*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
मानवाचे मन!
प्रथम मानव देह, देहानंतर आत्मा येणे जीवात्मा! जेंव्हा पंचमहाभूतांचा पुतळा देह होतो, उपलब्ध होतो तेव्हा जीवात्मा त्यात प्रवेश करतो.
देह, आत्मा येणे जीवात्मा, जीवात्म्याने देहात प्रवेश केल्यानंतर त्या जीवात्म्यापासून येणे आत्म्यापासून कोणती स्थिती निर्माण होते? आत्म्यापासून कोणती स्थिती तर मन. अन मनापासून बुद्धि .
आत्मा सतशुध्द परब्रम्हापासून प्राप्त झालेला आहे. अन त्यात आत्म्यापासून मनाची उपलब्धता. परंतु मन मानवाला कसे असते तर तारक असते, मारक नसून, साधक असते अन बोधकही असते.
मनापासून मानवाला बुद्धिची स्थिती प्राप्त होते. तीच बुध्दी सत स्थितीने गेली तर मानव परब्रम्हात जातो. परंतु तीच स्थिती अयोग्य स्थितीने गेली तर मानव सतापासून दूर जातो. बुध्दीमुळे कर्तव्य परायणता साधतो. बौद्धिक स्थिती नसेल तर मानव कर्तव्य परायणता साधु शकेल का? अन कर्तव्य परायण झाल्याविणा मानवाची स्थिती उपलब्ध होईल का?
तुमचा देह नुसता देहच आहे का? त्याला इंद्रिये आहेत. इंद्रियांची हालचाल झाल्याविना देह पूर्णत्व होईल का? नाही.
जी बौध्दिकता तुमच्याजवळ असते त्या बौध्दिकते नुसार इंद्रियांची कर्तव्यत: असते. बौध्दिक स्थिती सत स्थितीने गेली तर कर्तव्य सत स्थितीनेच होतील. परंतु तीच बौद्धिक स्थिती असत् स्थितीने जाईल तर इंद्रियांची कर्तव्यें देखिल असतच होतील.
मानवाला जे मन दिलेले आहे त्या मनावर कोण ताबा मिळवू शकेल? तर सद्गुरू! सदगुरुविना मानवाला शांत करणारे तत्व इतरत्र कोणीही होऊ शकत नाही. सदगुरु तत्वच मानवाच्या मनावर ताबा घेऊन त्याला स्थिर, शांत, भक्तियुक्त करु शकते.
सेवेकऱ्याला सदगुरु पूर्णत्व सानिध्यात घेतात, अन ज्ञानार्जनही करतात. त्यामुळे सेवेकरी सदगुरुमय होतो. प्रथम ज्योत सदगुरुमय झाली नाही तर ती सतमय कशी होऊ शकेल?
सताचा राजमार्ग सदगुरुच दाखवतात. येणे सदगुरु आणि सेवेकरी यांची मनन स्थिती एकलय होते. ही एकलयता साधली तरच मानवाचे मन स्थिर, शांत होऊ शकेल.
सदगुरु अन सेवेकरी यांचे नाते अतूट असतें. अन दोघांचीही स्थिती प्रेममय असते. यामुळे मनाची शुद्धत्वता होते. मन शांत होते. सेवेकऱ्याचे मन सदगुरु चरणाप्रत असेल तर ते तारक असते, बोधक असते. पण चंचल असेल अर्थात सदगुरु चरणांपासून दूर असेल तर ते मारक असते. अन त्यामुळे भक्ति म्हणजे काय हे मानवाला कळत नाही.
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*
*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*
मानवाचे मन!
प्रथम मानव देह, देहानंतर आत्मा येणे जीवात्मा! जेंव्हा पंचमहाभूतांचा पुतळा देह होतो, उपलब्ध होतो तेव्हा जीवात्मा त्यात प्रवेश करतो.
देह, आत्मा येणे जीवात्मा, जीवात्म्याने देहात प्रवेश केल्यानंतर त्या जीवात्म्यापासून येणे आत्म्यापासून कोणती स्थिती निर्माण होते? आत्म्यापासून कोणती स्थिती तर मन. अन मनापासून बुद्धि .
आत्मा सतशुध्द परब्रम्हापासून प्राप्त झालेला आहे. अन त्यात आत्म्यापासून मनाची उपलब्धता. परंतु मन मानवाला कसे असते तर तारक असते, मारक नसून, साधक असते अन बोधकही असते.
मनापासून मानवाला बुद्धिची स्थिती प्राप्त होते. तीच बुध्दी सत स्थितीने गेली तर मानव परब्रम्हात जातो. परंतु तीच स्थिती अयोग्य स्थितीने गेली तर मानव सतापासून दूर जातो. बुध्दीमुळे कर्तव्य परायणता साधतो. बौद्धिक स्थिती नसेल तर मानव कर्तव्य परायणता साधु शकेल का? अन कर्तव्य परायण झाल्याविणा मानवाची स्थिती उपलब्ध होईल का?
तुमचा देह नुसता देहच आहे का? त्याला इंद्रिये आहेत. इंद्रियांची हालचाल झाल्याविना देह पूर्णत्व होईल का? नाही.
जी बौध्दिकता तुमच्याजवळ असते त्या बौध्दिकते नुसार इंद्रियांची कर्तव्यत: असते. बौध्दिक स्थिती सत स्थितीने गेली तर कर्तव्य सत स्थितीनेच होतील. परंतु तीच बौद्धिक स्थिती असत् स्थितीने जाईल तर इंद्रियांची कर्तव्यें देखिल असतच होतील.
मानवाला जे मन दिलेले आहे त्या मनावर कोण ताबा मिळवू शकेल? तर सद्गुरू! सदगुरुविना मानवाला शांत करणारे तत्व इतरत्र कोणीही होऊ शकत नाही. सदगुरु तत्वच मानवाच्या मनावर ताबा घेऊन त्याला स्थिर, शांत, भक्तियुक्त करु शकते.
सेवेकऱ्याला सदगुरु पूर्णत्व सानिध्यात घेतात, अन ज्ञानार्जनही करतात. त्यामुळे सेवेकरी सदगुरुमय होतो. प्रथम ज्योत सदगुरुमय झाली नाही तर ती सतमय कशी होऊ शकेल?
सताचा राजमार्ग सदगुरुच दाखवतात. येणे सदगुरु आणि सेवेकरी यांची मनन स्थिती एकलय होते. ही एकलयता साधली तरच मानवाचे मन स्थिर, शांत होऊ शकेल.
सदगुरु अन सेवेकरी यांचे नाते अतूट असतें. अन दोघांचीही स्थिती प्रेममय असते. यामुळे मनाची शुद्धत्वता होते. मन शांत होते. सेवेकऱ्याचे मन सदगुरु चरणाप्रत असेल तर ते तारक असते, बोधक असते. पण चंचल असेल अर्थात सदगुरु चरणांपासून दूर असेल तर ते मारक असते. अन त्यामुळे भक्ति म्हणजे काय हे मानवाला कळत नाही.

