शुक्रवार, १२ जून, २०२०

माया - प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा
                       मौलिक ठेवा

मानव कोणत्याही प्रकारचा विचार करताना, हे माझे, ते माझे अशाच पध्दतीने विचार करीत असतो. तो माझे या खेरीज दूसरा विचार करत नाही. 

कां बरे तो असा विचार करीत असतो?

ह्याला कारण ती माया. माया कुणाला सुटली आहे कां? ह्याचे उत्तर पाहिले तर असे दिसून येईल की ती कुणालाही सुटलेली नाही. खरंच आहे ते. भगवंत म्हणतो मला देखील ती सुटलेली नाही. मग जर ती भगवंताला सुटलेली नाही, आपण तर शुद्र मानव. आपल्याला देखील ती कशी सुटेल? खरंय ना. अगदी खरंय. शंभर टक्के खरंय.

पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे भगवंत जरी म्हणत असले की मला देखील माया सुटलेली नाही, तरी ती कोणती माया? याचा आपण विचार करावयास हवा.

आता आपण म्हणू माया म्हणजे माया. ती एकच प्रकारची तर असते?

तर नाही. आपण इथेच तर गफलत करतो. आपल्यासाठी माया ही एकच प्रकारची असते. परंतु भगवंत म्हणतात, ती दोन प्रकारची असते.......
(अनगड - श्री सद्गुरू माऊलींच्या चरणाचा पाईक). क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: