*निजवस्तु दावीली माझी मला ।।*
*माझे सुख मज दावीयेले डोळा ।।*
*दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ।।*
(नामदेव महाराज)
सद्गुरूंची कृपा झाल्यावर आपल्याला खरे ज्ञान मिळते.
*डोळीयाचा डोळा उघडीला जेणे ।*
*आनंदाचे लेणे देवविले।।*
*नामदेव म्हणे निक्की सापडली सोय ।*
*कदा न विसंबे पाय खेचरांचे ।।*
सद्गुरु म्हणजे काय हे नामदेवाला कळले.
सद्गुरु हे परम् तत्व आहे. त्या येसू खेचरांचे पाय मी विसरणार नाही. ज्यांच्या कृपेने मी पहातो तेच ते सत् !
त्यांचे अभंग श्रेष्ठ प्रतिचे आहेत. सद्गुरूंनी नामदेवाचा कस पाहिला.
संत धनाचे लोभी नाहीत. ते धनाची किंमत कवडी समजतात. सद्गुरु ध्यान हिच संपत्ती होय.
विठ्ठल म्हणाले, "नाम्या ! तुझे लग्न करायचे आहे. तुला मुलगी कोण देणार? ती मुलगी सावकाराची पाहिजे. नाम्या म्हणायचा, माझे विठ्ठल आहेत.
श्रीहरीने मारूतीला आदेश दिले व त्याला बैल केले आणि नाम्या त्यावर बसला. मारूती बैल रूपाने होता. तो आरध्याच्या वाटेवर बसला. तेव्हा सावकाराची बायको नवर्यावर चिडली. हे पाहिल्यावर नाम्याने विठ्ठलाची आळवणी केली. त्यावेळी विठ्ठल निद्रिस्त होते. त्यानी ऐकले. अब्रू जाण्याची वेळ! तेव्हा रुक्मिणीसह, गणपतीसह निघाले. गणपतीबरोबर उंदीरही निघाले. सावकाराच्या घरी उंदराना पाठवून तेथील सर्व वस्तू नष्ट केल्या.
शेवटी विठ्ठलांनी रूप पालटले व नाम्याजवळ गेले. सावकाराला म्हणाले, "हे माझे चिरंजीव! नाम्याचे पारडे जड होते. सावकाराला नाम्याने सांगितले कि यांना शरण जा. त्यावेळी ते शरण गेले. नंतर विठ्ठल तेथून निघून गेले. पण विठ्ठलांनी लाघवांनी नाम्याचे घर सोनेरी केले.
नाम्याची बायको सज्जन होती. पांडुरंग भक्ताची लाज राखतो. सद्गुरु सेवेक-यासाठी सर्वस्व पणाला लावतात.
नामदेव हा आमच्या सारखाच मानव! पण भगवंताने त्याच्यासाठीच का यावे?
नामदेव तळमळीचा सेवेकरी होता. त्याला त्याच्या भगवंताशिवाय त्रिभूवनात काही दिसत नव्हते. म्हणून तो सद्गुरूंना आवडत होता. सद्गुरूंची इज्जत तीच आपली इज्जत सेवेक-यांनी समजावी.
टायपिंग: श्री सुभाष भोसले