जर आपणास मायावी कर्तव्यासाठी वेळ पुरत नाही तर मग सत् कर्तव्यासाठी अवधी मिळणार नाही.
मानवाचे शरीर कर्तव्य करीत असते. मनाने मानव मायेचे कर्तव्य करीत असतो. पण त्याच स्थितीप्रमाणे जर मानवाने अपुले मन सतात गढवून ठेविले मग इतरत्र स्थिती जी आपणास दिधली आहे त्याने तुमची कर्तव्य केली तर ती कर्तव्य होऊ शकतील.
दोन्ही स्थितीत मानव कर्तव्य करू शकतो. म्हणून मन दोन्ही स्थितीत ठेवायचे. सताप्रतही ठेवायचे अन् कर्तव्यातही ठेवायचे.
कर्तव्य केल्याविना मानवाला मायेची स्थिती प्राप्त होणार नाही. अन् माया ही मानवाला हवीच आहे. जर माया नसेल तर मानव काही करू शकणार नाही.
मानव सतावरच स्थितप्रज्ञ असतो म्हणून मानवाने आपले मन सताप्रत ठेऊन कर्तव्याची पूर्णत्वता केली पाहिजे. मग मानव संतुष्ट होईल. मानवाने सतात परिपूर्णता केली तर तो या विषयांतरात एकाग्र पणे राहील. नुसत्या विषयांतरात येणे नुसत्या कर्तव्यात राहिले तरीही तो मानव संतुष्ट होऊ शकणार नाही. दोन्ही स्थितीने राहिल्यानंतर मानव संतुष्ट राहिल.
सर्वस्व स्थिती सतानेच उपलब्ध करून ठेवलेली आहे. सताची मनोकामना कोणती असते? सताचीही मनोकामना असते कि मी जे स्थूल येणे शरीर या स्थितीत पाठवले आहे त्या शरीराला विषयांवरची जरूरी अधिक आहे. जर विषयांतर नसेल तर शरीर काम करू शकणार नाही. नुसत्या शरीराचा पुतळा करून उपयोग नाही, तर त्याच्याकडून कर्तव्य करून घेतलेच पाहिजे. जर कर्तव्य ही स्थितप्रज्ञ नसतील तर तुमचे शरीर काही करू शकणार नाही. विषयांतर म्हणजे मानवाला दिनात करावी लागणारी अनेक कर्तव्ये होत.
टायपिंग: श्री सुभाष भोसले
मानवाचे शरीर कर्तव्य करीत असते. मनाने मानव मायेचे कर्तव्य करीत असतो. पण त्याच स्थितीप्रमाणे जर मानवाने अपुले मन सतात गढवून ठेविले मग इतरत्र स्थिती जी आपणास दिधली आहे त्याने तुमची कर्तव्य केली तर ती कर्तव्य होऊ शकतील.
दोन्ही स्थितीत मानव कर्तव्य करू शकतो. म्हणून मन दोन्ही स्थितीत ठेवायचे. सताप्रतही ठेवायचे अन् कर्तव्यातही ठेवायचे.
कर्तव्य केल्याविना मानवाला मायेची स्थिती प्राप्त होणार नाही. अन् माया ही मानवाला हवीच आहे. जर माया नसेल तर मानव काही करू शकणार नाही.
मानव सतावरच स्थितप्रज्ञ असतो म्हणून मानवाने आपले मन सताप्रत ठेऊन कर्तव्याची पूर्णत्वता केली पाहिजे. मग मानव संतुष्ट होईल. मानवाने सतात परिपूर्णता केली तर तो या विषयांतरात एकाग्र पणे राहील. नुसत्या विषयांतरात येणे नुसत्या कर्तव्यात राहिले तरीही तो मानव संतुष्ट होऊ शकणार नाही. दोन्ही स्थितीने राहिल्यानंतर मानव संतुष्ट राहिल.
सर्वस्व स्थिती सतानेच उपलब्ध करून ठेवलेली आहे. सताची मनोकामना कोणती असते? सताचीही मनोकामना असते कि मी जे स्थूल येणे शरीर या स्थितीत पाठवले आहे त्या शरीराला विषयांवरची जरूरी अधिक आहे. जर विषयांतर नसेल तर शरीर काम करू शकणार नाही. नुसत्या शरीराचा पुतळा करून उपयोग नाही, तर त्याच्याकडून कर्तव्य करून घेतलेच पाहिजे. जर कर्तव्य ही स्थितप्रज्ञ नसतील तर तुमचे शरीर काही करू शकणार नाही. विषयांतर म्हणजे मानवाला दिनात करावी लागणारी अनेक कर्तव्ये होत.
टायपिंग: श्री सुभाष भोसले