गुरुवार, १४ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |* 2

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तूं  निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तूं स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

गुरुगीता कोणी कोणाला प्रणवाकृत केली आहे, तर महेशाने अंबेला प्रणवाकृत केली आहे. या गुरुगीतेत सदगुरुपदाची महती दिधलेली आहे. गुरु अन सदगुरु यामध्ये काही स्थिती आहे ना?

आपण सर्वस्व सेवेकरी मानवी स्थितीत आहात. आपुले गुरू किती आहेत अन सद्गुरु किती आहेत? आई, वडील, विद्यार्जन करणारे ते गुरू, ज्ञानार्जन करणारे ते सद्गुरू! पण मानवाच्या स्थुल देहातच काही गुरू वास करून आहेत. याची मानवाला कल्पना आहे का? मानवी स्थितीप्रमाणे माता गुरू, पिता गुरू, विद्यार्जन करणारे गुरू पण ज्ञानार्जन करणारे ते सदगुरु! त्यांना गुरू म्हणता येईल का?

परंतु मानवी देहात जे पाच गुरू आहेत त्याची मानवाला कल्पना आहे का? आपणास पदोपदी प्रणव मननतेत बिंबवले पाहिजेत. तुमच्या स्थुल देहात जो राम आणि जे सत आहे, जे सद्गुरू आहेत ते तुम्हास पहाता आले पाहिजेत. सद्गुरूंनी स्थुलात असताना हे कर्तव्य केले, ते तुम्हांस सताचा अर्थात सद्गुरूंचा वास आपल्या देहात कसा आहे हे दाखविण्याचे कर्तव्य सदोदित करीत होते अर्थात तो त्यांचा अधिकार होता. मग आपल्या देहातील पाच गुरूंकडून अर्थातच या पंचमहाभूतांनाकडून आपण काय स्वीकृत केलेत.

पंचमहाभूतांपासून देह बनला पण देहापासून बुद्धि कदापीही नाही. ती बुध्दी आत्मस्थितीपासून प्राप्त होते. या पंचमहाभूतांपासून आपण एकच स्थिती प्राप्त करु शकता अन ती म्हणजे संयमन! संयमाने मानव पूर्णत्वाने ज्ञान ग्रहण करु शकतो. अन ज्ञान ग्रहण केल्यानंतर पुढील स्थिती प्राप्त होते.

ज्ञानार्जन मानवाला कोणापासून प्राप्त होते ? तर सद्गुरूंपासून ज्ञान मानवाला प्राप्त होते. जोपर्यंत सत, परब्रह्म, सद्गुरु मानवास जवळ घेत नाही, सर्वस्व स्थितीने शुद्धत्व करीत नाही तोपर्यंत मानव अज्ञानी असतो. ज्या अवधीत सद्गुरु सेवेकऱ्याला आपणाप्रत घेतील, आपले बहुमोल प्रणव प्रदान करतील, अन षडरिपूच्या वलयाने वेष्टीलेल्या मनाला शुद्धत्व करतील त्यावेळीच तो ज्ञानार्जन करु शकेल. अन हे सर्वस्व सद्गुरुविना कोणीही करु शकणार नाही.

मानवाची स्थिती चलबिचल का होते? कारण तो सद्गुरूंच्या प्रणवांचे मनन पूर्णत्वाने करत नाही. मानव संयमतेने, एकनिष्ठ श्रध्देने सद्गुरु चरणाप्रत लीन राहिला तर तो मानव सद्गुरूंपासून दूर जाणार नाही. परंतु मन अस्थिर झाले तर मात्र तो सद्गुरूंपासून दूर जातो. म्हणून मानवाने मन सदोदित सद्गुरु चरणाप्रत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मंगळवार, १२ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तू निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तू स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला वर्तवित आहेत, "ॐ" नमोजी येणे ॐकारा तुजला माझा पूर्णत्व नमस्कार असो.

कल्पदृम म्हणजे कल्पनाही करता येणार नाही असे! असे हे सदगुरु परब्रम्ह आहेत. आपण कल्पनाही करु शकणार नाही. परब्रम्हाची आपण कल्पना करु शकतो का? नाही. महेश आपल्या अंबेला प्रणव देत आहेत, *"हे अंबे, सदगुरु तत्व, परब्रह्म तत्व असे आहे कि त्याची आपण कल्पना करु शकणार नाही. अन अशा या ॐकाराना माझा पूर्णत्वाने नमस्कारअसों"*

आपणास याची कल्पना आहे, महेश तत्व असे आहे? भोळे अन तप्तही आहे, परंतु पूर्णत्व सदगुरुमय तत्व आहे.

महेशानी पूर्णत्वाने सताची, परब्रम्हाची, सदगुरूंची जाणीव घेतली होती. भोळे असूनही या भूतलाचे कर्तव्य करीत होते. अन अशा तत्वाने आपल्या अंबेला येणे पत्नीला पूर्णत्वाने प्रणव दिले, "प्रथम ॐ आहे अन त्यातून आमची आकारणी झाली आहे अशा या ॐकारमय स्थितीला, ॐकाराना आमची सदैव, सतत नमस्कार स्थिती आहे."

अशा या सदगुरु परब्रम्हाची आपण कल्पनाही करु शकणार नाही असे महेश आपल्या पत्नीला विवरण करून सांगत आहेत.

आपण जाणताच सदगुरु साकारमय स्थितीत असताना अन सताने येणे सदगुरूंनी पूर्णत्व प्रस्थापित केले असताना मानवाची स्थिती कशी होत असते? चलबिचल स्थिती होते ना!

सदगुरूंनी सांगितल्याप्रमाणे मानवाने अर्थातच सत सेवेकऱ्यांनी आचरण ठेवले पाहिजे. त्यांच्या अनुसंधनाने वाटचाल केली पाहिजे. अर्थातच सदगुरूंच्या प्रणवांची मननता केली पाहिजे.

आपणा सर्वस्व सत सेवेकऱ्याना मानवी स्थिती प्रमाणे ही गुरुगीता प्रणवाकृत केली होती. त्यावेळी सत स्वयम येणे सदगुरु स्थुलात होते. सदगुरूंनी अर्थातच सताने येणे साक्षात परब्रम्हाने स्थुल देह धारण केलेला होता. अन मानव येणे सत सेवेकरी देखील स्थुलातच होते, स्थुल देही होते. सदगुरूंना आपणास या गुरुगीतेची मानवी स्थिप्रमाणे कल्पना दिधली. सताने अर्थात स्थुलदेही सदगुरूंनी आपणास दिधलेले प्रणव आपल्या मननतेत राहिले नाहीत.

रविवार, १० जून, २०१८

Vachane


*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

अंबा तापट होती, कर्तव्यासाठी हट्टाग्रही होती. स्वयंभू सतत नामस्मरणात लय राहायचे अन ज्यावेळी समाधीस्थ स्थितीतून उतरतील तेव्हाच ती त्यांना प्रणव देउ शकत असे. म्हणूनच ती प्रणव प्रस्थापित करीत  आहे, तुम्ही जे सतत ध्यानमय स्थितीत राहून परब्रम्हाचे दर्शन आपण घेत आहात ते मजला प्राप्त व्हावयास हवे.

महेश अंबेला सांगत आहे, *"तू मन सतशुध्द कर, परब्रम्हाची जाण घेतलीस तर तुला ते पूर्णत्व प्राप्त होईल."*
सत आपणाला सदोदित प्रणव देत होते, *" मन शुद्ध करून सताला पहाण्याची स्थिती करा."

* मानव सताप्रत पूर्णत्व स्थितीने राहिले तर मननतेला अवधी लागत नाही. मानवी मनाची स्थिती स्थिर नसल्याने मननतेला अवधी लागतो. परंतु मन सताप्रत स्थिर राहिल्यानंतर अवधिची आवश्यकता नाही.

सताने या पृथ्वीतलावर दृश्यत्वता प्राप्त करून संसारयुक्त स्थिती करून तुम्हासही आपणाप्रत घेऊन परब्रम्हास प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग साध्य करून दिधला. तुम्हास सत प्राप्त झाले, येणे सद्गुरू प्राप्त झाले तर राजमार्ग साध्य झाला. राजमार्गाने सेवेकऱ्याने वाटचाल केली तर परब्रम्हाची जाण प्राप्त होईल. अन तदनंतर तो भवसागरातून मुक्त होईल. जर मानव स्थिर झाला तर कशाचीही कमतरता भासणार नाही. शारिरीक स्थितीची नाही, ज्ञानाची नाही, सौख्याची नाही, सुखाची नाही कशाचीही कमतरता मानवाला वाटणार नाही. सत राजमार्ग साध्य करून देते परंतु मानवाला आक्रमिता येत नाही.

आम्ही आपणास सर्वस्वाना सदोदित प्रणव देतो आद्यकर्तव्य करा, सदोदित नामस्मरणात रहा. नामस्मरणात राहिल्यानंतर मन सतशुध्द राहून स्थिर शांत रहाते. मन स्थिर शांत राहिल्यानंतर शरीर शांत रहाते. मग सेवेकरी नामस्मरण किती करीतो. देहाला स्थिर शांत ठेउन सेवेकऱ्याने नामस्मरण हे केलेच पाहिजे.

लक्षात ठेवा नाम हे मानवाला सोडून नाही, अन मानव नामाला सोडून राहूच शकत नाही. कर्तव्य करीत करीत मानवाने मनाने नामस्मरण केले पाहिजे. परंतु मानवाकडून एवढी स्थिती पूर्णत्व होत नाही.

सेवेकरी मनाची स्थिती जागृतमय करील तेवढी त्या सेवेकऱ्याची जीवनज्योत प्रज्वलित होईल. त्याचा प्रकाश तेजोमय होईल. तुमच्या अंत:स्थितील ज्योत नामस्मरणामुळे तेजोमय होईल. हे करण्यासाठी मन सतशुध्द ठेवा.

भवसागरातून आपणास पलीकडे जावयाचे असेल तर सदगुरूंची साथ हवी. सदगुरूंची साथ दृढनिश्चयी ठेवलीत तर तुम्ही परब्रह्माप्रत निश्चितपणे जाऊ शकाल.

शनिवार, ९ जून, २०१८

सत वचने


तरी दुर्लभ या त्रिभुवनात.....!!!

*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला प्रणव देत आहेत, *" तू तुझे मन शुध्द शुचिर्भूत करून पूर्णत्वाने मी  जे प्रणव देतो ते ग्रहण कर. मी जे प्रणव देतो ते त्रिभुवनातही दुर्लक्षित आहेत."*
असेच प्रणव सत तुम्हा सर्वस्वाना स्थानावरून येणे आसनावरून देत होते. सत तुम्हास पूर्णत्व स्पष्टीकरण करून सांगत होते. सदगुरुमय झाल्याविना तुम्हास ज्ञान प्राप्त होईल का? नाही.
जेंव्हा मानव सदगुरु सानिध्यात येतो तेंव्हा सत त्या मानवाची पूर्णत्व शुध्दीकरण स्थिती करीते. त्याच अवधीत तो मानव सतशुध्द होऊन सदगुरुमय होतो. त्यापूर्वी मानव चंचल अन द्विधा मनस्थितीत असतो. ज्या अवधीत सत तुमच्या शिरकमलावर हस्त स्पर्श करून अखंड नामाची गती प्राप्त करीते, त्या अवधीत तुमची स्थिती सतशुध्द अन सदगुरुमय होते. अन तदनंतर सत तुम्हास सताची पूर्णत्व जाण करून देते. जे अंबेने प्रणव स्वयंभूना दिधले, *"तुम्हीच माझे गुरू आहात, तुम्हीच मजला सताची जाण द्या"* तदनंतर हे प्रणव स्वयंभूनी अंबेला दिधले. अन आम्ही आपणास आपल्या सताची पूर्णत्वाने जी स्थिती या भूतलावर होती त्याचे प्रणव दिधले. परंतु समीकरण एकच आहे, ही जी स्थिती आहे ती कवण केलेली स्थिती आहे. *अन तुमची स्थिती प्रत्यक्ष सताने घडवून दिलेली स्थिती आहे.* अंबेने स्वयंभूना प्रणव देणे यापेक्षा अधिकाधिक आगळी वेगळी स्थिती सताने तुम्हास प्रदान केलेली आहे. अन त्याप्रमाणें जर तुमची कृतीमान स्थिती असेल तर तो सेवेकरी कसा होईल? तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही. अन सतही त्या सेवेकऱ्यापासून दूर राहणे शक्य नाही. सत तुम्हास प्रणव देत होते कि ही कलीयुगी स्थिती आहे. या कलीयुगी स्थितीत मोहमायेत जी स्थिती आहे त्यात अधिक न गुंतता तुम्ही सत नामस्मरणात पूर्णत्व लय होऊन रहा. अशी स्थिती केल्यानंतर सत येणे परब्रह्म तुम्हास दुष्टांतमय स्थिती देईलच देईल.
सताने सर्वस्व उघड स्थिती केली पण तुम्ही ते स्मरणतेत घेतले नाही. मानव मोहमायेत अधिकाधिक गुंतत गेला त्यामुळे तो सतापासून दूर गेला. पूर्णत्व सताप्रत राहण्यासाठी सेवेकऱ्याने कर्तव्यापुरते मायेचे कर्तव्य करून सतत नामस्मरणात राहिले पाहिजे. पण मानवाकडून अशी स्थिती होत नाही.
कर्तव्य करीत असतानासुध्दा मन नामस्मरणात गुंतून राहिले पाहिजे. लक्षात घ्या नाम तुमच्यात गुंतून आहे. नामाने तुम्हाला सोडले तर तुमचे स्थुल  स्थित्य रहाणार नाही. म्हणजेच नाम तुमच्यात गुंतून आहे पण आपण संसारमय स्थितीत आहात. संसार येणे स्वार्थ! अन हेच प्रणव महेश अंबेला देत आहेत. सताला संसार नाही का? तुम्ही हाच सताचा संसार आहे. पण सत तुम्हात गुंतून राहिले नाही. तुम्हास ज्ञानोपदेश करीत, तुम्हास सतशुध्द करीत, तुम्हास सतभक्तिची पूर्णत्व जाण देत स्वयंम परब्रम्हाचे कर्तव्य करीत होते.

गुरुवार, ७ जून, २०१८

ईश्वर म्हणे वो देवी......

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

भक्त भगवंताप्रत का येत असतो? तर ज्ञानप्राप्तीसाठी आणि भक्तिसाठी भक्त सत चरणाप्रत येत असतो. आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत ज्ञानप्राप्तीसाठी जात होता.
भगवंतानी आपली सुख-दु:ख स्थिती ग्राह्य केली नाही तर आपली स्थिती चंचल होईल. भक्ताचे भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
सद्गुरू माऊलीने स्थुल रुप धारण केल्यानंतर सुख- दु:ख स्थिती भोगली कि नाही? पण तरीहि ते स्थिर, शांत, संयमी असायचे. पण तोच भक्त, थोडीशी दुर्मिळ स्थिती झाली तर चलबिचल होतो.
आपणास कल्पना आहे आमची कन्यका अहिल्या पतीच्या शापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? असे असून देखील आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होती ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हालाही सर्वस्वाची जाण होती. सर्वस्व स्थिती भगवंताने स्थुल रुप धारण करून स्थित्यंतरे कशी येतात त्याची स्वयम जाण सद्गुरूनी आपणास दिधलेली आहे.पण तरीही मानव विसरतो.

आपणास कल्पना आहे सुख आल्यानंतर मानव कालावधीची गणना करीत नाही. पण दु:ख आल्यानंतर मानव क्षणापासून सुरुवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत. थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर आपण चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आम्ही हे मान्य करीतो कि अपुले कर्तव्य आहे सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. परंतु हतबल होणे नाही. आपण सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लिनता ही ठेवलीच पाहिजे.
आपण सर्वस्व भक्त भगवंताचे आहात, सताचे आहात. त्या सताला तुमच्या सर्वस्व सुख-दु:खाची जाण आहेच. भक्ताची जर पूर्णत्व श्रध्दायुक्त स्थिती नसेल तर? लिनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम नसेल तर? भगवंत भक्तात लय होणार नाहीत. भक्ताचे भगवंतावर अपरंपार, नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होणारच. जेथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील.
म्हणून भगवंत भक्ताप्रत राहण्यासाठी या सर्वस्व गुणांची आवश्यकताआहे. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. लक्षात ठेवा विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते.

मंगळवार, २० मार्च, २०१८

गुरू गुह्य

सत ज्या अवधीत तुम्हांस आपणा प्रत घेत होते त्या अवधीत तुमची मानवी स्थितीप्रमाणे पूर्णत्व सतशुध्दताच करीत होते नां?

मोह आणि माया या सद्गुरूंपासून दूर नेणा-या आहेत.

आरती येणे कोणती स्थिती तर नाम.

सद्गुरूंसमवेत नामामुळेच जाऊ शकतो.

अंत:करणापासून सद्गुरू चरणी केलेली विनंती याला आपण सेवेकरी प्रार्थना म्हणतो.

प्रार्थना आणि विनंती :

प्रार्थना म्हणजे परात्पर, क्षराक्षर व चराचर याच्यात भरूनही अलिप्त असणा-या निर्गुण, निराकार व अविनाशी सच्छिदानंद तत्वाला नम्रतापूर्वक, एकाग्र चित्ताने केवळ दर्शन व सान्निध्य मिळविण्याकरिता नामाने आळविता येणे नाम प्रार्थना.

परब्रह्माकडे म्हणजेच सताकडे सुखदु:खाची, मायेची निवेदने आपण देत असतो तसेच कष्टमय स्थितीतून सुटण्यासाठी व मनाला शांती मिळविण्याकरिता आपण जे प्रणव देतो तीच विनंती.

💐🕉💐🕉💐🕉💐🕉💐

शनिवार, १७ मार्च, २०१८

"फक्त ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

💐🌲💐🌷💐🌲💐🌷

"भगवत् भक्तीच्या उत्तमावस्थेत रत झाल्यानंतरच भगवंताच्या प्रेम पात्रतेचा अधिकार भक्तांला प्राप्त होतो. नुसतंच वाचक अभ्यासक व पांडीत्य किंवा ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

भक्तीप्रेम सुख नेणवे आणिका !
पंडीत वाचका ज्ञानियांसी !!

भक्तीचे व भक्तांचेही अनेक प्रकार आहेत. भक्ती कशीही असली तरी श्रेष्ठ व उत्तमच.

गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात,
"नामभक्ती तर सगळेच करतात पण अंतःकरणात जिव्हाळा व भगवंताविषयीच्या आंतरिक प्रेमाचा कळवळा नसेल तर हा नंदनंदन परमात्मा संतुष्ट व वश्य होऊन प्राप्त होत नाही."

!! राम राम सब कोई कहे,
   ठग ठाकुर और चोर !
!! बिना प्रे💓म रिझें नही,
   तुलसी नंदकिसोर !!
🙏🏻 🙏🌻🌹

बुधवार, १४ मार्च, २०१८

*आनंद सागरात प्रेमे बूडी दिधली |* *लाभले सौख मोठे, नये बोलता बोली||*2*

सताने आपणा सर्वंस्वाना स्वयंस्थितीत घेतले. अन आपुले कर्तव्य यथायोग्य केले. परंतु सेवेकऱ्याकडून ती स्थिती पूर्णत्व होत नाही. राजमार्ग सताने आपणास प्रदान केलेला आहे पण तो राजमार्ग कसा आक्रमीता येईल हे तुम्हास अवगत नाही. एकदा का सताने प्रणव दिधला, त्या प्रणवात पूर्णत्व मग्न होऊन जो कर्तव्य करीतो त्याच्याकडून असे प्रणव येणार नाहीत. परंतु कलीयुगी स्थिती हेच प्रणव आपणाकडून मजला मिळतात. लक्षात घ्या कलीयुगातच सत कर्तव्य करीत होते. सताच्या प्रणवात कधी कमतरता होती का? एकदा का सताने प्रणव दिधले ते पूर्णत्व सिध्द होईलपर्यंत सत कधी शांत राहिले नाही. अशा सताचे आपण सेवेकरी आहात. राजमार्ग आपणास दिधलेला आहे. अन त्याची आक्रमिता आपणास करावयची आहे. याकरीता प्रथम मानवाची मती शुद्ध पाहिजे. शुद्ध मतीने, आचार, विचार येणे वृत्ती! मनापासून ज्याची वृध्दी होते ती कोण तर बुध्दी! जर ती शुध्द असेल तर सताने दिधलेला राजमार्ग आपण आक्रमित जालं. पण बुध्दीच जर शुद्ध नसेल तर कसे होईल. अनेक अडचणी येतील. म्हणून सत प्रणवाप्रमाणे सेवेकऱ्याने आपली बुध्दीमत्ता, मननता, मन कसे ठेवले पाहिजे? सतशुध्द ठेवले पाहिजे. पहा मन सतशुद्ध असेल तर सर्वसे सतशुध्द आहे. त्या मन सतशुध्द्तेतून बुध्दीची स्थिती होते. अन त्याप्रमाणे जर मानव कर्तव्य करु लागला तर त्याला कोठेही अडचण येणार नाही. आपण माझ्या सताचे सेवेकरी आहात, ते सतशुध्दतेनेच गेले पाहिजे.