मनुष्य यत् किंचित मायावी तत्वासाठी पशु बनतो. हा संशय म्हणजे क्षणिक लोभासाठी. हे करणे बरे नाही. मायावी तत्वात गुरफटला कि ईश्वर तत्व निराळे राहते. ज्याठिकाणी भक्ति तेथे तो रममाण होतो. तेथे विशेष अडचणी काही नाही.
सर्वात सोपी म्हणजे भक्ति. तुमच्यात जे आहे ते ओळखायला पाहिजे.
ते म्हणाले, "माते तुझे प्रणव कायम. मी निघालो."
रामावर सर्वांची माया होती. त्या गडबडीत सीतेला सर्व कळले कि प्रत्यक्ष राम वनवासाला चालले आहेत. त्यांनी कुणाला सांगितले नव्हते. सीता म्हणाली, "तुम्ही जेथे, तेथे मी येणार!" ती म्हणाली, "जशा परिस्थितीत तुम्ही, तशा परिस्थितीत मी."
सीतेचे मनोधैर्य श्रेष्ठ होते. तीने काही गोष्टींचा विचार केला नाही. प्रत्यक्ष राजाला बाहेर गेल्यावर स्वत: सर्व करायला पाहिजे. परंतु तीने कष्टाचे सुख पत्करले. ज्याठिकाणी नवरा तेथे छायेने (पत्नीने) असावयास पाहिजे.
जनकानी सीतेला सर्व काही सांगितले होते. शेवटी पती हा माझा साक्षात परमेश्वर! सीता आदिमाया शक्ति होती. सर्वजण वनवासाला निघाले. करीत करीत राम नाशिक येथे पंचवटीला आले. त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे मठ आहे.
राक्षसांचा नि:पात करण्यासाठी दक्षिणेला जावे लागले. असे परम् तत्व असताचा नि:पात करण्यासाठी चालले होते. पण राक्षस किती लबाड व अघोर असतात. रावणाने मारीचाला मायावी हरीण बनवून सीतामाईला बनविण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या कातडीची मी वस्त्रे बनवीन.
पण लक्ष्मणाला माहित होते. राम हरिणीच्या मागे होते. पण रावणाने रामाची नक्कल केली कि, "मी संकटात सापडलो आहे, लक्ष्मणा धाऽऽव." तेव्हा सीता घाबरली. पण लक्ष्मणाने सांगितले, "आई तू शांत रहा." परंतु लक्ष्मणाला ती आडवे, तीडवे बोलू लागली. लक्ष्मणा आताच तुम्ही निघा. आई जातो म्हणून त्याने रेषा आखली अन् सांगितले कुणी भिक्षेला आले तर याच्या बाहेर पडू नकोस.
तेव्हा लबाड रावण साधु बनले. व भिक्षेला आले. रावण लांब उभे राहिले. सीतेला पेच पडला व सीता म्हणाली, "तुम्ही जवळ या, भिक्षा वाढायची आहे." वाढताना चुकून तीचा पाय रेषेबाहेर पडला व रावणाने तीला पकडली.
अनंताना हे घडवायचे होते. राम मारिचाला मारून परत आले अन् पहातात तर सीता नाही. रामाला सुध्दा गहिवरून आले. पण लक्ष्मण धीर गंभीर होता.
ते शोधत शोधत दंडकारण्यात फिरू लागले व सीता सीता म्हणून झाडांना कवटाळीत होते. त्याचवेळी सतपुरूषांचा उध्दार होत होता. त्याचवेळी पार्वती शंकराला म्हणाली, "मी नकली सीता बनते." तेव्हा शंकर म्हणाले, "मी राम कोण आहे हे ओळखतो. तू त्या भानगडीत पडू नकोस. तुझ्यामुळे मला त्रास होईल. सावध रहा."
शेवटी पार्वती आली. लक्ष्मण रामाच्या पाठीमागे होताच. पार्वती नकली सीता बनली व लांब उभी राहिली. राम प्रेमाने अश्रू गाळत होते. परंतु राम काही फसले नाहीत. त्यांनी सर्व पाहिले. राम जवळ आले तरी फसले नाहीत. त्यांनी ढुंकुनसुध्दा पाहीले नाही.
*"परस्त्री मातेसमान."* राम पूर्ण शुध्द होते. रामांनी मुद्दाम टाळले. नकली सीता म्हणाली, "हे प्रभो ! आपली सीता येथे असताना आपण असे काय करता?" राम उत्तरले, *"हे भवाने! तू मला बनवायला आलीस का?"* (तीच ती तुळजापूरची भवानी) "हा दाशरथी राम पत्नीला पागल नव्हता. तू काय कैलासपती भोलानाथ समजलीस."
तीने पतीचा धावा केला. रामाने तीची पूजा केली.
(क्रमश:)
सर्वात सोपी म्हणजे भक्ति. तुमच्यात जे आहे ते ओळखायला पाहिजे.
ते म्हणाले, "माते तुझे प्रणव कायम. मी निघालो."
रामावर सर्वांची माया होती. त्या गडबडीत सीतेला सर्व कळले कि प्रत्यक्ष राम वनवासाला चालले आहेत. त्यांनी कुणाला सांगितले नव्हते. सीता म्हणाली, "तुम्ही जेथे, तेथे मी येणार!" ती म्हणाली, "जशा परिस्थितीत तुम्ही, तशा परिस्थितीत मी."
सीतेचे मनोधैर्य श्रेष्ठ होते. तीने काही गोष्टींचा विचार केला नाही. प्रत्यक्ष राजाला बाहेर गेल्यावर स्वत: सर्व करायला पाहिजे. परंतु तीने कष्टाचे सुख पत्करले. ज्याठिकाणी नवरा तेथे छायेने (पत्नीने) असावयास पाहिजे.
जनकानी सीतेला सर्व काही सांगितले होते. शेवटी पती हा माझा साक्षात परमेश्वर! सीता आदिमाया शक्ति होती. सर्वजण वनवासाला निघाले. करीत करीत राम नाशिक येथे पंचवटीला आले. त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे मठ आहे.
राक्षसांचा नि:पात करण्यासाठी दक्षिणेला जावे लागले. असे परम् तत्व असताचा नि:पात करण्यासाठी चालले होते. पण राक्षस किती लबाड व अघोर असतात. रावणाने मारीचाला मायावी हरीण बनवून सीतामाईला बनविण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या कातडीची मी वस्त्रे बनवीन.
पण लक्ष्मणाला माहित होते. राम हरिणीच्या मागे होते. पण रावणाने रामाची नक्कल केली कि, "मी संकटात सापडलो आहे, लक्ष्मणा धाऽऽव." तेव्हा सीता घाबरली. पण लक्ष्मणाने सांगितले, "आई तू शांत रहा." परंतु लक्ष्मणाला ती आडवे, तीडवे बोलू लागली. लक्ष्मणा आताच तुम्ही निघा. आई जातो म्हणून त्याने रेषा आखली अन् सांगितले कुणी भिक्षेला आले तर याच्या बाहेर पडू नकोस.
तेव्हा लबाड रावण साधु बनले. व भिक्षेला आले. रावण लांब उभे राहिले. सीतेला पेच पडला व सीता म्हणाली, "तुम्ही जवळ या, भिक्षा वाढायची आहे." वाढताना चुकून तीचा पाय रेषेबाहेर पडला व रावणाने तीला पकडली.
अनंताना हे घडवायचे होते. राम मारिचाला मारून परत आले अन् पहातात तर सीता नाही. रामाला सुध्दा गहिवरून आले. पण लक्ष्मण धीर गंभीर होता.
ते शोधत शोधत दंडकारण्यात फिरू लागले व सीता सीता म्हणून झाडांना कवटाळीत होते. त्याचवेळी सतपुरूषांचा उध्दार होत होता. त्याचवेळी पार्वती शंकराला म्हणाली, "मी नकली सीता बनते." तेव्हा शंकर म्हणाले, "मी राम कोण आहे हे ओळखतो. तू त्या भानगडीत पडू नकोस. तुझ्यामुळे मला त्रास होईल. सावध रहा."
शेवटी पार्वती आली. लक्ष्मण रामाच्या पाठीमागे होताच. पार्वती नकली सीता बनली व लांब उभी राहिली. राम प्रेमाने अश्रू गाळत होते. परंतु राम काही फसले नाहीत. त्यांनी सर्व पाहिले. राम जवळ आले तरी फसले नाहीत. त्यांनी ढुंकुनसुध्दा पाहीले नाही.
*"परस्त्री मातेसमान."* राम पूर्ण शुध्द होते. रामांनी मुद्दाम टाळले. नकली सीता म्हणाली, "हे प्रभो ! आपली सीता येथे असताना आपण असे काय करता?" राम उत्तरले, *"हे भवाने! तू मला बनवायला आलीस का?"* (तीच ती तुळजापूरची भवानी) "हा दाशरथी राम पत्नीला पागल नव्हता. तू काय कैलासपती भोलानाथ समजलीस."
तीने पतीचा धावा केला. रामाने तीची पूजा केली.
(क्रमश:)