शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

      कृष्ण शिष्ठतेसाठी आले असता दुर्योधन उच्च स्थानी बसले होते. त्यावेळी कृष्ण म्हणाले, "मी शिष्ठतेसाठी आलो आहे. तुम्ही समान दोन भाग करून महायुद्ध आटपा. पण त्या पांडवाना सुईच्या टोकाइतकीसुध्दा जमीन मिळणार नाही", असे कौरव म्हणाले.

इतका अपराध झाला तरी कृष्ण सहन करीत होते. भीम हा फक्त आईला (कुंतीला) मान द्यायचा. कृष्ण विचार करीत बसले. ते दुर्योधनाला म्हणाले, "दुर्योधना तू विचार कर. तुझे म्हणने चौकटीत बसत नाही." दुर्योधन धर्माला म्हणाला, "तुझे काय मत आहे?" तेव्हा धर्म म्हणाला, "ते कृष्ण सांगेल." तेव्हा कृष्ण म्हणाला, "यामध्ये तुला कोण पुण्यवान दिसतो का?"

धर्माला पापी बनविणारा दुर्योधन, तोच पापी होता. तेव्हा त्याला सर्व पापी दिसत होते. धर्म म्हणाला, "सर्व पुण्यवान व दुर्योधन सुध्दा पुण्यवान."

ज्याचे आचार विचार सत् त्याला सतच दिसणार. कृष्ण मात्र नाराज झाले. पुढे महान अवर्षण होणार हे माहित होते.
                              (क्रमश:)

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
तिने आपल्याला जन्म दिला. तिने सर्व कष्ट काढले. मातापित्यांचा वाईट गतीने उध्दार करणे पाप आहे.

सताने कालीयाचा सुध्दा नाश केला. अघोरांचा निपा:त करण्यासाठी सत् जन्माला येते. *सत् हेच कृष्ण व कृष्ण हेच सर्वस्व होय.*

परब्रह्म तत्व असल्याने त्यांना सर्व जाणीव होती. शेष हाच बलदेव. हे दोघेजण कंसाला भेटायला कंसाचे अपराध पूर्ण झाल्यानंतर गेले. त्यावेळी यशोदेला वाईट वाटले. तेव्हा त्यांची समजूत केली. शेवटी ते मथुरेला पोहोचले.

कंसाने अनितीने अपराध चालविले होते. कंसाने कृष्णाला पूर्ण ओळखले होते. पण कंस डावपेच करायचा. अनितीने कारभार करताना कृष्णाने भर गादिवरून ओढून आणून मुठीने मारले.

परब्रह्म शक्ति बरोबर मानव काय मुकाबला करणार? त्याचे ते राज्य कृष्णाने, माझे न म्हणता एका सात्विक ज्योतीला देऊन टाकले व निघाले.

याप्रमाणे आपले सेवेकरी उदारमतवादी पाहिजेत. *"साधेपणा पण उदात्त विचार"*

कृष्ण मायेचा आसुसलेला नव्हता. कंसाला मारल्यानंतर दुसरे नातलग होते. शेवटी बहिणीला म्हणाले 101 अपराध झाले कि माझ्याजवळ असलेले अस्त्र गप्प बसणार नाही. (जरासंध), मुचकुंदाला मारले व ते महाभारतात गेले.

खरोखर कृष्ण वेडा नव्हता. परंतु त्यांनी पाच पांडवांशी संगत केली. पांडवांकडे सत् ऐश्वर्य होते. परंतु कौरवांकडे दाखवायचे ऐश्वर्य होये.

धर्म राजा शितल, संयमी व शांत होता. कृष्ण सताच्याच ठिकाणी गेले. सत् सता मध्येच मिसळते. त्या पांच पांडवाना पाठीशी धरून महाभारत रचले. ज्याला प्रत्यक्ष भगवंत तारी त्याला कोण मारी. पण याचवेळी कृष्णाने राजकारण सुरू केले. शेवटी धर्माची समजूत केली. त्यातील भीमाला फक्त गदाच माहिती होती. त्याच्याजवळ शक्ति भरपूर होती. भीम कृष्णाला म्हणाला, दुर्योधन कृष्णाचा अपमान करील. पण कृष्ण म्हणाले, मला मान नाही अन् अपमानही नाही. नंतर कुंतीची समंती घेऊन ते गेले.
                                 (क्रमश:)

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

हरीविजय

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
हरीविजय नाव पडण्याचे कारण म्हणजे कृष्णावतारामध्ये त्यांनी लाघवी तऱ्हा केलेली आहे. तू एक तर मी दुप्पट.

कृष्णाने अवतारामध्ये काय केले. वासुदेव व देवकी यांच्या लग्नाच्यावेळी कंसाने आकाशवाणी ऐकून आपल्या बहिणीला खाली पाडली. तेथे नारद हजर झाला. कंस म्हणाला, "हिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो माझा वध करणार म्हणून हिचा वध करतो." नारद म्हणाले, "अरे कंसा बुद्धिमान असून तू मुर्ख कसा? आताच तू पापाचा धनी का होतोस?" तरी त्याने तिला बंदिशाळेत टाकली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिळेवर आपटायचा.

शेवटी एक बालक येण्यापूर्वीच देवकीला कृष्ण दिसला. ती कृष्णमय झाली होती. तिने लहान बालक पाहिले. नंतर ज्यावेळी शुद्धीवर आली त्यावेळी आकाशवाणी झाली "तुम्ही घाबरू नका. तुम्ही याला गोकुळात यमुनापार ठेवा."

तेव्हा वसुदेवांनी धीर केला. कृष्णाच्या स्पर्शाने बंदिशाळा उघडली. तोपर्यंत कोणाला जाग आली नाही. सर्व शांत. यमुना दुथडी भरून वहात होती. तेव्हा परत आकाशवाणी झाली "तू घाबरू नको."

बालकाचे पाय पाण्याला लागताच ती दुभंग पावली. त्यावेळी नंदाची मुलगी मृत अवस्थेत असलेली वसुदेवांनी आणली व मुलाला तेथे ठेवले.

नंतर कंसाला मुल झाल्याचे कळले. परमेश्वर कसे सूत्रधार आहेत पहा? तो रागाने तिला आपटणार तोच झटक्यात ती कडकडली, "हे पाप्या तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे."

हिच ती अबुनिवासीनी देवी होय. हिच स्थिर राहिली आहे. त्यावेळी कंस हताश झाला. यदुकुलोत्पन्न कंस होता. कृष्णाला ठार मारण्यासाठी त्याने लाघवांनी माणसे पाठवली पण त्यात त्याला यश आले नाही. परंतु त्या बालस्वरूपाला सर्व गती होती. नंतर यदुकुलात कृष्ण वाढू लागले.

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

*भक्ति*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

आपला भक्ति मार्ग निराळा आहे. अध्यात्मिक केंद्राच्या अनुसंधनाने, त्यामुळे सर्व समान पातळीने वागायचे. ध्यानधारणा गती व अखंड ज्ञान.

आपल्याला त्या ठिकाणी जाण्यास प्रकाश अनुभवावा लागतो. दृष्टी नासाग्री ठेवून बसावे लागते. कारण मन एकाग्र रहाण्यासाठी. दृष्टी उघडी ठेवून सुद्धा ध्यान करता येते. म्हणजेच ती केवळ प्रकाशित ज्योत पाहिजे. ते आपोआप दृष्टी फेकणार!

आपल्या भक्ति मार्गात आपण कोणत्या हेतूने बसतो. तुम्ही मला ओळखून घ्या अन् तीच मुर्ती डोळ्यासमोर ठेवून नामस्मरण करायचे. ते आपोआप होत असते व स्थिर होता येते. आपल्या आसनाचा भक्तिमार्ग असा आहे.

24 तासातून काही वेळ समर्थ चरणात घालवावा, ध्यानधारणा झाल्याशिवाय पूजेला अर्थ नाही. आपल्या घरीसुद्धा आपल्याला ध्यान करता येते. तो वेळ तुमचा परमेश्वराच्या ठिकाणी रूजू होतो, एरवी नाही. त्यांची पहाणी बरोबर असते. तुम्ही त्यांना बनवायचा प्रयत्न केला तरी ते बनायचे नाहीत.

सत् तत्व प्रेमळ आहे पण तितकेच वज्रापेक्षाही कठीण आहे. सद्गुरु वेळप्रसंगी लाघव का करतात? अनाठायी कोणावर लाघव करणार नाहीत. पण ही ज्योत चार तत्त्वांच्या निराळ्या गतीने चालल्यास ते लाघव करतात. एकदा समर्थांनी लाघव केले तर पूर्ण क्षमा केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी त्याला चुका सांगाव्या लागतात. वर वर चुका तसे वर वर क्षमा! लाघव हे फार निराळे आहेत. ते सेवेक-याला कासावीस करून सोडतात.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

*वाल्मिकी ऋषी*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

वाल्या कोळी खून करीत असे. तत्पूर्वी ती ब्राह्मण कुलोत्पन्न ज्योत होती. पण ती चुकली.

ब्राह्मण कुणाला म्हणावे? "ब्रम्ह जाणे इति ब्राह्मण:"

मनाच्या व्यापाराची खिन्नता झाली.

ज्योत चारी तत्त्वांच्या चाकोरीबाहेर गेली कि भगवंत त्याच्यावर लक्ष देतात. पण वाल्या बायको मुलांचे पोषण करण्यासाठी खून करीत असे. हे पाहून श्रीहरीना विचार पडला कि ज्योत फार अघोरी कामे करीत आहे.

शेवटी नारदांचे व श्रीहरींचे खलबत झाले. नारद म्हणाले, "तुमचे त्या ज्योतीवर फार लक्ष आहे". तेव्हा श्रीहरी म्हणाले "नारदा तू तेथे जा". तेव्हा नारद निघाले. ते तंबोरा व माळ यासह होते. वाल्याला दोन दिवस सावज मिळाले नव्हते. पण तिसऱ्या दिवशी वाल्याला नारद दिसले. त्याने आपली फरशी उगारली. तेव्हा नारद म्हणाले, "माझ्याजवळ काही नाही". पण वाल्याला फक्त मायेशिवाय दूसरे काही दिसत नव्हते. नारदांनी विचारले "तू हे कशासाठी करतोस?" तो म्हणाला, "माझ्या बायको-मुलांचे पोट भरण्यासाठी". तर मग आजपर्यंत जे पाप केलेस ते कोण भरणार? त्यावर वाल्या म्हणाला, "तीच भरतील."

नारद धीरोदत्त होते. नारदांनी सर्व सहन केले. ते म्हणाले मी उभा राहतो. हे तुझे पापाचे प्रायश्चित्त कोण भोगील ते तुझ्या माणसांना विचारून ये?

श्रीहरीनी लाघवांनी नटविल्यावर वाल्याला विचार पडला व तो आपल्या घरी गेला व पत्नीला म्हणाला, "मी एवढे खून केले. "पत्नी म्हणाली त्या पापाचा वाटा मी घेणार नाही". मुलांनी पण तेच उत्तर दिले.

मग वाल्या विचारात पडला. मी ही पापे मुलाबाळांसाठी केली पण पापाचा वाटेकरी मीच! तो तेथेच बसून रडू लागला. नारदांनी सांगितले म्हणून तो तेथे गेला होता. नारद म्हणाले,"आता तुझी कुऱ्हाड माझ्यावर चालव".

पश्चाताप होणे हेच खरे! नंतर वाल्या त्यांना शरण गेला व म्हणाला, "मला क्षमा करा." नारद म्हणाले, "ज्याचे त्यानेच भोगायचे. तू कसा काय मुक्त होणार?"

"त्यासाठी तुम्ही मला काही सांगा" असे वाल्या म्हणाला. नारद म्हणाले, "एक मंत्र आहे." नारदांनी त्याला "मरा" हा मंत्र दिला. मरा मरा राम राम हा मंत्र लयबद्ध स्थितीने जपता जपता, हा जप करत असता तद्नंतर त्यातून "राम" हा ध्वनी निर्माण झाला.

कित्येक वर्षे लोटली, श्रीहरी नारदांना म्हणाले, "तू कोणाला अनुग्रह दिला आहेस का?" आठवून तरी पहा. शिष्याबद्दल तू शंका का घेतोस?

नारदांनी विचार केला. त्यांना रामनामाचा ध्वनी ऐकू आला. त्याच्यावर वारूळ चढले होते. त्यावेळी तो अस्थिमय झाला होता. पण चैतन्यमय होता. तो समाधित गुंग होता.

नारदाचे बोल ऐकले अन् त्याने पाय धरले. नारदांनी त्यांना चेतना शक्ति दिली अन् म्हणाले, *"तू वाल्या नसून वाल्मिकी झालास"*

तुम्ही माझे सद्गुरु आहात. तुमची कृपा म्हणून मला हे पद मिळाले. *वाल्याने रामावतार होण्याआधी रामायण लिहिले.* आत्मदर्शन असल्याने वदघट असते.

"समर्थ भक्तिने मानव गेल्यास त्याच्या पापाच्या राशी नाश पावतील. पण ठाम श्रध्दा व समर्थ आदेशानुसार तुमचे वागणे असेल तर!"

यातून घेण्यासारखे म्हणजे खूनी मनुष्य देखील उध्दरीला जातो. सद्गुरूंनी मानवाला जर कोणते कार्य करू नको म्हटले व त्याने ते केले तर तो मानवाचा दोष आहे.

झाले गेले गंगेला अर्पण करायचे. आत्मदर्शन प्रकाशाखेरीज मिळणार नाही. एकचित्त होण्यासाठी सद्वर्तनाची चाकोरी पाहिजे. सत् कृपेच्या साह्याने समाधी लागते.

सर्व संत म्हणतात, "सद्गुरु हे परम् निदान आहे. ते असूनही अलिप्त आहेत."

हे सताचे आसन आहे. *प्रत्येक ज्योतीने आपले आचरण सत् शुद्ध ठेवले पाहिजे.* शंकेला थारा द्यायचा नाही. बाहेर अघोर कार्य करणारे मानव आहेत, त्यांच्या पासून दूर रहायचे.

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी

*सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली।*
*निजवस्तु दावीली माझी मला ।।*
*माझे सुख मज दावीयेले डोळा ।।*
*दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ।।*
(नामदेव महाराज)

सद्गुरूंची कृपा झाल्यावर आपल्याला खरे ज्ञान मिळते.

*डोळीयाचा डोळा उघडीला जेणे ।*
*आनंदाचे लेणे देवविले।।*
*नामदेव म्हणे निक्की सापडली सोय ।*
*कदा न विसंबे पाय खेचरांचे ।।*

सद्गुरु म्हणजे काय हे नामदेवाला कळले.
सद्गुरु हे परम् तत्व आहे. त्या येसू खेचरांचे पाय मी विसरणार नाही. ज्यांच्या कृपेने मी पहातो तेच ते सत् !

त्यांचे अभंग श्रेष्ठ प्रतिचे आहेत. सद्गुरूंनी नामदेवाचा कस पाहिला.

संत धनाचे लोभी नाहीत. ते धनाची किंमत कवडी समजतात. सद्गुरु ध्यान हिच संपत्ती होय.

विठ्ठल म्हणाले, "नाम्या ! तुझे लग्न करायचे  आहे. तुला मुलगी कोण देणार? ती मुलगी सावकाराची पाहिजे. नाम्या म्हणायचा, माझे विठ्ठल आहेत.

श्रीहरीने मारूतीला आदेश दिले व त्याला बैल केले आणि नाम्या त्यावर बसला. मारूती बैल रूपाने होता. तो आरध्याच्या वाटेवर बसला. तेव्हा सावकाराची बायको नवर्‍यावर चिडली. हे पाहिल्यावर नाम्याने विठ्ठलाची आळवणी केली. त्यावेळी विठ्ठल निद्रिस्त होते. त्यानी ऐकले. अब्रू जाण्याची वेळ! तेव्हा रुक्मिणीसह, गणपतीसह निघाले. गणपतीबरोबर उंदीरही निघाले. सावकाराच्या घरी उंदराना पाठवून तेथील सर्व वस्तू नष्ट केल्या.

शेवटी विठ्ठलांनी रूप पालटले व नाम्याजवळ गेले. सावकाराला म्हणाले, "हे माझे चिरंजीव! नाम्याचे पारडे जड होते. सावकाराला नाम्याने सांगितले कि यांना शरण जा. त्यावेळी ते शरण गेले. नंतर विठ्ठल तेथून निघून गेले. पण विठ्ठलांनी लाघवांनी नाम्याचे घर सोनेरी केले.

नाम्याची बायको सज्जन होती. पांडुरंग भक्ताची लाज राखतो. सद्गुरु सेवेक-यासाठी सर्वस्व पणाला लावतात.

नामदेव हा आमच्या सारखाच मानव! पण भगवंताने त्याच्यासाठीच का यावे?
नामदेव तळमळीचा सेवेकरी होता. त्याला त्याच्या भगवंताशिवाय त्रिभूवनात काही दिसत नव्हते. म्हणून तो सद्गुरूंना आवडत होता. सद्गुरूंची इज्जत तीच आपली इज्जत सेवेक-यांनी समजावी.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

समाधी


सतचरण हीच मुक्ती...!!! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

सद्गुरू प्रिय ज्योत ती असते जी सदोदित सद्गुरू दर्शनात असते, सद्गुरुंच्या प्रणवांचे पालन करणारी ज्योत. सद्गुरू कडून ज्ञान घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करून ज्ञान वाढवणारी ज्योत.

पांचवा प्रणव ज्या भक्तांना, ज्या सेवेकऱ्यांना प्रगट असेल त्यालाच म्हणायचे सद्गुरू दर्शन ! सद्गुरू दर्शन हीच मुक्ती !

चारी वेद जेथे मौनावले तेथे मग चारी मुक्ती कुठे शिलक राहिल्या ?

स्थुलातुन सूक्ष्म, सूक्ष्मातून कारण, कारणातून महाकारण देह म्हणजे तेजोमय स्थिती.

ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर आपण चारी देहाचे व्यवहार करू शकतो. या चार देहातून ती ज्योत मुक्त होऊ शकते. कशामुळे? तर सद्गुरूमय झाल्यामुळे.

चारी मुक्तीच्या पलीकडचे सद्गुरू तत्व आहे. अविनाशी परम् तत्व जर प्रगट झाले अन त्यांच्या दर्शनात तुम्ही तादात्म्य झालात मग स्थूल राहील कोठे? सूक्ष्म राहील कोठे ? कारण राहील कोठे ? महाकारण राहील कोठे ? अशा ज्योतीला देहभान रहात नाही. तेथेच समाधी लागते.

समाधी म्हणजे त्या अनंताच्या शुभ्रप्रकाशाशी ज्योतिर्मय होणे अर्थात स्वतःचे जडत्व आपण विसरणे. जाणीव रहित होणे. तटस्थ होऊन त्या स्थितीत रममाण होणे. यालाच समाधी म्हणतात ! जवळ जवळ मृत्यूसमान त्याची गती असते. त्याचा जीव त्रिकुटीत अविनाशाशी लयबद्ध होऊन ब्रह्मांडी लय असतो. मग मुक्ती राहिली कोठे ? सतचरण आहेत तीच मुक्ती !
प पू सदगुरु बाबांच्या चारी मुक्ती म्हणजे , सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळविणे या प्रवचनातील एक भाग
टायपिंग:श्री रविंद्र वेदपाठक

*नामदेव महाराज*2

नामदेवाचे व्यवहार मायावी होते. विठ्ठलाना विचार पडला हा भोळा आहे. त्याला खरे दर्शन दिले नाही म्हणून ज्ञानेश्वरांना सांगितले.

ज्ञानेश्वरांनी नामदेवाला बोलावले व म्हणाले, "तुम्ही याचे कच्चे पक्के डोके पहा. गोराकाका तुम्ही याचे कच्चे, पक्के पहा."

त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मारण्यास सुरूवात केली. तेव्हा नाम्या म्हणाला, "गोराकाका, तुम्हाला अक्कल आहे कि नाही."

तेव्हा गोराकुंभार म्हणाला, "हा कच्चा आहे. तेथे अभिमान दिसला."

त्यातून मुक्ता नाम्याला म्हणाली, "चिडतोस का?"

तेव्हा नाम्या तिच्यावर चिडला अन् म्हणाला, "मी विठ्ठलाला विचारतो."

तो विठ्ठलाला म्हणाला, " मी तुमचा आवडता असताना या लोकांनी माझा अपमान केला. मला कच्चा म्हटले. तेव्हा तुम्हीच पहा."

विठ्ठलांनी त्याची समजुत केली. विठ्ठल म्हणाले, " मला तू खरा पाहिला नाहिस. खरे रूप पहाण्यासाठी सद्गुरु करावा लागतो."

तर नाम्या म्हणाला, "तुम्हीच सद्गुरूं!" तेव्हा विठ्ठल म्हणाले सद्गुरु केल्याशिवाय काही नाही. तू खेचर यांना शरण जा.

नाम्याने आवड्यानाथाच्या देवळात जाऊन येसू खेचर यांचा शोध केला. येसू खेचर हे पादत्राणे घालून देवळात लिंगावर पाय ठेवून झोपले होते. ते पाहून नाम्याला वाईट वाटले. त्याला राग आला. जोरजोराने येसू खेचराचे पाय धरून बाजूला ठेवी तर तेथे लिंग! शेवटी आपले चुकले म्हणुन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. शरण गेला. तेव्हा खेचर म्हणाले, "आता खरी पश्चा:ताप दग्ध झालेली ज्योत आहे." तेव्हा त्यांनी नाम्याला बोलावले व डोक्यावर हात टाकला म्हणजेच अनुग्रह दिला. नाम्याला गहिवरून आले. माझ्या कल्याणासाठी विठ्ठलांनी कस घेतला.
टायपिंग: श्री सुभाष भोसले