सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

*नामदेव महाराज*

नामदेव समाजाच्या गतीने शिंपी होते. घरचे सुखी होते. त्यांचे माता पिता विठ्ठलांचे नि:सीम भक्त होते. त्यामुळे विठ्ठलांनी नामदेवाला त्यांच्या घरी पाठवले.

त्यांचे वडील परप्रांतात गेले. त्यांची रूढी होती कि रोज विठ्ठलाला भोजन अर्पण करून मगच आपण जेवायचे. ते काम नामदेवाजवळ दिले. त्याला वाटे विठ्ठलांनी भोजन करावे. त्याना एकदा विठ्ठलाजवळ नेले. तेथे त्याना फार उशीर झाला. नामदेव म्हणाले " मी जेवण आणले ते तू का जेवत नाहीस." अन् म्हणाले, "विठ्ठला तुम्ही जेवला नाहीत तर मी इथे डोके आपटून जीव देईन."

तेव्हा विठ्ठलाने लाघवी नटवून भोजन केले. घरी आल्यावर त्याच्या आईला खरे वाटेना. वडील आल्यावर आईने त्यांना सांगितले, " नाम्या ताट रीकामा आणित असे."

वडीलांनी विचारले भोजन तू काय केलेस? खरे खोटे पहाण्यासाठी त्यांनी गुपचूप पहाण्याचे ठरविले व नाम्या जवळ भोजनाचे ताट दिले.

नाम्या म्हणाला "विठ्ठला तू जेव" विठ्ठल जेवला. त्यावेळी वडीलांनी नाम्याला धन्यवाद दिले. शेवटी तोच नामदेव 5 (पाच) वर्षाचा असताना, विठ्ठलांना जेवणास भाग पाडणारा पुढे संगतीने दरोडेखोर बनला.

पण पूर्व जन्माची ती सात्विक ज्योत होती. जरी दरोडे घातले तरी आवडया नागनाथाला नैवेद्य दाखवायचा.

नामदेव पंचक्वान्नाचे ताट घेऊन गेला त्याच वेळी एक गरीब आई व मुलगा ते भोजन पाहू लागली. नाम्याने ते भोजन मुलाला दिले.

दरोडेखोरांनी माझ्या नवर्‍याचा वध केला हे बाईचे शब्द ऐकून नाम्या विचारात पडला. कारण तो सत् होता. त्याच्या डोळ्यात अंजन पडल्याप्रमाणे झाले व त्याना रोज येण्याची मुभा दिली. अन् म्हणाला मी अत्यंत पापी आहे. असे म्हणून तो लिंगाला म्हणाला माझी सुटका करा अन् स्व:चा खंजीर काढून रक्त दिले. त्याला मुर्चा येऊन तो देवळात पडला. तेव्हा तेथे ब्राम्हण आले व त्यांनी पाहिले. नाम्याला उचलून बाहेर टाकले.

नवनाथ म्हणाले "तू ज्याला जेवण दिलेस त्यांनी तुला दृष्टांत दिला कि तू महत् पापी आहेस. तू येथे दिंडीला येऊ नकोस." तेव्हा त्याला फार वाईट वाटले.

माझ्यामुळे इतरांना आदेश नाही. त्यानी एक विठ्ठलाला पत्र लिहिले. ते वाचून विठ्ठल हेलावले. त्यात होते "मी अत्यंत पापी आहे. मी तुमचा नेम विसरणार नाही. पाच वर्षांचा असताना माझ्या हातचे जेवण तुम्ही केलेत. पण मी आता तुम्हाला तोंड दाखविणार नाही."

शेवटी त्याना भरून आले. विठ्ठलांनी जाणीव दिली तुला आता क्षमा आहे. तू दर्शनाला येऊ शकतोस. त्याला पश्चाताप झाला. तोच नामदेव विठ्ठलांचा भक्त झाला.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: