शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

शेवटी कौरव पांडवांची लढाई जुंपली, परंतु त्याना पांच पांडवांचा नाश करता आला नाही. अर्जुनाच्या ठिकाणी माया उत्पन्न झाली त्यावेळी अर्जुनाने वायुमंत्र उपदेशिला. त्याच ठिकाणी कृष्णाने सुक्ष्माची गती दिली. अर्जुनाने गुरू, मामा, आजोबा, भाऊ या सर्वाना पाहिले. अर्जुन कृष्णाला म्हणाला मला हे राज्य नको. अन् हे पापही नको. तुच्छ ते राज्य. "कृष्णा ! मला या राज्याची आवश्यकता नाही." तेव्हा कृष्ण म्हणाले, "अर्जुना तुला ही दुर्बुद्धी कशी सुचली?" कृष्णाने जाणले व त्याला ठिकाणावर आणण्यासाठी उपदेश केला. तीच गीता 150-200 श्लोकात केली. 

"ही लढाई सत्य असत्यासाठी आहे. तू कोण? मारविता कोण? वगैरे सांगून विराट रूप दाखविले व हे सर्व खेळ मी अनंताचा अनंत करीत आहे." कृष्णाने अर्जुनाला शुद्धीवर आणून ठणकावले कि, "तुझ्याकडून हे युध्द करून घेणार आहे."

तेव्हा अर्जुन लढाईला उभा राहिला. पण अर्जुनाला बाण लागला नाही. कृष्णाने सारथ्याचे काम केले. त्याच्या
रथाच्या वरती रूद्र मारूती होता. म्हणून रथ उडत नव्हता.

इतके सर्वस्व घडविले, पण द्रोण, भीष्म कठीण होते. द्रोण ही सामान्य ज्योत नव्हती. कृष्णाने कारस्थाने केली. त्याने भीमाला बोलावले व सांगितले अश्वत्थामा हत्तीला ठार मारणे. ठार मारल्यानंतर कृष्ण धर्माजवळ आले. आकाशपाताळ एक केले व धर्म राजाला म्हणाले, "अश्वत्थामा लढाईत पडला हे आम्ही सर्वत्र पसरविणार. तेव्हा द्रोण तुझ्याकडे येईल, तेव्हा तू फक्त असे म्हण कि, "अश्वत्थामा लढाईत पडला. मनुष्य किंवा हत्ती माहित नाही."

कृष्णाने सत्यासाठी लबाडी केली. पण कृष्ण तेथेच अव्यक्त राहिले. द्रोणाना कळताच ते धर्माजवळ आले. अन् धर्माला म्हणाले धर्मराज अश्वत्थामा लढाईत पडला हे खरे आहे काय? तेव्हा कृष्णाने धर्माला श्रवणी दिली. धर्माने सांगितले, "अश्वत्थामा लढाईत पडला."

तेव्हा द्रोणाचार्याना बाणाने मारले. भीष्मांची तसेच कर्णाची गती केली. कर्ण हा पांडव होता. पण अघोराकडे सानिध्य.

कर्ण खरा दानशूर होता. कवचकुंडले मागितली. कृष्णाने पृथ्वीला आदेश दिले तू दुभंग हो. तेव्हा कर्णाच्या रथाची चाके जमीनीत रूतली. कृष्ण म्हणाले, "कर्णा तू एका साध्वीची वस्त्रफेड होताना खाली मान का घातलीस?"

महाभारत संपल्यावर कृष्णराज यादवकुलोत्पन्न होते; यादव उन्मत्त झाले. त्याने समाधी अंगाने आपली काया स्थिर केली. सत्यासाठी झगडले. कृषणावतारात त्यांनी याप्रमाणे कार्य केले.

आता कलीयुगात सद्गुरु तत्वाने कार्य करीत आहेत. नीती तत्वाने जाण्यास सद्गुरु सांगत आहेत. सत् हे सतासाठी झगडणारे आहे. ते निर्भीड, सत्य अन् सात्विक आहे. *सत्या परता नाही धर्म!* ज्याच्या जवळ सत्य धर्म नाही तो मुक्तिस कसा जाणार?   24 ऑगस्ट 

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

कृष्णांची शिष्ठाई संपल्यानंतर, ते चालले असताना कृष्णांना भूक लागली. पण कृष्ण नात्याने दुर्योधनाकडे  वा धर्माकडे न जाता विदूराकडे गेला. हा गरीब होता. (शुध्द साधी ज्योत) कृष्ण त्याच्या घरी आले. तेव्हा विदूर कासावीस झाला. कारण त्यांना मी काय देणार? 

परंतु विदूर सत् होते. अन्न घ्यायचे ते सताच्या घरी. त्यावेळी विदुराला परमानंद झाला. विदूर म्हणाले, "या वेळी माझ्या घरी काही नाही." पण कृष्ण म्हणाले, "त्या कण्या आहेत की!"
        *विदूरा घरच्या भक्षुणी कण्या*

      नंतर कण्यांची पेज पत्रावळीचा द्रोण करून त्यातून खात असताना कृष्ण म्हणाले, "आज मी अमृत प्यायलो. परंतु विदूर म्हणाला परमेश्वराला पेज द्यावी! तेव्हा कृष्ण प्रेमाने म्हणाला, विदूरा तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी एका हाताने जेवतो. पण तुझ्यासाठी चार हातानी द्रोण केला, तू धन्य आहेस. असे हे कृष्ण सताचे कैवार घेणारे आहेत. कौरवांनी कपटे केली. पांडवाना बारा वर्षे वनवासात पाठवली, वनवासात सुद्धा असताना दुर्योधनाने दुर्वास मुनींना सात - आठसे शिष्यांना घेऊन द्रौपदीकडे जेवणासाठी पाठविले. त्यावेळी अथितीचा आदर सत्कार केला जात असे. दुर्वास द्रौपदीकडे आले परंतु बुध्दी असताची होती. ते सर्व जेवण आटोपल्यानंतर आले तेंव्हा द्रौपदीला भीती वाटली. यांना आता जेवण कुठचे द्यायचे? पण दुर्वास ठणकावून म्हणाले, *"आम्ही गंगास्नान करून येतो, तो पर्यंत जेवणाची तयारी कर."* ती होय म्हणाली, पण तीला आठवण झाली सूर्याने दिलेली थाळी तीने धुऊन ठेवली होती. अशावेळी शांतपणे तीने कृष्णाचा धावा केला. तेव्हा कृष्ण हजर झाले. तीने सर्व हकीगत सांगितली. कृष्णाला सुद्धा पेच पडला कृष्ण म्हणाले, अग, पण द्रौपदी तुझ्याजवळ थाळी आहे ना? पण त्या थाळीला डाळीचा एक कण लागला होता. कृष्णांनी चावी फिरवली. तेव्हा प्रत्येक जण पाण्यातच ढेकर द्यायला लागले. त्यांनी ध्यान करून तेथे कृष्ण असल्याचे पाहिले. व तेथून पळून गेले. भगवंत ज्या ठिकाणी आहेत तेथे कमतरता होऊ शकेल काय? आपल्या भक्ताची बुध्दी कोती तर भगवंत त्याला कोते देतात. पण बुध्दी विशाल असल्यास भगवंत सुद्धा विशाल! भक्ताची लाज त्यांनीच राखली. असे ते करून अकर्ते आहेत.
                                     (क्रमश:) 23 ऑगस्ट

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

      कृष्ण शिष्ठतेसाठी आले असता दुर्योधन उच्च स्थानी बसले होते. त्यावेळी कृष्ण म्हणाले, "मी शिष्ठतेसाठी आलो आहे. तुम्ही समान दोन भाग करून महायुद्ध आटपा. पण त्या पांडवाना सुईच्या टोकाइतकीसुध्दा जमीन मिळणार नाही", असे कौरव म्हणाले.

इतका अपराध झाला तरी कृष्ण सहन करीत होते. भीम हा फक्त आईला (कुंतीला) मान द्यायचा. कृष्ण विचार करीत बसले. ते दुर्योधनाला म्हणाले, "दुर्योधना तू विचार कर. तुझे म्हणने चौकटीत बसत नाही." दुर्योधन धर्माला म्हणाला, "तुझे काय मत आहे?" तेव्हा धर्म म्हणाला, "ते कृष्ण सांगेल." तेव्हा कृष्ण म्हणाला, "यामध्ये तुला कोण पुण्यवान दिसतो का?"

धर्माला पापी बनविणारा दुर्योधन, तोच पापी होता. तेव्हा त्याला सर्व पापी दिसत होते. धर्म म्हणाला, "सर्व पुण्यवान व दुर्योधन सुध्दा पुण्यवान."

ज्याचे आचार विचार सत् त्याला सतच दिसणार. कृष्ण मात्र नाराज झाले. पुढे महान अवर्षण होणार हे माहित होते.
                              (क्रमश:)

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
तिने आपल्याला जन्म दिला. तिने सर्व कष्ट काढले. मातापित्यांचा वाईट गतीने उध्दार करणे पाप आहे.

सताने कालीयाचा सुध्दा नाश केला. अघोरांचा निपा:त करण्यासाठी सत् जन्माला येते. *सत् हेच कृष्ण व कृष्ण हेच सर्वस्व होय.*

परब्रह्म तत्व असल्याने त्यांना सर्व जाणीव होती. शेष हाच बलदेव. हे दोघेजण कंसाला भेटायला कंसाचे अपराध पूर्ण झाल्यानंतर गेले. त्यावेळी यशोदेला वाईट वाटले. तेव्हा त्यांची समजूत केली. शेवटी ते मथुरेला पोहोचले.

कंसाने अनितीने अपराध चालविले होते. कंसाने कृष्णाला पूर्ण ओळखले होते. पण कंस डावपेच करायचा. अनितीने कारभार करताना कृष्णाने भर गादिवरून ओढून आणून मुठीने मारले.

परब्रह्म शक्ति बरोबर मानव काय मुकाबला करणार? त्याचे ते राज्य कृष्णाने, माझे न म्हणता एका सात्विक ज्योतीला देऊन टाकले व निघाले.

याप्रमाणे आपले सेवेकरी उदारमतवादी पाहिजेत. *"साधेपणा पण उदात्त विचार"*

कृष्ण मायेचा आसुसलेला नव्हता. कंसाला मारल्यानंतर दुसरे नातलग होते. शेवटी बहिणीला म्हणाले 101 अपराध झाले कि माझ्याजवळ असलेले अस्त्र गप्प बसणार नाही. (जरासंध), मुचकुंदाला मारले व ते महाभारतात गेले.

खरोखर कृष्ण वेडा नव्हता. परंतु त्यांनी पाच पांडवांशी संगत केली. पांडवांकडे सत् ऐश्वर्य होते. परंतु कौरवांकडे दाखवायचे ऐश्वर्य होये.

धर्म राजा शितल, संयमी व शांत होता. कृष्ण सताच्याच ठिकाणी गेले. सत् सता मध्येच मिसळते. त्या पांच पांडवाना पाठीशी धरून महाभारत रचले. ज्याला प्रत्यक्ष भगवंत तारी त्याला कोण मारी. पण याचवेळी कृष्णाने राजकारण सुरू केले. शेवटी धर्माची समजूत केली. त्यातील भीमाला फक्त गदाच माहिती होती. त्याच्याजवळ शक्ति भरपूर होती. भीम कृष्णाला म्हणाला, दुर्योधन कृष्णाचा अपमान करील. पण कृष्ण म्हणाले, मला मान नाही अन् अपमानही नाही. नंतर कुंतीची समंती घेऊन ते गेले.
                                 (क्रमश:)

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

हरीविजय

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
हरीविजय नाव पडण्याचे कारण म्हणजे कृष्णावतारामध्ये त्यांनी लाघवी तऱ्हा केलेली आहे. तू एक तर मी दुप्पट.

कृष्णाने अवतारामध्ये काय केले. वासुदेव व देवकी यांच्या लग्नाच्यावेळी कंसाने आकाशवाणी ऐकून आपल्या बहिणीला खाली पाडली. तेथे नारद हजर झाला. कंस म्हणाला, "हिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो माझा वध करणार म्हणून हिचा वध करतो." नारद म्हणाले, "अरे कंसा बुद्धिमान असून तू मुर्ख कसा? आताच तू पापाचा धनी का होतोस?" तरी त्याने तिला बंदिशाळेत टाकली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिळेवर आपटायचा.

शेवटी एक बालक येण्यापूर्वीच देवकीला कृष्ण दिसला. ती कृष्णमय झाली होती. तिने लहान बालक पाहिले. नंतर ज्यावेळी शुद्धीवर आली त्यावेळी आकाशवाणी झाली "तुम्ही घाबरू नका. तुम्ही याला गोकुळात यमुनापार ठेवा."

तेव्हा वसुदेवांनी धीर केला. कृष्णाच्या स्पर्शाने बंदिशाळा उघडली. तोपर्यंत कोणाला जाग आली नाही. सर्व शांत. यमुना दुथडी भरून वहात होती. तेव्हा परत आकाशवाणी झाली "तू घाबरू नको."

बालकाचे पाय पाण्याला लागताच ती दुभंग पावली. त्यावेळी नंदाची मुलगी मृत अवस्थेत असलेली वसुदेवांनी आणली व मुलाला तेथे ठेवले.

नंतर कंसाला मुल झाल्याचे कळले. परमेश्वर कसे सूत्रधार आहेत पहा? तो रागाने तिला आपटणार तोच झटक्यात ती कडकडली, "हे पाप्या तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे."

हिच ती अबुनिवासीनी देवी होय. हिच स्थिर राहिली आहे. त्यावेळी कंस हताश झाला. यदुकुलोत्पन्न कंस होता. कृष्णाला ठार मारण्यासाठी त्याने लाघवांनी माणसे पाठवली पण त्यात त्याला यश आले नाही. परंतु त्या बालस्वरूपाला सर्व गती होती. नंतर यदुकुलात कृष्ण वाढू लागले.

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

*भक्ति*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

आपला भक्ति मार्ग निराळा आहे. अध्यात्मिक केंद्राच्या अनुसंधनाने, त्यामुळे सर्व समान पातळीने वागायचे. ध्यानधारणा गती व अखंड ज्ञान.

आपल्याला त्या ठिकाणी जाण्यास प्रकाश अनुभवावा लागतो. दृष्टी नासाग्री ठेवून बसावे लागते. कारण मन एकाग्र रहाण्यासाठी. दृष्टी उघडी ठेवून सुद्धा ध्यान करता येते. म्हणजेच ती केवळ प्रकाशित ज्योत पाहिजे. ते आपोआप दृष्टी फेकणार!

आपल्या भक्ति मार्गात आपण कोणत्या हेतूने बसतो. तुम्ही मला ओळखून घ्या अन् तीच मुर्ती डोळ्यासमोर ठेवून नामस्मरण करायचे. ते आपोआप होत असते व स्थिर होता येते. आपल्या आसनाचा भक्तिमार्ग असा आहे.

24 तासातून काही वेळ समर्थ चरणात घालवावा, ध्यानधारणा झाल्याशिवाय पूजेला अर्थ नाही. आपल्या घरीसुद्धा आपल्याला ध्यान करता येते. तो वेळ तुमचा परमेश्वराच्या ठिकाणी रूजू होतो, एरवी नाही. त्यांची पहाणी बरोबर असते. तुम्ही त्यांना बनवायचा प्रयत्न केला तरी ते बनायचे नाहीत.

सत् तत्व प्रेमळ आहे पण तितकेच वज्रापेक्षाही कठीण आहे. सद्गुरु वेळप्रसंगी लाघव का करतात? अनाठायी कोणावर लाघव करणार नाहीत. पण ही ज्योत चार तत्त्वांच्या निराळ्या गतीने चालल्यास ते लाघव करतात. एकदा समर्थांनी लाघव केले तर पूर्ण क्षमा केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी त्याला चुका सांगाव्या लागतात. वर वर चुका तसे वर वर क्षमा! लाघव हे फार निराळे आहेत. ते सेवेक-याला कासावीस करून सोडतात.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

*वाल्मिकी ऋषी*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

वाल्या कोळी खून करीत असे. तत्पूर्वी ती ब्राह्मण कुलोत्पन्न ज्योत होती. पण ती चुकली.

ब्राह्मण कुणाला म्हणावे? "ब्रम्ह जाणे इति ब्राह्मण:"

मनाच्या व्यापाराची खिन्नता झाली.

ज्योत चारी तत्त्वांच्या चाकोरीबाहेर गेली कि भगवंत त्याच्यावर लक्ष देतात. पण वाल्या बायको मुलांचे पोषण करण्यासाठी खून करीत असे. हे पाहून श्रीहरीना विचार पडला कि ज्योत फार अघोरी कामे करीत आहे.

शेवटी नारदांचे व श्रीहरींचे खलबत झाले. नारद म्हणाले, "तुमचे त्या ज्योतीवर फार लक्ष आहे". तेव्हा श्रीहरी म्हणाले "नारदा तू तेथे जा". तेव्हा नारद निघाले. ते तंबोरा व माळ यासह होते. वाल्याला दोन दिवस सावज मिळाले नव्हते. पण तिसऱ्या दिवशी वाल्याला नारद दिसले. त्याने आपली फरशी उगारली. तेव्हा नारद म्हणाले, "माझ्याजवळ काही नाही". पण वाल्याला फक्त मायेशिवाय दूसरे काही दिसत नव्हते. नारदांनी विचारले "तू हे कशासाठी करतोस?" तो म्हणाला, "माझ्या बायको-मुलांचे पोट भरण्यासाठी". तर मग आजपर्यंत जे पाप केलेस ते कोण भरणार? त्यावर वाल्या म्हणाला, "तीच भरतील."

नारद धीरोदत्त होते. नारदांनी सर्व सहन केले. ते म्हणाले मी उभा राहतो. हे तुझे पापाचे प्रायश्चित्त कोण भोगील ते तुझ्या माणसांना विचारून ये?

श्रीहरीनी लाघवांनी नटविल्यावर वाल्याला विचार पडला व तो आपल्या घरी गेला व पत्नीला म्हणाला, "मी एवढे खून केले. "पत्नी म्हणाली त्या पापाचा वाटा मी घेणार नाही". मुलांनी पण तेच उत्तर दिले.

मग वाल्या विचारात पडला. मी ही पापे मुलाबाळांसाठी केली पण पापाचा वाटेकरी मीच! तो तेथेच बसून रडू लागला. नारदांनी सांगितले म्हणून तो तेथे गेला होता. नारद म्हणाले,"आता तुझी कुऱ्हाड माझ्यावर चालव".

पश्चाताप होणे हेच खरे! नंतर वाल्या त्यांना शरण गेला व म्हणाला, "मला क्षमा करा." नारद म्हणाले, "ज्याचे त्यानेच भोगायचे. तू कसा काय मुक्त होणार?"

"त्यासाठी तुम्ही मला काही सांगा" असे वाल्या म्हणाला. नारद म्हणाले, "एक मंत्र आहे." नारदांनी त्याला "मरा" हा मंत्र दिला. मरा मरा राम राम हा मंत्र लयबद्ध स्थितीने जपता जपता, हा जप करत असता तद्नंतर त्यातून "राम" हा ध्वनी निर्माण झाला.

कित्येक वर्षे लोटली, श्रीहरी नारदांना म्हणाले, "तू कोणाला अनुग्रह दिला आहेस का?" आठवून तरी पहा. शिष्याबद्दल तू शंका का घेतोस?

नारदांनी विचार केला. त्यांना रामनामाचा ध्वनी ऐकू आला. त्याच्यावर वारूळ चढले होते. त्यावेळी तो अस्थिमय झाला होता. पण चैतन्यमय होता. तो समाधित गुंग होता.

नारदाचे बोल ऐकले अन् त्याने पाय धरले. नारदांनी त्यांना चेतना शक्ति दिली अन् म्हणाले, *"तू वाल्या नसून वाल्मिकी झालास"*

तुम्ही माझे सद्गुरु आहात. तुमची कृपा म्हणून मला हे पद मिळाले. *वाल्याने रामावतार होण्याआधी रामायण लिहिले.* आत्मदर्शन असल्याने वदघट असते.

"समर्थ भक्तिने मानव गेल्यास त्याच्या पापाच्या राशी नाश पावतील. पण ठाम श्रध्दा व समर्थ आदेशानुसार तुमचे वागणे असेल तर!"

यातून घेण्यासारखे म्हणजे खूनी मनुष्य देखील उध्दरीला जातो. सद्गुरूंनी मानवाला जर कोणते कार्य करू नको म्हटले व त्याने ते केले तर तो मानवाचा दोष आहे.

झाले गेले गंगेला अर्पण करायचे. आत्मदर्शन प्रकाशाखेरीज मिळणार नाही. एकचित्त होण्यासाठी सद्वर्तनाची चाकोरी पाहिजे. सत् कृपेच्या साह्याने समाधी लागते.

सर्व संत म्हणतात, "सद्गुरु हे परम् निदान आहे. ते असूनही अलिप्त आहेत."

हे सताचे आसन आहे. *प्रत्येक ज्योतीने आपले आचरण सत् शुद्ध ठेवले पाहिजे.* शंकेला थारा द्यायचा नाही. बाहेर अघोर कार्य करणारे मानव आहेत, त्यांच्या पासून दूर रहायचे.

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी

*सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली।*
*निजवस्तु दावीली माझी मला ।।*
*माझे सुख मज दावीयेले डोळा ।।*
*दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ।।*
(नामदेव महाराज)

सद्गुरूंची कृपा झाल्यावर आपल्याला खरे ज्ञान मिळते.

*डोळीयाचा डोळा उघडीला जेणे ।*
*आनंदाचे लेणे देवविले।।*
*नामदेव म्हणे निक्की सापडली सोय ।*
*कदा न विसंबे पाय खेचरांचे ।।*

सद्गुरु म्हणजे काय हे नामदेवाला कळले.
सद्गुरु हे परम् तत्व आहे. त्या येसू खेचरांचे पाय मी विसरणार नाही. ज्यांच्या कृपेने मी पहातो तेच ते सत् !

त्यांचे अभंग श्रेष्ठ प्रतिचे आहेत. सद्गुरूंनी नामदेवाचा कस पाहिला.

संत धनाचे लोभी नाहीत. ते धनाची किंमत कवडी समजतात. सद्गुरु ध्यान हिच संपत्ती होय.

विठ्ठल म्हणाले, "नाम्या ! तुझे लग्न करायचे  आहे. तुला मुलगी कोण देणार? ती मुलगी सावकाराची पाहिजे. नाम्या म्हणायचा, माझे विठ्ठल आहेत.

श्रीहरीने मारूतीला आदेश दिले व त्याला बैल केले आणि नाम्या त्यावर बसला. मारूती बैल रूपाने होता. तो आरध्याच्या वाटेवर बसला. तेव्हा सावकाराची बायको नवर्‍यावर चिडली. हे पाहिल्यावर नाम्याने विठ्ठलाची आळवणी केली. त्यावेळी विठ्ठल निद्रिस्त होते. त्यानी ऐकले. अब्रू जाण्याची वेळ! तेव्हा रुक्मिणीसह, गणपतीसह निघाले. गणपतीबरोबर उंदीरही निघाले. सावकाराच्या घरी उंदराना पाठवून तेथील सर्व वस्तू नष्ट केल्या.

शेवटी विठ्ठलांनी रूप पालटले व नाम्याजवळ गेले. सावकाराला म्हणाले, "हे माझे चिरंजीव! नाम्याचे पारडे जड होते. सावकाराला नाम्याने सांगितले कि यांना शरण जा. त्यावेळी ते शरण गेले. नंतर विठ्ठल तेथून निघून गेले. पण विठ्ठलांनी लाघवांनी नाम्याचे घर सोनेरी केले.

नाम्याची बायको सज्जन होती. पांडुरंग भक्ताची लाज राखतो. सद्गुरु सेवेक-यासाठी सर्वस्व पणाला लावतात.

नामदेव हा आमच्या सारखाच मानव! पण भगवंताने त्याच्यासाठीच का यावे?
नामदेव तळमळीचा सेवेकरी होता. त्याला त्याच्या भगवंताशिवाय त्रिभूवनात काही दिसत नव्हते. म्हणून तो सद्गुरूंना आवडत होता. सद्गुरूंची इज्जत तीच आपली इज्जत सेवेक-यांनी समजावी.
टायपिंग: श्री सुभाष भोसले