रविवार, १० जून, २०१८

Vachane


*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

अंबा तापट होती, कर्तव्यासाठी हट्टाग्रही होती. स्वयंभू सतत नामस्मरणात लय राहायचे अन ज्यावेळी समाधीस्थ स्थितीतून उतरतील तेव्हाच ती त्यांना प्रणव देउ शकत असे. म्हणूनच ती प्रणव प्रस्थापित करीत  आहे, तुम्ही जे सतत ध्यानमय स्थितीत राहून परब्रम्हाचे दर्शन आपण घेत आहात ते मजला प्राप्त व्हावयास हवे.

महेश अंबेला सांगत आहे, *"तू मन सतशुध्द कर, परब्रम्हाची जाण घेतलीस तर तुला ते पूर्णत्व प्राप्त होईल."*
सत आपणाला सदोदित प्रणव देत होते, *" मन शुद्ध करून सताला पहाण्याची स्थिती करा."

* मानव सताप्रत पूर्णत्व स्थितीने राहिले तर मननतेला अवधी लागत नाही. मानवी मनाची स्थिती स्थिर नसल्याने मननतेला अवधी लागतो. परंतु मन सताप्रत स्थिर राहिल्यानंतर अवधिची आवश्यकता नाही.

सताने या पृथ्वीतलावर दृश्यत्वता प्राप्त करून संसारयुक्त स्थिती करून तुम्हासही आपणाप्रत घेऊन परब्रम्हास प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग साध्य करून दिधला. तुम्हास सत प्राप्त झाले, येणे सद्गुरू प्राप्त झाले तर राजमार्ग साध्य झाला. राजमार्गाने सेवेकऱ्याने वाटचाल केली तर परब्रम्हाची जाण प्राप्त होईल. अन तदनंतर तो भवसागरातून मुक्त होईल. जर मानव स्थिर झाला तर कशाचीही कमतरता भासणार नाही. शारिरीक स्थितीची नाही, ज्ञानाची नाही, सौख्याची नाही, सुखाची नाही कशाचीही कमतरता मानवाला वाटणार नाही. सत राजमार्ग साध्य करून देते परंतु मानवाला आक्रमिता येत नाही.

आम्ही आपणास सर्वस्वाना सदोदित प्रणव देतो आद्यकर्तव्य करा, सदोदित नामस्मरणात रहा. नामस्मरणात राहिल्यानंतर मन सतशुध्द राहून स्थिर शांत रहाते. मन स्थिर शांत राहिल्यानंतर शरीर शांत रहाते. मग सेवेकरी नामस्मरण किती करीतो. देहाला स्थिर शांत ठेउन सेवेकऱ्याने नामस्मरण हे केलेच पाहिजे.

लक्षात ठेवा नाम हे मानवाला सोडून नाही, अन मानव नामाला सोडून राहूच शकत नाही. कर्तव्य करीत करीत मानवाने मनाने नामस्मरण केले पाहिजे. परंतु मानवाकडून एवढी स्थिती पूर्णत्व होत नाही.

सेवेकरी मनाची स्थिती जागृतमय करील तेवढी त्या सेवेकऱ्याची जीवनज्योत प्रज्वलित होईल. त्याचा प्रकाश तेजोमय होईल. तुमच्या अंत:स्थितील ज्योत नामस्मरणामुळे तेजोमय होईल. हे करण्यासाठी मन सतशुध्द ठेवा.

भवसागरातून आपणास पलीकडे जावयाचे असेल तर सदगुरूंची साथ हवी. सदगुरूंची साथ दृढनिश्चयी ठेवलीत तर तुम्ही परब्रह्माप्रत निश्चितपणे जाऊ शकाल.

शनिवार, ९ जून, २०१८

सत वचने


तरी दुर्लभ या त्रिभुवनात.....!!!

*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला प्रणव देत आहेत, *" तू तुझे मन शुध्द शुचिर्भूत करून पूर्णत्वाने मी  जे प्रणव देतो ते ग्रहण कर. मी जे प्रणव देतो ते त्रिभुवनातही दुर्लक्षित आहेत."*
असेच प्रणव सत तुम्हा सर्वस्वाना स्थानावरून येणे आसनावरून देत होते. सत तुम्हास पूर्णत्व स्पष्टीकरण करून सांगत होते. सदगुरुमय झाल्याविना तुम्हास ज्ञान प्राप्त होईल का? नाही.
जेंव्हा मानव सदगुरु सानिध्यात येतो तेंव्हा सत त्या मानवाची पूर्णत्व शुध्दीकरण स्थिती करीते. त्याच अवधीत तो मानव सतशुध्द होऊन सदगुरुमय होतो. त्यापूर्वी मानव चंचल अन द्विधा मनस्थितीत असतो. ज्या अवधीत सत तुमच्या शिरकमलावर हस्त स्पर्श करून अखंड नामाची गती प्राप्त करीते, त्या अवधीत तुमची स्थिती सतशुध्द अन सदगुरुमय होते. अन तदनंतर सत तुम्हास सताची पूर्णत्व जाण करून देते. जे अंबेने प्रणव स्वयंभूना दिधले, *"तुम्हीच माझे गुरू आहात, तुम्हीच मजला सताची जाण द्या"* तदनंतर हे प्रणव स्वयंभूनी अंबेला दिधले. अन आम्ही आपणास आपल्या सताची पूर्णत्वाने जी स्थिती या भूतलावर होती त्याचे प्रणव दिधले. परंतु समीकरण एकच आहे, ही जी स्थिती आहे ती कवण केलेली स्थिती आहे. *अन तुमची स्थिती प्रत्यक्ष सताने घडवून दिलेली स्थिती आहे.* अंबेने स्वयंभूना प्रणव देणे यापेक्षा अधिकाधिक आगळी वेगळी स्थिती सताने तुम्हास प्रदान केलेली आहे. अन त्याप्रमाणें जर तुमची कृतीमान स्थिती असेल तर तो सेवेकरी कसा होईल? तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही. अन सतही त्या सेवेकऱ्यापासून दूर राहणे शक्य नाही. सत तुम्हास प्रणव देत होते कि ही कलीयुगी स्थिती आहे. या कलीयुगी स्थितीत मोहमायेत जी स्थिती आहे त्यात अधिक न गुंतता तुम्ही सत नामस्मरणात पूर्णत्व लय होऊन रहा. अशी स्थिती केल्यानंतर सत येणे परब्रह्म तुम्हास दुष्टांतमय स्थिती देईलच देईल.
सताने सर्वस्व उघड स्थिती केली पण तुम्ही ते स्मरणतेत घेतले नाही. मानव मोहमायेत अधिकाधिक गुंतत गेला त्यामुळे तो सतापासून दूर गेला. पूर्णत्व सताप्रत राहण्यासाठी सेवेकऱ्याने कर्तव्यापुरते मायेचे कर्तव्य करून सतत नामस्मरणात राहिले पाहिजे. पण मानवाकडून अशी स्थिती होत नाही.
कर्तव्य करीत असतानासुध्दा मन नामस्मरणात गुंतून राहिले पाहिजे. लक्षात घ्या नाम तुमच्यात गुंतून आहे. नामाने तुम्हाला सोडले तर तुमचे स्थुल  स्थित्य रहाणार नाही. म्हणजेच नाम तुमच्यात गुंतून आहे पण आपण संसारमय स्थितीत आहात. संसार येणे स्वार्थ! अन हेच प्रणव महेश अंबेला देत आहेत. सताला संसार नाही का? तुम्ही हाच सताचा संसार आहे. पण सत तुम्हात गुंतून राहिले नाही. तुम्हास ज्ञानोपदेश करीत, तुम्हास सतशुध्द करीत, तुम्हास सतभक्तिची पूर्णत्व जाण देत स्वयंम परब्रम्हाचे कर्तव्य करीत होते.

गुरुवार, ७ जून, २०१८

ईश्वर म्हणे वो देवी......

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

भक्त भगवंताप्रत का येत असतो? तर ज्ञानप्राप्तीसाठी आणि भक्तिसाठी भक्त सत चरणाप्रत येत असतो. आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत ज्ञानप्राप्तीसाठी जात होता.
भगवंतानी आपली सुख-दु:ख स्थिती ग्राह्य केली नाही तर आपली स्थिती चंचल होईल. भक्ताचे भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
सद्गुरू माऊलीने स्थुल रुप धारण केल्यानंतर सुख- दु:ख स्थिती भोगली कि नाही? पण तरीहि ते स्थिर, शांत, संयमी असायचे. पण तोच भक्त, थोडीशी दुर्मिळ स्थिती झाली तर चलबिचल होतो.
आपणास कल्पना आहे आमची कन्यका अहिल्या पतीच्या शापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? असे असून देखील आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होती ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हालाही सर्वस्वाची जाण होती. सर्वस्व स्थिती भगवंताने स्थुल रुप धारण करून स्थित्यंतरे कशी येतात त्याची स्वयम जाण सद्गुरूनी आपणास दिधलेली आहे.पण तरीही मानव विसरतो.

आपणास कल्पना आहे सुख आल्यानंतर मानव कालावधीची गणना करीत नाही. पण दु:ख आल्यानंतर मानव क्षणापासून सुरुवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत. थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर आपण चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आम्ही हे मान्य करीतो कि अपुले कर्तव्य आहे सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. परंतु हतबल होणे नाही. आपण सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लिनता ही ठेवलीच पाहिजे.
आपण सर्वस्व भक्त भगवंताचे आहात, सताचे आहात. त्या सताला तुमच्या सर्वस्व सुख-दु:खाची जाण आहेच. भक्ताची जर पूर्णत्व श्रध्दायुक्त स्थिती नसेल तर? लिनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम नसेल तर? भगवंत भक्तात लय होणार नाहीत. भक्ताचे भगवंतावर अपरंपार, नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होणारच. जेथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील.
म्हणून भगवंत भक्ताप्रत राहण्यासाठी या सर्वस्व गुणांची आवश्यकताआहे. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. लक्षात ठेवा विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते.

मंगळवार, २० मार्च, २०१८

गुरू गुह्य

सत ज्या अवधीत तुम्हांस आपणा प्रत घेत होते त्या अवधीत तुमची मानवी स्थितीप्रमाणे पूर्णत्व सतशुध्दताच करीत होते नां?

मोह आणि माया या सद्गुरूंपासून दूर नेणा-या आहेत.

आरती येणे कोणती स्थिती तर नाम.

सद्गुरूंसमवेत नामामुळेच जाऊ शकतो.

अंत:करणापासून सद्गुरू चरणी केलेली विनंती याला आपण सेवेकरी प्रार्थना म्हणतो.

प्रार्थना आणि विनंती :

प्रार्थना म्हणजे परात्पर, क्षराक्षर व चराचर याच्यात भरूनही अलिप्त असणा-या निर्गुण, निराकार व अविनाशी सच्छिदानंद तत्वाला नम्रतापूर्वक, एकाग्र चित्ताने केवळ दर्शन व सान्निध्य मिळविण्याकरिता नामाने आळविता येणे नाम प्रार्थना.

परब्रह्माकडे म्हणजेच सताकडे सुखदु:खाची, मायेची निवेदने आपण देत असतो तसेच कष्टमय स्थितीतून सुटण्यासाठी व मनाला शांती मिळविण्याकरिता आपण जे प्रणव देतो तीच विनंती.

💐🕉💐🕉💐🕉💐🕉💐

शनिवार, १७ मार्च, २०१८

"फक्त ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

💐🌲💐🌷💐🌲💐🌷

"भगवत् भक्तीच्या उत्तमावस्थेत रत झाल्यानंतरच भगवंताच्या प्रेम पात्रतेचा अधिकार भक्तांला प्राप्त होतो. नुसतंच वाचक अभ्यासक व पांडीत्य किंवा ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

भक्तीप्रेम सुख नेणवे आणिका !
पंडीत वाचका ज्ञानियांसी !!

भक्तीचे व भक्तांचेही अनेक प्रकार आहेत. भक्ती कशीही असली तरी श्रेष्ठ व उत्तमच.

गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात,
"नामभक्ती तर सगळेच करतात पण अंतःकरणात जिव्हाळा व भगवंताविषयीच्या आंतरिक प्रेमाचा कळवळा नसेल तर हा नंदनंदन परमात्मा संतुष्ट व वश्य होऊन प्राप्त होत नाही."

!! राम राम सब कोई कहे,
   ठग ठाकुर और चोर !
!! बिना प्रे💓म रिझें नही,
   तुलसी नंदकिसोर !!
🙏🏻 🙏🌻🌹

बुधवार, १४ मार्च, २०१८

*आनंद सागरात प्रेमे बूडी दिधली |* *लाभले सौख मोठे, नये बोलता बोली||*2*

सताने आपणा सर्वंस्वाना स्वयंस्थितीत घेतले. अन आपुले कर्तव्य यथायोग्य केले. परंतु सेवेकऱ्याकडून ती स्थिती पूर्णत्व होत नाही. राजमार्ग सताने आपणास प्रदान केलेला आहे पण तो राजमार्ग कसा आक्रमीता येईल हे तुम्हास अवगत नाही. एकदा का सताने प्रणव दिधला, त्या प्रणवात पूर्णत्व मग्न होऊन जो कर्तव्य करीतो त्याच्याकडून असे प्रणव येणार नाहीत. परंतु कलीयुगी स्थिती हेच प्रणव आपणाकडून मजला मिळतात. लक्षात घ्या कलीयुगातच सत कर्तव्य करीत होते. सताच्या प्रणवात कधी कमतरता होती का? एकदा का सताने प्रणव दिधले ते पूर्णत्व सिध्द होईलपर्यंत सत कधी शांत राहिले नाही. अशा सताचे आपण सेवेकरी आहात. राजमार्ग आपणास दिधलेला आहे. अन त्याची आक्रमिता आपणास करावयची आहे. याकरीता प्रथम मानवाची मती शुद्ध पाहिजे. शुद्ध मतीने, आचार, विचार येणे वृत्ती! मनापासून ज्याची वृध्दी होते ती कोण तर बुध्दी! जर ती शुध्द असेल तर सताने दिधलेला राजमार्ग आपण आक्रमित जालं. पण बुध्दीच जर शुद्ध नसेल तर कसे होईल. अनेक अडचणी येतील. म्हणून सत प्रणवाप्रमाणे सेवेकऱ्याने आपली बुध्दीमत्ता, मननता, मन कसे ठेवले पाहिजे? सतशुध्द ठेवले पाहिजे. पहा मन सतशुद्ध असेल तर सर्वसे सतशुध्द आहे. त्या मन सतशुध्द्तेतून बुध्दीची स्थिती होते. अन त्याप्रमाणे जर मानव कर्तव्य करु लागला तर त्याला कोठेही अडचण येणार नाही. आपण माझ्या सताचे सेवेकरी आहात, ते सतशुध्दतेनेच गेले पाहिजे.

*आनंद सागरात प्रेमे बूडी दिधली |* *लाभले सौख मोठे, नये बोलता बोली||*

आपण iसत चरणाप्रत आलात ही आनंद स्थिती येणे आनंद सागरच आहे ना! या स्थितीत आपणास काय बहाल केले आहे, भक्ति बहाल केली आहे. अन भक्तीच्या महासागरात आपण सामावलेले आहात का? तुम्ही मायावी महासागरातच बुडी दिधली आहे. जो आनंद महासागरात बुडी घेईल ते सुख येणे शांतता अन संयमाने पूर्ण बहरून जाईल. परंतु मायावी सागरात बुडी घेणारा असा बहरून जाईल का? नाही. सताने भक्तीच्या महासागरात तुम्हाला आणून सोडले आहे. परंतु आपण परीपूर्ण भक्तियुक्त झाला आहात का? नाही. जर आपण भक्तीने परीपूर्ण झाला नाहीत मग आपणास आनंद महासागराची कल्पना येणार नाही. तर त्या आनंद महासागराची कल्पना घेण्यासाठी काय केले पाहिजे? तर भक्तीच्या महासागरात डुंबत राहिले पाहिजे. परंतु हे होत नाही. याला कारण मायावी स्थिती. माया कोणाला नाही. माया सर्वस्वाना आहे. परंतु आद्य कर्तव्य जे आपण विसरतो तेंव्हाच आपुली अशी स्थिती होते. मानवी स्थितीप्रमाणे तुम्ही प्रणव सताप्रत देत आहात. सत ते प्रणव ग्रहण करतें अन प्रणव ग्रहन करून तुम्हास सुख शांती प्राप्त करून देते. अरे! ही देखील मायाच नव्हे का? माया येणे प्रेम. ही सत सात्विक माया, अन अशा या सात्विक स्थितीचे आपण सेवेकरी आहात. मग आपण कशात डुंबुन राहायचे? भक्ति अन नामस्मरणात डुंबुन रहावयास पाहिजे का मायेत? मग आपणाकडून असे प्रणव का येतात? मानवी स्थितीप्रमाणे जर सर्वस्व शुद्ध असेल तर अशी चूक होणार नाही. जर आनंद सागरात आपण डुंबत राहिला असतात तर असे प्रणव आले नसते. सत प्रणवाप्रमाणे भक्तीच्या सागरात येणे भक्तिमध्ये डुंबले पाहिजे. म्हणजे या मोहमायेपासून आपणास मुक्तता मिळेल. ज्या भक्ताने भक्तीच्या स्थितीने प्रेमाने आपणास सामाऊन घेतले त्याला सुखाची दु:खाची कमतरता येइल का? दु:ख त्याच्याजवळ येउ शकेल का? त्याच्यापासून सुख दूर जाउ शकेन का? नाही. शांतता, संयमता तेथे  पूर्णत्व राहील.

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

*आरती सदगुरूंची उजळली अंतरी|*

साम्य स्थितीत सत प्रवृत्ती असते. तरी मानवाला त्याची कल्पना येत नाही. मानव सताची आरती केव्हा करीतो? आप्ल्या स्थितीनुसार स्तुती अन आरती एकच आहे. म्हणून विचारत आहे सताची आरती मानव केव्हा करीतो? स्तुती प्रणवाद्वारे होते अन आरती कशी असते? आपणास क्ल्पना आहे मानवाला भक्ति जशी सोपी आहे तसेच भक्ति हा प्रणव देण्यास सोपा आहे. अन आरती हा ही एक प्रणव देण्यास सोपा आहे. परंतु या प्रणवात गहनता आहे. मानवी स्थितीप्रमाणे सताचे स्थितीत राहून आपणा सर्वस्वाना किती प्रणव बहाल केलें. परंतु त्या प्रणवाची मननता आपण सेवेकऱ्यानी केली नाही. पूर्णत्वाने ज्ञान मननतेत बहरून राहिले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता ही सर्वस्व भक्तिचीच अंगे आहेत. आपल्या मननतेनुसार मन पूर्णत्व सदगुरुमय करून, सतत नामस्मरण करीत दिव्यदृष्टीने आत्मज्योतीच्या प्रकाशात रममाण होणे येणे नाम आरती!

सताने आपणा सर्वस्वाना नाम बहाल केले आहे. येणे नाम आरती! सदगुरूंनी बहाल केलेले नाम अंत:र्मय स्थितीत येणे त्रयीत लय केल्यानंतर आपल्याला दिव्य प्रकाश मिळेल. त्या दिव्य प्रकाशात आपण सत पाहू  शकाल. अंबर येणे आकाश! आकाशात सुध्दा बहरून उरलेला हा दिव्य प्रकाश आहे. सताने दिधलेले  नाम अंत:र्मय स्थितीत ठेउन जो आपण प्रकाश पाहू शकाल, तोच प्रकाश आकाशमय येणे अंबरमय स्थितीत बहरलेला आहे. प्रकाशाची साठवण तुम्ही करु शकता का? नाही! तो प्रकाश नामानेच प्राप्त होऊ शकेल. सदगुरूंनी दिलेल्या नामानेच तो प्रकाश मिळू शकेल. मन त्रयीत, त्रयीत लय करून जे प्रणव पूर्णत्व होतात त्यालाच मंत्र म्हणतात. अन तोच मंत्र याने नाम! आता आपण सेवेकरी आरती येणे नाम कोणत्या तऱ्हेने घेणार शुद्ध शुचिर्भूत करून हे नाम येणे आरती केली पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार अर्धपदमासन घालून आपल्या सदगुरूंना नमस्कार करून, त्यांचे  स्वरुप मनामध्ये साठवून, चरणकमलाकडे मनाचे केंद्रिकरण करुन, त्रिकुटित आत्मज्योत लय करुन, देहाला विसरून अंत:र्यामापासून सदगुरूंना आळवले पाहिजे. लक्षात घ्या आपण नाम केव्हाही घेउ शकतो. परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सदगुरु चरणांवर अर्पण करूनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीने आपण नामाची स्थिती केलीत तर्च ते सतचरणाप्रत पोहोचू शकतें. तदनंतर सताचे दर्शन पूर्णत्वाने घेउ शकता.
आपण जी ज्योत दिवास्वरुपी प्रगट करता तीच ज्योत आपल्या आत्मस्थितीतही प्रगट असते ना! आत्मा ही पण एक ज्योतच आहे ना! तो आत्मा आपण मानवी स्थितीप्रमाणे सामूहिक स्थितीत प्रगट करु शकणार नाही. त्या परब्रम्हाचे स्मरण दिपस्थितीने आत्म्याशी स्वरूप करणे अन परब्रम्हाचे स्मरण करणे. आम्ही देखील सताचे स्तवन करीतो, पण कोणत्या स्थितीने याची आपणास पूर्णत्व क्ल्पना आहे. परंतु मानवाला हे प्रतिक करावेच लागतें ते प्रतिक आपल्या हस्त स्थितीत नसेल तर आपण स्थिर होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा आत्मज्योतीचे प्रतिक हा दिप आहे.