मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

*नामदेव महाराज*2

नामदेवाचे व्यवहार मायावी होते. विठ्ठलाना विचार पडला हा भोळा आहे. त्याला खरे दर्शन दिले नाही म्हणून ज्ञानेश्वरांना सांगितले.

ज्ञानेश्वरांनी नामदेवाला बोलावले व म्हणाले, "तुम्ही याचे कच्चे पक्के डोके पहा. गोराकाका तुम्ही याचे कच्चे, पक्के पहा."

त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मारण्यास सुरूवात केली. तेव्हा नाम्या म्हणाला, "गोराकाका, तुम्हाला अक्कल आहे कि नाही."

तेव्हा गोराकुंभार म्हणाला, "हा कच्चा आहे. तेथे अभिमान दिसला."

त्यातून मुक्ता नाम्याला म्हणाली, "चिडतोस का?"

तेव्हा नाम्या तिच्यावर चिडला अन् म्हणाला, "मी विठ्ठलाला विचारतो."

तो विठ्ठलाला म्हणाला, " मी तुमचा आवडता असताना या लोकांनी माझा अपमान केला. मला कच्चा म्हटले. तेव्हा तुम्हीच पहा."

विठ्ठलांनी त्याची समजुत केली. विठ्ठल म्हणाले, " मला तू खरा पाहिला नाहिस. खरे रूप पहाण्यासाठी सद्गुरु करावा लागतो."

तर नाम्या म्हणाला, "तुम्हीच सद्गुरूं!" तेव्हा विठ्ठल म्हणाले सद्गुरु केल्याशिवाय काही नाही. तू खेचर यांना शरण जा.

नाम्याने आवड्यानाथाच्या देवळात जाऊन येसू खेचर यांचा शोध केला. येसू खेचर हे पादत्राणे घालून देवळात लिंगावर पाय ठेवून झोपले होते. ते पाहून नाम्याला वाईट वाटले. त्याला राग आला. जोरजोराने येसू खेचराचे पाय धरून बाजूला ठेवी तर तेथे लिंग! शेवटी आपले चुकले म्हणुन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. शरण गेला. तेव्हा खेचर म्हणाले, "आता खरी पश्चा:ताप दग्ध झालेली ज्योत आहे." तेव्हा त्यांनी नाम्याला बोलावले व डोक्यावर हात टाकला म्हणजेच अनुग्रह दिला. नाम्याला गहिवरून आले. माझ्या कल्याणासाठी विठ्ठलांनी कस घेतला.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: