*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
प्रथम मानव, त्याला ईष तत्वाची जाण मिळाल्यानंतर तो मनुष्य, अन त्याचा उपदेश पूर्णत्व ग्रहण केल्यानंतर नंतर योगी!
मानवाला सताने ज्ञानही दिधले, अन भक्तिही दिधली. *"ज्ञानाविना भक्तिही शून्य अन भक्तिविना ज्ञानही शून्य"*
आपुले मन सतचरणावर लीन झाल्यानंतर भक्ति होते. सदगुरु चरणांजवळ आल्यानंतर ज्ञानही प्राप्त होते अन भक्तिही प्राप्त होते. परंतु ते मानवाने कसे ग्राह्य करायचे असते?
मनात जर पूर्णत्वाने सत् भक्ति असेल तर बौद्धिक स्थिती विशाल होईल. बौद्धिक स्थिती विशाल झाल्यानंतर ज्ञानही विशालच होईल. तरच त्याला ज्ञानाचा अन भक्तीचा प्रत्यय येईल. आपण स्थित रहावयाचे, सतशुध्द रहावयाचे, मन सतशुध्द करावयाचे, नम्र रहावयाचे, प्रणव लीनतेने द्यावयाचे तरच गती गतीने तुमच्या ज्ञानात, भक्तित पूर्णत्वाने वाढ होईल.
भक्त भगवंताप्रत का येत असतो? भक्तिसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी तो सतचरणाप्रत येत असतो का? येणे भक्त भगवंताप्रत येतो, तो सुख, दु:ख सांगण्यासाठी. कलीयुगी स्थितीप्रमाणे, आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत जात होता तो ज्ञानासाठी. परमेशाला पूर्णत्व पहाण्यासाठी!
परंतु या कलीयुगी स्थितीत कशी स्थिती होते?
तर आपली सुख दु:ख सताने येणे भगवंताने ग्राह्य करून सुखशांती दिधली पाहिजे.
अन जर का भगवंताकडून अशी स्थिती झाली नाही तर मग भक्त चंचल होईल. भगवंताने आपली सुख दु:खे ग्राह्य केली नाहीत तर आपली सर्वस्वांची स्थिती चंचल होते. चलबिचल होते.
मग तो मानव असो, सेवेकरी असो, तो कसा प्रणव देईल? आम्ही आपल्या चरणांवर शरण आलो आहोत यातून मजला सोडवा.
आपण प्रणव दिधलें भक्त भक्तिसाठी सताप्रत येत असतो, अन तोच भक्त पुन:श्च प्रणव कसे देतो?
आपणा सर्वस्वांच्या ज्ञानात अधिकाधिक तेजोमय स्थिती होण्यासाठीच हे प्रणव दिधलें आहेत.
भक्ताचे प्रणव ग्राह्य करणे हे भगवंताचे कर्तव्यच आहे. अन भक्ताने भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचेही कर्तव्य आहे.
परंतु हे आपणास असे प्रणव प्रस्थापित का केले? इतुके ज्ञान आपणाप्रत असताना आपणाकडून प्रणवांची स्थिती का होऊ नये?
भगवंताने स्थुलरुप धारण करून सुखदु:खे भोगली का नाही? त्या अवधीत भगवंत कसे होते? स्थिर, शांत, संयमी होते. पण तोच भक्त थोडीसी दुर्मिळ स्थिती झाली तर कसा होतो? चलबिचल होतो. अवधितच स्थितीही प्रगट करतो.
टायपिंग : श्री सुभाष भोसले
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
प्रथम मानव, त्याला ईष तत्वाची जाण मिळाल्यानंतर तो मनुष्य, अन त्याचा उपदेश पूर्णत्व ग्रहण केल्यानंतर नंतर योगी!
मानवाला सताने ज्ञानही दिधले, अन भक्तिही दिधली. *"ज्ञानाविना भक्तिही शून्य अन भक्तिविना ज्ञानही शून्य"*
आपुले मन सतचरणावर लीन झाल्यानंतर भक्ति होते. सदगुरु चरणांजवळ आल्यानंतर ज्ञानही प्राप्त होते अन भक्तिही प्राप्त होते. परंतु ते मानवाने कसे ग्राह्य करायचे असते?
मनात जर पूर्णत्वाने सत् भक्ति असेल तर बौद्धिक स्थिती विशाल होईल. बौद्धिक स्थिती विशाल झाल्यानंतर ज्ञानही विशालच होईल. तरच त्याला ज्ञानाचा अन भक्तीचा प्रत्यय येईल. आपण स्थित रहावयाचे, सतशुध्द रहावयाचे, मन सतशुध्द करावयाचे, नम्र रहावयाचे, प्रणव लीनतेने द्यावयाचे तरच गती गतीने तुमच्या ज्ञानात, भक्तित पूर्णत्वाने वाढ होईल.
भक्त भगवंताप्रत का येत असतो? भक्तिसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी तो सतचरणाप्रत येत असतो का? येणे भक्त भगवंताप्रत येतो, तो सुख, दु:ख सांगण्यासाठी. कलीयुगी स्थितीप्रमाणे, आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत जात होता तो ज्ञानासाठी. परमेशाला पूर्णत्व पहाण्यासाठी!
परंतु या कलीयुगी स्थितीत कशी स्थिती होते?
तर आपली सुख दु:ख सताने येणे भगवंताने ग्राह्य करून सुखशांती दिधली पाहिजे.
अन जर का भगवंताकडून अशी स्थिती झाली नाही तर मग भक्त चंचल होईल. भगवंताने आपली सुख दु:खे ग्राह्य केली नाहीत तर आपली सर्वस्वांची स्थिती चंचल होते. चलबिचल होते.
मग तो मानव असो, सेवेकरी असो, तो कसा प्रणव देईल? आम्ही आपल्या चरणांवर शरण आलो आहोत यातून मजला सोडवा.
आपण प्रणव दिधलें भक्त भक्तिसाठी सताप्रत येत असतो, अन तोच भक्त पुन:श्च प्रणव कसे देतो?
आपणा सर्वस्वांच्या ज्ञानात अधिकाधिक तेजोमय स्थिती होण्यासाठीच हे प्रणव दिधलें आहेत.
भक्ताचे प्रणव ग्राह्य करणे हे भगवंताचे कर्तव्यच आहे. अन भक्ताने भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचेही कर्तव्य आहे.
परंतु हे आपणास असे प्रणव प्रस्थापित का केले? इतुके ज्ञान आपणाप्रत असताना आपणाकडून प्रणवांची स्थिती का होऊ नये?
भगवंताने स्थुलरुप धारण करून सुखदु:खे भोगली का नाही? त्या अवधीत भगवंत कसे होते? स्थिर, शांत, संयमी होते. पण तोच भक्त थोडीसी दुर्मिळ स्थिती झाली तर कसा होतो? चलबिचल होतो. अवधितच स्थितीही प्रगट करतो.
टायपिंग : श्री सुभाष भोसले