सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

*नामदेव महाराज*

नामदेव समाजाच्या गतीने शिंपी होते. घरचे सुखी होते. त्यांचे माता पिता विठ्ठलांचे नि:सीम भक्त होते. त्यामुळे विठ्ठलांनी नामदेवाला त्यांच्या घरी पाठवले.

त्यांचे वडील परप्रांतात गेले. त्यांची रूढी होती कि रोज विठ्ठलाला भोजन अर्पण करून मगच आपण जेवायचे. ते काम नामदेवाजवळ दिले. त्याला वाटे विठ्ठलांनी भोजन करावे. त्याना एकदा विठ्ठलाजवळ नेले. तेथे त्याना फार उशीर झाला. नामदेव म्हणाले " मी जेवण आणले ते तू का जेवत नाहीस." अन् म्हणाले, "विठ्ठला तुम्ही जेवला नाहीत तर मी इथे डोके आपटून जीव देईन."

तेव्हा विठ्ठलाने लाघवी नटवून भोजन केले. घरी आल्यावर त्याच्या आईला खरे वाटेना. वडील आल्यावर आईने त्यांना सांगितले, " नाम्या ताट रीकामा आणित असे."

वडीलांनी विचारले भोजन तू काय केलेस? खरे खोटे पहाण्यासाठी त्यांनी गुपचूप पहाण्याचे ठरविले व नाम्या जवळ भोजनाचे ताट दिले.

नाम्या म्हणाला "विठ्ठला तू जेव" विठ्ठल जेवला. त्यावेळी वडीलांनी नाम्याला धन्यवाद दिले. शेवटी तोच नामदेव 5 (पाच) वर्षाचा असताना, विठ्ठलांना जेवणास भाग पाडणारा पुढे संगतीने दरोडेखोर बनला.

पण पूर्व जन्माची ती सात्विक ज्योत होती. जरी दरोडे घातले तरी आवडया नागनाथाला नैवेद्य दाखवायचा.

नामदेव पंचक्वान्नाचे ताट घेऊन गेला त्याच वेळी एक गरीब आई व मुलगा ते भोजन पाहू लागली. नाम्याने ते भोजन मुलाला दिले.

दरोडेखोरांनी माझ्या नवर्‍याचा वध केला हे बाईचे शब्द ऐकून नाम्या विचारात पडला. कारण तो सत् होता. त्याच्या डोळ्यात अंजन पडल्याप्रमाणे झाले व त्याना रोज येण्याची मुभा दिली. अन् म्हणाला मी अत्यंत पापी आहे. असे म्हणून तो लिंगाला म्हणाला माझी सुटका करा अन् स्व:चा खंजीर काढून रक्त दिले. त्याला मुर्चा येऊन तो देवळात पडला. तेव्हा तेथे ब्राम्हण आले व त्यांनी पाहिले. नाम्याला उचलून बाहेर टाकले.

नवनाथ म्हणाले "तू ज्याला जेवण दिलेस त्यांनी तुला दृष्टांत दिला कि तू महत् पापी आहेस. तू येथे दिंडीला येऊ नकोस." तेव्हा त्याला फार वाईट वाटले.

माझ्यामुळे इतरांना आदेश नाही. त्यानी एक विठ्ठलाला पत्र लिहिले. ते वाचून विठ्ठल हेलावले. त्यात होते "मी अत्यंत पापी आहे. मी तुमचा नेम विसरणार नाही. पाच वर्षांचा असताना माझ्या हातचे जेवण तुम्ही केलेत. पण मी आता तुम्हाला तोंड दाखविणार नाही."

शेवटी त्याना भरून आले. विठ्ठलांनी जाणीव दिली तुला आता क्षमा आहे. तू दर्शनाला येऊ शकतोस. त्याला पश्चाताप झाला. तोच नामदेव विठ्ठलांचा भक्त झाला.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

*देही देखीली पंढरी । .....3

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

"अवघाची संसार सुखाचा करीन । दावीन तिन्ही लोकी ।।"

असे संतानी म्हटले आहे. खऱ्या भक्ताला आपल्या प्रपंचाची काळजी नाही. सत्य आपल्या संसारात स्थिर होण्यासाठी प्रथम आई वडील सत्याने वागणारे पाहिजेत. सत्याचे पालन झाले पाहिजे.

सत्पद म्हणजे दयाघन! ते कुणाला बोलणार नाहीत, तरीपण मानवांनी आपले आचरण सत् ठेवले पाहिजे.

चोख्याला विठ्ठलाशिवाय दूसरे काही माहित नव्हते. चोख्याने जाणले होते कि सत्यामुळे आदर मिळतो. सत्य टिकविले पाहिजे. सत्य हेच ईश! मायावी मन स्थिर राहणार नाही.

मानव हा क्षणभंगुर आहे. क्षणिक लोभासाठी मनुष्य पापे करतो. पण त्याला सुख शांती मिळत नाही. असत् कधीही स्थिर राहणार नाही.

मन हे मोक्षाप्रत नेणारे आहे. जगात कोणी महान किंवा मोठा नाही. संचिताप्रमाणे होत असते. गरीबी आली तर नाराज न होणे, श्रीमंती आली म्हणून हुरळून जाऊ नये.

समर्थ म्हणतात, "अमीरी ही चंचल आहे. श्रीमंत लक्ष्मी असते. मी गरीबीत असतो. मी कोणीही नाही. माझ्याकडून करून घ्या."

सद्गुरूंचे आदेश पाळा. समर्थ शक्तिपूढे मानवाचा ठाव लागणार नाही. सद्गुरु हे अत्यंत लाघवी आहेत. तुम्ही कोठेही असला तरी समर्थांचे ध्यान करा. त्यांची आठवण ठेवल्यावर मालिक सुध्दा म्हणतात कि, "माझे सेवेकरी मला विसरणार नाहीत."

सत् हे सर्व काही पुरवित असते. जन्म झाल्यावर आईच्या रक्ताचे दुधात रूपांतर सतच करते.

मनुष्य कर्माने दरिद्री होतो.

गर्वापासून आणलेली जी संपत्ती ती गर्वसंपत्ती.

विश्वव्यापी तेच परमेश्वर, पांडुरंग. तेच चोख्याला सर्व काही देत होते. सत् संपत्ती कुणी लुटली तरी संपणार नाही. ती कुणी लूटणार नाही.

"पांडुरंग म्हणजे शुभ्रप्रकाश! सद्गुरूंचा शुभ्र प्रकाश असतो."

प्रत्यक्ष चोखा आपल्या मुखाने म्हणत असे. शांती हि त्याची निजागंना म्हणजेच अर्धागिंनी आहे. तीच रुक्मिणी आहे. शांती असावी म्हणजे तृप्ती.

आकारले तितके नाशे. आपली दृष्टी नष्ट झाली तर सर्वस्व नष्ट होते. डोळे निर्माण होतात. बंद केले कि जाणीव होत नाही. पण त्यात जो प्रकाश मिळतो त्यातच सद्गुरु उभे असतात. त्यांच्या आदेशाप्रमाणे चालले पाहिजे.

मानव हा क्षणभंगुर आहे. सद्गुरूंची भक्ति परमश्रेष्ठ गतीची आहे. समर्थांनी कस घ्यायला सुरुवात केली म्हणजे ते त्याला नाचतात.

" हे भगवंता तुझ्या सत्तेने वेद बोलतात. सूर्य तुझ्या सत्तेने चालतो. तू ब्रम्हांडाचा धनी आहेस", असे नामदेव म्हणतो.

सद्गुरु तत्व ज्याने ओळखले तोच तहान भूक विसरतो. स्वार्थासाठी लाख उपद्व्याप केले कि पापाच्या राशी निर्माण होतात. मृत्यू गोलार्धात 83 लक्ष योनी आहेत.

सद्गुरूंना बनविणे म्हणजे महान अपराध आहे. सद्गुरूंनी शाप दिला तर त्याचे रक्षण करणारा कोणी नाही, असे स्वयंभू पार्वतीला सांगतात.

बी चांगले पेरले तर चांगले उगवणार. दृष्टी व कान यामध्ये चार बोटांचे अंतर आहे. त्याच चार बोटांनी मानव अधोगतीला गेले आहेत.

मालिक कस घेतात आपल्याला ह्याबद्दल आदर पाहिजे. माया, ममता, अहंकार यांना आदर न देणारा तोच माझा भक्त असे कृष्ण पार्थाला म्हणाले.

भगवंताबरोब मानव बरोबरी करू शकणार नाही.

"माया आपल्या बरोबर येणार नाही. अशाश्वत आहे तीच माया आहे."

चार चौकटीत म्हणजेच चार तत्वामध्ये सत् पदाने आहे तोच सेवेकरी आहे.

चोखा लीन, नम्र व शांत होता. तोच हा पांडुरंग जाणा । आपण जन्माला आल्यावर समर्थांना डोळे भरून पहा हिच खरी भक्ति. मनात शंका आणू नका.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

*देही देखीली पंढरी।आत्माअविनाशी विटेवरी ।।*

*देही देखीली पंढरी।आत्माअविनाशी विटेवरी ।।*
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी)

काही मानव म्हणतात कि, "माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत."

"वैकुंठनायक तेच समर्थ!"

आपल्या सद्गुरु कर्तव्यासाठी ह्या गोष्टीचा काही मतलब नसतो. ज्याने सृष्टीला उत्पन्न केले आहे त्याला आपण काय देणार? त्याला आपल्या शक्तिने काय अर्पण करणार? आपण आपली चुक सुधारली पाहिजे.

चोखा म्हणतो, "माझ्या देहातच पंढरी आहे व त्यात पांडुरंग आहे त्याला मी पाहत आहे."

आजकालचा मानव क्षणिक लोभासाठी लबाड्या करतो.

ज्या ठिकाणी सत्य आहे तेथे यश आहे. "यश ते पार्थां मीच जाण" असे कृष्ण अर्जुनाला म्हणाले. ज्या ठिकाणी मी आहे त्याठिकाणी यश आहे. समर्थांना पहाण्यासाठी आपले आचरण चोख्याप्रमाणे पाहिजे.

संसार म्हणजे सगुणाचे सार!

पण निर्गुण काय आहे ते ओळखावे. आपण आहात हे आपणाला कळले पाहिजे. प्रथम आपली भूमिका शुध्द असली पाहिजे. "पळसाला पाने तीन".

संसार नीटनेटका असेल तर पाच मिनिटे भक्तिला बसता येईल. गरीबी पत्करली तरी चालेल.

मला पत मिळाली तर ती सत्यामुळेच मिळाली. सत्य असल्यानेच सर्वस्व आहे. चोख्याने सत्य कधी सोडले नाही.

संतोष व समाधान पाहिजे. कर्ते करविते वेगळे आहेत. म्हणजे सत्य संकल्पाचा दाता आहे. तरच ते पांडुरंग उभे रहातात. समर्थ म्हणतात, "मला जे करून घ्यायचे ते मी घेणारच." मालिक म्हणतात, "तुम्ही कर्तव्यात रहा, माझे लक्ष आहे."

सताला अपयश आणण्यास कोणी पाहिले तर तसे होणार नाही. मालिक कस घेतात पण त्याला ते कधी कमी पडू देणार नाहीत.

संतांमध्ये स्वार्थ नव्हता. म्हणून भगवंत संतांची चाकरी पत्करीत होते. मनुष्य नेहमी मायेत चुकतो. माझे काही नाही. माझ्यासह हे समर्थांचे आहे. अविनाशी आत्मा अमर आहे. सत् आपल्या ठिकाणी असेल तर काही कमतरता नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

मन हे वारू.......!!!

मन हा असा वारू आहे, सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्यावरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?

मनावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही. केले नाही. करविता नाही. हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचि:र्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.

जय श्री सद्गुरू माऊली।

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची अमृत वाणी*

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

चोखोबा हा जातीने महार असून नितांत आदरणीय होता. त्याची कृती सत् व अभिमान रहित शुध्द अशी होती. तो म्हणे, "मला तुम्ही बनवले, तरी  विठ्ठलाला कुणी बनविणारे नाही."
चोखोबाची वर्तणूक निष्कलंक होती.

संत म्हणजे शांत, विठ्ठल म्हणजे चैतन्याचा गाभा! चैतन्याचा गाभा म्हणजे बाहेरील ज्योतीची निरज्योत. स्वात्म अनुभव घेण्यासाठी बालरूप घेतात. चित्घन चकचकीत हि-याप्रमाणे असतात.

पांडुरंग चोख्यासाठी सर्वस्व होते. कोणताही संत असला तरी त्याला सद्गुरुविना दर्शन नाही. विठ्ठलाशिवाय त्याला दुसरे काही माहित नव्हते. सद्गुरूंनी त्याला दर्शन दिले. त्याचा मूळ उद्देश नितांत भक्ति हा होता. शुध्द नितांत भक्ति हे उच्च पातळीचे ध्येय आहे. त्या भक्तिमध्ये कोणत्याही तऱ्हेचे तरंग निर्माण होऊ देऊ नयेत.

समर्थ कस पहातात. ती ज्योत ठामपणे आहे, निष्कलंक आहे कि मायावी आहे? तुम्ही श्रद्धेने आपल्या कर्तव्याने वाटचाल करा. ते अनंत व्यापक आहेत. अशा अनंतना सर्वस्वाची गती आहे.

कुणी निंदो वा वंदो आपला स्वहिताचा धंदा गमावता कामा नये. सद्गुरु तुमच्या पापसंचिताचा नाश करून तुम्हाला सत् पदाची ओळख करुन देतात.

आंधळ्याला ज्याप्रमाणे काठी त्याप्रमाणे भक्ताला सद्गुरु ही काठी आहे. ती ज्योत सताच्या आदेशा बाहेर नाही.

"आपण जे काही कर्तव्य करता, त्या कर्तव्यात असलेल्या काही मायावी ज्योतीना परब्रह्म म्हणजे पैसा वाटतो."

आपण जन्माला आल्याबरोबर आमच्या बरोबर काय असते? स्थूल संपत्ती नसून सत् किंवा असत् असते.

"सत् चित् झाले म्हणजे सच्चिदानंद होते."

काही मानव म्हणतात कि माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? तर आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत. वैकुंठनायक तेच समर्थ!
टायपिंग : श्री सुभाष भोसले

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी

आपले सद्गुरु आपल्याला ज्ञान देत असतात. परंतु ते ज्ञान प्राप्त करून देतांना सद्गुरु कधी श्रम हा प्रणव प्राप्त करीत नाहीत. तर ते प्रणव देतात हे माझे आद्य कर्तव्य आहे. सत् इतके श्रम घेऊन आपणास बोध प्राप्त करून देत असतात, मग तो बोध मानवाने परिपूर्ण ग्रहण केला पाहिजे की नको?

मी माझ्या सताला कसा बरे विसरू? अशी स्थिती कलीयुगी मानवाने सताप्रत केली तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही.

मानवी स्थितीप्रमाणे या कलीयुगी स्थितीत असत्य स्थितीसाठी सर्वस्व स्थिती मुक्त आहे. परंतु सत्य स्थितीसाठी अनेक अडचणी आहेत.

कारण हे  प्रथमपासूनच आहे. सत्य हे सत्यच आहे. ते कदापिही लोपत नाही आणि कितीही लोपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लोपून रहाणार नाही.

मानवाला जेंव्हा दु:खमय स्थिती प्राप्त होत असते तेव्हाच त्याला सताप्रत प्रणव देण्यास उसंत मिळते. जेंव्हा मानवाला दु:खमय येणे आफत स्थिती प्राप्त होते तेव्हा त्याला सताची आठवण करण्यास पूर्णत्वाने उसंत मिळते.

परंतु अशी स्थिती न करता दु:खातूनही आणि सुखातूनही सताला कधी विसरू नये. अशी जेंव्हा स्थिती होते तेंव्हा सत् त्या ज्योतीपासून कदापिही दूर जात नाही. सताला दूर कोण करीते? तर मानवच करीतो.

सत् मानवाला स्वयंम् स्थितीत घेण्याची स्थिती करीत असते. सत कधीही आपल्या सेवेक-याला अती कष्टात जाऊ देत नाही. परंतु सेवेकरी पूर्णाची स्थिती दुय्यम करून अती कष्टात जातो. सताने एकदा का प्रणव दिधले तर ते पूर्णत्व करण्यासाठी सत् पराकाष्ठा करीत असते. परंतु मानव अतीमायेच्या आहारी जाऊन स्थिती करीतो.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी

ज्याने अहंकार केला तो या भूतलावर कर्तव्य करू शकणार नाही. सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. अहंकाराचा नाश करा. रागाचा नाश करा. अहंकाराचा नाश केल्याविना तुम्हाला सत् प्राप्त होणार नाही.

ज्या अवधीत रागाची स्थिती होईल त्या अवधीत नामस्मरणाची स्थिती करणे. मग राग आपणापासून दूर जाईल. रागाने जो या देहाचा नाश करतो तो या भूतलावर सुक्ष्म गतीने अती दु:खमय स्थिती प्राप्त करून घेत असतो.

मानवाने लीनतेने राहिले पाहिजे. स्थानावरून सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. जो लीनतेने; शांततेने स्थितीत राहील त्याच्यापासून सत् कदापिही दूर जाणर नाही. मानवाने आचरण करताना प्रथम लीनता पत्करली पाहिजे. जरी कलीयुगी स्थिती असली तरी आपण सत् सानिध्यातल्या ज्योती आहात. लीनतेने आचरण होईल त्यावेळी आपण सताला ह्रदयस्थ स्थितीत साठवून ठेवाल. अहंभाव असेल तर सत् आपणाप्रत रहाणार नाही. म्हणून अहंमतेचा नाश करून लीनतेने स्वीकार करा. मनन स्थितीत जर समाधान युक्त स्थिती असेल तरच मनन स्थिती स्थिर राहील.

माया ही चीज किती गंभीर आहे, अन् ही माया मानवाला सतापासून दूर नेते. मायेत गढून गेल्यानंतर मानवाला कल्पना येत नाही. जी स्थिर, शांत माया आहे तीचा मानव विचारही करीत नाही. सत् आपणास पदोपदी प्रणव देत होते मायेपासून दूर रहा. माया चंचल आहे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

सोमवार, ३० जुलै, २०१८

अंतरंगी रंगूनी जावे....5

अतरंगी रंगुनी जावे .......

यत्किंचित माया पण मायेसाठी केवढ्या गडबडी. मायेकरिता रात्रंदिवस झोप सुद्धा लागत नाही. ही माया आपण घेऊन जाणे शक्य नाही. अरे आपले कवच सुद्धा आपल्याल्या नेता येत नाही, आदेश सुटल्यानंतर तेथेच टाकून जावे लागते मग माया काय येणार बरोबर?

पण कांही लोकांची जाणीव असते की माया म्हणजेच सर्वस्व. माया सतावू लागली की मग सदगुरूंचा शोध घेतात.

त्रास कधी होतो मायेत गुरफटल्यानंतर. तेंव्हा मायेत रममाण न होता सत चरणात रममाण व्हा. मायेरहीत आम्ही नाही, तुम्ही नाही आणि अनंत म्हणतात तेही नाहीत.

माझ्या भक्ताने टाहो फोडला मग मलाही धाव घ्यावी लागते. मग मी तरी माया रहीत आहे का ? पण आमची माया कशी आहे? सत माया! अन तुमची माया कशी आहे?

सताची माया कशी असणार तर सम बुद्धीने सगळी कडे पाहणार, अंतरंगाचे तरंग असे असतात. क्रमशः
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

रविवार, २९ जुलै, २०१८

*श्री गुरुदेव पितामह*

मानव कितीही गप्प राहिला तरी त्याच्या अंत:र्मय स्थितीची कल्पना आम्हास येते. अंत:र्मय स्थितीत सत् आहे. तुमच्या अंतर्मय स्थितीत जी काही स्थिती चालू आहे त्याची सताला परिपूर्ण कल्पना आहे.

मानवाने कसे राहिले पाहिजे?
स्थिती चांगली असो अगर वाईट असो ती सताजवळ उघड केली पाहिजे. अंतर्मय स्थितीत ठेवल्यानंतर कर्तव्य होणार नाही. तुमची अंतर्मय स्थिती स्वच्छ राहिल्यानंतर सत् त्या ठिकाणी वास करून राहील.

आपुली अंतर्मय स्थिती गढुळ केंव्हा होते? 

आचार म्हणू कि विचार म्हणावे?
आचार दिसतात विचार दिसत नाहीत. वाईट विचार अंतर्मय स्थितीत राहिल्यानंतर अंतर्मय स्थिती गढुळ होते. आचाराने तुम्ही कर्तव्य करीत असता; ते सर्वस्वांना दिसत असते. पण तुम्ही विचार करीता ते कोण पाहू शकेल?

अंतर्मय स्थिती गढूळ झाल्यानंतर सत् बाजूला सरकते. मग तुमचे विचारही बिघडतात अन् आचारही बिघडतात. मानवाची स्थूल स्थिती होऊन त्याला कर्तव्याची जाण रहात नाही अन् मानव आळशी होतो.

म्हणून प्रणव देतो मनन स्थिती शुध्द ठेवा. त्याकरीता प्रथम तुमचे विचार शुध्द ठेवा. जेंव्हा तुमच्या मनन स्थितीत विचारांची शुध्दत्वता असेल त्या अवधीत सत् तुमच्याप्रत असेल. परंतु ज्या अवधीत तुमची वैचारिक स्थिती गढूळ असेल त्या अवधीत सत् बाजूला सरकते.

आम्ही मानवाला दुर्गुणी म्हणणार नाही, कारण सताने त्याची या स्थितीत उपलब्धता केली आहे. ती दुर्गुणी होण्यासाठी नाही. मानवाची वैचारिक स्थितीच मानवाला दुर्गुणी होण्याकरिता कारणीभूत होत असते. म्हणून मानवाने वैचारिक स्थिती पूर्णत्व शुध्द ठेवली पाहिजे.

गुरुवार, २६ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद

आपला हा पंचमहाभूतांचा बनलेला देह आहे. आपल्या या देहात जवळ जवळ बहात्तर हजार नाड्या आहेत. त्यात प्रमुख बहात्तर. त्यावर तीन नाड्या: इडा, पिंगळा, सुषुम्ना. तीन नाड्या बहात्तर नाड्याना चेतना देतात आणि बहात्तर नाड्या बहात्तर हजार नाड्याना.

तीन नाड्याना चेतना देणारी एक नाडी आहे, तिला तुर्या म्हणतात. तुर्येकडून सूत्रे फिरली की सर्वस्व सूत्रे फिरतात. त्या तुर्येला सुद्धा चालना देणारे आणखी एक तत्व आहे. त्या तत्वाच्या इशाऱ्यावर तुर्या काम करत असते. पण ते तत्व मात्र अव्यक्त आहे. ते तुम्ही पाहिले पाहिजे अन त्यातच तुम्ही लय झाले पाहिजे.

अध्यात्माच्या वा योगाच्या सहाय्याने तुम्ही तुर्येप्रत जाऊ शकता पण पुढे जायला अडचणी येतात. तुर्या म्हणजेच बिंदू! कुणी त्याला ज्योत म्हणतात.

मग आता लक्षात घ्या या सर्व नाड्यांचा अधिपती तोच गणपती ! त्याच्या सत्तेने सर्वस्व व्यवहार होत असतात. सर्व नाड्यांकडून ते कर्तव्य करून घेत असतात. गजासुराचा वध करण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्मावतार घेईल असे शंकराला संदेश मिळाले होते. अन् त्या नुसार गणपतीचे अवतार कार्य घेऊन गजासुराचा वध केला.

गणपती गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. ते समत्व बुद्धीने सगळीकडे पहातात. ओंकार समत्व बुद्धीने पाहणारा आहे म्हणून महेशानी म्हटले आहे 'समता वर्तावी | अहमता खंडावी !' गणपतीची पूजा करताना अहंकार रहित होऊन पूजा करा तरच तो कृपादृष्टीने पाहिल.

समर्थ रामदास स्वामीने म्हटले आहे,

                  गणाधिश जो ईश सर्वां गुणांचा ।
                  मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक