *_अहं ब्रह्मास्मि_*

पण त्यासाठी सगळीकडे समत्वतेने पहाण्यासाठी मानवाच्या मनाची ठेवण किती उच्च व्हायला पाहिजे?
..अनगड (श्री सद्गुरू माऊलींच्या चरणाचा पाईक)......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: